१७ मार्च रोजी नागपूर परिसरात झालेल्या दंगलीनंतर सरकारने पंचनामा आणि भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंचनामा अहवालानुसार, दंगलीत एकूण ६२ वाहनांचे नुकसान झाले, ज्यात ३६ कार, २२ दुचाकी, २ क्रेन आणि २ तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय एका घराचेही नुकसान झाले. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूरचे प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचनामा सुरू करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर नागपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया राबविली.
दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका, अशी विनंती करणारे उद्धव ठाकरेंनी एकदा नव्हे, तर दोनदा फोन केले होते
नागपूर मध्ये दंगल घडवणाऱ्या सगळ्या आरोपींकडून दंग्यातली नुकसान भरपाई वसूल करू. त्यांनी नुकसान भरपाईचे पैसे भरले नाहीत, तर प्रसंगी त्यांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. ही सुनावणी आता २ एप्रिल २०२५ रोजी होईल. सतीश सालियन यांनी त्यांच्या वकिलामार्फत ही याचिका दाखल केली होती,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये भेट झाली.
राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचे काम सुरु आहे. मात्र, खासगी आणि देवस्थानच्या जमीनी वक्फ बोर्डाने बळकावल्या असल्याचे आढळून आले तर त्या काढून घेतल्या जातील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची (MSIDC)’ आढावा बैठक पार पडली. एमएसआयडीसी रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी काम करणारी संस्था आहे
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी एक सरकारी निर्णय (GR) जारी केला. आता महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ती जागा (कोठी मीना बाजार) खरेदी करेल, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांनी म्हणजेच औरंगजेबाने ताब्यात घेतले होते. येथे एक संग्रहालय बांधण्याची योजना आहे.
‘कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या केसांवर टिप्पणी करणे किंवा गाणे गाणे हा लैंगिक छळ नाही,’ असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. १८ मार्च रोजीच्या आदेशात न्यायालयाने ही टिप्पणी केली.
आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नागपूर हिंसाचार प्रकरणात प्रवेश केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी तेथील पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले दहा; पण आजोबा कसे आणि किती लढले नातवाने सांगितले पाहा!!, असे आज मुंबईत घडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुदधीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एकत्रित सेवा ॲप (सिंगल विंडो ॲप) आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकीकडे औरंगजेबाची कबर वाचवण्याची बौद्धिक कसरत; तर दुसरीकडे छावा Chhawa सिनेमावर बंदी घालायची मौलानाची मागणी!! असला प्रकार देशात सुरू झालाय.
राज्यातील शासकीय कामामध्ये एआयचा वापर सुरू झाला आहे. डिजिटल गव्हर्नन्स आणि राइट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्य मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दीदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी गेट्स फाउंडेशनने महिलांना उद्योजक बनवण्यासाठी भागीदारी करण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाउंडेशनचे बिल गेट्स यांच्यात गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली.
नागपुरात भडकलेल्या हिंसेचे उदात्तीकरण करीत हिंसा पुन्हा भडकावी यासाठी दंगलीच्या व्हिडिओवर देशविघातक कॅप्शन लिहून व्हायरल करणारा नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान याच्यासह सहा आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवारांचे “हे” टेक्निक आत्मसात करायचा (शप) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya sule यांचा डाव, पण…!!, हे शीर्षक वाचून कोणते टेक्निक आणि ते का आत्मसात करायचा कोणता डाव??
विधिमंडळाने विधिमंडळाच्या बाहेर आज दिवसभर दिशा सालियन + आदित्य ठाकरे प्रकरणावर राजकीय गदारोळ झाला. जुनेच आरोप – प्रत्यारोप पुन्हा उगळले गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात औष्णिक केंद्रातील राखेच्या विक्रीसंदर्भात नव्या सर्वंकष धोरणाची घोषणा केली. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सध्या 100 टक्के लिलावाची अंमलबजावणी होत असली तरी स्थानिक उद्योगांना प्राधान्य देऊन त्यांचावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
महाराष्ट्रातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणिराईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक (कॅलेंडर) यूपीएससीप्रमाणे निश्चित करणार असल्याचे विधानपरिषदेत सांगितले. गेल्या पाच-सात वर्षांपासून विविध न्यायालयीन आदेशांमुळे वेळापत्रक बदलावे लागत असल्याचे सांगत त्यांनी यापुढे पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
नागपूर हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला हिंसाचार समोर आला आहे. त्यात 38 वर्षीय फहीम खान नामक व्यक्तीवर जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात घेतलेल्या बैठकीत राज्याच्या भविष्यवेधी विकासासाठी भूस्थानिक आणि माहिती तंत्रज्ञान यांची सांगड घालून ‘महाटेक’ संस्थेची निर्मिती करण्याचे निर्देश दिले. या संस्थेमुळे राज्याच्या नियोजन प्रक्रियेला गती मिळेल आणि ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीत मोठा हातभार लागेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App