नागपूर जिल्हा न्यायालयासाठी लवकरच आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या इमारतीत न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि प्रभावी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विश्वविक्रमी फलंदाज विराट कोहली याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंडनमध्ये सदिच्छा भेट घेतली.
आगामी गणेशोत्सवात भाविकांना अन्नदान, महाप्रसाद किंवा प्रसादाचे वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना यंदा अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ल्यांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. या भीषण हल्ल्यांमुळे आयुष्य कायमचे बदललेल्या कुटुंबीयांप्रती त्यांनी एकजुटीची भावना व्यक्त केली.
सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा, महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर तसेच सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये अन्नाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
गातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेरिकेच्या उद्योगपतींचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत आता एकही भारतीय किंवा अमेरिकेबाहेरील उद्योगपती राहिलेला नाही
मराठी चित्रपटसृष्टीला आणखी मोठी झेप घेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला
महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हस्ते शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती साकारली.
मुलींच्या शिक्षणासाठी साडी नेसून, हातात चप्पल घेऊन अंबाजोगाई येथे अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या रमाबाई अशोक रणवीर यांच्या संघर्षाची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दखल घेतली आहे.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीची सत्ता असतानाच आता दोन्ही मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद उफाळून येताना दिसत आहेत.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्वरांचा जादुई प्रवास अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला सांगीतिक वारसा यापुढेही कित्येक पिढ्यांना आनंद देत राहील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
गणरायाच्या आगमनासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, 33,872 स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. मुंबई ही देशाची वित्तीय राजधानी असून, आता ती जागतिक भांडवलाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट्यवधींच्या औषध विक्री व्यवसायातील व्यापारी विनीत मनोचा यांच्या हत्या प्रकरणाने कानपूरमध्ये खळबळ उडाली आहे. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांसह संबंधित व्यक्तींचे तब्बल 21 दिवसांचे कॉल डिटेल्स तपासले.
अभिनेता संजय दत्तच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला व्यासपीठावर मराठीत बोलण्याची विनंती केली असता, “मी येरवडा जेलमध्ये सहा वर्षे राहिलो
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द करण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी सोशल मीडियावर जिममधील एक व्हिडिओ शेअर केला
पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ने गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासन आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड यांच्यात २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमादरम्यान सामंजस्य कराराच्या प्रतींची औपचारिक देवाणघेवाण करण्यात आली.
जगातील देशांच्या संस्कृती, परंपरा आणि विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत.
ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीने गोविंदांचा जोश आणखी वाढला.
नेपाळमधील त्रिशुली-3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल नऊ दिवस अडकून राहिल्यानंतर 30 वर्षीय संजय साह यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या काळात त्यांनी सतत ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करत देवाकडे प्रार्थना केली.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App