विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!, हेच राजकीय वास्तव जयंत पाटलांनी झी24तासला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले.
राहुल गांधींनी ज्या प्रकारे कांशीराम यांच्या राजकीय वारसावर डल्ला मारलाय, ते पाहून उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे Political Icons संपले का??, असा सवाल तयार झाला तर आश्चर्य वाटायला नको.
नरेंद्र मोदी हे पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झाले आहेत. त्यामुळे देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला मोदींनी सुरुवात केली आहे. एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. त्यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या समोर गहाण ठेवले आहे, असे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सोडले. चारित्र्य नसलेला पंतप्रधान संघाला कसा काय चालतो??, असा सवाल सुद्धा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मोदी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरले.
काशी येथील ऐतिहासिक मनिकर्णिका घाटाचे संवर्धनाचे काम सुरू असताना तेथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काही मुद्दे उपस्थित केले होते.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचा खोडा आहे तो निघता निघत नाही, हे लक्षात आल्यावर शरद पवारांच्या गटाने वेगळाच “डाव” टाकला. रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या भेटीगाठींमधून तो समोर आला.
राहुल गांधी बड्या उद्योगपतींकडे लग्नाला नाही जात, ते शेतकरी कुटुंबाच्या लग्नात जातात, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून “डबल गेम” समोर आली. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काल एकाच वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, पण ही भेट कशासाठी होती??, याची कारणे मात्र दोघांनी वेगवेगळी दिली.
मनसेचा आजचा वर्धापन दिन राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन साजरा केला. आजच्याच दिवशी त्यांच्या पक्षाला मराठवाड्यातल्या एका पंचायत समितीत सत्ता मिळाली.
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची प्रफुल्ल पटेल यांनी साधी दखलही घेतली नाही.
ठाकरे आणि पवारांच्या मागे काँग्रेसची फरफट; 14 खासदार आणि 16 आमदार असूनही काँग्रेसला नाही किंमत!!,
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह तुतारीच्या अनावरणासाठी तब्बल 40 वर्षांनी रायगडावर गेले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या 9 मार्च 2016 रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावर जाणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच सोशल मीडिया पोस्ट मधून हे जाहीर केले.
इस्रायलच्या पंतप्रधानांनी allies at war हे पुस्तक वाचले आणि इराणच्या विरोधात अरब देश एकवटले!!, अशी प्रतीकात्मक घडामोड घडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले.
जोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे वारे वाहून तसे घडून येण्याची शक्यता होती, तोपर्यंत रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधला “स्वार्थ” दिसला नव्हता, पण विलीनीकरणाची शक्यता मावळल्या बरोबर रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधल्या “स्वार्थाचा साक्षात्कार” झाला!!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजकीय अहंकार आज कळसाला पोहोचला. केंद्र सरकार विषयीचा आकस आता राष्ट्रपतींपर्यंत येऊन ठेपलेला दिसला.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा!!, हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा असल्याची राजकीय वस्तुस्थिती आता समोर आलीय.
सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचू शकले!!, अशी राजकीय वस्तुस्थिती काल समोर आली. किंबहुना ते राजकीय रहस्य काल उलगडले. राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी inside story म्हणून या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचा 2026 – 2027 सालचा अर्थसंकल्प सादर करावा लागला.
ज्या दिवशी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी पवार कुटुंबातल्या दोघांना बिनविरोध राज्यसभेत पाठविले, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने धर्मांतर विरोधी – लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. याच फडणवीस सरकारमध्ये बाहेरून पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत.
बिहार सारख्या मोठ्या राज्यात शांतपणे सत्तांतर घडवून नितीश कुमार राज्यसभेत येऊन भाजपच्या मुख्य टीम मध्ये सामील झाले, पण शरद पवार वयाच्या 86 व्या वर्षी राज्यसभेत येऊन सुद्धा अजून “राखीव” खेळाडूच्या भूमिकेतून बाहेर पडू शकले नाहीत.
भाजपाकडून राजकीय प्रयोग जोरात पण पवारांचा पक्ष जुन्याच प्रयोगाच्या कर्दमात म्हणजे चिखलात!!, असे राजकीय चित्र आज राज्यसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने समोर आले.
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी हो – नाही, नाही – हो, असे करत अखेरीस शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार, तरीही राष्ट्रवादी अस्वस्थ आणि बेजार!!, हीच राजकीय वस्तुस्थिती आज महाराष्ट्रासमोर आहे. कारण पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार असले तरी त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीची खरी राजकीय सूत्रे आज कुठल्याच पवारांच्या हातात खऱ्या अर्थाने उरलेली नाही त्या सूत्रांमध्ये एक तर भाजपने आणि दुसरा त्यांच्याच राष्ट्रवादीतल्या भाजपला अनुकूल असलेल्या नेत्यांनी पक्का शिरकाव केलाय.
राज्यात 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समाेर आली आहे. या प्रकरणाचा तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकाळत ठेवत काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरच्या दिवशी त्यांना महाविकास आघाडीची राज्यसभा उमेदवार द्यायचे मान्य केले. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या, तेव्हा कुठे काँग्रेस हायकमांडने आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्या उमेदवारीला मान्यता दिल्याची बातमी आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App