उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आपले सगळे बळ तिथे एकवटले खरे, पण त्यामुळे भाजपला इतर 27 महापालिकांमध्ये पूर्ण मोकळे रान मिळाले. ठाकरे बंधू मुळातच विरोधात गेल्यामुळे भाजपला मुंबईत एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली आणि तिथे ठाकरे बंधूंना जखडून ठेवण्यात भाजपा यशस्वी झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला टार्गेट करणार त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागणार याची जाणीव भाजपच्या नेत्यांना होतीच त्यानुसार देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, अमित साटम या नेत्यांनी तशी तयारी केली होती ती तयारी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत उपयोगी ठरली.
नको बारामती, नको भानामती, अशा घोषणांची आठवण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या ऐन मोक्याच्या क्षणी आज काढण्यात आली. या घोषणांमधून पिंपरी चिंचवडकरांच्या मनातल्या पार्थ पवारच्या पराभवाच्या आठवणींना उजाळा द्यायची आयडिया भाजपच्या नेत्यांनी पुढे आणली.
दादा – ताईंच्या ऐक्यात प्रफुल्ल पटेलांची पाचर; केंद्रातल्या सत्तेच्या खुर्चीसाठी “पवार संस्कारितांची” तडफड!!, हेच राजकीय वास्तव चित्र प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाखतीतून समोर आले.
प्रखर हिंदुत्व ते हिंदू – मुस्लिम वादाला घाबरणारा पक्ष; ठाकरेंच्या शिवसेनेचे हरवून गेले लक्ष्य!!, शिवसेनेची अशीच अवस्था मुंबईतून समोर आले.
इंजिनात बसून मशालीने विरोधकांना जाळायची भाषा; पण ठाकरे बंधूंना आपल्या पक्षांमधली गळती रोखता येईना!!, अशी अवस्था मुंबईत झाली आहे.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी हराकरी केली, पण त्याचवेळी भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस भारी ठरली. 29 महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने एकवटून निवडणुका लढवलेली नाही. उलट सर्वच्या सर्व महापालिकांमध्ये सगळे विरोधक विस्कटलेल्या अवस्थेत निवडणूक लढवताना दिसतात. त्यामुळे भाजप समोर विरोधकांचे कुठले आव्हानच नाही. मुंबईत ठाकरे बंधू, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका – पुतणे या दोन राजकीय घराण्यांनीच भाजपकडे थोडेफार आव्हान निर्माण केले. काँग्रेसवाले तर यात फार मागे पडले, पण असे असताना सुद्धा भाजपवाल्यांनी सरळपणे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून “सेल्फ गोल” करण्यात “धन्यथा” मानली.
पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांनी केली “गेम”; महापालिकेला तसे करण्याचे अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन, ती वस्तुस्थिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या हमीपत्र नंतर समोर आली.
पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक नेतृत्व एकवटून अजित पवारांना थेट “आवाज” टाकणाऱ्या भाजपा आमदार महेश लांडगे यांना घेण्यासाठी पवार कुटुंबाला एकवटावे लागले.
अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!, हेच राजकीय चित्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.
महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!, असलाच प्रकार महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने समोर आलाय. महापालिकांच्या निवडणुकात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला जातोय. त्यात स्थानिक मुद्द्यांपासून ते नेत्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे विषय चघळले जात आहेत. त्यातच काही नेत्यांनी शरद पवारांच्या पासून ते हिजाबवाल्या महिलेच्या पंतप्रधान पदापर्यंतची चर्चा या निवडणुकीत पुढे आणली. त्यामुळे ही निवडणूक जास्तच रंगतदार झाली.
विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने; पण अजितदादांनी त्याचे श्रेय दिले शरद पवारांना!!, असे आज लातूरमध्ये घडले.
अंबरनाथच्या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठी खेळी केली खरी, पण ती सुद्धा तोकडी ठरली. अंबरनाथ नगर परिषदेत बहुमताची बाजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच मारली.
ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर उतारा; देवेंद्र फडणवीसांचा तर्री पोहा!!, असेच चित्र माध्यमांमधून तरी समोर आले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी फक्त मुंबई आणि ठाणे या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केले, पण तिथे सुद्धा ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरून प्रचारात भाग घेतला, असे दिसले नाही. त्यांनी मुंबई परिसरात सहा सभांचे नियोजन केले. पण प्रत्यक्षात सभाच घेतल्या नाहीत. ठाकरे बंधू ठाण्यात आणि नाशिक मध्ये सुद्धा एकत्र सभा घेणार, असे जाहीर झाले. पण ते या दोन्ही शहरांमध्ये फिरकले नाहीत. दोघांनी मुंबईत आपापल्या पक्षांच्या काही शाखांना भेटी दिल्या.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पवारांना आणि त्यांच्या अनुयायांना काही फायदा जरूर झाला, पण क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला मात्र कायमचा फटका बसला. पवारांची महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर एकहाती सत्ता होती, तिला भाजपने टप्प्याटप्प्याने सुरुंग लावला. क्रिकेट पासून कुस्तीपर्यंत वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्ष पवारच राहिले. शरद पवार अजित पवार रोहित पवारांनी वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद कायम आपल्या ताब्यात ठेवले.
उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून वाद निर्माण करत आहेत. महायुतीतल्या सहयोगी पक्षावर किती आणि कसे बोलायचे हे त्यांनी ठरविले पाहिजे. अन्यथा मी बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, कसे बोलू शकतो आणि कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला. फडणवीसांनी या इशाऱ्यातून आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला.
शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.
शरद पवार “सिंह” आणि अजित पवार “वाघ’; पण दोघेही अडकलेत दोन महापालिकांच्या पिंजऱ्यात!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवार आणि अजित पवारांची झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना आली जाग, महाराष्ट्रात अजून दोन-चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!, अशी अवस्था अजित पवारांची झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लक्ष केंद्रित करून तिथेच प्रचाराचा धुरळा उडवला आहे.
महापालिकांच्या निवडणुका मध्यावर आले असताना ठाकरे बंधू बसले अजूनही घरी पण एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले.
पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांची पूर्ती झाली “शोभा”; स्थानिक आणि किरकोळ निवडणूकांमध्ये निघाली हवा, असेच म्हणायची वेळ अजित पवार आणि रोहित पवारांच्या राजकीय अवस्थेवरून येऊन ठेपली.
अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो
मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!, असेच राजकीय चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर समोर आले.
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App