राहुल गांधी आणि जयराम रमेश यांना संघाचे दिसले “कुसळ”, पण दिसले नाही काँग्रेसच्याच आशीर्वादाने कम्युनिस्टांनी सरकारी संस्थांमध्ये घुसवलेले “मुसळ”, असे म्हणायची वेळ जयराम रमेश यांच्या वक्तव्याने आली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ सादर करून चिनी ड्रोन तंत्रज्ञानाची भलामण केली होती, पण आता त्याच व्हिडिओतले काही अंश सादर करून राहुल गांधींनी drone warfare चा किती गंभीर इशारा दिला, होता, अशा स्वरूपाचे सादरीकरण काँग्रेसने आज केले.
बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने आपली सत्तेवरची पकड मजबूत करताना वेगवेगळे हातखंडे वापरले.
अजितदादांच्या पक्षात मोठी “महागाई”; ती सावरता येईना तरी सत्तेच्या तुकड्यासाठी घाई घाई!!, हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण खुद्द अजितदादांच्या वक्तव्याची चिकित्सा केली की त्याचे प्रत्यंतर येऊन ते पटायलाही लागेल. Ajit Pawar NCP
बांगलादेशातल्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ञ हिंस्र राज्यकर्त्याचा शेख हसीना यांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा बेत असल्याचा डाव समोर आला आहे.
पुण्यामध्ये अजितदादांना लिमिटेड ऑप्शन्स, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटून टाकल्या तव्यावर!! अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अवस्था झाली. जमीन खरेदी व्यवहारात महाराष्ट्र सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर अजित पवारांना संपूर्णपणे शहरासाठी एक शहराध्यक्ष सापडला नाही. त्यामुळे अजितदादांनी पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमून पक्षांतर्गत अधिकाराची विभागणी केली.
पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा भारतात मात्र आत्मा वंचनाची लागलीये स्पर्धा!! अशी ऑपरेशन सिंदूर नंतर आजची अवस्था आहे.
इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला. महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये एकाच वेळी या घडामोडी घडल्या.
पाकिस्तानने किती राफेल विमाने पाडली??, हे विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS नी सांगितले, भारत पाकिस्तान पेक्षा सगळ्यांचं क्षेत्रांत प्रबळ!! हे कालच्या दिवसातल्या सगळ्या बातम्यांचे सार राहिले.
आत्तापर्यंत काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असल्याचे मानले जात होते. कारण काँग्रेसने आतापर्यंत देशात किमान 55 ते 60 वर्षे राज्य केले. देशाला 7 पंतप्रधान दिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही राज्य करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत मान्यतेनुसार काँग्रेस अजूनही देशातला मोठा राजकीय पक्ष आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, पण आता शरद पवारांनी स्वतःच ठेवलेत कानावर हात!! बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही
जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये mock drill ठरवून त्याची तारीख केंद्र सरकारने बदलून ती आज 31 मे 2025 अशी केली.
कोर्टात आणि माध्यमांमध्ये “पवार संस्कारितांचे” रोज निघतात वाभाडे, तरीही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटलेत मुख्यमंत्री पदाचे धुमारे!!
लोकशाहीवादी, बांगलादेशातल्या ग्रामीण जनतेचा मसीहा असे मुखवटे धारण करणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञाने बांगलादेशात पुरती चालूगिरी केली देशावर दिले सोडून वाऱ्यावर आणि स्वतःच्या ग्रामीण फॅमिलीच्या कंपन्यांची मात्र भांडवल भरती केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवले असे ट्रम्प आठ वेळा म्हणाल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले. त्यांनी मोदी सरकारला वारंवार टोचले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवून आणले, असे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी आठ नाही
पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सगळा देश पाकिस्तानच्या विरोधात एकवटला भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हल्ले करून तिथली नऊ दहशतवादी केंद्रे नष्ट करून टाकली. पाकिस्तानच्या हवाई दलाला पांगळे केले.
जातील तिथे मित्र पक्षांवरच अजितदादांच्या कुरघोड्या म्हणून भाजप आमदारांनी अमित शहांपुढे वाचला तक्रारीचा पाढा, पण अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना मोठ्या संख्याबळावर रेटून काम करवून घ्यायचा सल्ला दिला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या सध्याच्या राजकारणात दोन परस्पर विरोधी टोके मानले जातात. नेहरू विरोधी विचार म्हणजे सावरकर आणि सावरकर विरोधी विचार म्हणजे नेहरू, असे समीकरण या दोघांचेही अनुयायी मांडतात, पण प्रत्यक्षात सावरकर आणि नेहरू यांच्यात अनेक मुद्द्यांवर गंभीर मतभेद असले, तरी त्यांच्या काही विचारांमध्ये विलक्षण साम्य होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक “गांधीय” नेत्यांपेक्षा नेहरू आणि सावरकर यांचे विचार अधिक आधुनिक आणि काळाशी सुसंगत होते.
भारत स्वतंत्र झाल्याच्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सल्ला मानला गेला असता, तर पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजेच POK अस्तित्वातच राहिला नसता.
भारतातल्या आजकालच्या सगळ्याच समस्यांचे ओझे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खांद्यावर टाकायची आजकालची “फॅशन” असताना प्रत्यक्षात नेहरू काळ नेहरूंचे राजकीय कर्तृत्व, प्रतिमा निर्मिती आणि त्याला कारणीभूत ठरलेली विरोधकांची अति तात्त्विक सुमार कामगिरी याचा आढावा पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीच्या दिवशी घेतला, तर तो वावगा ठरणार नाही.
माओवादी नक्षलवाद्यांच्या अंगात पाकिस्तानी माज, मोदी सरकारवर दुगाण्या झोडतच शांततेचा प्रस्ताव!!
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने उपेक्षित ठेवले, त्यांना भाजपने आपलेसे केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबतीत जे घडले, तेच वसंतराव नाईक यांच्या बाबतीत झाले!!
ऑपरेशन सिंदूर संदर्भात कुठलेही उथळ वक्तव्य करू नका. कुठेही कुठल्याही विषयावर उथळपणे बोलू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाजप आणि एनडीएच्या नेत्यांना दिला.
भारताने यशस्वी करून पाकिस्तानच्या दहशतवादाला धडा शिकवला. सगळा पाकिस्तान भारतीय हल्ल्याच्या टप्प्यात आणला. त्यांचे 20 % हवाई दल नष्ट केले. तरी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विजयाचे झेंडे उंच उंच फडकावले. पाकिस्तानी जनरल असीम मुनीरला फिल्ड मार्शली बहाल केली. पाकिस्तानने 1971 च्या युद्धाचा बदला घेतला, अशा गर्जना पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफने केल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App