मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा खडा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी – अमराठी वादावर भाष्य करताना उपस्थित केला आहे. त्यांनी यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाचे वा नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर विशेषतः ठाकरे बंधूंवर होता हे स्पष्ट आहे.
सुप्रीम कोर्टाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात म्हटले आहे की, जर महिला सुशिक्षित असेल तर तिने पोटगी मागण्याऐवजी स्वतः काम करावे. महिलेने मुंबईत फ्लॅट, १२ कोटी रुपयांचा देखभाल खर्च आणि महागडी बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती.
संपूर्ण पृथ्वी एक दिसते. अंतराळातून कोणत्याही सीमा दिसत नाहीत.’, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय नागरिक शुभांशू शुक्ला यांचे विधान एनसीईआरटीच्या पाचवीच्या वर्गाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. हे पुस्तक विशु अधाना यांनी तयार केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अभ्यासक्रमातील बदलाचे समर्थन केले. ते म्हणाले की, भारताला समजून घेण्याची आणि योग्य पद्धतीने सादर करण्याची गरज आहे. भागवत म्हणाले- आज शिकवला जाणारा इतिहास पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. भारताचे अस्तित्व त्यांच्या विचारांमध्ये नाही. भारत जगाच्या नकाशावर दिसतो, पण त्यांच्या विचारांमध्ये नाही. चीन आणि जपान त्यांच्या पुस्तकांमध्ये सापडतील, भारत नाही.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात जबरदस्तीने आणि फसवणुकीच्या आधारे होणाऱ्या धर्मांतरांना अटकाव घालण्यासाठी लवकरच धर्मांतर प्रतिबंधक कायदा (Anti-Conversion Law) आणण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रमेन्द्र शेट आणि आम आदमी पक्षाचे क्रूझ सिल्वा यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
देशभरात भटक्या कुत्र्यांनी माजवलेली दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील वर्षभरात तब्बल ३७ लाख ४० हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले, तर किमान ५४ जणांचा मृत्यू रेबीज किंवा गंभीर जखमांमुळे झाला. इतकी भीषण आकडेवारी समोर असूनही केंद्र सरकारने या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ प्राणी जन्म नियंत्रण (ABC) नियम २०२३ यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनामाच्या नंतर अनेकांना जम्मू काश्मीर आणि मणिपूरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची आठवण झाली.
भारतातील आघाडीच्या क्रिप्टो एक्सचेंज CoinDCX वर 19 जुलै रोजी मोठा सायबर हल्ला झाला. हॅकर्सनी कंपनीच्या अंतर्गत ऑपरेशनल खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवून सुमारे $44 दशलक्ष (380 कोटी रुपये) चोरले. ही खाती फक्त अन्य एक्सचेंजेसवर लिक्विडिटीसाठी वापरली जात होती, त्यामुळे ग्राहकांच्या निधीला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ४ दक्षिण भारतीय कलाकारांना समन्स बजावले आहेत. यामध्ये राणा दग्गुबती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मंचू यांचा समावेश आहे.
बिहारमधील आरा येथे गँगस्टर चंदन मिश्राच्या हत्येशी संबंधित काही आरोपी आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) यांच्यात चकमक झाली आहे. यामध्ये दोन गुन्हेगारांना गोळी लागली. एकाला अटक करण्यात आली आहे. शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.
केरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन म्हणाले की, शशी थरूर राष्ट्रीय सुरक्षेबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना तिरुअनंतपुरममधील कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात आमंत्रित केले जाणार नाही.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यानंतर राजधानी नवी दिल्ली सकट संपूर्ण देशातल्या राजकीय वर्तुळात नुसतेच तर्क वितर्क लढविले जात आहेत. पण प्रत्यक्षात कुणालाच त्यांच्या राजीनामाच्या खऱ्या कारणांच्या मूळापर्यंत जाता आले नाही.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. पुढील आठवड्यात, या मुद्द्यावर लोकसभेत १६ तास आणि राज्यसभेत ९ तास चर्चा होईल. तथापि, विरोधकांचे म्हणणे आहे की, चर्चा अधिवेशनाच्या सुरुवातीलाच झाली पाहिजे आणि पंतप्रधान मोदींनी त्यावर प्रतिक्रिया द्यावी.
विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळणारी किंवा न रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची विकेट काढण्यासाठी पवार कुटुंब एकवटले आहे. रोहित पवारांच्या बरोबरच सुप्रिया सुळेंनी दिल्लीतून त्यासाठी “राजकीय गोलंदाजी” केली आहे.
कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील एका भाजी विक्रेत्याला केवळ UPI व्यवहारांमुळे 29 लाख रुपयांची GST नोटीस पाठवण्यात आली आहे. शंकरगौडा नावाचे हे विक्रेते गेली चार वर्षे भाजीपाल्याचं दुकान चालवत असून, त्यांनी या काळात एकूण 1.63 कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले. हे व्यवहार पाहून GST विभागाने त्यांच्याकडून कराची मागणी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध वाराणसीमध्ये खटला दाखल केला जाणार आहे. सोमवारी वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने माजी पंतप्रधानांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली. राहुल गांधींवर अमेरिकेत शिखांविरुद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे.
खलिस्तानी दहशतवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेत खलिस्तान स्वातंत्र्य रॅलीची घोषणा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाबाहेर ही रॅली काढण्यात येणार आहे. दोन दिवसांनी येथे खलिस्तानच्या समर्थनार्थ जनमत चाचणी घेण्यात येणार आहे.
कॅश घोटाळ्यात अडकलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जुलै रोजी, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, त्यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या नोटिसा संसदेच्या दोन्ही सभागृहातील पीठासीन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या २१५ खासदारांच्या (लोकसभेत १५२ आणि राज्यसभेत ६३) स्वाक्षऱ्या आहेत.
भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून कार्यरत असलेले जगदीप धनखड यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलेल्या राजीनाम्यात त्यांनी वैद्यकीय कारणांचा उल्लेख करत आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले.
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात पायलटच्या चुकीचे वृत्त खोटे असल्याचे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटले आहे. नायडू यांनी परदेशी माध्यमांनाही संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी घाईघाईत कोणताही निष्कर्ष काढू नये असा सल्लाही दिला आहे.
श्रावणानिमित्त उत्तर प्रदेशातील रस्ते आणि महामार्गांवर कावडियांचा जमाव आहे. रविवारी दिल्लीहून परतताना मुख्यमंत्री योगी यांनी गाझियाबादमधील दुधेश्वर मंदिरात जलाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी बागपतमध्ये हेलिकॉप्टरमधून कावडियांवर पुष्पवृष्टी केली.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांची अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. सोमवारी विमान धावपट्टीवरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे.
कर्नाटक सरकारने धर्मस्थळ मंदिरात महिला आणि मुलींवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपास पथकात आयपीएस अधिकारी डॉ. पुनव मोहंती, एमएन अनुचेत, सौम्या लथा आणि जितेंद्र कुमार दयाम यांचा समावेश आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात कर्नाटक सरकारने म्हटले आहे की या प्रकरणाव्यतिरिक्त, एसआयटी राज्यातील इतर संबंधित प्रकरणांची देखील चौकशी करेल. महिला आयोगाच्या शिफारशीवरून सिद्धरामय्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी त्यांच्या यूपीएससी मुलाखतीची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, त्यांची यूपीएससी मुलाखत २१ मार्च १९७७ रोजी झाली होती, ज्या दिवशी देशात आणीबाणी उठवण्यात आली होती
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. देशभरातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 7 कोटी मुलांचा बायोमेट्रिक डेटा (बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो) आधारमध्ये अपडेट केला जाईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App