2022-23 मध्ये भारतातून एकूण 22,963.78 टन निर्यात
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंब्याची लागवड भारतात नेहमीच लोकप्रिय फळांपैकी एक म्हणून केली जाते. आंब्याचा सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणजे हापूस, जो महाराष्ट्रात पिकवला जातो. इतर लोकप्रिय जातींमध्ये केसरी, दशहरी आणि लंगडा यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे, भारतीय आंब्याचे गोडपणा, रसाळपणा आणि अनोख्या चवीसाठी जगभरात कौतुक आणि ओळखले जाते. यामुळेच जगभरातील बाजारपेठांमध्ये भारतीय आंब्याची मागणी कायमच राहते. Huge demand for Indian mango in America exports doubled in one year
त्याचवेळी, चालू आर्थिक वर्षात भारताची अमेरिकेला होणारी आंबा निर्यात दुपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. निर्यातदारांना 2022-23 मध्ये अमेरिकेत फळांची शिपमेंट 2,000 टनांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे, जी 2021-22 मध्ये 16.51 टन आणि 2020-21 मध्ये 1.45 टन होती.
2022-23 मध्ये भारतातून एकूण 22,963.78 टन (48.53 दशलक्ष डॉलर किंवा 378.49 कोटी रुपये) आंबा निर्यात झाली होती. यामद्ये यूएई (12,139.62 टन), UK (2,768.76 टन) आणि कतार (2,026.20 टन) या प्रमुख बाजारपेठा होत्या. त्याचवेळी अमेरिका ओमान, नेपाळ आणि कुवेतच्या मागे सातव्या क्रमांकावर होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App