मनसेचा आजचा वर्धापन दिन राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन साजरा केला. आजच्याच दिवशी त्यांच्या पक्षाला मराठवाड्यातल्या एका पंचायत समितीत सत्ता मिळाली.
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची प्रफुल्ल पटेल यांनी साधी दखलही घेतली नाही.
ठाकरे आणि पवारांच्या मागे काँग्रेसची फरफट; 14 खासदार आणि 16 आमदार असूनही काँग्रेसला नाही किंमत!!,
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह तुतारीच्या अनावरणासाठी तब्बल 40 वर्षांनी रायगडावर गेले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या 9 मार्च 2016 रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावर जाणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच सोशल मीडिया पोस्ट मधून हे जाहीर केले.
इस्रायलच्या पंतप्रधानांनी allies at war हे पुस्तक वाचले आणि इराणच्या विरोधात अरब देश एकवटले!!, अशी प्रतीकात्मक घडामोड घडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले.
जोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे वारे वाहून तसे घडून येण्याची शक्यता होती, तोपर्यंत रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधला “स्वार्थ” दिसला नव्हता, पण विलीनीकरणाची शक्यता मावळल्या बरोबर रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधल्या “स्वार्थाचा साक्षात्कार” झाला!!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजकीय अहंकार आज कळसाला पोहोचला. केंद्र सरकार विषयीचा आकस आता राष्ट्रपतींपर्यंत येऊन ठेपलेला दिसला.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा!!, हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा असल्याची राजकीय वस्तुस्थिती आता समोर आलीय.
सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचू शकले!!, अशी राजकीय वस्तुस्थिती काल समोर आली. किंबहुना ते राजकीय रहस्य काल उलगडले. राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी inside story म्हणून या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचा 2026 – 2027 सालचा अर्थसंकल्प सादर करावा लागला.
ज्या दिवशी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी पवार कुटुंबातल्या दोघांना बिनविरोध राज्यसभेत पाठविले, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने धर्मांतर विरोधी – लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. याच फडणवीस सरकारमध्ये बाहेरून पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत.
बिहार सारख्या मोठ्या राज्यात शांतपणे सत्तांतर घडवून नितीश कुमार राज्यसभेत येऊन भाजपच्या मुख्य टीम मध्ये सामील झाले, पण शरद पवार वयाच्या 86 व्या वर्षी राज्यसभेत येऊन सुद्धा अजून “राखीव” खेळाडूच्या भूमिकेतून बाहेर पडू शकले नाहीत.
भाजपाकडून राजकीय प्रयोग जोरात पण पवारांचा पक्ष जुन्याच प्रयोगाच्या कर्दमात म्हणजे चिखलात!!, असे राजकीय चित्र आज राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने समोर आले.
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी हो – नाही, नाही – हो, असे करत अखेरीस शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार, तरीही राष्ट्रवादी अस्वस्थ आणि बेजार!!, हीच राजकीय वस्तुस्थिती आज महाराष्ट्रासमोर आहे. कारण पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार असले तरी त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीची खरी राजकीय सूत्रे आज कुठल्याच पवारांच्या हातात खऱ्या अर्थाने उरलेली नाही त्या सूत्रांमध्ये एक तर भाजपने आणि दुसरा त्यांच्याच राष्ट्रवादीतल्या भाजपला अनुकूल असलेल्या नेत्यांनी पक्का शिरकाव केलाय.
राज्यात 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समाेर आली आहे. या प्रकरणाचा तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकाळत ठेवत काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरच्या दिवशी त्यांना महाविकास आघाडीची राज्यसभा उमेदवार द्यायचे मान्य केले. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या, तेव्हा कुठे काँग्रेस हायकमांडने आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्या उमेदवारीला मान्यता दिल्याची बातमी आली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विहिरीने करण्याची चर्चा थांबविण्याचा जयंत पाटलांनी लॉलीपॉप दिला आणि त्यातून शरद पवारांच्या उमेदवारीतला अडथळा दूर करायचा “डाव” खेळला, हीच राजाकीय वस्तुस्थिती आज राज्यसभा निवडणुकीचे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी म्हणजेच 4 मार्च 2026 रोजी समोर आली.
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा गट भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागल्या दारी??, असा सवाल ऐन मोक्याच्या क्षणी समोर आलाय.
शरद पवारांची राज्यसभा खासदारकी; सुप्रिया सुळे, जयंत पाटील मातोश्रीच्या दारापाशी!!, अशी राजकीय घडामोड रात्री घडली. शरद पवारांना राज्यसभेचे खासदारकी द्या, अशी मागणी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्री बंगल्यावर जाऊन करावी लागली. पण उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना लगेच सकारात्मक प्रतिसाद दिल्याची अधिकृत बातमी नाही. उलट काँग्रेसने शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, तर विचार करता येईल, असे उत्तर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्याचे बातम्यांमधून दिसून आले.
धुळवडीच्या सणानिमित्त प्रथेप्रमाणे आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला रंग लावून विनम्रपणे अभिवादन केले. पण एकनाथ शिंदे यांनीही धुळवड साधेपणाने साजरी केली.
राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीवर महाविकास आघाडीतून शिक्कामोर्तब होणार नाही, हे लक्षात येताच शरद पवारांनी भाजपला डोळा मारला
आखाती युद्धामुळे तेलाचे भाव भडकले, पण त्यामुळेच रशियाकडून तेल खरेदी करण्याचा भारताचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. कारण भारतीय नागरिकांना तेलाच्या भावाची झळ पोहोचू नये म्हणून केंद्रातल्या मोदी सरकारने तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले टाकली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि शरद पवारांचा पत्ता राज्यसभेतून परस्पर कट केला. ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज घडली. काँग्रेसने महाराष्ट्रातल्या राज्यसभा जागेवर आपला अधिकार सांगितला. त्याच्या बदल्यात उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर दिली. पण त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेत जाण्याचा मनसूबा काँग्रेसने परस्पर उधळून लावला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या भाजपने सुरू केलेल्या परिवर्तन यात्रेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App