आरक्षणाच्या मुद्य्यावरून सध्या राज्यभरातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील तीन दिवसात तीन मराठा तरूणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना मराठा समाजाच्या आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका मांडत, मराठा समाजातील तरूणांना कळकळीची विनंतीही केली आहे. Eknath Shindes reaction to the suicide of Maratha community youth for reservation
पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, ” मराठा समाजाच्या मुलाने आत्महत्या करणे हे त्याच्या परिवारासाठी आणि आमच्यासाठीही वेदनादायी आहे. कारण, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रालाच आपला परिवार समजतो. त्यामुळे ज्या आत्महत्या झाल्या आहेत, ते अतिशय दुर्दैवी आहेत. एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी कटीबद्ध आहे.”
याशिवाय ”मराठा समाजातील माझ्या भावानो मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतोय, टोकाचं पाऊल उचलू नका. धीर धरा थोडा वेळ द्या. या सगळ्या गोष्टी होताय आणि होतील. आपल्या कुटुंबाचा मुलाबाळांचा थोडा विचार मराठा समाजातील तरूणांनी केला पाहिजे. सरकार म्हणून मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटीबद्ध आहोत. ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही नक्की करणार आहोत.” असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.
“मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात”, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी… https://t.co/zYUcrJFQMZ — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 22, 2023
“मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात”, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी… https://t.co/zYUcrJFQMZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 22, 2023
आरक्षणाच्या मुद्य्यावरून सध्या राज्यभरातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने, निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठीच मराठा समाजातील तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App