पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!, ही अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय अवस्था येऊन ठेपली आहे.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर आली, पण या दोन्हीकडे “पवार संस्कारितांनीच” आपली भांडणे उघड्यावर आणली.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!, हा राजकीय आणि आर्थिक “चमत्कार” घडवायचे कर्नाटकातल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने ठरविले आहे. झाडू मारायच्या मशीनवर एवढा मोठ्या खर्चाचा आकडा पाहून विरोधकांसह सामान्य नागरिकांनी देखील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
स्थानिक राजकारणाच्या गदारोळात दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्येच एकमेकांना फोडून स्वबळ वाढवायची स्पर्धा लागली त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्याचे पडसाद फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी बैठकीत आणि नंतर उमटले, पण सकाळची नाराजी संध्याकाळच्या तोडग्यामुळे संपुष्टात आली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कलादालनाचे उद्घाटन केले. या कलादालनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बांगलादेश स्वतंत्र करण्याची शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागली “किंमत”; हीच खरी मोहम्मद युनूस नावाच्या पाकिस्तानी मनोवृत्तीची फ़ितरत!!, याचा अनुभव पुन्हा एकदा बांगलादेशात आला.
कसली आलीय vote chori??; कमी करा सीना जोरी!! हा सल्ला दुसरा तिसरा कुणी नाही, तर काँग्रेस प्रेमी पत्रकारांनीच राहुल गांधींना आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिलाय.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घराणेशाहीतून तयार केलेले रेकॉर्ड बिहार विधानसभा निवडणुकीत तुटले.
वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला, भाजपने घेतला; पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेता नाही फिरकला!!, असे आज छत्रपती संभाजी नगर मध्ये घडले.
बिहार विधानसभा निवडणूक यांचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणातून जे मोठे राजकीय भाकीत वर्तविले, ते काँग्रेस फुटीचे आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून काँग्रेसच्या सध्याच्या आमदारांच्या विरोधात काँग्रेस मधले नेते आणि कार्यकर्ते बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सध्याच्या नामदारांचे नेतृत्व मान्य नाही कारण सध्याच्या नामदारांनी मूळ काँग्रेसची “मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस” करून टाकली आहे, अशी खिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली. त्यापुढे जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल, असे भाकीत केले.
बिहार विधानसभेचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज असे दोन वेळा वर्तविले
शिल्पकलेतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नवी दिल्ली नजीक नोएडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.
फक्त जातीच्या समीकरणावर निवडणूक लढा आणि हमखास पडा!!; बिहारने शिकवला धडा!!, असे म्हणायची वेळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी आणली.राहुल गांधींच्या काँग्रेसने आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने कितीही सामाजिक न्यायाच्या बाता मारल्या, तरी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुका केवळ जातीच्या समीकरणावरच लढविल्या होत्या हे सत्य लपून राहिले नाही
बिहारमध्ये अब्रू पुरती गेली; त्यानंतर काका फुटण्याला सुचली पश्चात बुद्धी!!, असंच म्हणायची वेळ पवार काका – पुतण्यांच्या प्रतिक्रियांवरून आली.
सध्याची काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस बनली आहे. काँग्रेसच्या नामदारांचे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेस मधल्या अनेक नेत्यांना आवडत नाही. त्यामुळे लवकरच काँग्रेस फुटेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या बिहार विजयी सभेत केले.
सध्याची काँग्रेस ही मूळची काँग्रेस उरली नसून ती मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस बनली आहे. बिहार मधल्या पराभवानंतर ती आणखी एका फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे.
Gen Z आणि महिलांचा ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास; बाता मारणाऱ्या चिरतरुण नेत्यांना चपराक!!, हे खरं म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे खरे फलित आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मराठी नेते चमकले, पण एकटे अजित पवार घसरले, असे राजकीय चित्र आज निकालाच्या दिवशी समोर आले.
बिहारच्या निवडणुकीशी सुतराम संबंध नाही; पण तरीही प्रतिक्रिया देण्याची संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंना घाई!!, असे चित्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात दिसले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या राज्यात राजकीय भूकंप झाला. तिथले जातीय मुस्लिम + यादव (M+Y) समीकरण उद्ध्वस्त झाले
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात प्रचंड उलटफेर झाला असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) प्रचंड विजयाच्या दिशेने पुढे सरकली, तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल महागठबंधन यांची मोठी घसरण झाली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे निवडणूक आयोगाने दिलेले कल लक्षात घेता बिहारमध्ये तेजस्वीचे तेज फिके, कन्हैयाची बासरी फुटली आणि राहुलची vote chori फसली, अशाच शब्दांनी वर्णन करावे लागेल.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या 14 नोव्हेंबरला लागणार आहेत पण ते निकाल येण्याच्या दिवशीच बिहारमध्ये “नेपाळ” आणि “बांगलादेश” घडवायची लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने तयारी केली. तशी धमकीच राष्ट्रीय जनता दलाचे नेते सुनील सिंह यांनी दिली. त्यामुळे बिहार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ विकसन करणे या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही विशेष सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजनही केले.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 2017 मध्ये सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिम नगरसेवकांना निवडून आणण्यात आघाडीवर होते. पण आता या दोन्ही पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. कारण खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मुक्तहिदा मुसलमीन (AIMIM) याने तब्बल 50 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच ही घोषणा केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App