बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त अब्दुर रहमान मसूद यांनी सांगितले की, अवामी लीग आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही. राजशाही येथील प्रादेशिक लोक प्रशासन प्रशिक्षण केंद्रात (आरपीएटीसी) आयोजित ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा आढावा’ या विषयावरील कार्यशाळेत त्यांनी हे विधान केले.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची माफी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तथापि, न्यायालयाने त्यांच्या अटकेलाही स्थगिती दिली आहे.
अयुब खान, याह्या खान आणि झिया उर रहमान नाही दाबू शकले, तर मोहम्मद युनूस काय चीज आहे??, असा जोरदार सवाल करत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने बांगलादेशात पुनरुत्थानाचा निर्धार केला.
भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी १८ मे २०२५ रोजी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एसएनएससी) सचिव अली अकबर अह्मदियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत भारत-इराण धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली, ज्यात विशेषतः चाबहार पोर्ट प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरवर (आयएनएसटीसी)जोर देण्यात आला. भारताने प्रादेशिक स्थिरतेत इराणच्या ‘रचनात्मक भूमिके’ची प्रशंसा केली
सोमवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी युद्धविरामात ट्रम्प यांची भूमिका आणि पाकिस्तान आणि तुर्कियेशी तणावपूर्ण संबंधांसह अनेक मुद्द्यांवर आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीचे ट्रम्प यांचे दावे बरोबर नाहीत. यादरम्यान, समितीने मिस्री आणि त्यांच्या कुटुंबावरील सायबर हल्ल्याचा एकमताने निषेध केला आणि एक ठराव मंजूर केला.
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज(मंगळवार) पुण्यात निधन झाले आहे.
पाकिस्तानचे 2025 – 26 चे वार्षिक बजेट अर्थात अर्थसंकल्प पाकिस्तानचे शहाबाज शरीफ सरकार किंवा पाकिस्तानी लष्कर फायनल करणार नाही
दिल्ली पोलिसांनी सोमवार, १९ मे रोजी एका मोठ्या पायरसी रॅकेटचा पर्दाफाश केला आणि १.७ लाखांहून अधिक पायरसी केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके जप्त केली. त्याची किंमत २.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले होते. भारतीय हवाई संरक्षण दलाने ते हाणून पाडले. लष्कराच्या जवानांनी पंजाबमध्ये पाडण्यात आलेल्या पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्राचे अवशेषही दाखवले.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्वासितांच्या एका प्रकरणात म्हटले की, भारत ही धर्मशाळा नाही. जगभरातील निर्वासितांना आपण भारतात का आश्रय द्यावा? आपण १४० कोटी लोकांसोबत लढत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आपण सगळीकडून येणाऱ्या निर्वासितांना आश्रय देऊ शकत नाही. श्रीलंकेच्या एका नागरिकाची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतले आहे. ज्योतीची चौकशी करण्यासाठी एनआयएचे पथक सोमवारी हिसारला पोहोचले. यानंतर, तिला ताब्यात घेऊन चंदीगडला नेण्यात आले. आता ज्योतीची तिच्या दहशतवादी संबंधांबद्दल चौकशी केली जाईल. यासोबतच जम्मू इंटेलिजेंस युट्यूबरची चौकशी देखील करेल.
देशात ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) ही संकल्पना राबवली गेल्यास सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा दावा यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी केला आहे.
लष्कर-ए-तोयबाचा टॉप दहशतवादी सैफुल्ला खालिद याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. तो बराच काळ नेपाळमधून काम करत होता. यावेळी तो सिंध प्रांतातील बदिन येथील मातली येथे राहत होता. भारतातील तीन हल्ल्यांच्या कटात त्याचे नाव होते.
सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग लागून आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेत मृतांना आणि जखमींना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कारवाईत हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाची योजना आखणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राशी घनिष्ठ संबंध आणि पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडॉरला झालेल्या दौऱ्यामुळे ओडिशातील यूट्यूबर प्रियांका सेनापती सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. गुप्तचर विभागाने तिच्या हालचाली आणि संबंधांची चौकशी सुरू केली आहे.
भारतीय सैन्याचे शौर्य आणि पराक्रम पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर आले आहे. वेस्टर्न कमांडने जारी केलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये, भारतीय सैनिक पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, लष्कराने हे सिद्ध केले आहे की भारत केवळ आपल्या सीमांचे रक्षणच करू शकत नाही तर गरज पडल्यास शत्रूंना त्यांच्याच हद्दीत घुसून प्रत्युत्तर देखील देऊ शकतो.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी झालेल्या वादग्रस्त विधानांनंतर मध्य प्रदेश भाजपने आपल्या नेत्यांसाठी सार्वजनिक भाषण कौशल्यावर आधारित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर जून महिन्यात भोपाल येथे होणार असून, नेत्यांनी बोलताना होणाऱ्या चुकांपासून बचाव करावा आणि प्रभावी संवाद साधावा यावर भर दिला जाणार आहे.
“मौत का सौदागर” नंतर पुढची चूक! अनेक वर्षे मार खाऊ नये काँग्रेसची भागेना भूक!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस पक्षाच्या नव्या टीकेने आणली आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त करण्यासाठी स्वदेशी विकसित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याची पुष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसाठी ‘एक पद, एक पेन्शन’ देण्याचा आदेश दिला आहे.
व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे नवीन पोप लिओ-१४ यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते व्हॅटिकनला पोहोचले आहेत. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले आहेत.
पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर मुंबईत मोठ्या बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आला आणि तेव्हापासून पोलिस हाय अलर्टवर आहेत. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन रूम नंबर ११२ वर हा धमकीचा फोन आला होता आणि फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्रोने रविवारी सकाळी ५.५९ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV-C61) द्वारे आपला १०१ वा उपग्रह EOS-09 (पृथ्वी वेधशाळा उपग्रह) प्रक्षेपित केला, परंतु हे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही.
काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई हे पाकिस्तान सरकारच्या थेट निमंत्रणावर आयएसआयच्या संपर्कात येऊन तिकडे गेले होते आणि परतल्यावर त्यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीचा तीव्र विरोध केला, असा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App