ठाकरे सेनेला मुंबईत नको भाजपची साथसंगत; पण चंद्रपुरात हवी सत्तेसाठी सोबत!!, अशी ठाकरे सेनेची दुहेरी राजकीय भूमिका आज समोर आली.
देवेंद्र फडणवीस : महापालिका टू जिल्हा परिषद व्हाया दावोस एक राजकीय प्रवास!!, अशाच शब्दांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या महिनाभरातल्या कर्तृत्वचे वर्णन करावे लागेल.
नाशिक : 29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या […]
29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. पण त्या पलीकडे जाऊन महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, पण त्यात अजितदादांचा सहभाग नगण्य असेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच निर्णायक भूमिका बजावतील.
नाशिक : राजधानी नवी दिल्लीत काँग्रेसने आज आयोजित केलेल्या मनरेगा श्रमिक संमेलनात काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या भाषणांपेक्षा राहुल गांधींचे फोटोशूटच सोशल मीडियावर जास्त गाजले. राहुल गांधींनी […]
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही.
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय कंपन्यांशीच दावोस मध्ये जाऊन करार केल्याचा आरोप शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांनी केला होता. प्रत्यक्षात युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्यांशी महाराष्ट्राने तिथे करार केले.
केरळमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्रातले नेते आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केरळच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तिरुअनंतपुरम मध्ये जाऊन एक वेगळीच भाजप सूचना केली. त्यामुळे सत्ताधारी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) वेगळीच राजकीय खळबळ माजली. अशी सूचना करून रामदास आठवले यांनी अशी सूचना करून कम्युनिस्टांना “गुगली” टाकली, की भाजपला “बाउन्सर” टाकला??, या विषयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
काँग्रेसवाले हरले तरी भांडणे आणि जिंकले तरी भांडणेच!!, असला प्रकार त्या पक्षातून समोर आलाय. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत पराभूत झाला. त्यांनी ठाकरे बंधूंशी फारकत घेतली आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली. पण ती दोन्ही पक्षांना राजकीय दृष्ट्या पचली नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेसचे फक्त 24 नगरसेवक निवडून आले. २२७ पैकी 24 हा परफॉर्मन्स बघून काँग्रेसचे मुंबईतले नेते भडकले.
नितीन नवीन माझे बॉस आहेत. मी कार्यकर्ता आहे, अशा एका वाक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप मधला पिढीचा बदल म्हणजे Generation Change अधोरेखित केला.
केवळ फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??, असा सवाल मराठी माध्यमांच्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे समोर आला.
बारामती बाराची, पराभवानंतरही अजितदादांची खुमखुमी!!, असा प्रकार समोर आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पवार काका – पुतण्याचा दणकून पराभव झाला. भाजपशी टक्कर घेणे दोन्ही पवारांना एकत्र येऊन सुद्धा जमले नाही, भाजपवर नाही नाही ते आरोप करून अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची सत्ता खेचून आणता आली नाही, तरीसुद्धा अजित पवारांची खुमखुमी शमली नाही, याचेच प्रत्यंतर आले.
(नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाटेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकवा!!, असला प्रकार मराठी माध्यमांच्या लिबरल पत्रकारितेतून समोर आला आहे.
कपिल सिब्बल मुंबईत येऊन जे बोलले, ते राजकीय सत्यच होते आणि आहे. पण ते म्हटल्यानुसार “जसेच्या तसे” घडवायची जबाबदारी संबंधित पक्षांवर आहे का??, हा खरा सवाल आहे. काय म्हणाले, कपिल सिब्बल??
महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन पवार एकत्र येतील, पण ते पुणे जिल्हा परिषदेच्या पलीकडे जातील का??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निकालांमुळे समोर आला आहे.
संजय राऊतांची शिंदे सेनेत संशय पेरणी; पण ठाकरे आणि राऊतांच्या नादी लागून शिंदे करतील का आत्मघाती कृती??, असा सवाल समोर आलाय.
भाजपा – शिवसेना युतीने मुंबई महापालिका जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव टाकत असल्याची फक्त माध्यमांतून चर्चा;
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका अजित पवार हरले. त्यांनी महायुती मधला वरिष्ठ नेत्यांचा वादा तोडून भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली त्यांना भ्रष्टाचारी ठरविले.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले “धुरंधर” हे जसे दाखवून दिले, तसेच त्यांच्या टीम मधले महत्त्वाचे नेते सुद्धा “साईड हिरो” झाले हे सगळ्या महाराष्ट्रासमोर आले.
महापालिकांच्या निवडणुका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय भाकीत वर्तविले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू जरी एकत्र आले असले
महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, राज्याच्या राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. या निकालांनी महायुतीचे वर्चस्व अधोरेखित केले असून विरोधकांसाठी, विशेषतः पवार आणि ठाकरे गटासाठी हे निकाल आत्मचिंतन करायला लावणारे आहेत.
ठाकरे खरे झुंजले, डबल ढोलकी पवार हरले, खोटे चाणक्य धुळीस मिळाले!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातल्या मतदारांनी महापालिका निवडणुकीत रंगविले.
असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला 100 + जागा, ओळखा पुढचा धोका; नुसत्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणाऱ्यांना इशारा!!, हे महाराष्ट्रातले वेगळे राजकीय वास्तव 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढे आले. या निकालामुळे अनेकांनी महाराष्ट्रात मुसलमानांचा राजकीय प्रभाव वाढल्याची भीती व्यक्त केली. पण यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांकडून मुसलमान दूर गेले हे राजकीय वास्तव फारसे कुणी स्वीकारले नाही. काँग्रेस, उबाठा शिवसेना या दोन पक्षांना मुसलमान मतदारांनी जोरदार फटका दिला.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका जिंकल्याचे सेलिब्रेशन भाजपने केले असले, तरी मुंबईत ठाकरे बंधूंनी भाजपला कडवी टक्कर दिली.
महापालिका निवडणुकांमध्ये पवार नावाच्या ब्रँडचा मतदारांनी पुरता बोऱ्या वाजवला. त्याचीच मजा महाराष्ट्रातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी घेतली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App