सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा आज सुरू झाला असून आजपासून स्व – गणनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची स्व – गणना डिजिटल स्वरूपात केली. त्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तयार केलेल्या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले.
पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या दोन दिवसांमधल्या काही मुलाखतींमधून समोर आली.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी मध्ये मध्ये अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माफी मागितली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील सुनावून घेतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या शेजारी बसला होत्या.
विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली.
प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभांच्या निवडणुकांचे मतदान संपताच त्यांच्या निकालांची “अशी” काही चाहूल लागली, की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आज शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात सामील झाले, तर काल रात्रीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये घुसून जबरदस्त गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल नेमका कसा लागेल, याची राजकीय चुणूक काल आणि आज व्यवस्थित दिसली.
केंद्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर तसेच येथील पायाभूत सुविधांवर भाष्य केले. तसेच महायुतीमधील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे.
काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!, हेच राजकीय वास्तव आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे टाकावे लागले शस्त्र आणि पवार विरुद्ध पवार हा डाव सुद्धा उलटला!!, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले हे वास्तव आज सुप्रिया सुळे यांच्या तोंडून बाहेर आले.
एक दोन नव्हे, तर तब्बल ८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मॅरेथॉन बैठक घ्यावी लागली. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली.
प्रादेशिक घराणेशाहीला दणका; राष्ट्रीय पक्षांना फायदा!!, हेच राजकीय चित्र पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पांडिचेरी या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मधून समोर आले.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा केंद्रीय पोलीस बलाच्या 500 कंपन्या तैनात राहतील, अशा आशयाचे ट्विट CAPF अर्थात सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी आज केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतले मतदान संपण्यापूर्वीच पश्चिम बंगाल मध्ये अत्यंत मोठ्या कारवाईचे संकेत देखील मिळाले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे एक बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी संसदीय राजकारणातून माघार घेतली. त्यांना शरद पवारांसारखी संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज राहिली नाही.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप निकाल एका झटक्यात पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे, पण त्या जागेवरच उमेदवार ठरवताना सुद्धा राष्ट्रवादीची दमछाक झाली आहे.
सुनेत्रा पवारच गैरहजर; मग मोदी बागेतले स्नेहभोजन पवार कुटुंबांमधल्या मतभेदांच्या भेगा बुजवू शकेल का??, असे विचारायची वेळ शरद पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी आली.
नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद मधली मुख्य मास्टर माईंड निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिक कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. मात्र या दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत कोर्टाला जी माहिती दिली, त्यातून मालेगावात धर्मांतराचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. निदा खान अजूनही फरार असून ती तिच्या वकिलामार्फत कोर्टासमोर आपली बाजू मांडली. कोर्टाने तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेऊन पूर्ण केली. पण निकाल मात्र २ मे रोजी द्यायचे जाहीर केले.
इराणनेच पडला पाकिस्तानी मध्यस्थीचा बुरखा; इराणी परराष्ट्रमंत्री मदत मागण्यासाठी गेले रशियाला!!, ही अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड आज समोर आली.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत ममता बॅनर्जींनी अक्षरशः एकाकी प्रचार केला.
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची पुडी एका सोशल मीडिया अकाउंटने सोडली. पण त्यामधून संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी झाली??, […]
नाशिक : आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार पक्षातून फुटले. […]
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवालांना दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता मिळवता आली पण दिल्लीची सत्ता जाताच त्यांना आपल्या पक्षातले राज्यसभेचे 7 खासदारच टिकवता आले नाहीत, तर आम आदमी पार्टीची लिबरल गॅंग सुद्धा पक्षात टिकवून ठेवता आली नाही!! हा इतिहास गेल्या 10 वर्षांमध्ये घडला.
राज्यसभेच्या ७ खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली, काँग्रेस आनंदी झाली!!, ही राजकीय घडामोड पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी घडली.
ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर मतदारांची नावे कापण्यावर फोडायला सुरुवात; म्हणे, SIR ने केली ममतांची सत्ता बरबाद!!, हेच राजकीय वास्तव पश्चिम बंगाल मध्ये काल झालेल्या 152 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विक्रमी आकडेवारीनंतर समोर आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App