विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला.
शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरे यांची विलीनीकरणाला टांग!!, अशीच राजकीय घडामोडी आज राजधानीतून समोर आली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीलाच मोठ्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानिमित्ताने पवार कुटुंबाची “डबल गेमच” राजधानीतून समोर आली.
अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??, असा सवाल समोर आलाय.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालात शिंदे सेनेला मागे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास, पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!,
जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल कुणी संशय आणि संदेह पसरवेल तितके दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण दूरच जाईल.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्योग आले पाहिजेत त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना उद्योजक सुद्धा प्रतिसाद देत आहेत ते महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत, पण काही घटक मात्र उद्योगांना त्रास देत असतील, तर त्यांना ठोकून काढू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका!!, असा सल्ला म्हणे, काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिला. काँग्रेस सावध झाल्याच्या नावाखाली या बातम्या सर्व मराठी माध्यमांनी दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. काँग्रेस पक्ष स्वतःच्याच बळावर वाढवा. काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम स्वतंत्रपणे लोकांपर्यंत न्या, असा सल्ला म्हणे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा नुसताच गदारोळ प्रत्यक्षात पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मतदानाची घसरण आणि त्याकडे कुणाचेच लक्ष नाही, असे राजकीय चित्र आज समोर आले.
अजितदारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच उरली की काय??, अशी शंका येणारी आकडेवारी साम टीव्हीने घेतलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या एक्झिट पोल मधून समोर आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यक्तीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प आणि देवेंद्र फडणवीस विदर्भ – तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!, हेच राजकीय चित्र आज शनिवारी समोर आले.
ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा आणि अजितदादा गेल्यानंतर भाजपच्याच हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!, असेच राजकीय चित्र मुंबई आणि बारामतीतल्या आजच्या घडामोडींमधून समोर आले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे या सुनिता पवार यांच्या शपथविधीनंतर मात्र पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून अचानक “दूर” झाल्याने त्यांच्याभोवतीचे राजकीय गूढ वाढले.
औद्योगिक क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरू असून विदर्भातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे उद्योजक आकर्षित व्हावेत, त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करावी, यासाठी राज्यातल्या फडणवीस सरकारने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवारांनी पार्थ पवार च्या नावाचा आग्रह धरला, अशी बातमी सकाळ समूहाच्या साम टीव्हीने दिली. पण त्यामुळेच कवडीची किंमत वाढली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी *खेळी” केली??, असा सवाल समोर आला
संजय राऊत यांनी आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत शरद पवारांना महाविकास आघाडी कडून राज्यसभेची निवडणूक लढवायची “ऑफर” दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, जालना-नांदेडसह अनेक जिल्ह्यांमधील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या ‘न्यू टाऊन’ प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली.
लोकसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसच्या महिला खासदारांचा हल्ला होणार असा पोलखोल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत उत्तरच दिले नाही. त्याउलट त्यांनी राज्यसभेत जाऊन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांनी राजकीय आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले. अगदी तरुण वयातच ते आमदार मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्यांचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व विकसित होत होते. पण 1985 नंतर शरद पवारांच्या राजकीय आयुष्याला जे वळण लागले, त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख सोनिया ते सुनेत्रा असा उतरत गेल्याचेच चित्र समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुढे रेटू शकतील का??,
बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा double game खेळली. सुनेत्रा पवारांना संधी दिली.
जणू पवार एकटेच टाकतात “डाव” आणि बाकीचे खेळतात गोट्या; अजितदादांचे कट्टर विरोधक काळूराम चौधरी काय म्हणाले??, ते तरी वाचा!!, असे म्हणायची वेळ काही youtubers आणि “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी चालविलेल्या “youtube वर गोंधळ आणि बारामतीत मुजरा” या सिनेमामुळे आली.
विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!, असेच प्रफुल पटेल यांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेचे वर्णन करावे लागेल.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलचे सगळे नेते लाभार्थी; त्यामुळे मग story किती खरी, किती खोटी??, असा सवाल समोर आला.
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांमध्ये भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App