ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर उतारा; देवेंद्र फडणवीसांचा तर्री पोहा!!, असेच चित्र माध्यमांमधून तरी समोर आले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी फक्त मुंबई आणि ठाणे या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केले, पण तिथे सुद्धा ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरून प्रचारात भाग घेतला, असे दिसले नाही. त्यांनी मुंबई परिसरात सहा सभांचे नियोजन केले. पण प्रत्यक्षात सभाच घेतल्या नाहीत. ठाकरे बंधू ठाण्यात आणि नाशिक मध्ये सुद्धा एकत्र सभा घेणार, असे जाहीर झाले. पण ते या दोन्ही शहरांमध्ये फिरकले नाहीत. दोघांनी मुंबईत आपापल्या पक्षांच्या काही शाखांना भेटी दिल्या.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पवारांना आणि त्यांच्या अनुयायांना काही फायदा जरूर झाला, पण क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला मात्र कायमचा फटका बसला. पवारांची महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर एकहाती सत्ता होती, तिला भाजपने टप्प्याटप्प्याने सुरुंग लावला. क्रिकेट पासून कुस्तीपर्यंत वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्ष पवारच राहिले. शरद पवार अजित पवार रोहित पवारांनी वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद कायम आपल्या ताब्यात ठेवले.
उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून वाद निर्माण करत आहेत. महायुतीतल्या सहयोगी पक्षावर किती आणि कसे बोलायचे हे त्यांनी ठरविले पाहिजे. अन्यथा मी बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, कसे बोलू शकतो आणि कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला. फडणवीसांनी या इशाऱ्यातून आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला.
शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.
शरद पवार “सिंह” आणि अजित पवार “वाघ’; पण दोघेही अडकलेत दोन महापालिकांच्या पिंजऱ्यात!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवार आणि अजित पवारांची झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना आली जाग, महाराष्ट्रात अजून दोन-चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!, अशी अवस्था अजित पवारांची झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लक्ष केंद्रित करून तिथेच प्रचाराचा धुरळा उडवला आहे.
महापालिकांच्या निवडणुका मध्यावर आले असताना ठाकरे बंधू बसले अजूनही घरी पण एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले.
पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांची पूर्ती झाली “शोभा”; स्थानिक आणि किरकोळ निवडणूकांमध्ये निघाली हवा, असेच म्हणायची वेळ अजित पवार आणि रोहित पवारांच्या राजकीय अवस्थेवरून येऊन ठेपली.
अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो
मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!, असेच राजकीय चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर समोर आले.
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे आहेत, तर ते मुंबई + ठाण्यात आणि पुणे + पिंपरी चिंचवड मध्येच काय अडकलेत??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलाय.
सुरेश कलमाडी लक्षात राहतील, ते पुण्यातल्या काँग्रेसचे अखेरचे धुरंधर नेता म्हणून!! कर्नाटकातून पुण्यात येऊन संपूर्ण पुणे शहर काँग्रेसचे नेतृत्व मिळविणे तसे सोपे नव्हते. कारण सुरेश कलमाडी ज्यावेळी पुण्यात आले, त्यावेळी पुण्याच्या काँग्रेसमध्ये मोठ्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांचे नेतृत्व तेव्हा पुण्याच्या क्षितिजात चमकत होते. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर गाडगीळ आणि टिळक हे दोघे पुण्याचे “कारभारी” होते. त्यावेळी पुण्यात काँग्रेसचे दोन गट होते. एक गट गाडगीळांचा, तर दुसरा गट टिळकांचा.
लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले
गजनीच्या मोहम्मदाने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ वर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या 1000 वर्षांमध्ये प्रचंड संघर्ष झाले. सोमनाथाचे मंदिर पुन्हा दिमाखाने उभे राहिले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास लेख लिहिला. भारतावर झालेल्या आक्रमणाची आणि भारतीयांनी संघर्ष करून मिळविलेल्या विजयाची आज आठवण करून दिली.
दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत…, पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही.
एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.
अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसला डोक्याला ताप!!, हेच राजकीय चित्र महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच समोर आले. कारण अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आपापल्याच मित्र पक्षांना अडचणीत आणले.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप – प्रत्यारोपांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा!!, “पार्टी विथ अ डिफरन्स” कुठेच दिसेना!!, अशी अवस्था येऊन ठेपली.
वेळीच वेसण घातली नाही म्हणून हिंमत झाली, असे म्हणायची वेळ अजित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली. अजित पवारांनी पिंपरी – चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आणि राज्य सहकारी बँक लुटली, असे आरोप त्याच अजित पवारांना टोचली भाजपची “राक्षसी भूक”!!, हे राजकीय सत्य आज पिंपरी चिंचवड मधून बाहेर आले.
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेचे 25 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले. कारण त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या सगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यासाठी मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण नुसते आरोप प्रत्यारोप करण्याखेरीज महाविकास आघाडीचे नेत्यांनी दुसरे केले तरी काय??, असा गंभीर सवाल या निमित्ताने समोर आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App