सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या एका प्रकरणात वांद्रे कोर्टाने गुरुवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना नोटीस बजावली आहे. यामुळे चव्हाण यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.
बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांसाठी नवा निर्देश जारी केला आहे. या नियमावलीनुसार, शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाची मराठी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे, कारण ती स्वतःच शरद पवारांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जालन्यामध्ये एक वेगळेच वक्तव्य करून त्याला राजकीय राजकीय फोडणी दिली.
आता मी तिघे एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्यामध्ये कोणीही स्पीडब्रेकर आणू शकत नाही. कोणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र स्पीड ब्रेकरला आता आमच्यात जागा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पूर्ण झाला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले, वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाली. साेशल मीडियावर अनेकांनी ज्ञान पाजळले. मात्र, अशा प्रकारची काेणतीही चर्चा नव्याने झालीच नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत केला.
काका – पुतण्या एकत्र येणार. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार. महाराष्ट्राच्या राजकारणात “नवा भूकंप” होणार. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी सत्तेची वाटणी होणार
मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी देखील याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे वक्तव्य केल्याने या चर्चेला अधिक जोर आला आहे.
भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर यशस्वीपणे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय सेनेचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.
भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला बाप दाखवण्याचे काम केल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी तिरंगा रॅलीत बोलताना व्यक्त केली. पाकविरोधातील कारवाईनंतर त्याचे राजकारण करणाऱ्यांना जनाची नव्हे तर मनाची लाज वाटली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे संपन्न होणाऱ्या गोदावरी महाआरतीस आज विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले
भारतीय लष्कराच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. या भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली आहे. भारताची परराष्ट्र आणि संरक्षण विषयक भूमिका आता अधिक ठाम, निर्णायक आणि जागतिक स्तरावर प्रभावी झाली असल्याचे फडणवीस म्हणाले. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑपरेशन सिंदूर आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच वर्षांत महाराष्ट्राला अशांत करण्याचे सतत प्रयत्न झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांधकामाला लागणारी वाळू उपलब्ध होण्यास सुविधा होईल. तसेच राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही राज्य सरकारच्या वतीने स्वीकारण्यात आला आहे. त्यासाठी 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुजरातचे अर्थ व ऊर्जा मंत्री कनुभाई देसाई यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषद (पश्चिम क्षेत्र)’ संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील नागरी क्षेत्रासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांच्या नव्या नियुक्त्या आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ‘दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि’. आयोजित ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण’ परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि आवश्यक खबरदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा पत्र लिहून केली. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने त्या मागणीत खोडा घातला. संरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. ती संसदेच्या विशेष अधिवेशनात करण्यापेक्षा सर्वपक्षीय बैठकीत चांगली होऊ शकते, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, सिंधुदुर्ग येथे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’चे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)’ कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली भोपाळ, मध्य प्रदेश येथे ‘संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी महाराष्ट्र – मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28वी बैठक’ पार पडली.
मागील काळात अडीच वर्षे अडचणी आल्या होत्या. त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता. त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दिड वर्षे आधी पूर्ण झाली असती, असा टोला देखील त्यांनी लगावला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळावर निशाणा साधला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे होता. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App