शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना पोलिसांनी उध्वस्त केला यात दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली असून हॉटेल मालक मात्र फरार झाला.
महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना निर्लज्ज, विश्वासघातकी बाई असे म्हटले.संजय राऊत यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. यावर आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली. या चर्चेदरम्यान, महाराष्ट्र लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल तसेच राज्य शासन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून प्रशासन आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे.
फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा उठवल्यानंतर मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याबरोबर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भाषा झाली “सरळ” आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती पत्करली. पुण्यातल्या कृषी खात्यातल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या नाड्या कशा आवळल्या याचे वर्णन त्यांनी केले.
“पवार संस्कारित” माणसे मुकाटपणे कापताहेत सत्तेच्या सुमडीत कोंबड्या; “ठाकरे संस्कारित” माणसे काढताहेत एकमेकांच्या चड्ड्या!! हे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे आजचे चित्र आहे.
येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार असून दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. रविवारी विधानभवनात आयोजित विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणातले “हलके” आणि “जड” याची चर्चा महायुतीतल्या तथाकथित ताणतणावांमुळे मराठी माध्यमांमध्ये सुरू आहे.
भारताच्या आर्थिक विकासात सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्याच्या माध्यमातून देश 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल, असे केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांनी सांगितले. पुण्यातील जनता सहकारी बँक लिमिटेडच्या हीरक महोत्सव समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
अमरावीतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा आपल्या 15 सेकंद पोलिस हटवा, या वक्तव्यावरून अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हैदराबाद कोर्टाने नवनीत राणा यांना समन्स बजावला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटिस बजावली आहे.
सहकार क्षेत्रात प्रगती करत असताना सहकारी बँकांनी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे देत असताना या दोन्ही नेत्यांनी युद्धाचा ठामपणे इन्कार केला
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. आमच्या एका अभ्यासानुसार ही संख्या वर्षाला ३० ते ३५ लाख रुग्ण हे इतर राज्यातून येतात. याचा परिणाम म्हणजे या रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण संख्येमुळे, इथली व्यवस्था पार कोलमडली आहे आणि त्यामुळे मुंबईतील नागरिकांना उपचार मिळत नाहीत. हे चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा पुरावा म्हणून आधारकार्डावरील पत्त्याच्या आधारे रुग्णांना मुंबईतील सरकारी रुग्णलयात सेवा पुरवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली.
दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्चीत बसविले, त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला, याविषयी मराठी माध्यमांमध्ये सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना टोले हाणले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी प्रथम राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला पाहिजे असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे मत आहे, असे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. माहीम विधानसभेला अमित यांचा पराभव झाला होता. मनसेच्या विधानसभा अध्यक्षांची एक बैठक अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात त्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपात (कलम ४२०) दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला.
राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटीरुपयांचा घोटाळा झाला आहे.वाल्मीक कराडने निविदा ठरवल्या,महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोपभाजप आमदार सुरेश धस यांनीकेला. गुरुवारी आष्टीत त्यांनीपत्रपरिषद घेतली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचाअधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनीस्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देतनाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडे पैसा, पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे. तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे. पण हा माणूस एवढा हपापल्याला आहे की त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.
मराठा मुलीशी विवाह केल्यामुळे दलित तरुण विक्रम गायकवाड यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.22 फेब्रुवारी,) भोर तालुक्यातील उत्रोली या गावात भेट देऊन ऑनरकिलिंग चा बळी ठरलेल्या दिवंगत विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांची आपण सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
कुठल्याही गरजू महिलेचे नाव लाडकी बहिण योजनेतून कमी केलेले नाही.योजनेसाठी जी महिला पात्र आहे तिला आम्ही लाभापासून कधीच वंचित ठेवणार नसल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात यावे यासाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. त्यामुळे घाबरून अजित पवार गटात प्रवेश केला होता, असा धक्कादायक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजित पवार यांनी केला आहे.
बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आला पुन्हा “लकवा”; नेत्यांच्या वक्तव्यातून दिसली हतबलता!!प्रकाश आंबेडकरांनी आज बऱ्याच दिवसांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना लकवा झाल्याचा आरोप केला.
दिशा चुकू देऊ नका, भागवतांनी केले भाषण; पण “पवार संस्कारितांचे” कारनामे आलेत संघ संस्कारितांच्या अंगलट!!, असेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकार बाबत घडताना दिसले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App