जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेने (SIA) मंगळवारी श्रीनगरमधील 8 ठिकाणी छापे टाकले. एप्रिल 1990 मध्ये खोऱ्यात दहशतवाद शिखरावर असताना काश्मिरी पंडित महिला सरला भट्ट यांच्या अपहरण आणि हत्येशी संबंधित हा खटला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी Rahul Gandhi मतदानाच्या चोरीचा विषय तापवून निवडणूक आयोगाला सातत्याने टार्गेट केले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटक मधल्या महादेवपुरा मतदारसंघाचे उदाहरण देऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानात एवढा फरक कसा?
राहुल गांधींनी उचलून धरलेला मतांची चोरी मुद्द्यासाठी काँग्रेसने सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेन उघडले. त्यामध्ये लोकांना सहभागी व्हायला सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआरच्या महानगरपालिका संस्थांना भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांची नसबंदी करण्याचे आणि त्यांना कायमचे आश्रयगृहात ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि जर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यामध्ये सहभागी झाली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत. पण हे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस सत्तेत असतानाच तयार झालेल्या मतदार यादीतील कथित फेरफारांवर आता आक्षेप घेणाऱ्या पक्षाच्या भूमिकेवर कर्नाटकाचे सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बिहारमध्ये सुरू असलेल्या सखोल मतदार पुनरीक्षणावर (एसआयआर) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर सादर केले. आयोगाने म्हटले की, प्रारूप मतदार यादीतून बाहेर झालेल्या मतदारांची वेगळी यादी बनवणे वा त्यांची नावे समाविष्ट न करण्याची कारणे सांगणे वर्तमान कायद्यात बंधनकारक नाही.
विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचा शरद पवारांच्या पक्षात सन्मान; जितेंद्र आव्हाडांनी प्रवक्ते पद देऊन “वाढविला” “मान”!!, असे आज घडले.
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींची वातावरण निर्मिती, काँग्रेस अध्यक्षांनी घातली 5 स्टार जेवणावेळी; पण पक्षातला असंतोष रोखण्यात दोन्ही ठरले अपयशी!!, हीच समोर आली काँग्रेस मधली कहाणी!!
मतदार यादीतील अनियमिततेवरून त्यांच्याच पक्षावर टीका करणाऱ्या विधानानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर कर्नाटकचे सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी सोमवारी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.
उत्तर प्रदेशातील संभलनंतर आता फतेहपूरमध्ये मंदिर-मशीद वाद सुरू झाला आहे. येथे सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक बजरंग दल, हिंदू महासभा यासह अनेक हिंदू संघटनांचे २ हजार लोक ईदगाहमध्ये बांधलेल्या समाधीस्थळावर पोहोचले.
न्यायाधीश अॅडव्होकेट जनरल (JAG) शाखेत पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांसाठी २:१ च्या प्रमाणात आरक्षण देण्याच्या भारतीय लष्कराच्या धोरणाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्दबातल ठरवले. जेएजी ही लष्कराची कायदेशीर शाखा आहे, जिथे अधिकारी कायदेशीर सल्ला देतात, कोर्ट-मार्शल केसेस देतात आणि सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कायदेशीर गरजा पूर्ण करतात.
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अण्वस्त्र धमकीला भारताने सोमवारी प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की – अण्वस्त्रे दाखवणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. भारत अण्वस्त्रांच्या ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. आम्हाला स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे माहित आहे.
मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी मल्लिकार्जुन खरेदींची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!,
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शकुन राणी प्रकरण चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना राहुल गांधी यांनी शकुन राणी या महिलेचा संदर्भ दिला होता. त्या शकुन राणीने दोन वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या संबंधी सर्व पुरावे सादर करा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाकडून लढणाऱ्या एका अमेरिकन सैनिकाला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मरणोत्तर ऑर्डर ऑफ लेनिन पदक प्रदान केले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, या अमेरिकन तरुणाचे नाव मायकेल ग्लॉस (२१) होते. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये रशियाकडून लढताना तो शहीद झाला होता.
सुधारित आयकर विधेयक २०२५ उद्या म्हणजेच सोमवार, ११ ऑगस्ट रोजी संसदेत सादर केले जाईल. शुक्रवारी (८ ऑगस्ट) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३१ सदस्यीय निवड समितीने बदल सुचविल्यानंतर नवीन आयकर विधेयक २०२५ मागे घेतले.
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व INDI आघाडीवर लादण्यासाठी पुढाकार; पण निवडणूक आयोगाला सहीचे प्रतिज्ञापत्र द्यायला राहुलची माघार!!, हे सोनिया गांधी प्रणित राजकीय सत्य आजच्या मत चोरी प्रकरणाच्या खासदारांच्या मोर्चावरून सिद्ध झाले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले- मध्य प्रदेशमध्ये संरक्षण क्षेत्राचे केंद्र बनण्यासाठी सर्व गुण आहेत. त्यांच्याकडे सर्व संसाधने आहेत. रायसेनमध्ये केवळ रेल्वे कोचच तयार केल्या जाणार नाहीत तर विविध रेल्वे उत्पादने देखील बनवली जातील. मध्य प्रदेशमध्ये बनवलेल्या रेल्वे कोच देशभरातील स्पीड ट्रेनमध्ये वापरल्या जातील. मध्य प्रदेशचा औद्योगिक विकास देशाला विकासाच्या नवीन उंचीवर घेऊन जाईल.
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या मतचोरीच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १ लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला होता.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या घरी झालेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशनच्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांना शेवटच्या रांगेत बसवल्याची बातमी महाराष्ट्रभर गाजली.
मतदान चोरीच्या मुद्द्यापासून ते मतदार यादीच्या शुद्धीकरणापर्यंत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय खासदारांच्या 30 जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याची परवानगी दिली होती
मुंबईच्या दादरच्या कबुतरखान्यावरून वाद चांगलाच चिघळला आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी सरकारला आव्हान दिले आहे. धर्माच्या विरोधात गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा एकेरी उल्लेख केला.
डोनाल्ड ट्रम्पने फुगवलेल्या नोबेल फुग्याला लाडक्या असीम मुनीरची टाचणी; अमेरिकेतून भारताच्या बरोबर जगाला दिली अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी!!, असला प्रकार अमेरिकेतून समोर आला. Asim Munir
मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App