निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी, पण त्यामुळेच “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी यायची जबाबदारी??, असा सवाल तयार झाला.भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविरुद्ध बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले. ठाकरे बंधूंना ठोकता ठोकता निशिकांत दुबे मराठी लोकांवर घसरले. बाहेरच्यांच्या टॅक्स वर मराठी लोक जगतात, असे बोलून बसले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात खुलासा करावा लागला. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यापासून महाराष्ट्र भाजपला अंतर राखावे लागले. पण जे काही झाले ते “पॉलिटिकली कॅल्क्युलेटेड” झाले असेच बोलले गेले. कारण त्यातून मराठी – अमराठी मतांचे ध्रुवीकरण समोर आले.
दारूच्या नशेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि धमकी देणे, अशा गंभीर प्रकारात अडकलेल्या राहील खान या याच्यापासून मनसेने स्पष्टपणे अंतर ठेवले आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सांगितले की, राहील हा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा असला तरी, त्याच्या वर्तनाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्याच्या वर्तनाचे समर्थन मनसे करत नसून, पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी संख्याबळ तोकडे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते सरन्यायाधीशांकडे धावले!!, असे आज विधिमंडळात घडले.
ठाकरे बंधूंनी गाजवला मराठीचा मुद्दा, पण पवारांच्या हाती लढायला मुद्दाच लागेना!!, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था होऊन बसली
रायगड मध्ये शरद पवारांची भाषा पुरोगामी, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फरफट ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या दारी!!, अशी अवस्था झाल्याचे समोर आलेय.
राज्याच्या अर्थसंकल्पीय व्यवहारांवर आणि निधीच्या वितरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत कडक शब्दांत टीका केली. “कोणाला किती निधी द्यायचा, हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात?” असा थेट सवाल करत त्यांनी अर्थविभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मराठी – अमराठी वादात मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी फटकावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मीरा-भाईंदर मध्ये मोठा मोर्चा काढला.
पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे समाजकारण योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आहे असे आपण म्हणतो, पण आज ज्यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत त्यांना फुले, शाहू, आंबेडकरांविषयी किती आस्था आहे याबद्दलची शंका वाटावी असे चित्र आहे, असे ते म्हणालेत.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण केले आणि त्यांच्या बोलण्यात पराभवाची छाया स्पष्ट दिसत होती. राज ठाकरे यांनी आमच्याबद्दल काहीही म्हटले नाही, म्हणून आम्हीही त्यांच्यावर काही बोलणार नाही, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.
देशात आर्थिक विकास होत असला, तरी त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही, हीच खरी चिंतेची बाब आहे, असे वक्तव्य करत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधले आहे.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र या मुद्द्यावरून संघाच्या प्रतिक्रियेवर वेगळाच narrative set करायचा प्रयत्न मराठी माध्यमांनी चालविल्याचे आज समोर आले. महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवायचा निर्णय घेतला. मात्र हिंदीची सक्ती केली, असा दावा करत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. फडणवीस सरकारने तो अध्यादेश मागे घेतला. त्यामुळे आपला विजय झाल्याचा दावा करून ठाकरे बंधूंनी ऐक्य मेळावा घेतला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला. त्यावरून हिंदी सक्ती आणि राज्यांच्या भाषांवरचे प्रेम या विषयावर वेगळेच राजकारण सुरू झाले.
राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हॉटेल विट्सच्या वादग्रस्त लिलावप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटांच्या अटी व शर्ती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करीत आहेत, अफवा पसरवत आहेत. या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. .
समविचारी पक्ष आणि काँग्रेसच्या मूल्यांना आदर देणारे पक्ष असतील, तरच काँग्रेस त्यांच्यासोबत युती करेल,” असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त करत राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात अपमानास्पद आणि शिवराळ भाषा वापरल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये हाके यांनी सात दिवसांच्या आत अजित पवार यांची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयात दिवाणी, फौजदारी आणि अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातले भाजपवाले ठाकरे बंधूंची दादागिरी नाकारतात, पण ते हिंदी भाषकांची मस्तवाल मुजोरी का खपवून घेतात??, असा सवाल महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भाजपवाल्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आणि वक्तव्यातून समोर आलाय.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पॉडकास्ट एक मालिका सुरू केली आहे. यात बोलताना त्यांनी वारीच्या इतिहासावर तसेच महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीबद्दल भाष्य केले आहे.
भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयी सभेवर टीका केली आहे. तसेच हे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला कार्यक्रम असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एकत्र येत विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. या मेळाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता संजय निरुपम यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी नव्हे तर आता ठाकरे विकास आघाडी तयार झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये पार पडला. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले, आणि त्यांच्या भेटीने संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबईत पार पडलेल्या विजयी रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘अणाजी पंत’ असा करत टोला लगावला. यावर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारे उल्लेख करणे म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा अपमान असल्याचे केसरकर यांनी म्हटले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली असून, हाके यांनी सात दिवसांत अजित पवार यांची लेखी माफी मागावी, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा नितीन यादव यांनी दिला आहे.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदावरी मातेची नित्य महाआरती पावसाळ्यातही अखंड सुरू ठेवण्याची परंपरा यंदाही पाळली गेली. काल नाशिकमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असतानाही ११ समर्पित गोदासेवकांनी पुराच्या पाण्यात उभे राहून महाआरती संपन्न केली.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा आशिष शेलार यांनाच पहिला राजकीय धोका, म्हणून केली हीन पातळीवर जाऊन टीका!!, असे आज घडले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री आशिष शेलार यांनी मनसेवर टीका करताना मनसैनिकांची तुलना पहलगाम मधल्या जिहादी दहशतवाद्यांशी केली. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले तुम्ही भाषा विचारून हिंदूंना मारताय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App