पंतप्रधान मोदींनी शनिवारी सुरत विमानतळावर बिहारच्या जनतेला संबोधित केले. भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, बिहारने अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत जातीच्या राजकारणाला नकार दिला.
भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट इनोव्हेशन अरुणाचल प्रदेशच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात, १६,००० फूट उंचीवर चालण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे सैनिकांना आवश्यक वस्तू जलद पोहोचवता येतात.
बिहार विधानसभेचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज असे दोन वेळा वर्तविले
कर्नाटकातील बागलकोटमध्ये, ऊसाच्या किमती वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. रबकावी-बनहट्टी तालुक्यातील गोदावरी साखर कारखान्यात ऊसाने भरलेले १०० हून अधिक ट्रॅक्टर जाळण्यात आले.
ब्रिटनमधील आघाडीची मीडिया संस्था बीबीसीने गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी केलेल्या भाषणाचे चुकीचे संपादन केल्याबद्दल त्यांची माफी मागितली.
फक्त जातीच्या समीकरणावर निवडणूक लढा आणि हमखास पडा!!; बिहारने शिकवला धडा!!, असे म्हणायची वेळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी आणली.राहुल गांधींच्या काँग्रेसने आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने कितीही सामाजिक न्यायाच्या बाता मारल्या, तरी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुका केवळ जातीच्या समीकरणावरच लढविल्या होत्या हे सत्य लपून राहिले नाही
कर्नाटक सरकारने राज्यात पीरियड लीव्ह पॉलिसी 2025″ लागू करणारा अधिकृत आदेश जारी केला आहे. यामुळे सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दरवर्षी १२ पगारी सुट्ट्या किंवा महिन्याला एक पगारी मासिक पाळीची रजा मिळेल.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या निकालापूर्वी बांगलादेशात हिंसाचार वाढला आहे, त्याच्या निषेधार्थ त्यांच्या अवामी लीग पक्षाने देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिली आहे.
जम्मू – काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री ११:२० वाजता मोठा स्फोट झाला. यात सात जणांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींपैकी बहुतेक पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्यावर ९२ आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी, बिहारमध्ये एनडीएच्या विजयावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारच्या लोकांनी खळबळ उडवून दिली आहे. आता कट्टा सरकार कधीही परत येणार नाही. त्यांनी छठी मैय्याचा जय जयकारही केला. ते म्हणाले की, जे लोक छठपूजेला नाटक म्हणू शकतात, ते बिहारचा आदर कसा करतील.
दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेले “व्हाइट कॉलर मॉड्यूल” सुमारे पाच वर्षांपूर्वीचे आहे. प्रत्येक सदस्य त्यांच्या स्वतःच्या गटाचा नेता होता, परंतु खरा नेता, डॉ. मुजफ्फर अली राथेर अजूनही फरार आहे आणि तो यूएईमध्ये असल्याचा संशय आहे. दरम्यान, सूत्रांनी उघड केले की मॉड्यूलमध्ये सहभागी डॉक्टर सुमारे तीन वर्षांपासून स्फोटके गोळा करत होते. त्यांनी दर महिन्याला एक नवीन चॅट ग्रुप तयार केला. ते बांगलादेश, अफगाणिस्तान, दुबई आणि सौदी अरेबियामध्ये भेटत होते. तेथे पाकिस्तानी हँडलरदेखील त्यांच्या संपर्कात होते.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. एनडीएने २०२ जागांसह प्रचंड विजय मिळवला आहे. महाआघाडी ३५ जागांवर आली आहे. यावेळी बिहारमध्ये महाआघाडीला मोठा धक्का बसला आणि राजद-काँग्रेस युतीने २०१० नंतरची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. यामागील पाच प्रमुख कारणे कोणती होती? समजून घेऊया.
सध्याची काँग्रेस मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस बनली आहे. काँग्रेसच्या नामदारांचे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण काँग्रेस मधल्या अनेक नेत्यांना आवडत नाही. त्यामुळे लवकरच काँग्रेस फुटेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या बिहार विजयी सभेत केले.
अदानी समूहाने पुढील १० वर्षांत आंध्र प्रदेशात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक बंदरे, सिमेंट, डेटा सेंटर, ऊर्जा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात असेल.
सध्याची काँग्रेस ही मूळची काँग्रेस उरली नसून ती मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस बनली आहे. बिहार मधल्या पराभवानंतर ती आणखी एका फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे.
Gen Z आणि महिलांचा ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास; बाता मारणाऱ्या चिरतरुण नेत्यांना चपराक!!, हे खरं म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे खरे फलित आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटांचा तपास करणाऱ्या एजन्सींना एक मोठा सुगावा लागला आहे. पोलिस सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की, अटक केलेल्या संशयितांचे तुर्कीची राजधानी अंकारा येथील एका परदेशी हँडलरशी थेट संबंध होते.
१४,५९९ कोटींच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रिअल इस्टेट कंपनी जेपी इन्फ्राटेक लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची ईडी काेठडी सुनावली. जेपी समुहातील कंपन्या जेएएल, जेआयएल यांनी घर खरेदीदारांकडून १४,५९९ कोटी रुपये वसूल केले. यातील मोठी रक्कम बांधकामाऐवजी जेपी सेवा संस्थान ट्रस्ट, जेपी हेल्थकेअर लिमिटेड व जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड सारख्या इतर समूह कंपन्या आणि ट्रस्टमध्ये वळवण्यात आली. मनोज गौर हे जेएसएसचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. यामुळे अपूर्ण प्रकल्प आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
बुधवारी लडाखमधील न्योमा येथील मुध हवाई तळावर ऑपरेशन्स सुरू झाले. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी काल त्याचे उद्घाटन केले. त्यांनी नोएडा येथील हिंडन हवाई तळावरून सी-१३०जे सुपर हरक्यूलिस विमान उडवले आणि ते न्योमा हवाई तळावर पोहोचले.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मराठी नेते चमकले, पण एकटे अजित पवार घसरले, असे राजकीय चित्र आज निकालाच्या दिवशी समोर आले.
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभा सदस्यत्व पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत रद्द केले. न्यायमूर्ती देबांशू बसक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप आमदार अंबिका रॉय यांनी दाखल केलेल्या याचिकांवर निकाल देताना रॉय यांना राज्य विधानसभेतून अपात्र ठरवले.
बिहारच्या निवडणुकीशी सुतराम संबंध नाही; पण तरीही प्रतिक्रिया देण्याची संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंना घाई!!, असे चित्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात दिसले.
मूडीज रेटिंग्जने असा अंदाज वर्तवला आहे की पुढील दोन वर्षांसाठी भारत जी-२० देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. मूडीजच्या मते, २०२७ पर्यंत भारताचा जीडीपी विकास सरासरी ६.५% राहण्याचा अंदाज आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या राज्यात राजकीय भूकंप झाला. तिथले जातीय मुस्लिम + यादव (M+Y) समीकरण उद्ध्वस्त झाले
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App