पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सत्ताधारी एनडीए खासदारांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेला संबोधित केले. ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ या थीमवर भर देत, त्यांनी खासदारांना त्यांच्या मतदारसंघात २०-३० स्वदेशी मेळावे आयोजित करण्यास सांगितले
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : The existence of 15 political parties : देशातील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका निरपेक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोग वर असते. […]
आज 9 सप्टेंबर 2025 सरकारे कोसळण्याचा दिवस ठरला. फ्रान्स आणि नेपाळ या दोन देशांमधली सरकारे आज एकाच दिवशी घरी जाऊन बसली.
भारतातील लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकवरील बंदी उठवण्याची कोणतीही योजना नसल्याचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अश्विनी वैष्णव यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: Jaideep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफ आकारणीमुळे या वर्षी भारताचा जीडीपी विकासदर ०.५०% कमी होऊ शकतो. असे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नागेश्वरन म्हणाले… मला आशा आहे की हा अतिरिक्त कर जास्त काळ टिकणार नाही. या आर्थिक वर्षात हा कर जितका जास्त काळ चालू राहील तितका त्याचा परिणाम जीडीपीवर ०.५% ते ०.६% पर्यंत होऊ शकतो. परंतु जर हा कर पुढील वर्षापर्यंत वाढला तर त्याचा परिणाम आणखी जास्त होईल, जो भारतासाठी मोठा धोका निर्माण करू शकतो.
सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये एसआयआर (मतदार पडताळणी) विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली. न्यायालयाने म्हटले – आधार हा ओळखीचा पुरावा, नागरिकत्वाचा नव्हे.न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदार ओळखपत्रासाठी आधार हा १२ वा दस्तऐवज मानण्याचे आदेश दिले. सध्या, बिहार एसआयआरसाठी ११ विहित कागदपत्रे आहेत, जी मतदारांना त्यांच्या फॉर्मसोबत सादर करावी लागतात.
शरद पवारांनी दाखवली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची एकजूट; पण ते टाळू शकतील का INDI आघाडीतल्या खासदारांची फूट
केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रत्यार्पणाच्या अपीलात बेल्जियम सरकारला आश्वासन दिले आहे की भारतात हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मानवतेने वागवले जाईल. गृह मंत्रालयाने त्यांच्या पत्रात चोक्सीला कोणत्या कक्षात ठेवले जाईल याचाही उल्लेख केला आहे.
मंगळवारी देशाला १५ वे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. एनडीएने ६८ वर्षीय सीपी राधाकृष्णन यांना तर भारताने ७९ वर्षीय बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७८१ खासदार संसदेत मतदान करतील. मतमोजणी सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. त्यानंतर निकाल जाहीर केले जातील.
जम्मू-काश्मीरमधील पवित्र हजरतबल परिसरातील राष्ट्रीय चिन्हाची झालेली विटंबना आणि त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार तारिक अन्वर यांनी दिलेल्या विधानामुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. अन्वर यांनी “जे झालं ते झालं” असे उद्गार काढले. या वक्तव्यामुळे भाजपने काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल करत राहुल गांधींनाही थेट लक्ष्य केले आहे.
भारतामध्ये सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने सोमवारी सकाळपासून मोठी मोहीम उघडली. जम्मू-काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांमधील एकूण २२ ठिकाणी समांतर धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत अनेक संशयितांवर चौकशी करण्यात आली असून, मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्डडिस्क, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असलेले पुरावे जप्त करण्यात आले.
आगामी सणासुदीच्या काळात भारतीय वस्तूंना प्राधान्य देऊन देशी उद्योगांना बळकटी मिळवून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एनडीए खासदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात ‘स्वदेशी मेळे’ आयोजित करावेत. यामधून स्थानिक उत्पादक, कारागीर, लघुउद्योग, महिला स्वयं-सहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकाता न्यायालयात सहारा इंडिया ग्रुपविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात १.७४ लाख कोटी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्याचा उल्लेख आहे.ईडीने सहारा संस्थापक दिवंगत सुब्रत रॉय यांच्या पत्नी सपना रॉय आणि मुलगा सुशांत रॉय यांना आरोपी म्हणून नाव दिले आहे. अनिल वलपारंपिल अब्राहम आणि जितेंद्र प्रसाद (जेपी) वर्मा यांच्यासह समूहाचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील आरोपींमध्ये आहेत.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर मोठा बवाल चालवलाय; प्रत्यक्षात विरोधकांपुढे खासदारांचे सध्याचे संख्याबळच टिकवण्याचे खरे आव्हान आहे, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्य समोर आले.
भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले.
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने पुढील सात वर्षांत (आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत) वीज उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशन-वितरणात सुमारे ६० अब्ज डॉलर्स (सुमारे ५.३४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश भारताची वेगाने वाढणारी वीज मागणी पूर्ण करणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यास मदत करणे आहे.
भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा रविवारी सुरू झाली. पंतप्रधान मोदींनीही त्यात सहभाग घेतला. यादरम्यान ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. फोटो शेअर करताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, संसद कार्यशाळेत, देशभरातील सहकारी संसद सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि जनतेची चांगली सेवा करण्यासाठी असे व्यासपीठ खूप महत्वाचे आहे.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Sudarshan Reddy : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काही तासांवर येऊन ठेपले आहे. या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीए आघाडीने […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Vice President Election : माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले- लव्ह जिहाद आणि धर्मांतर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सौहार्दासाठी गंभीर धोका आहे. ते म्हणाले- बळजबरीने, प्रलोभनाने किंवा फसवणुकीने केलेले धर्मांतर अयोग्य आहे. यामुळे समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. आमचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत हे थांबवणे आहे. या समस्येचे निराकरण ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की लवकरच अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जसा प्रशांत किशोरने गांधी आंबेडकरांच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला मुस्लिमांना दिलाय
बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला पुढे आणलाय.
शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले त्यानुसारच बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा समाजाचे धर्मगुरु जितेंद्र महाराज (पोहरादेवी) यांनी रविवारी ता. ७ हिंगोली ेयेथे दिला आहे.
भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके दिवसेंदिवस वाढत असून ते केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिलेल्या भाषणात या धोक्यांची सविस्तर चर्चा करत सहा प्रमुख आव्हाने अधोरेखित केली. सीमारेषेवरच नव्हे तर डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार आहे असे आवाहन त्यांनी केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App