मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र : व्यूहरचना आणि कृती आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली.
बुद्धिबळाचा पट समोर येताच शरद पवारांनी राजा आणि वजीरालाच हात घातला, पण त्यामुळे तो दिल्लीतल्या वगैरे हात घातला की गल्लीतल्या वजीराला हात घातला??, असा सवाल समोर आला. त्याचे उत्तरही लगेच मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची राजी – नाराजी आणि अर्थ मंत्रालयाची मागणी यांची नेमकी राजकीय किंमत किती??, या सवालाचे सध्यातरी उत्तर ० (शून्य) या आकड्याने देता येईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत किंवा पक्षबाह्य कितीही राजी किंवा नाराजी व्यक्त केली
डीलिमिटेशन किंवा परिसीमनाच्या मुद्द्यावर देशातले प्रादेशिक पक्ष प्रचंड अस्वस्थ झाले आहेत लोकसभेतल्या राज्यसभेतल्या खासदारांची विधानसभेतले आणि विधान परिषदेतल्या आमदारांची संख्या वाढली आणि राजकीय विस्तार झाला तर आपले भवितव्य काय??, याची चिंता प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना जास्त भेडसावते आहे. त्यामुळेच सध्या दिल्लीपासून राज्यांच्या राजधान्यांपर्यंत नुसती धावपळ सुरू आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सत्तालोलूप पक्षातल्या नेत्यांची भेटीगाठींची झुंबड उडाली आहे. त्यातून रुसवे फुगवे होत आहेत. दोन राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये प्रचंड खेचाखेच सुरू आहे, पण खरंतर ती फारच संकुचित आणि छोटी बाब आहे.
कोलकत्याच्या सुभाष बाबू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांकरा मशिद हलवायचा निर्णय घेतात बंगालमधल्या माजी मुस्लिम मंत्र्याला आठवला हिंदू – मुस्लिम भाईचारा!!
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी धडपडाट; म्हणून तर फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याचा घालताहेत “घाट”!!, हेच राजकीय वास्तव राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यातून समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या “एक्सप्लेनेशन मोडचा” आज तिसरा दिवस आला. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचा खुलासा केला.
विरोधकांमध्ये काँग्रेस एकाकी; चिदंबरम यांची लेखी कबुली!!, हीच राजकीय वास्तव पी. चिदंबरम यांनी केलेल्या दीर्घट्वीटमुळे समोर आले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!, हे चित्र सलग दोन दिवसांमध्ये दिसले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची हीच अवस्था सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी म्हणे एकत्र जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला. त्यात मोठा भूकंप होणार, अशा बातम्यांचे पेव फुटले. त्यामध्येच अमोल मिटकरी या विधान परिषदेतून निवृत्त झालेल्या आमदाराने आपल्या ट्विट मधून भर टाकली. त्यात राष्ट्रवादीच्या तथाकथित हक्काच्या अर्थ मंत्रालयाच्या बातमीची शेपूट जोडली.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मटण – मांस विक्रीवर बंदी; पण खवचट मराठी माध्यमांना “खटकली” खवय्यांची “कोंडी”!! असला प्रकार आज समोर आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला झारखंड सारख्या दुरुस्त राज्यातून आव्हान मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस झटकन explanation mode मध्ये आली, किंबहुना पक्षाला तशा mode मोडमध्ये यावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना कमोडिटी करून ठेवलेय आणि त्यांना विनोदाचा विषय करून ठेवलेय, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशिक मधल्या कार्यक्रमात व्यक्त केली.
संजय राऊत यांनी त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत आजपर्यंत केलेली सगळी भाकिते खोटी ठरली असताना सुद्धा आज त्यांनी धडाक्याने नवे राजकीय भाकित केले.
मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर विरोधकांचा फुलटॉस; देवेंद्र फडणवीसांचा षटकार; बाकीच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गमावली संधी!!, हेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. विरोधकांनी फडणवीस सरकारला खऱ्या अर्थाने कधी घेरलेच नाही.
कुठेच काही जमत नाय म्हणून पवारांच्या पक्षाचे तीन डगरींवर हात पाय!!, असला प्रकार शरद पवारांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीतून समोर आला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या सहा महिन्यांमधली अवस्था अशीच झालेली दिसली.
उद्धव ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर आणि शरद पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ दाखवायची भाजपची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये बोलून दाखवली.
सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज सुप्रिया सुळे दुसरे करणार तरी काय??, असा सवाल त्यांच्याच एका वक्तव्यामुळे समोर आलाय.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती आज स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी सार्थक ठरली!! कारण भारताला खंडित स्वरूपात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 79 वर्षांनी शामाप्रसाद मुखर्जींचे एक महत्त्वाचे स्वप्न त्यांच्या राज्यात साकार झाले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय बारगळल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेस पक्षात विलीन करायच्या बातम्या सुरू झाल्या. या बातम्यांना आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हवा दिली.
केंद्रातल्या मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणजेच मोदी सरकारची तिसरी टर्म सुरू झाली. या तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि भविष्यात करणार काय??, याचे तपशील आकडेवारीसकट समोर आले.
सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!, असला प्रकार ठाकरे सेनेकडून विधान परिषदेत समोर आला.
भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत भारताने प्रगतीची खूप उंच झेप घेतली. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याकडे वाटचाल सुरू असताना डिजिटल इंडियाने महत्त्वाची कामगिरी केली. भारतातल्या सामान्य नागरिकांच्या व्यवहारात क्रांतिकारी बदल झाले. त्यांचे व्यवहार सोपे झाले आणि अधिक सुरळीत झाले.
सचिन अहिरांनी शिंदे सैनिक येऊन उद्धव ठाकरेंना दिल्या त्यांच्या पक्षाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App