भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध दाखल केलेली रिट याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल दुबे यांच्याविरुद्ध अवमान कारवाईची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय निधी कमी करण्यासाठी रणनीती आखत आहे. यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) प्रमुखांची भेट घेतली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांबद्दल शोक व्यक्त केला. यासोबतच, त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याबद्दल बोलले.
बांगलादेशच्या चितगाव न्यायालयाने हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. चितगाव न्यायालयाचे वकील सैफुल इस्लाम अलिफ यांच्या हत्येप्रकरणी हा आदेश देण्यात आला.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती.
५ मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाने इंडियाज गॉट लेटेंटमध्ये एका अपंग मुलाची चेष्टा केल्याच्या प्रकरणाची सुनावणी केली. समय रैनावर त्याच्या शोमध्ये एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलावर आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने मुंबई पोलिस आयुक्तांना या प्रकरणातील पाचही आरोपींना पुढील सुनावणीत हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत
एकीकडे, भारत पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्धाची तयारी करत आहे आणि दुसरीकडे, भारतीय लष्कराच्या ताफ्यात नवीन शस्त्रे आपली जागा घेत आहेत.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर सलाल + बागलीहार आणि किशनगंगा धरणांमध्ये पाणी रोखले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांची दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरूच आहे. दरम्यान, भारतीय सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठ्या कारवाई केल्या. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानला युद्धाची भीती वाटत आहे.
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तळाशी पोहोचत असताना, तपास यंत्रणांना एक मोठा सुगावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या कटामागे अल उमर मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुश्ताक अहमद जरगरचे नाव स्पष्टपणे समोर आले आहे. जरगर हा तोच दहशतवादी आहे जो १९९९ च्या कंदहार विमान अपहरण प्रकरणात सुटला होता. सध्या तो पाकिस्तानात राहतो.
देशातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये त्याचबरोबर महत्त्वाच्या संस्थांमध्ये नागरी संरक्षणासंदर्भातल्या सर्व व्यवस्था चोख करा. त्यासाठी आवश्यक ती mock drills 7 मे रोजी घ्या, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सर्व राज्यांना जारी केले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत त्यांनी भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की ज्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी हल्ल्याचा कट रचला त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करून दिली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सांगितले की ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटतील आणि विरोधी पक्षाने पाकिस्तानला भेट दिलेल्या खासदार गौरव गोगोई यांना तिकीट का दिले हे विचारतील.
जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी हे आज भारत दौऱ्यावर आले असून नेमका त्याच वेळी दुसऱ्या जपानी नेत्याच्या हातून भारताने पाकिस्तानवर आजच economic strike केला. हा योगायोग वरवरचा वाटत असला तरी तो भारतीय नेतृत्वाने तो कौशल्याने घडवून आणला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-जपान संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर जपानकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फोन केला. भारताने दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या लढ्यात रशियाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. पण त्यापलीकडे जाऊन पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातले balancing act केले.
: पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुर्शिदाबाद दंगलींबाबत गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. यामध्ये, पश्चिम बंगालसाठी कट्टरतावाद आणि अतिरेकीवाद हा एक मोठा धोका असल्याचे वर्णन केले आहे.
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी (४ मे) ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, पहलगाममध्ये गोळीबार सुरू असताना ते युरोपमध्ये सुट्टी घालवत होते. मिलिंद देवरा यांनी एक्सवर म्हटले आहे की, ‘उद्धव ठाकरेंच्या युरोप दौऱ्याच्या विपरीत, शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच काळात पीडितांना मदत केली.’
भारताने जम्मू-काश्मीर मधले महत्त्वाचे प्रकल्प बागलीहार + सलाल आणि किशनगंगा या सगळ्या धरणांची गेट बंद केली असून त्याचा परिणाम अवघ्या 16 तासांमध्ये पाकिस्तान दिसला. पाकिस्तानात वाहून जात असलेल्या चिनाब आणि झेलम नद्यांचा जलस्तर 40 % कमी झाला. ऐन उन्हाळ्यात आज जलस्तर कमी झाल्याने पाकिस्तानात पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपण उपदेशक नव्हे तर भागीदार शोधत असतो. विशेषतः ते उपदेशक जे परदेशात जे उपदेश करतात, पण घरी आचरणात आणत नाहीत.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी आपण घेतो असे इंग्लंडमध्ये सांगून आपल्या राजकीय मोठेपणाचा आव आणून दाखविला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला राहुल गांधी कसे जबाबदार नेते आहेत आणि ते चुका मान्य करून त्याची जबाबदारी देखील कशी घेतात याची वर्णने करणारे ट्विट आणि व्हिडिओ राहुल गांधींच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर राहुल गांधींनी चुकांची घेतलेली जबाबदारी आणि प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या चुका आणि त्यामुळे सगळ्या देशाला चुकवावी लागलेली किंमत यातली फार मोठी विसंगती समोर येते.
: आसाममधील पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या लोकांवर सतत कारवाई केली जात आहे. आसाम पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी हॅकर्सनी आता सायबर हल्ल्यांद्वारे भारतीय युजर्सना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यांमध्ये युजर्सचे संगणक, लॅपटॉप आणि फोन लक्ष्य केले जात आहेत.
भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ प्रभावाने काढून टाकल्या आहेत. हा निर्णय त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या ६ महिने आधी ३० एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App