रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले की, संपूर्ण युक्रेन आमचे आहे आणि बफर झोन तयार करण्यासाठी युक्रेनियन शहर सुमीवर कब्जा करण्याची धमकी दिली.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी एक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, इस्लामिक देशांतील काही ‘हँडलर’ काँग्रेसच्या समर्थनार्थ ५ हजारांहून अधिक सोशल मीडिया अकाऊंट्स चालवत आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी हा सर्वात मोठा परकीय हस्तक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून, केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणा या प्रकाराची चौकशी करत आहेत, असेही सरमा यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ निमित्त, बेंगळुरूस्थित अक्षर योग केंद्राने १२ नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करून ऐतिहासिक कामगिरी केली. केंद्राचे संस्थापक आणि आध्यात्मिक प्रमुख हिमालयन सिद्ध अक्षरजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाली.
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि विधवा, वृद्ध आणि अपंगांचे पेन्शन वाढवले आहे. सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत आता या लोकांना दरमहा ११०० रुपये मिळतील. पूर्वी त्यांना दरमहा ४०० रुपये मिळत होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
गेल्या नऊ दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू आहे. त्यामुळे इराणमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. ज्या अंतर्गत आतापर्यंत दोन गट भारतात पोहोचले आहेत.
अलीकडेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये जेवण केले. यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी अमेरिकेच्या वृत्तीवर भाष्य केले. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, अमेरिका इतर देशांचा तोपर्यंतच ‘मित्र’ आहे जोपर्यंत त्याचा फायदा होतो आणि अमेरिका त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काहीही करू शकते.
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रगड्यात आपल्या देशाचे तुकडे होतील, याची खात्री दहशतवादी देश पाकिस्तानला पटत चालली आहे
अहमदाबाद विमान अपघातासाठी एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला त्यांच्या तीन अधिकाऱ्यांना सर्व पदांवरून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. फ्लाइट क्रू शेड्यूलंगशी संबंधित ‘गंभीर आणि वारंवार उल्लंघन’ केल्यामुळे DGCA ने एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे.
आंध्र प्रदेशमधील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील २०,००० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथे एका भव्य योग सत्रात भाग घेतला आणि एक नवीन विश्वविक्रम रचला. या विक्रमाची अधिकृत घोषणा आज होऊ शकते.
इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने भारतासाठी अपवादात्मक निर्णय घेत, आपले हवाई क्षेत्र खुलं केल्याने ‘ऑपरेशन सिंधू’च्या दुसऱ्या टप्प्यास गती मिळाली असून, सुमारे १,००० अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या भारतात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे बिहार मधले दौरे वाढले. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांचे सत्ताधारी पक्षांवरचे हल्ले देखील वाढत चालले.
बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचे मोठे शिरकाण झाले त्यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कुठली चिंताजनक प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती, पण गाझा पट्टी आणि इराण यांच्यावर इजराइलने प्रतिबंधात्मक हल्ले केले.
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये सांगितले की, ओडिशातील डबल इंजिन सरकारमुळे लोकांना दुहेरी फायदा मिळत आहे. आज ओडिशामध्ये भाजप सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. हा केवळ सरकारचा वर्धापन दिन नाही. हा एका स्थापित सरकारचा वर्धापन दिन आहे. हा सुशासनाचा वर्धापन दिन आहे.
: दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा दावा नोबेलवर!!, असे अमेरिकेच्याही इतिहासातले रसातळाचे राजकारण आज घडले. अ
इराणचे भारतातील उपराजदूत मोहम्मद जावेद हुसैनी यांनी इस्रायलविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि भारताला इस्रायलचा उघडपणे निषेध करण्याचे आणि त्यावर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या आणि शांतताप्रिय देशांनी, जे जागतिक दक्षिणेचा आवाज आहेत, इस्रायलवर टीका करून आघाडीची भूमिका बजावली पाहिजे.
इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवणारे अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी हे जगभरात ओळखले जाणारे एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. आजही त्यांच्या नावावर तेहरानमध्ये रस्ते, विद्यापीठे आणि चलन नोटा आहेत. पण त्यांच्याशी संबंधित एक रोचक माहिती अशी आहे की, त्यांच्या पूर्वजांचे मूळ भारतातील उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात होते.
पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लंडनस्थित डॉक्टर राजतशुभ्र बंधोपाध्याय यांना भेटायला गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांना कोलकाता पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने केंद्र-राज्य संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले असून भाजपने राज्य सरकारवर “गुंडशाही”चा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने इंदूरस्थित खासगी कंपनी मेसर्स तीर्थ गोपिकॉन लिमिटेडशी संबंधित १८३ कोटी रुपयांच्या मोठ्या बनावट बँक हमी घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
आज म्हणजेच २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्ताने विशाखापट्टणममध्ये योगासनं करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशाचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी राजधानी भुवनेश्वरमध्ये रोड शो केला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीनला भेट देणार आहेत. ते २५ ते २७ जून दरम्यान चीनच्या दौऱ्यावर असतील. चीन दौऱ्यादरम्यान राजनाथ किंगदाओ शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बंडखोरीनंतर पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-१ ने हसीना यांना खटला लढण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील उपलब्ध करून दिला आहे.
राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार उपेंद्र कुशवाह यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उपेंद्र कुशवाह यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ही धमकी मिळाली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी सिवानमधील एका सभेला संबोधित केले.
जर तुम्हालाही रेल्वे तिकीट बुक करताना वेटिंग लिस्ट पाहून काळजी वाटत असेल, तर आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. वेटिंग तिकिटांची अनिश्चितता कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही ट्रेनमध्ये बुकिंग फक्त एका निश्चित मर्यादेपर्यंतच केले जाईल – आणि ती मर्यादा एकूण जागांच्या फक्त २५टक्के असेल. म्हणजेच, आता ‘वेटिंगमध्ये टाकूया, कदाचित तिकीट कन्फर्म होईल’ हा विचार देखील बंद होणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App