नाशिक शहर आणि विशेषतः रामतीर्थ, पंचवटी परिसराच्या विकासात पुरोहित संघाचे योगदान मोलाचे असून या संघाला विश्वासात घेऊनच कुंभमेळ्याचे नियोजन केले जाईल, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केले.
वाल्मीक कराड प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्व काही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.
सोशल मीडियाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लोक आपले खासगी आयुष्यातील क्षण तसेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) नुकतेच हे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणांबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे.
मंत्रिमंडळातल्या चार चुकार मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झापले की नाही??, याच्यावर मराठी माध्यमांनी बराच खल केला. विरोधी पक्षांनी टीका टिप्पण्या केल्या पण स्वतः फडणवीसांनी मात्र मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूर हे एक यशस्वी मोहीम होती. यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह हे एक आदरणीय संरक्षण मंत्री आहेत. ते देशाला काय घडले याची माहिती देऊ शकले असते. प्रत्येक प्रश्न विरोधी पक्षाकडून येत नसतो. काही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील जनतेच्या मनातील प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले आहेत. याचे मी स्वागत करते. सत्ताधारी पक्ष त्यांचे उत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज चर्चा होईल, मला आशा आहे की पंतप्रधान दोन्ही सभागृहांना उपस्थित राहतील, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक ट्रस्टसाठी मोठी आर्थिक क्रांती घडवणारा निर्णय नुकताच घेतला गेला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, आता सार्वजनिक ट्रस्ट त्यांच्या निधीपैकी 50 % पर्यंत रक्कम म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), कॉर्पोरेट बॉण्ड्स आणि इतर सध्याच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवू शकतात.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 महिन्यांपूर्वी अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. या घटनेला 21 महिन्यांचा काळ लोटला तरी देखील मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेकवेळा न्याय मिळवा यासाठी प्रयत्न केले. परंतु, बीडमधील पोलिसांनी देखील याची हवी तशी दखल घेतली नाही. अखेर आता मुख्यमंत्र्यांनी मुंडे कुटुंबाला गुरुवारी (31 जुलै) मुंबईत बोलावले आहे.
उद्धव ठाकरे यांना लोक सोडून जात आहेत, याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावे, असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. परंतु, फेब्रुवारी महिन्यातच राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप साळवी यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर महिलांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे मंगळवारी स्वतः काळा कोट घालून कोर्टात पोहोचल्या. यावेळी त्यांनी प्रांजल यांच्यावतीने युक्तिवाद केला नाही. पण त्या पूर्णवेळ कोर्टात हजर होत्या. दरम्यान, प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी ईशा सिंग नामक तरुणीच्या माध्यमातून प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर तीव्र चर्चा रंगली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार चकमक होत आहे. आज लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसवर आणि विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. श्रीकांत शिंदेंचे भाषण सुरू असताना विरोधकांनी ‘50 खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. यामुळे श्रीकांत शिंदे संतापल्याचे पाहायला मिळाले.
समाजजागृती, युवतींचा आत्मविकास आणि महिलांना धार्मिक क्षेत्रात सन्माननीय स्थान देण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या प्रेरणादायी उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.
रेव्ह पार्टीच्या व्याख्येवरून सरकारशी वितंड वाद पण दारुड्यांच्या पार्टीला मात्र सुप्रिया सुळे + रोहित पवार आणि एकनाथ खडसे यांची साथ!!, असे चित्र महाराष्ट्रभर गाजत असलेल्या रेव्ह पार्टीच्या मुद्द्यावरून निर्माण झाले.
: नवऱ्याच्या काळ्या कमाईला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची विचित्र घटना मुंबईच्या कांदिवली पूर्व भागातील आकुर्ली येथे घडली आहे. आरोपी पती म्हाडाचा अधिकारी आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीनुसार या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला आहे. खराडी ड्रग्ज पार्टीप्रकरणी ससून रूग्णालयाने आपला अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. त्यात खेवलकर यांच्यासह दोघांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस पुढे काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. दरम्यान, पुणे पोलिसांनी खेवलकर यांचा अहवाल त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांना देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रोहिणी यांनी माध्यमांकडे मदत मागितली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ‘भारत’चे भाषांतर करू नये अन्यथा आपण देशाची ओळख आणि जगात मिळणारा आदर गमावू, अशी भीती व्यक्त केली होती. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भागवत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, संविधानात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्द वापरले आहेत. तथापि, जर आपण ‘भारत’ वापरला तर ते अधिक चांगले होईल. ‘भारत’ या शब्दाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मोहन भागवत यांनी काहीही वादग्रस्त म्हटलेले नाही. त्यांच्या वक्तव्याला वादात रूपांतरित करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीत टाय-ब्रेक फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करून तिने हे विजेतेपद पटकावले. विश्वविजेतेपद मिळवण्यासोबतच ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे रविवारी पूर्ण झाले. ही कारवाई २४ जुलै रोजी सुरू झाली आणि तीन दिवस चालली. या छाप्यात सुमारे ५० कंपन्या सहभागी आहेत. २५ हून अधिक लोकांची चौकशीही करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, त्याला उत्तर द्यायलाच मी बांधील आहे, अे नाही. यासोबतच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांचा मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून घेऊ. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे खडसे कुटुंबाची कोंडी झाली असून, विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा आणि विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला व तो त्यांना द्यावा देखील लागला. त्यानंतर पासून धनंजय मुंडे हे फारसे कुठल्या सामाजिक कार्यक्रमात फारसे आले नव्हते. आज त्यांना वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलावण्यात आले असता, भाषण करताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टी दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत.
विशेष प्रतिनिधी पुणे : Khadse’s Son-in-Law शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक […]
माझ्यासह माझी जात व माझा जिल्हा एवढा बदनाम करावा? एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नसेल, ते मी सहन केले. पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असा विश्वास माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App