प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सर्व शाळांना अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने तब्बल 1160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ज्या शाळांना आतापर्यंत अजिबात अनुदान देण्यात येत नव्हते, त्यांना 20%. 20% अनुदान ज्या शाळांना आधी मिळत होते, त्यांना 40%. आणि ज्यांना 40 % अनुदान मिळत होते, त्यांना 60 % अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे. या निर्णयामुळे 63 हजारांहून अधिक शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. Grants to all schools in Maharashtra; Provision of Rs 1160 Crore Shinde – Fadnavis Govt
देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुन्हा सुरू
2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात राबविलेला जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा भाग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियान हा फडणवीस सरकारच्या काळातला फ्लॅग शिप प्रोग्रॅम होता. परंतु 2019 नंतर आलेल्या ठाकरे – पवार सरकारने हे अभियान बंद केले होते. मात्र ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील सरकारने घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या आज 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले आहेत. ते असे :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App