
coal shortage : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील कोळशाच्या संकटामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची ग्वाही दिली आहे. तथापि, त्यांनी असेही सांगितले की, महाराष्ट्राची मागणी 17,500 ते 18 हजार मेगावॅट आहे, जी जास्त मागणीच्या काळात 22 हजारांपर्यंत जाते. आमच्याकडे 3500 ते 4 हजार मेगावॅट वीज कमी आहे. Maharashtra will not face power shortage due to coal shortage, testifies Energy Minister Nitin Raut
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील कोळशाच्या संकटामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची ग्वाही दिली आहे. तथापि, त्यांनी असेही सांगितले की, महाराष्ट्राची मागणी 17,500 ते 18 हजार मेगावॅट आहे, जी जास्त मागणीच्या काळात 22 हजारांपर्यंत जाते. आमच्याकडे 3500 ते 4 हजार मेगावॅट वीज कमी आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे वीज कपातीच्या चर्चेदरम्यान नितीन राऊत म्हणाले, “मंत्री म्हणून मी ग्वाही देतो की, कोळशाच्या कमतरतेमुळे वीज कपात होणार नाही.”
काय म्हणाले ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत?
बावनकुळेंचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र
दुसरीकडे, राज्याचे माजी ऊर्जामंत्री भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य शासनाने कोळशाचे योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सरकारने 2800 कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. जूनपर्यंत सरकारला कोळसा कंपन्यांकडून पत्रव्यवहार होत होता की, कोळसा खरेदी करून ठेवा, पण सरकारने तसे केलेच नाही. असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले की, सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्यानंच राज्यावर ही वेळ आली आहे. 2800 कोटी रुपये कोळशाचे थकीत असल्याने महाराष्ट्रावर अंधारात जाण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारचा तिन्ही कंपन्यांशी ताळमेळ नाही. कोळसा लिफ्टिंगची परवानगी न दिल्याने ही वेळ राज्यावर आली आहे. ऊर्जा विभागाने कोळशाचे योग्य नियोजन केलं नाही. कोळशाचा पुरेसा साठा केलाच नाही. महाजनकोकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. गरज भासल्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला 4-5 हजार कोटी द्यावे, कर्ज घ्यावं पण यातलं काहीही सरकारने केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra will not face power shortage due to coal shortage, testifies Energy Minister Nitin Raut
महत्त्वाच्या बातम्या
- Coal Crisis : केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “आम्ही राज्यांना कोळशाचा साठा वाढवण्यास सांगितले होते, पण त्यांनी तसे केलेच नाही!”
- हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवले, आता 100 टक्के प्रवासी क्षमतेला मुभा
- ठाकरे सरकारने २८०० कोटी रुपये थकीत ठेवले, कोळशाचं नियोजनच केलं नाही, म्हणूनच ही वेळ, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप
- आनंदाची बातमी : आता मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनला केंद्राची मंजुरी
- मोठी बातमी : पाकिस्तानी दहशतवाद्याला एके-47 सह दिल्लीत अटक, देशाच्या राजधानीत घातपाताचा कट उधळला