बारामती बाराची, पराभवानंतरही अजितदादांची खुमखुमी!!, असा प्रकार समोर आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पवार काका – पुतण्याचा दणकून पराभव झाला. भाजपशी टक्कर घेणे दोन्ही पवारांना एकत्र येऊन सुद्धा जमले नाही, भाजपवर नाही नाही ते आरोप करून अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची सत्ता खेचून आणता आली नाही, तरीसुद्धा अजित पवारांची खुमखुमी शमली नाही, याचेच प्रत्यंतर आले.
(नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाटेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवा!!, असला प्रकार मराठी माध्यमांच्या लिबरल पत्रकारितेतून समोर आला आहे.
कपिल सिब्बल मुंबईत येऊन जे बोलले, ते राजकीय सत्यच होते आणि आहे. पण ते म्हटल्यानुसार “जसेच्या तसे” घडवायची जबाबदारी संबंधित पक्षांवर आहे का??, हा खरा सवाल आहे. काय म्हणाले, कपिल सिब्बल??
महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन पवार एकत्र येतील, पण ते पुणे जिल्हा परिषदेच्या पलीकडे जातील का??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निकालांमुळे समोर आला आहे.
संजय राऊतांची शिंदे सेनेत संशय पेरणी; पण ठाकरे आणि राऊतांच्या नादी लागून शिंदे करतील का आत्मघाती कृती??, असा सवाल समोर आलाय.
भाजपा – शिवसेना युतीने मुंबई महापालिका जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव टाकत असल्याची फक्त माध्यमांतून चर्चा;
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका अजित पवार हरले. त्यांनी महायुती मधला वरिष्ठ नेत्यांचा वादा तोडून भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली त्यांना भ्रष्टाचारी ठरविले.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले “धुरंधर” हे जसे दाखवून दिले, तसेच त्यांच्या टीम मधले महत्त्वाचे नेते सुद्धा “साईड हिरो” झाले हे सगळ्या महाराष्ट्रासमोर आले.
महापालिकांच्या निवडणुका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय भाकीत वर्तविले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू जरी एकत्र आले असले
महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, राज्याच्या राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. या निकालांनी महायुतीचे वर्चस्व अधोरेखित केले असून विरोधकांसाठी, विशेषतः पवार आणि ठाकरे गटासाठी हे निकाल आत्मचिंतन करायला लावणारे आहेत.
ठाकरे खरे झुंजले, डबल ढोलकी पवार हरले, खोटे चाणक्य धुळीस मिळाले!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातल्या मतदारांनी महापालिका निवडणुकीत रंगविले.
असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला 100 + जागा, ओळखा पुढचा धोका; नुसत्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणाऱ्यांना इशारा!!, हे महाराष्ट्रातले वेगळे राजकीय वास्तव 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढे आले. या निकालामुळे अनेकांनी महाराष्ट्रात मुसलमानांचा राजकीय प्रभाव वाढल्याची भीती व्यक्त केली. पण यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांकडून मुसलमान दूर गेले हे राजकीय वास्तव फारसे कुणी स्वीकारले नाही. काँग्रेस, उबाठा शिवसेना या दोन पक्षांना मुसलमान मतदारांनी जोरदार फटका दिला.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका जिंकल्याचे सेलिब्रेशन भाजपने केले असले, तरी मुंबईत ठाकरे बंधूंनी भाजपला कडवी टक्कर दिली.
महापालिका निवडणुकांमध्ये पवार नावाच्या ब्रँडचा मतदारांनी पुरता बोऱ्या वाजवला. त्याचीच मजा महाराष्ट्रातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी घेतली.
महाराष्ट्रातल्या 29 पैकी 25 महापालिकांमध्ये भाजप महायुतीने विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या भाजप मुख्यालयात विजय उत्सव साजरा केला.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निकालाचा नेमका अन्वयार्थ सांगायचा असेल, तर ठाकरे ब्रँडचा दबदबा संपला आणि पवार ब्रँडची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळाली, असेच म्हणावे लागेल.
ज्यांना ठाकरे आणि पवार करायला गेले गारद; तेच फडणवीस ठरले महाराष्ट्राचे धुरंधर!!, हे महापालिका निवडणुकांच्या निकालाने आज संपूर्ण देशाला दाखवून दिले.
ठाकरे बंधू मुंबईत झुंजले; ते पराभूत झाले तरी त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा राखली. मुंबईत ते दोन नंबरची शक्ती ठरले. त्याउलट पवार मात्र फुकटची दमबाजी करून जोरदार आदळले, हेच राजकीय वास्तव महापालिका निवडणुकांमधून समोर आले.
ठाकरे, पवारांसकट सगळ्या विरोधकांना फुकाची बडबड आणि कृतीत आळस या निवडणुकीत नडला हेच राजकीय वास्तव महापालिका निवडणुकांच्या निकालांमधून समोर आले. भाजपच्या नेत्यांना सत्तेचा लाभ झाला. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा लाभ करून घेतला. हे जितके खरे तितकेच हेही खरे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकट भाजपच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये प्रचंड मेहनत घेतली संघटनात्मक जाळे विणले कितीही टीका किंवा शरसंधान साधले तरी भाजपने बेरजेचे राजकारण करणे सोडले नाही पक्षांमध्ये असंतोष उफाळून आला, तरी त्याला अटकाव न करता मोकळी वाट करून दिली. पण भाजपमध्ये बाकीच्या पक्षातल्या नेत्यांना घेणे थांबविले नाही. याचा अंतिम परिणाम भाजपच्या विस्तारात झाला. त्याचा चांगला परिणाम भाजपला महापालिका निवडणुकीच्या यशामध्ये पाहायला मिळाला.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात आश्चर्यकारक असे काहीच घडले नाही मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता गेली, तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे हे निवडणुकीच्या साठी एकत्र आले पण प्रत्यक्षात त्यांना पराभवाचेच तोंड पाहावे लागले.
नाशिक : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पवार ब्रँडने फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर लक्ष केंद्रित केले होते. “पवार बुद्धीचे” अनेक पत्रकार या ब्रँडच्या प्रमोशनसाठी […]
हा बाईचा विजय नाही, शाईचा विजय आहे, ते मार्कर पेन च्या शाईवर आक्षेप!! इथपर्यंत भारतीय लोकशाहीचा प्रवास आज येऊन ठेपला.
अजितदादांच्या दादागिरीवर महेश दादाच भारी पिंपरी चिंचवड मध्ये मारली बाजी!!, असे चित्र महापालिका निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर घेतलेल्या एक्झिट पोल मधून समोर आले.
महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. हे कार्यकर्ते आमच्या मोठ्या निवडणुकांमध्ये राबतात. त्यामुळे त्यांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी ऐकायचे असते
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करून आल्यानंतर ठाकरे बंधूंनी एवढी आगपाखड केली, तर उद्या निकाल लागल्यानंतर ते काय करतील??, असा सवाल आज मतदानाच्या दिवशीच समोर आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App