विशेष प्रतिनिधी
ढाका – म्यानमारमधून बांगलादेशात निर्वासित म्हणून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेशदरम्यान सामंजस्य करार झाला आहे. बांगलादेशने हजारो रोहिंग्या मुस्लिमांना बंगालच्या उपसागरातील भसान चार या बेटावर ठेवले आहे.UN will bats for rohingya muslims
म्यानमारमधील लष्कराच्या अत्याचाराला कंटाळून लाखो रोहिंग्या मुस्लिमांनी इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून आश्रय घेतला आहे. त्यातील बहुसंख्य, म्हणजे सुमारे ११ लाख लोक बांगलादेशात आले आहेत.
यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ लागल्याने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नह निर्माण होऊ लागल्याने बांगलादेश सरकारने रोहिंग्यांना एका बेटावर विस्थापित करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार भसान चार बेटावर आतापर्यंत १९ हजार रोहिंग्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या बेटावरील रोहिंग्यांना संरक्षण आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी बांगलादेश सरकारने संयुक्त राष्ट्रांबरोबर करार केला आहे.बांगलादेशमधील कॉक्स बझार जिल्ह्यात निर्वासित रोहिंग्यांसाठी छावण्या उभारण्यात आल्या असून या छावण्यांमधील एक लाख निर्वासितांचे भसान चार बेटावर पुनर्वसन करण्याचा बांगलादेश सरकारचा विचार आहे.
हे बेट राहण्यासाठी योग्य नसल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे. मात्र, ११ कोटी डॉलर खर्च करत बेटावर बऱ्याच सुधारणा केल्या असल्याचा दावा बांगलादेश सरकारने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App