महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाउंट रविवारी सकाळी हॅक झाले होते. हॅकर्सनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तान आणि तुर्कीच्या झेंड्यांचे फोटो पोस्ट केले होते. शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ सायबर क्राइम पोलिसांना कळवले. तक्रार मिळाल्यानंतर 30 ते 45 मिनिटांत त्यांनी अकाउंटवर नियंत्रण मिळवल्याचे त्यांच्या पथकाने सांगितले आहे.
देशात आता नवीन जीएसटीचे दर उद्यापासून (22 सप्टेंबर) लागू होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नवीन जीएसटी धोरणावर भाष्य केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल. पंतप्रधानांनी जनतेला फक्त देशवासीयांच्या कठोर परिश्रमातून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून हे देशातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी वृत्तसंस्था : Laxman Hake : राज्यातील ओबीसी आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके सध्या चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स […]
जालना जिल्ह्यात झालेल्या दोन हल्ल्यामुळे आज महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातला एक हल्ला मराठा आरक्षण आंदोलकांनी केला, तर दुसरा हल्ला कुठल्या आंदोलकांनी नाही तर थेट मधमाशांनी केला. त्यामुळे हे दोन्ही हल्ले महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले.
विशेष प्रतिनिधी पुणे : Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला “गोट्या खेळत होतास का? खिशातून […]
सायबर सुरक्षा ते ड्रग्स विरोधात झिरो टॉलरन्स अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांनी सुधारणांचा नवा अध्याय लिहिलाय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ओबीसी समाजावर लढो या मरो-ची परिस्थिती आली आहे. आतापर्यंत ओबीसींच्या 7 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप आहे. दोन समाज आमने-सामने आले आहेत. मराठवाड्यात तर अनेक गावांमध्ये मराठा-ओबीसी वाद सुरू आहे हे सर्व सरकारचे पाप आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सराईत खोटेपणा आणि माफी वीर ही राहुल गांधी यांची खरी ओळख आहे. आता ज्या निवडणूक आयोगावर अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करत आहे त्याबद्दल अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण ही खोटं बोलण्याची राहुल गांधी यांची पहिली वेळ नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ चे उदघाटन संपन्न झाले.
जसा काका, तसा पुतण्या; दमबाजी करण्यात दोघांची स्पर्धा!! हे चित्र महाराष्ट्राला आज पाहायला मिळाले. आपल्यासाठीच सत्ता आणि आपणच सत्तेसाठी असा अविर्भाव बाळगणाऱ्या पवार कुटुंबातले काका – पुतणे लोकांना दमदाटी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत, याचा प्रत्यय महाराष्ट्राला पुन्हा एकदा आला.
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आपल्या स्पष्टवक्ते आणि आक्रमक शैलीमुळे नेहमीच […]
विशेष प्रतिनिधी पुणे : NAVRATRI UTSAV : कधी ये नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण दिसत आहे. परंतु विश्व […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र एयरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड’च्या संचालक मंडळाची बैठक झाली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्यातील ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीचा समाचार घेतला आहे. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्यात प्रामाणिकता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर माझी भूमिका धरसोड वृत्तीची आहे का? हा प्रश्न ओबीसीच्या सर्वच नेत्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे ते म्हणालेत.
नागपूर येथे चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यापासून समाजा समाजात तेढ निर्माण केली जातेय, ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, असे ते म्हणालेत.
राज्य सरकारने सरकारी योजनांतील बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी एक गोल्डन डेटा तयार केला आहे. या डेटामध्ये राज्यातील सर्वच नागरिकांची इत्यंभूत माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सरकारला भविष्यातील कोणत्याही योजनेसाठी वेगळा सर्व्हे करण्याची काहीच गरज उरणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ कार्यक्रम
अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून जी स्वबळाची उबळ आणली, तिच्या मागे ताकद नाही, त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात त्यांना भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!, हीच दोन प्रमुख कारणे दिसतायेत. बाकी मराठवाड्यात अजितदादांच्या पक्षाला फारशी संधी नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर महापालिकांमध्ये फारसे अस्तित्व नाही. जे थोडेफार राजकीय अस्तित्व उरले आहे, ते जिल्हा परिषदांमध्ये, निवडक कारखान्यांमध्येच!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : ST employees strike : यंदाच्या दिवाळीच्या सणासमयी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी […]
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा सध्या संपूर्ण राज्यात तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी उघड उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी यावर पडळकरांना खडे बोल देखील सुनावले.
भाजपच्या सत्तेच्या वळसणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी आली असल्याचे आज दिसून आले. पण त्याच वेळी मागच्या दाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी केल्याचा डावही समोर आला.
देवेंद्र फडणवीस यांच्या गोपीचंद पडळकर यांना कानपिचक्या; पण ते मोठे नेते व्हायचाही दिला दाखला!!, असे आज गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील अशा रंगलेल्या सामन्यात घडले.
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला जावे. शासनाने त्यांना तिथे नोकरी शोधून द्यावी. मात्र, गावातील ओबीसीच्या अन्नात माती मिसळू नये, अशी खोचक टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नांदेड येथे माध्यमांशी बोलताना केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App