भाजपसाेबत जाण्याचा निर्णय दाेन ते तीन वेळा अंतिम झाला हाेता. मात्र नंतर भूमिका बदलण्यात आली असा गाैप्यस्फाेट करत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिल्यानंतर नगर विकास विभागाने मंगळवारी रात्री राज्यामधील अ, ब आणि क या वर्गवारी मधील नऊ आणि ड वर्गातील 19 महापालिकेंच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहे. मुंबई वगळता राज्यात इतरत्र चारचा प्रभाग होणार आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले असून, ती २०११ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात २०१७ मध्ये अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसारच नव्याने काही किरकोळ बदल करून ती रचना पुन्हा लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया सुरु केली असून, या प्रभाग रचनेवर आधारित निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करत मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. त्यांनी जाहीर केलं की, मुंबईतील सर्व लोकल ट्रेन लवकरच एसी (AC) केल्या जातील आणि त्यासाठी प्रवाशांकडून कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी झीशान अख्तरला कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.
जर तुम्ही दुर्तगती महामार्गावर गाडीने जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणण्याची तयारी करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अचानक शरद पवारांना बांगलादेशच्या नोबेल पारितोषिक विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याच्या विषयी कळवळा आला. त्या कळवळ्यातूनच पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला चढाविला.
देशात उडणाऱ्या बसेसचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या अगदी जवळ आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत सरकार सार्वजनिक वाहतुकीचे पूर्णपणे रूपांतर करण्यासाठी अनेक क्रांतिकारी प्रकल्पांवर काम करत आहे. यामध्ये हवाई बसेस, फ्लॅश चार्जिंग इलेक्ट्रिक बसेस आणि डोंगराळ राज्यांसाठी डबल-डेकर फ्लाइंग बसेस यांचा समावेश आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वर्धापन दिनीच गळती; जयंत पाटील देखील प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर पळती!!, अशी अवकाळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 व्या वर्धापनदिनी प्राप्त झाली. पक्षाच्या गळतीच्या आणि जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा छायेखालीच राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात बंदिस्त वातावरणात वर्धापन दिन साजरा करावा लागला.
ऑपरेशन सिंदूरवरील राजकारण थांबता दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूरवर विशेष सत्र बोलवण्याची गरज नाही. ही एक अतिशय संवेदनशील बाब आहे आणि त्यावर खुली चर्चा शक्य नाही. विरोधकांची अशी मागणी योग्य नाही.
एकीकडे सुप्रिया सुळे यांचे victim card, दुसरीकडे टीचर मधून अजितदादांवर वार आणि तरीही सत्तेच्या वळसणीला जायला पवारांची राष्ट्रवादी तयार!! असला प्रकार राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापन दिनी समोर आला.
मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकां जवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या अपघातामागचे कारण आणि त्यावरील उपाय योजना देखील त्यांनी सुचवल्या आहेत.
उठाव केल्यानंतर माझ्यावर दररोज आरोप झाले, पण मी आरोपांना उत्तर न देता कामातून उत्तर दिलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि महायुतीला २३२ जागा मिळाल्या,ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, टोमणेसम्राटांची मारणाऱ्यांची नाही असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
राष्ट्रवादीच्या पोस्टर रोगाची सैनिकांनाही लागण झाली आहे म्हणून ज्या पद्धतीने पोस्टर वर चढतात राष्ट्रवादीचे हौशी मुख्यमंत्री, त्याप्रमाणे सैनिक घडवतात ठाकरे बंधूंची युती असला प्रकार सगळ्या महाराष्ट्रात दिसून येतोय.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी म्हणाले की, जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याने, भाजप नेहमीच स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार आहे.
मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधी वाटपावरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. . या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप मंत्र्यांसह विरोधकांनी केला असून , या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून, लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागाचा निधी वळवलेला नाही, असा खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जागेसाठी प्रचंड आग्रह करत पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडी पणाला लावली होती. आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा विरोध असतानाही अट्टाहासाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र आता हेच चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकत शिंदे गटात दाखल होणार असल्याची घोषणा झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज औंध, पुणे येथे पर्यावरणपूरक, सुपर ई.सी.बी.सी आणि नेट झिरो संकल्पनेवर आधारित नवनिर्मित ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)’च्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन झाले.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका “मॅच फिक्सिंग” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना मी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील युतीबाबत मातोश्रीवर बैठक झाली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. मात्र या एकत्र येण्याने भारतीय जनता पक्षाला कुठलाही धोका नाही, असा ठाम विश्वास भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
देशात ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत असे म्हणत राहुल गांधी यांचे विधान म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा मानसिकतेचे उदाहरण आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांनीच केली घायकुती; मुख्य नेते निवांत आणि इतरांच्याच लुडबूडी!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App