अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सरकार FIR दाखल करून घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा संशय निर्माण होतोय, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. अजित पवारांच्या अपघाताविषयी FIR का नोंदवला जात नाही? या प्रकरणी सरकार का अडथळे आणत आहे? सरकार एका FIR ला का घाबरत आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी या प्रकरणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात चुकीची आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत, भाजप आमदार योगेश सागर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुंबईत आल्यानंतर आपल्याला आलेल्या भाषिक अडचणीची आठवण सांगितली. मी मुंबई आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या. तेव्हा मी शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असे ‘सांस्कृतिक’ मराठी बोलायचो. पण इथे आल्यानंतर ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नसल्याची बाब माझ्या लक्षात आली आणि मी माझी भाषा बदलली, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून, रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘चौथे विश्व मराठी संमेलन 2026’ च्या उदघाटन प्रसंगी मराठी भाषा विभागामार्फत आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित, ‘जावे विनोदाच्या गावा… उलगडूया अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखराच्या बेतात असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आत्तातरी ठाम भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले.
दोन राष्ट्रवादींच्या घमासानात सगळ्याच पवारांचा एकछत्री अंमल धोक्यात!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले.
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली. मुंबईतील वरळी येथे आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे राज्याच्या राजकारणात आता अधिकृतपणे “सुनेत्रा पर्व’ सुरू झाले असून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
दहा वर्षांत अर्थव्यवस्था तीनपट झाली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार ६६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून पुढील ४ ते ५ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होईल, असा दुर्दम्य विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण, दावोस दौरा, मराठी शाळांचा मुद्दा यावर सविस्तर माहिती देताना विरोधकांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनेत्रा पवारांची निवड झाली त्याचवेळी प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षपदी कायम राहिले. त्यामुळे विलीनीकरणाच्या विरोधातला खुंटा हलवून अधिक बळकट झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनिता पवारांची निवड झाली. त्यांच्यासमोरच कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाचे सावट अधिक गडद होत आहे. हा केवळ दुर्दैवी अपघात होता की नियोजित घातपात
टिपू सुलतानने 75000 हिंदू आणि 33000 नायर यांची हत्या केली हा खरा इतिहास गेल्या 70 वर्षांमध्ये आम्हाला कोणी शिकवला नाही पण म्हणून खरा इतिहास बाहेर यायचा राहिला नाही
झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तात्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग व्हीएसआर (VSR) प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत करावी लागतेय लॉबिंग आणि अजित पवारांच्या विमान अपघात संदर्भात FIR दाखल करण्यासाठी बारामतीत वकिलांच्या फौजेसह करावे लागतेय शक्तिप्रदर्शन!!, हे महाराष्ट्रातले राजकीय वास्तव आज समोर आले.
अजितदादांना न्याय मिळवण्याची मागणी बारामतीत रोहित पवारांच्या शक्ती प्रदर्शनात परावर्तित आणि साथीला अजितदादांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढले युगेंद्र पवार!!, असे राजकीय चित्र समोर आले.
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 80952.56 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. ज्यात 89.84 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम दाखवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या 74427.41 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 8.77 टक्क्यांची भरीव वाढ झाली असून, यामध्ये विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित करतानाच प्रशासकीय खर्चात कपात करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. दरम्यान, विकासकामांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिका आपल्या काही मुदत ठेवी मोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहितीही या अर्थसंकल्पातून समोर आली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार असेल. 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असेल, तर त्याची गांभीर्याने चौकशी झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. रोहितने अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला असून त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या अपघातामागील सत्य समोर यावे, हीच आमची अपेक्षा आहे. कोणतीही शंका राहू नये म्हणून तपास प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यावश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या आक्षेपानंतर ‘न्यायिक भ्रष्टाचार’ (ज्यूडीशियल करप्शन) या प्रकरणाच्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. NCERT च्या सूत्रांनी वृत्तसंस्था ANI ला याची पुष्टी केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बुधवारी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती.
अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बुधवारी रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आमदारांचे असे होत असेल, तर इतरांची काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर कार्यवाही केली नाही, तर जून महिन्यात पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तर कोणाच्याही विनंतीकडे लक्ष दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संबंधित मंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक असून, नव्या समितीच्या माध्यमातून प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा मुंबईतील ‘एबोड’ हा बंगला जप्त केला आहे. पीटीआय (PTI) नुसार, त्याची किंमत सुमारे 3,716 कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App