मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, कोकण रेल्वे महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागत असून आवश्यक गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं होत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यातील महिला सुरक्षा व गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले, महिलांनी तक्रार दाखल करण्यात पुढाकार घेतल्यामुळे न्याय मिळवणे सोपे झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांना उद्देशून राजधर्म सांगितला
नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हात उगारणाऱ्या दंगलखोरांना पोलिसांचा धाक काय असतो हे दाखवून देऊ, असा इशारा राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी बुधवारी विधिमंडळ परिसरात बोलताना दिला. यावेळी त्यांनी जनतेला सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल न करण्याचेही आवाहन केले.
यूपीएससीच्या धर्तीवर राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत देखील कॅलेंडर निश्चित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. एमपीएससीची परीक्षा या वर्षीपासून आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी काही नागरिकांचा विरोध आहे.
राज्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर रील्स तयार करून आपण काम करत असल्याचे भासवतात. आता अशा बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन जीआर काढणार आहे. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार परिणय फुके यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदरील माहिती दिली.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये महाराष्ट्राच्या पुढे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांपासून चर्चेत आलेल्या नागपूर शहराचा सातवा क्रमांक लागत असल्याचे ते म्हणाले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला होता. हा मुद्दा आज विधानसभेतही गाजला. नागपूरच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता नागपूरमधील हिंसाचारामागे अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सभागृहात केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शहरी नक्षलवादविरोधी कायदा 2024 लवकरात लवकर अंमलात आणण्याची मागणी केली.
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत पुन्हा चौकशी करण्यासाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
एखाद्याचा किमान शब्दांत कमाल “उल्लेख” करणे, हे आवली पुणेकरांचे वैशिष्ट्य पुलंनी आपल्या तुम्हाला पुणेकर व्हायचे, नागपूरकर की मुंबईकर??, या कथाकथनात टिपले
शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यांचे पक्ष जर केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असते, तर लोकशाही अधिक बळकट झाली असती अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला हाणला.
औरंगजेब मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याच परिवारातल्या संघटनांचे कान टोचल्याचे माध्यमांमध्ये चर्चा असली तरी प्रत्यक्षात संघाच्या प्रतिनिधी सभेत बांगलादेशातील हिंदुंवर झालेल्या अत्याचाराबाबत चर्चा
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा देण्यात आला आहे. नाशिक कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले असून मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी तथा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
नागपुरात औरंगजेब प्रेमींनी केलेल्या दंगली बाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून वेगळ्याच संशयाची पेरणी झाली. नागपूरच्या दंगलीमागे प्रशांत कोरटकर तर नाही ना, असा संशय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.
दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा, असे उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या. त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले. काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेबाची कबर काढली, तर ती या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. १ मार्च रोजी लिहिलेले हे पत्र नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांनी पाठवले होते. हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर शेअर केले आहे.
नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येईल.
नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विधान परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा त्यांची माफी मागितली होती. आम्ही तुमच्यासोबत सरकार स्थापन करायचे आहे असे सांगितले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी या विषयावर आपले मत बदलले होते.
नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीची मणिपूरच्या दंगलीशी तुलना करून महाराष्ट्रात मणिपूर करायची भीती विरोधकांनी दाखवली पण यातून औरंगजेबाची कबर वाचवायची त्यांची तयारीच उघड दिसली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App