प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी ठाकरे – पवार सरकारला एक प्रकारे फटकार लगावली. तरीही ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री अनिल परब यांनी सरकारची ताठर भूमिका सोडली नाही. राणा दाम्पत्यावरचे देशद्रोहाचे आरोप योग्यच असलेल योग्यच लावले होते असा दावा दोन्ही मंत्र्यांनी केला आहे. Court slaps treason clause dilip walase and anil parab
राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना हायकोर्टाने ठाकरे – पवार सरकारला फटकारले मात्र तीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ताठर भूमिका सोडली नाही. टिप्पणी करणे हा न्यायालयाचा अधिकार आहे. पण पोलिसांनी अभ्यास करुनच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, असा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. न्यायालयाचे निरीक्षण म्हणजे निकाल नाही आहे असे समर्थन अनिल परब यांनी केले.
– हायकोर्टाची फटकार
हायकोर्टाने एवढे कठोर निरीक्षण नोंदवूनही दिलीप वळसे पाटील यांनी राजद्रोहाच्या कारवाईचे समर्थन केले. पोलिसांनी अभ्यास करूनच राणा दंपत्याविरोधात देशद्रोहाचे 124 ए हे कलम लावले होते, असा दावा त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App