वृत्तसंस्था
मुंबई : समीर वानखेडे यांच्या संदर्भात कोणतेही ट्विट अथवा सोशल मीडियावर कमेंट करू नये, असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट बजावले असताना आणि तसेच लिखित स्वरूपातही मान्य केलेले असताना देखील नवाब मलिक त्याचा भंग का करीत आहेत? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये?, अशी फटकार मुंबई हायकोर्टाने आज लगावली आहे.Mumbai high court issues notice to nawab malik over sameer wankhede family defamation case
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे. नवाब मलिक हे हायकोर्टाच्या आदेशानंतर देखील वारंवार समीर वानखेडे तसेच कुटुंबीयांची बदनामी करणारी वक्तव्ये करत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यावर मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करून तुम्ही हेतुतः हायकोर्टाच्या आदेशाचा भंग का करत आहात?, याचे उत्तर द्या, असे आदेश दिले आहेत.
SAMEER WANKHEDE: समीर वानखेडे प्रकरणाचा महाराष्ट्रभर प्रवास ! मुंबई ते औरंगाबाद व्हाया रिसोड ;आता औरंगाबादेत मलिकांविरूद्ध तक्रार
समीर वानखेडे यांच्या संदर्भात तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संदर्भात कोणतीही अनावश्यक कमेंट सोशल मीडियावर करू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्याला मान्यता देऊन नवाब मलिक यांनी तसे लेखी उत्तर देखील हायकोर्टात सादर केले होते. परंतु, त्यानंतर देखील नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबीयांनी संदर्भात सार्वजनिक वक्तव्य करणे सोडले नाही.
समीर वानखेडे हे माझ्याबरोबर नमाज पठाणाला असायचे. पण ते चैत्यभूमीवर कालच दिसले, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्याचबरोबर हायकोर्टाने आदेश देऊनही अनेकदा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना संदर्भात वक्तव्ये केली आहेत. याबाबतच हायकोर्टाने तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये? याचे उत्तर प्रतिज्ञापत्र सादर करून द्या, अशा शब्दांत नवाब मलिक यांना फटकारले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App