पुण्यातल्या कोरेगाव पार्क/ कोंढवा मधल्या महार वतनाच्या 40 एकर जमिनीचा खरेदी गैरव्यवहार अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर राजकीय दृष्ट्या उलटल्यानंतर अजितदादांवर मुंबईतून कोण game करतोय का
मनोज जरांगे यांनी प्रथमच धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला. या कटासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचा आरोप देखील केला.
अमेडिया कंपनीच्या 99 % च्या मालकावर गुन्हा दाखल नाही; पालकमंत्री पित्याला घोटाळ्याची म्हणे माहितीच नाही, पण आजोबांनी “कवडीमोल” ठरविलेल्या नातवाने 300 कोटी तरी आणले कुठून
पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या महार वतनाच्या 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारने केला असला, तरी खुद्द अजित पवारांनी त्या मुद्द्यावरून हात वर केले परंतु अण्णा हजारे यांनी त्यांचे आणि त्यांच्या पवार घराण्याचे “संस्कारच” बाहेर काढले. एरवी खासदार सुप्रिया सुळे पवारांनी केलेल्या संस्कारांच्या बाणा खूप मारत असतात. पण अण्णा हजारे यांनी त्या संस्कारांवरच कुठाराघात केला.
फडणवीस सरकार मधले उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरंतर कुठल्याही सरकारसाठी राजकीय डोकेदुखी ठरले. कारण सिंचन घोटाळ्यापासून ते राज्य सहकारी बँक घोटाळ्यापर्यंत त्यांचे नाव आरोपींच्या यादीत आले. त्या पाठोपाठ ताज्या महार वतन जमीन खरेदी प्रकरणात त्यांचा मुलगा पार्थ पवार अडकला पण एरवी कुठल्या ना कुठल्या घोटाळ्याच्या नावाखाली सतत फडणवीस सरकारला घेणाऱ्या आत्याबाई सुप्रिया सुळे मात्र पार्थ पवारच्या मदतीला धावल्या.
एकनाथ खडसे यांनी भोसरीतली MIDC ची जमीन बाजारभावापेक्षा कमी किमतीत घेतली त्यासाठी आपला मंत्रिपदाचा प्रभाव वापरला, असा आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने ED ने मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्या पाठोपाठ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खळबळजनक प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून ते चौकशीच्या स्कॅनर खाली आणले.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या कारकीर्दीत जमीन गैरव्यवहारांचे दोन प्रकार समोर आले. त्यापैकी 230 कोटी रुपयांचा व्यवहार रद्द झाला, पण आता 300 कोटींचा व्यवहार रद्द होणार का??, असा सवाल समोर आलाय.
पुण्यातील जैन होस्टेल जमीन व्यवहाराचा विषय तापून थंड होतोय नाही, तोच अजित पवारांच्या मुलाचा जमीन खरेदीतला भ्रष्टाचार समोर आला. पण त्यामुळेच महार वतन जमीन खरेदीत भ्रष्टाचार अजितदादांचा आणि आरोपांचे शिंतोडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर!!, असला प्रकार घडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मुंबई प्रकल्प शुभारंभ आणि कोनशिला अनावरण आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विशेष सत्कार संपन्न झाला.
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात इंदिरा भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्यांदा vote chori चे प्रेझेंटेशन केले. याआधी त्यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वोट चोरी झाली, असा आरोप करणारे मोठे प्रेझेंटेशन केले होते. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हरियाणा मध्ये वोट चोरी करून भाजपचे सरकार आणले गेले, असा आरोप केला.
सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी झाले वेगळे, आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र!!, हा राजकीय प्रकार पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादी मधून समोर आला आहे. महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक झाली तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी करायचा अधिकार स्थानिक नेतेमंडळींनाच देण्यात आला
बिहार मधल्या मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधींची हरियाणाच्या निमित्ताने vote chori ची वातावरण निर्मिती!!, हाच प्रकार त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जनतेच्या समोर आला.
फडणवीस – शिंदे – फडणवीस असे आलटून पालटून मुख्यमंत्री; पवार काका पुतण्यांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!!, हा प्रकार आज कोल्हापूरमध्ये घडला.
शिंदेंच्या सेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवृत्तीची लागण; मुख्यमंत्री पदासाठी नुसतीच सुरू बडबड!!, असला प्रकार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून समोर येऊन राहिलाय.
मतदार याद्यांवरून करा आरडाओरडा, पण आता निवडणुकीला सामोरे जा!!, अशी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाने अवस्था करून ठेवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज 239 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना जी अप्रत्यक्ष घोषणा केली ती महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दिशेनेच गेली सुप्रीम कोर्टानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करा असे आदेश दिलेत याची आठवण राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत करून दिली. यातच अप्रत्यक्षपणे त्यांनी जिल्हा परिषदा महापालिका या निवडणुकांची सुद्धा घोषणा करून टाकली.
विरोधकांनी मतदार याद्यांवर तीव्र आक्षेप घेऊन निवडणुकीच्या विरोधात वातावरण निर्मिती केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
संपूर्ण जगात भारतीय सैन्य दलाच्या रचनांची वाहवा होत असताना तिच्यामध्ये नव्या युद्धाच्या आव्हानांच्या गरजांनुसार बदल करण्याचे भारतीय संरक्षण दलाने ठरविले असून या बदलांमध्ये अत्याधुनिकता आणि युद्ध परंपरा यांचा अनोखा मिलाफ करायचा निर्णय घेतलाय
शांततेच्या नोबेल पासून अण्वस्त्र चाचण्यांपर्यंत डोनाल्ड ट्रम्पची फिरली मती; उरली नाही रणनीती!!, असंच म्हणायची वेळ अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच उधळलेल्या मुक्ताफळांवरून आली
ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने दिली भाजपला संधी; आशिष शेलारांनी वाचली मुस्लिम दुबार मतदारांची यादी!!, असे आज घडले. त्यामुळे Vote chori विरुद्ध Vote jihad असा नवा डाव खेळायला सुरुवात झाली.
काँग्रेसचे बुद्धिमान मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी इंदिरा गांधींना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहताना अत्यंत चतुराईने बिहार विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी निवडली
क्रिकेट विश्वचषकावर कोरून नाव, भारतीय महिलांनी रचला इतिहास!!, ही घटना 3 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई च्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर घडली.
काकाला चुलीत घालायला पुतण्या तयार; “पवार संस्कारांची” दिसायची राहिली होती हीच किनार!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडिया पोस्ट मुळे आली.
संघावर बंदीच्या काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या नुसत्याच बाता; प्रत्यक्षात संघ किती वाढलाय, ते आकड्यांत वाचा!!, असं म्हणायची वेळ काँग्रेस आणि समाजवादी नेत्यांच्या राजकीय वक्तव्यांनी आणि राजकीय वर्तनाने आणली.
महाराष्ट्रातल्या मतदार याद्या शुद्धीकरणासाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढलेल्या सत्याच्या मोर्चात शरद पवार त्यांच्या वयोमानानुसार चालले नाहीत, पण ते त्या मोर्चाच्या सभेत मात्र सामील झाले. या मोर्चाचे मुख्य भाषण खुद्द त्यांनीच केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App