ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही. पण शेतकऱ्यांना दुष्काळी निकषांमध्ये सगळी मदत देऊ. तिच्यात हयगय होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
विशेष प्रतिनिधी इचलकरंजी : Asaduddin Owaisi : पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी, विमान व जहाज वाहतूक बंद केली असताना क्रिकेट सामना खेळून काय साध्य केले? क्रिकेट न […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath Shinde : संकटात मदत करणे ही सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे. नुकसानीची संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे तब्बल 60 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून नुकसानीच्या सर्व प्रकारच्या डेटाचे वर्गीकरण व्हायचे आहे.
महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने राज्याचे सर्वसमावेशक कर्करोग उपचार धोरण जाहीर केले असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने त्याचे तपशील सादर केले त्याला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
कोल्हापूर येथे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाचा ऐतिहासिक शाहू नगरीतील अर्थात सातारा शहरातील शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. तसेच समाजहित लक्षात घेऊन दसरा उत्सवासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गत पन्नास वर्षात शेतकऱ्यांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भाग उध्वस्त झाले आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात शासन शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळप्रसंगी ड्रोनच्या सहाय्याने व याचबरोबर प्रत्यक्ष पंचनाम्याच्या माध्यमातून अधिकाधिक मदत केली जाईल, असे सांगितले आहे. आम्ही वेळप्रसंगी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी आज, 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओवेसी हे भडकाऊ भाषणे करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावाववर भाष्य करताना म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहिल्यानगर प्रकरणात कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षाच्या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणे संदर्भात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलताई गवई हजर राहण्यावरून निर्माण झालेल्या गैरसमज दूर झाला
राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच महाराष्ट्रातले पोलीस वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात. त्यामध्ये ते प्रामुख्याने महिला, मुले यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत असतात. महिलांच्या आत्मरक्षणासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे उदाहरण यवतमाळ मधून समोर आले. महिलांनी अत्याचाराच्या विरोधात आत्मविश्वासाने उभे राहावे. आत्मरक्षण करावे यासाठी पोलिसांनी तब्बल 6000 विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले.
मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
वृत्तसंस्था मुंबई : Siddhivinayak Temple : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्याच्या अनेक भागांना पुराचा तडाखा बसला आहे. विशेषतः मराठवाडा आणि सोलापूरसह […]
राज्यातील पूरस्थितीवरून राजकारण तापले असून, आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मदतीवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, ‘मुख्यमंत्री असताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीत किती मदत केली?’ असा सवाल केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यांच्या शैलीत प्रफुल्ल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मूल, चंद्रपूर येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण संपन्न झाले.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. अतिवृष्टीमुळे सगळी धरणे भरली. त्यांच्यातून अतिरिक्त विसर्ग करावा लागला.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षाने अद्याप युतीसाठी संपर्क साधलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.
राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आवाहन केले आहे. त्यांनी नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र लोकांचा सवाल आहे, हे संजय आहेत की ‘गांज्या’ राऊत? कारण रोज सकाळी त्यांची वागणूक गांजाच्या नशेतल्या माणसासारखी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहत असताना राऊतांचा राजकारणापुरताच मर्यादित विरोध केवळ नशेतली बडबड ठरत असल्याचे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले असताना नाशिक मध्ये गंगा गोदावरीला आलेल्या महापुरात रामतीर्थ गोदाकाठी असलेली गोदाकुटी आज पूर्णपणे वाहून गेली. तरीही गोदावरी आरतीची उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला आहे. त्यानुसार आज सायंकाळी गोदा सेवकांनी गोदावरी महाआरती केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकार्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची नेमकी आकडेवारी समोर आली. नागरिकांना मदत करताना अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहावे. केवळ नियम आणि कायद्यावर बोट ठेवून काम करू नये मदत करताना सरळ हात असावा अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App