बड्या नेत्यांच्या उलट्यापाट्या भेटीगाठी, एकमेकांची खेचाखेची; पण कार्यकर्त्यांच्या मात्र ओढाताणी!! असला प्रकार महाराष्ट्रात सुरू झालाय.
गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५°C पेक्षा जास्त जात आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त एअर कंडिशनर (AC) वापरत आहेत. पण हे AC चालवण्यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे विजेचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यामुळेच सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजासाठी दिलेलं SEBC (Socially and Educationally Backward Class) आरक्षण सध्या लागू आहे आणि त्यावर कोणतीही स्थगिती (stay) दिलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर बुधवारी विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू केली आहे. या सुनावणीमुळे मराठा विद्यार्थ्यांना सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी SEBC आरक्षणाचा लाभ मिळत राहणार आहे.
जागतिक दहशतवादाशी लढायची अमेरिकेची तोंडी भाषा; प्रत्यक्षात जिहादी जनरलला army day मध्ये पायघड्या!! असला प्रकार अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलाय.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बनत चाललात “रिचर्ड निक्सन” आणि जागतिक सत्ता संतुलनात अमेरिकेचा घसरत चाललाय पाय असेच ट्रम्प यांच्या सध्याच्या राजकीय हालचालींमधून समोर आले.
नितीश कुमार यांच्यावर over dependency म्हणजेच ज्यादा अवलंबित्व ठेवल्याने भाजपला तोटा चिराग पासवान यांनी मध्येच दामटला घोडा!! ही बिहारच्या राजकारणातल्या निवडणुकीपूर्वीची सुरुवात आहे.
पुण्यातून शरद पवारांचा आणि कोलकत्यातून ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला, पण दोघांनीही काँग्रेसच्याच पायाखालच्या सतरंज्या खेचल्या हेच राजकीय वास्तव चित्र आज समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अचानक शरद पवारांना बांगलादेशच्या नोबेल पारितोषिक विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याच्या विषयी कळवळा आला. त्या कळवळ्यातूनच पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला चढाविला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वर्धापन दिनीच गळती; जयंत पाटील देखील प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर पळती!!, अशी अवकाळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 व्या वर्धापनदिनी प्राप्त झाली. पक्षाच्या गळतीच्या आणि जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा छायेखालीच राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात बंदिस्त वातावरणात वर्धापन दिन साजरा करावा लागला.
एकीकडे सुप्रिया सुळे यांचे victim card, दुसरीकडे टीचर मधून अजितदादांवर वार आणि तरीही सत्तेच्या वळसणीला जायला पवारांची राष्ट्रवादी तयार!! असला प्रकार राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापन दिनी समोर आला.
राष्ट्रवादीच्या पोस्टर रोगाची सैनिकांनाही लागण झाली आहे म्हणून ज्या पद्धतीने पोस्टर वर चढतात राष्ट्रवादीचे हौशी मुख्यमंत्री, त्याप्रमाणे सैनिक घडवतात ठाकरे बंधूंची युती असला प्रकार सगळ्या महाराष्ट्रात दिसून येतोय.
मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते
राष्ट्रवादीच्या ऐक्याची तापवत राहा हवा; तिचा राजकीय सौदेबाजीसाठी वापर करत राहा!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याच्या बातम्यांमधून समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेन’चा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले.
पाकिस्तानी शिष्टमंडळाने अमेरिकेत जाऊन पाकिस्तानी दंडात काढल्या बेटकुळ्या, पण सिंधूच्या पाण्यासाठी चार चार वेळा काढताहेत भारताच्या नाकदुऱ्या!!, अशी पाकिस्तानची अवस्था झालीय.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एवढे “उच्च दर्जाचे मुत्सद्दी” आहेत की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात न झालेल्या शस्त्रसंधीचे credit परस्पर 13 वेळा घेतले, पण आता ते एलन मस्क याच्याशी एकदाही बोलायला तयार नाही!!
ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांनीच केली घायकुती; मुख्य नेते निवांत आणि इतरांच्याच लुडबूडी!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे.
शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्तींचा हात असल्याचे सांगून “डॉक्टर” गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेच्या राजकीय दुखण्याचे अचूक निदान केले
ठाकरे बंधू एकत्र; पवार काका अस्वस्थ, शिंदे + अजितदादांना भाजपची सत्ता धरावी लागणार घट्ट!!, असे राजकीय समीकरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे.
प्रगत देशांची संघटना G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा झाला. काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी कारण नसताना मोदी सरकारवर आगपाखड करून घेतली.
अजूनही “टाळी”, “पावले” आणि “फोन कॉल” या शब्दांपर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!, अशी शिवसेना मनसे युतीची आजही अवस्था आहे.
गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाने आता पाण्यावरून अणुबॉम्ब युद्ध भडकवणारी भाषा केली. पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या अमेरिका भेटीत हे घडले.
लोकसभा निवडणूक अजून 4 वर्षे लांब आहे. काही राज्यांच्या निवडणुका 2025 – 26 मध्ये आहेत, पण त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा दूरच्या राजकीय क्षितिजावर पण दिसत नव्हती.
राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या मेरीच्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!! असे एकाच दिवशी घडले.
जगाच्या इतिहासात कुणी केला नाही, असला फैसला बांगलादेशाने केला. बांगलादेशाचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ राज्यकर्ता मुघलांच्या परंपरेला जागला. त्याच्या राजवटीत बांगलादेशाने आपला “बापच” बदलून टाकला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App