विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातल्या फडणवीस सरकारने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभेत पाठिंबा दिला. तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनीच फक्त जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात अधिकृत मत नोंदविले. बाकी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी त्या विधेयका संदर्भात सूचना जरूर केल्या. परंतु निर्णयाक फडणवीस सरकारने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा दिला. विधानसभेने हे जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले. Maharashtra Special Public Security Bill
पण विधानसभेच्या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते विधेयक विधान परिषदेत येताच जाग आली. फडणवीस सरकारने मांडलेले जनसुरक्षा विधेयक हे भाजप बचाव विधेयक असल्याची टीका केली. त्यांनी या विधेयकाला शिवसेनेचा विरोध असल्याचे जाहीर केले. सरकार बोलतोय एक आणि करतेय दुसरंच. सरकारचा पॉलिटिकल अजेंडा वेगळा आहे. डावी विचारसरणी ठोकून काढायचा आणि विरोधकांना तुरुंगात घालायचा सरकारचा डाव आहे. पण मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास ही खरी डावी विचारसरणी आहे. पण फडणवीस सरकारला जनसुरक्षा कायद्याचा बडगा चालवून सर्वसामान्य नागरिकांना दाखवून तुरुंगात कोंडायचे आहे. त्यामुळे आमचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध आहे, असे उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळ परिसरात जाहीर केले.
उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये किती गोंधळ आहे हेच समोर आले. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जसा विधानसभेत संबंधित विधेयकाला पाठिंबा दिला तसाच पाठिंबा काँग्रेसचे आमदारांनी दिला. पण काँग्रेसचे केंद्रीय नेते त्यामुळे नाराज झाले. फडणवीस सरकारने मांडलेल्या जन सुरक्षा विधेयकाला काँग्रेसच्या 16 आमदारांनी तीव्र विरोध करायला हवा होता विधानसभेत आणि विधानसभे बाहेर त्यांनी मोठा आवाज उठवायला हवा होता असे मत केंद्रीय नेत्यांनी व्यक्त केले. पण यातून काँग्रेसमधल्या समन्वयाचा अभावच समोर आला. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या आजच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतली राजकीय विसंगती देखील समोर आली.
Mumbai | On the Maharashtra Special Public Security Bill, Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray says, " The government says something and does something different. They are using and misusing their majority. Modi ji had said ‘sabka sath sabka vikas’, this is leftist thinking… pic.twitter.com/xEeUVeDbLk — ANI (@ANI) July 11, 2025
Mumbai | On the Maharashtra Special Public Security Bill, Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray says, " The government says something and does something different. They are using and misusing their majority. Modi ji had said ‘sabka sath sabka vikas’, this is leftist thinking… pic.twitter.com/xEeUVeDbLk
— ANI (@ANI) July 11, 2025
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App