राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर सुरू झालेला शाब्दिक कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि निवडणूक निकालांवरून जोरदार निशाणा साधला. माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी माझ्यावर टीका केली, असे दानवे यावेळी म्हणाले.
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युती संदर्भात तसेच आगामी महापालिकेच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले आहे. तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुण्याचे माजी महापौर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सहा तास चर्चा केली. त्यांचे मन वळवायचा प्रयत्न केला, पण त्यात सुप्रिया सुळे यांना अपयश आले. प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. अजित पवारांना असलेला विरोध कायम ठेवला.
महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला भाजपने 129 नगराध्यक्ष निवडून आणले. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा 57 नगराध्यक्ष निवडून आणले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 39 नगराध्यक्ष निवडून आणता आले. त्यापाठोपाठ राज्यातल्या फडणवीस सरकार नगराध्यक्षांच्या अधिकारांमध्ये वाढ करायचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत; पण 22 वर्षांच्या मुलीने दाखवून दिले, पवार म्हणजे बारामती नाहीत!!, हे राजकीय वास्तव देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. अशातच, मिरा भाईंदरमध्ये भाजपचे आक्रमक नेते आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या
नाशिक : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित अशी ठाकरे बंधूंची युती आज जाहीर झाली, पण दोघांनीही जागावाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला. युती जाहीर करण्यापूर्वी उद्धव ठाकरे मातोश्रीतून निघून राज […]
एका मौलानाने त्यांना 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सांगितले होते. यावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुले आहेत. तो म्हणतो की मला 30-35 मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका 19 मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन-चार-चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे राणा यांनी म्हटले आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सणीतले होते. यावरून राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे दोन पक्ष आघाडी करण्याची शक्यता बळावली असतानाच मराठी माध्यमांनी शरद पवार सत्तेत सामील व्हायची हवा करत आहेत, अशा दावा करणाऱ्या बातम्या दिल्या त्यासाठी वेगवेगळी आणि भली मोठी कारणे सुद्धा दिली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
एपिस्टाईन फाईल मधून जे धक्कादायक खुलासे झाले, त्यातून मराठी माणसाला पंतप्रधान बनायची संधी आहे, असे मी म्हटले होते. पण ते 19 डिसेंबरलाच होईल, असे मी म्हटले नव्हते. शिवाय जे पंतप्रधान होतील, ते नागपूरातले असतील. बारामती किंवा कराड मधले पंतप्रधान होणार नाहीत, अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला टोचले. पण त्या पलीकडे जाऊन पृथ्वीराज बाबांनी शरद पवारांच्या जुन्या राजकीय जखमेवर मीठ चोळले.
Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal stage aggressive protests Cuff Parade Mumbai. Demonstrators condemn Dipu Das murder Bangladesh following false blasphemy allegations. Police detain activists during South Mumbai agitation. Protesters demand international action against minority atrocities and communal violence.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा बुधवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली.
पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
शरद पवारांनी जे आयुष्यभर पुढचे मागचे खालचे वरचे राजकारण केले, त्याची फलश्रुती पवारांच्या राजकारणाच्या बालेकिल्ल्यांमध्येच दिसून आली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट झाली, तर पुण्यामध्ये काका पुतणे एकत्र येऊन सुद्धा त्यांना काँग्रेसची गरज निर्माण झाली.
अजित पवार पुण्यात चक्क महाविकास आघाडी बरोबर जाणार. पवार काका – पुतणे काँग्रेसला बरोबर घेऊन एकत्र निवडणूक लढविणार, अशा बातम्या देऊन मराठी माध्यमांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय उत्सुकता वाढवून ठेवली.
शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा अचानक पुळका आला. पण त्यांना स्वतःच्याच पक्षात कार्यकर्ते टिकवता येईना!!, अशी राजकीय परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उद्भवली.
मुंबई महानगरपालिका ही केवळ एक महापालिका नसून आशियातील सर्वात श्रीमंत सत्ताकेंद्र आहे. आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी ठरणार आहे. यावेळच्या रणधुमाळीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज यावर सुनावणी पार पडली असून, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार नसून, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे दिसत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यात उभय नेत्यांत संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढतील, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळला आहे.
नगरपालिका मधल्या विजयानंतर न थांबता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागले पुढच्या कामाला. त्यांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अनेक मेळावे घ्यायला सुरुवात केली असून ठाणे शहरामध्ये उत्तर भारतीय समाजाच्या ओबीसी समुदायाची प्रातिनिधिक बैठक घेतली. त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे मेळावे घेतले पण त्याचवेळी महाविकास आघाडीतले वेगवेगळे नेते पत्रकार परिषदा घेण्यात किंवा पत्रकारांना बाईट देण्यात मग्न राहिले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App