मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुखांची निवड केली असून, बीड जिल्ह्यातही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस यांची, तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर धस आणि मुंडे यांच्यात उफाळून आलेला वाद सर्वांनी पाहिला होता, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे काम करण्यासाठी या दोन्ही नेत्यांना एकत्रितपणे जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी झाले वेगळे, आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र!!, हा राजकीय प्रकार पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादी मधून समोर आला आहे. महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक झाली तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी करायचा अधिकार स्थानिक नेतेमंडळींनाच देण्यात आला
फडणवीस – शिंदे – फडणवीस असे आलटून पालटून मुख्यमंत्री; पवार काका पुतण्यांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!!, हा प्रकार आज कोल्हापूरमध्ये घडला.
शिंदेंच्या सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवृत्तीची लागण; मुख्यमंत्री पदासाठी नुसतीच सुरू बडबड!!, असला प्रकार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून समोर येऊन राहिलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षे पूर्ण होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यातील आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. आरोग्य सुविधांच्या या विकेंद्रीकरणाचाही जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
राज्यात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. तसेच दुबार मतदार दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी टीका केली आहे.
मतदार याद्यांवरून करा आरडाओरडा, पण आता निवडणुकीला सामोरे जा!!, अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाने अवस्था करून ठेवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज 239 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना जी अप्रत्यक्ष घोषणा केली ती महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दिशेनेच गेली सुप्रीम कोर्टानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करा असे आदेश दिलेत याची आठवण राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत करून दिली. यातच अप्रत्यक्षपणे त्यांनी जिल्हा परिषदा महापालिका या निवडणुकांची सुद्धा घोषणा करून टाकली.
भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने जो बोगस मतदानाच्या विरोधात मोर्चा सुरू केला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.
विरोधकांनी मतदार याद्यांवर तीव्र आक्षेप घेऊन निवडणुकीच्या विरोधात वातावरण निर्मिती केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करताना पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने 21 महत्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांमध्ये लक्ष घातले. या प्रकल्पांमध्ये नेमके काय अडथळे आहेत
\ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही.
मविआकडून ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मविआमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात ते जितक्या मतांनी निवडून आले त्या पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. तर ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले की, मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे. या वादग्रस्त विधानामुळे सुर्वे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला आयते कोलित दिले आहे, तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वादाला आणखी हवा मिळून मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या ४० हून अधिक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे पाली हिल येथील घर देखील समाविष्ट आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण किंमत ₹३,०८४ कोटी असल्याचा अंदाज आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणेचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. तो सहकाऱ्यांसह भटिंडाहून शकुरबस्ती- मुंबई सेंट्रल एसी स्पेशल ट्रेनने घरी परतत होता. कोटा रेल्वे स्थानकावर जेवणाचे पॅकेट घेण्यासाठी तो उतरत होता. चालत्या ट्रेनमधून उतरण्याची चूक त्याने केली आणि तो पडला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये सापडून अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले परंतु, त्याचा मृत्यू झाला.
ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने दिली भाजपला संधी; आशिष शेलारांनी वाचली मुस्लिम दुबार मतदारांची यादी!!, असे आज घडले. त्यामुळे Vote chori विरुद्ध Vote jihad असा नवा डाव खेळायला सुरुवात झाली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “अजित पवारजी, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?”
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी त्यांच्या शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राज्यभरात त्यांच्या आंदोलनाची प्रशंसा करण्याऐवजी बदनामी अधिक केली जात आहे आणि ‘आम्ही मॅनेज झालो’ असे बोलणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App