मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, जालना-नांदेडसह अनेक जिल्ह्यांमधील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या ‘न्यू टाऊन’ प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली.
लोकसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसच्या महिला खासदारांचा हल्ला होणार असा पोलखोल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत उत्तरच दिले नाही. त्याउलट त्यांनी राज्यसभेत जाऊन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांनी राजकीय आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले. अगदी तरुण वयातच ते आमदार मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्यांचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व विकसित होत होते. पण 1985 नंतर शरद पवारांच्या राजकीय आयुष्याला जे वळण लागले, त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख सोनिया ते सुनेत्रा असा उतरत गेल्याचेच चित्र समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुढे रेटू शकतील का??,
बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा double game खेळली. सुनेत्रा पवारांना संधी दिली.
जणू पवार एकटेच टाकतात “डाव” आणि बाकीचे खेळतात गोट्या; अजितदादांचे कट्टर विरोधक काळूराम चौधरी काय म्हणाले??, ते तरी वाचा!!, असे म्हणायची वेळ काही youtubers आणि “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी चालविलेल्या “youtube वर गोंधळ आणि बारामतीत मुजरा” या सिनेमामुळे आली.
विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!, असेच प्रफुल पटेल यांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेचे वर्णन करावे लागेल.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलचे सगळे नेते लाभार्थी; त्यामुळे मग story किती खरी, किती खोटी??, असा सवाल समोर आला.
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांमध्ये भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!!
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मित्र प्रेमापोटी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा त्याग केला, पण एकनाथ शिंदे यांच्या मात्र या निवडणुकीतला प्रचार जोरात आला.
यशवंत शिष्याची काय ही अवस्था??, सुनेच्या पक्षात सुद्धा विलीन होत येईना!!, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुराळा उडाला. आता दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही आणि झाले तर ते आपल्या अटी शर्तींवर होत नाही, हे लक्षात येताच आम्ही काय शस्त्र टाकून शरणागती पत्करायला जात नव्हतो, असा राणा भीमदेवी थाट पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आणला. जयंत पाटलांनी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्याला वेगळ्या शब्दांनी दुजोरा दिला, पण दोघांनीही अजित पवारांची शपथ वाहून विलीनीकरण करण्याचा आग्रह अजित पवारांचाच होता, असा वारंवार दावा केला
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 1 फेब्रुवारीला 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी युवकांसाठी पेटारा […]
शेतीपासून आरोग्यापर्यंत आणि रोजगार निर्मिती पासून शेअर मार्केट पर्यंत सर्वत्र संचार आणि विस्तार करणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज 2 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला.
पवारांच्या कुटुंबातला सत्तासंघर्ष सासरा – सून, नणंद – भावजय यांच्यातला; पण त्याचे खापर मात्र प्रफुल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा आणि भाजपच्या नेत्यांवर!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आणि “पवार बुद्धीने” ग्रासलेल्या नेत्यांमधून आणि पत्रकारांकडून समोर आला.
आजच्या 31 जानेवारी 2026 रोजीच्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर संपूर्ण पवार कुटुंबाच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार; उपमुख्यमंत्री होणार (“मूळच्या पवार” नव्हे), तर “बाहेरून आलेल्या पवार”!!, हे राजकीय वास्तव आज 31 जानेवारी 2026 रोजीच्या प्रचंड घडामोडीनंतर समोर आले.
सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी बद्दल आपल्याला काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी तो त्यांच्या अधिकारात घेतलेला निर्णय आहे.
2026 चा जानेवारी महिना महाराष्ट्रातल्या राजकारणात खरी “क्रांती” घेऊन आला. कारण याच महिन्यात मुंबईतल्या राजकारणातून ठाकरे “नॉन प्लस” झाले, तर उर्वरित महाराष्ट्रातून पवार नॉन प्लस झाले.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सूचक पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून ठामपणे उभे राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!
अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना मिळणार, अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी चालवली असताना प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App