नाशिक मधल्या TCS कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहादचा तपास समाधानकारक रित्या सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तपास आणि तथ्य शोध पथक नेमले. त्यांच्या येत्या १० दिवसांमध्ये रिपोर्ट आल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी आज मुंबईत दिली.
लोकसभेत महिला आरक्षण आणि पुनर्रचना विधेयके विरोधकांनी फेटाळल्यानंतर भाजपने देशभरात निदर्शने केली भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राजधान्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली.
माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
टाटा कन्सल्टिंग सर्विसेस TCS मधल्या कॉर्पोरेट जिहादची मास्टरमाईंड निदा खान हिला अटकेपासून दिलासा द्यायला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आज नकार दिला.
एरवी कुठल्याही राज्यांमधले नेते केंद्रातल्या नेत्यांना फॉलो करतात. राज्यांमध्ये नेते केंद्राच्या नेत्यांचे अनुकरण करतात. केंद्रातल्या नेत्यांच्या तोंडी असलेली भाषा राज्यातले नेते वापरतात.
मुंबई महापालिकेने कालच एक दोन नव्हे, तर १६४ शाळा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. त्या शाळांची यादी जाहीर केली. त्याबरोबर शिक्षणाचा कळवळा दाखवून काही मराठी माध्यमांनी आता या शाळेमधील मुले शिकणार कुठे??, त्यांच्या बालकांनी करायचे काय??, अशा आक्रोश करणाऱ्या बातम्या दिल्या. मुंबई महापालिकेने जणू काही मुलांचा शिक्षणाचा हक्कच काढून घेतल्याचा कांगावा मराठी माध्यमांनी या बातम्यांमधून केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा या मातीतला असल्याने तो रुजला, या उलट मार्क्सवादी विचार हा आयात केला म्हणूनच कालबाह्य झालेला मार्क्सवाद आज संपला असून, संघाचा विचार मात्र जनमानसात खोलवर रुजला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवून दिला ४०० पार घोषणेचा खरा मकसद!!, असेच म्हणायची वेळ मोदींनी काल रात्री केलेल्या भाषणामुळे आली. महिला आरक्षणाचा विषय मोदींनी ज्या पद्धतीने […]
काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी नारी शक्ती विधेयकाला विरोध करत महिलांच्या अधिकारांचे भ्रूणहत्या केली. ज्या ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणामध्ये अडथळे आणले त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज रात्री ८.३० वाजता भाषण; कोणत्या दिशेने राजकीय लढाई नेऊन देणार महिला आरक्षण??, असा सवाल आज समोर आला.
लोकसभेत काल महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयके फेटाळून लावल्यानंतर मोदी सरकार आक्रमक झाले. भाजपच्या नेत्यांनी विधेयके फेटाळण्याचे सगळे खापर काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर फोडले.
लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा परिसीमन विधेयके पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी हर्षवायू झाल्यासारखे लिहिले भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!, राहुल गांधींच्या या लिहिण्यामुळेच लाडक्या बहिणी कसा आणि कुठे देतील फटका??, असा सवाल ताबडतोब समोर आला.
: महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभांचे परिसीमन म्हणजेच सदस्य संख्यावाढ ही विधेयके लोकसभेने आज दोन तृतीयांश बहुमताच्या अभावी नामंजूर केली. महिलांना 33 % आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी आज लोकसभेतून खोडा घातला. लोकसभा सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या आधारे विधेयकाच्या बाजूने 278 मते दिली,
राहुल गांधींकडे ब्रिटिश आणि भारतीय असे दुहेरी नागरिकत्व असेल तर CBI तपास करा. त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करा, असे स्पष्ट आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज दिले. राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या संदर्भात FIR दाखल करून हे प्रकरण CBI कडे हस्तांतरित करावे, असे आदेश सुद्धा खंडपीठाने दिले. त्यामुळे राहुल गांधींच्या राजकीय आणि वैयक्तिक अडचणीत भर पडली. कर्नाटक भाजपचे कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांनी राहुल गांधींवर ब्रिटिश नागरिकत्व घेतल्याचा आरोप केला होता.
मोदी सरकारची चलाखी; प्रियांका गांधींची कबुली!!, हेच राजकीय वास्तव प्रियांका गांधींनी महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयकांवर केलेल्या भाषणातून समोर आले.
नाशिक मधले TCS कार्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच मराठी माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!, असलाच प्रकार गेल्या दोन दिवसांपासून समोर आला.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या महिला आरक्षण आणि लोकसभा विधानसभांच्या संख्या वाढीचे परिसीमन या विधेयकांना काँग्रेसच्या सगळ्या विरोधकांनी वेगवेगळी कारणे सांगून विरोध केला
निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.
मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात आणलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम या विषयाला थेट विरोध करता येत नाही म्हणून काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या विरोधकांनी लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध केला. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
33 % महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही असे सांगताना विरोधकांची लोकसभेत दमछाक; अडकले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलेल्या पेचात!!, असे राजकीय वास्तव चित्र आज लोकसभेतून समोर आले.
33 % महिला आरक्षणाचे क्रेडिट सरकारी खर्चाने विरोधकांना द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तयार झाले त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभांच्या पुनर्रचनेत दक्षिणी राज्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याची गॅरंटी नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत दिली.
शरद पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी नाईलाजाने पाठिंबा देणारी काँग्रेस विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार का??, असा सवाल आज समोर आला.
नाशिक मध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गोदावरी आरती केली, तर त्या उपक्रमाला कम्युनिस्टांनी आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध करून पाहिला. शेवटी पोलीस बंदोबस्तात आंबेडकर जयंतीची गोदावरी महाआरती करावी लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण देशाचा राजकीय नकाशा बदलायची तयारी; पण ठाकरे + पवार खेळत बसलेत घरातल्या घरात “खेळी”!!,
संसदेच्या विशेष अधिवेशना नारीशक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण मंजूर करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा नवा डाव टाकला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App