आपला महाराष्ट्र

नाशिक मध्ये जैन माता, भगिनींच्या वतीने दिव्य गोदावरी महाआरती; भक्तिदीपाची उजळली अखंड ज्योती!!

पवित्र गोदावरीच्या तीरावर आज श्रद्धा, करुणा आणि भक्तिभावाने ओथंबलेला एक अद्भुत क्षण साकार झाला. साडेतीनशेहून अधिक जैन माता-भगिनींच्या उपस्थितीत गोदावरी महाआरतीचा अलौकिक आणि भावस्पर्शी सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Radhakrishna Vikhe Patil,

Radhakrishna Vikhe Patil, : विखे पाटलांची घणाघाती टीका- आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष; या पापाचे धनी शरद पवार

भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर प्रखर टीका केली आहे. समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. तसेच 1994 साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Bawankule

Bawankule : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह; जागा निश्चितीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम

राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना निवास आणि अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून वसतिगृह उभारणीसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

ATS Raids

ATS Raids : टेरर फंडिंगप्रकरणी पुण्यात एटीएसचे छापे; 18 जण ताब्यात, 2 वर्षांपूर्वी अटक झालेल्या अतिरेक्याकडून सुगावा

साताऱ्यातील टेरर फंडिंगप्रकरणी बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर एटीएसने पुण्यात १९ ठिकाणे छापे टाकले. त्यात १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यात २०२३ मध्ये इसिसचे मॉड्यूल उघडकीस आले. पुणे, मुंबई, गुजरातमधील काही शहरात ड्रोन हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या काही दहशतवाद्यांना अटकही झाली होती.

Chief Justice

सरन्यायाधीशांवरच्या बूट फेकीला देऊन राजकीय हवा काँग्रेस आणि पवारांचे नेते पोळ्या भाजताहेत पहा!!

सरन्यायाधीशांवरच्या बूट फेकीला देऊन राजकीय हवा काँग्रेस आणि पवारांचे नेते पोळ्या भाजताहेत पाहा!!, असला प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांपासून ते राजधानी नवी दिल्लीपर्यंत दिसून आला. तीन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर 72 वर्षीय वकील राकेश भूषण यांनी भर कोर्टात बूट फेकला. त्यामुळे देशभर मोठी खळबळ उडाली. संपूर्ण देशभरातून राकेश भूषण यांचा सार्वत्रिक निषेध झाला. सुप्रीम कोर्टाच्या बार कौन्सिलने राकेश भूषण यांच्यावर कारवाई केली. परंतु, खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राकेश भूषण यांच्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर पोलीस तक्रार दाखल केली नाही.

Sameer Wankhede

Sameer Wankhede : शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस व नेटफ्लिक्सला समन्स; समीर वानखेडेंच्या याचिकेवर दिल्ली HCने 7 दिवसांत मागितले उत्तर

दिल्ली उच्च न्यायालयात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स आणि शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंटला समन्स बजावले, ज्यात असा आरोप करण्यात आला आहे की रेड चिलीज निर्मित आणि नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या मालिकेमुळे समीर वानखेडेंची प्रतिमा मलिन झाली आहे.

Maharashtra

ब्रिटिश पंतप्रधानांच्या दौऱ्याचा महाराष्ट्राला फायदा; गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या क्षितिजाकडे राज्याची वाटचाल!!

ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी दौऱ्याची सुरुवात राजधानी नवी दिल्ली ऐवजी मुंबईतून केली. त्यांच्या समवेत उद्योगपती व्यापारी आणि कुलगुरूंचे एक मोठे शिष्टमंडळ आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या ताज महाल पॅलेस येथे ब्रिटिश सीईओ शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांच्याशी उद्योग आणि व्यापार विषयक चर्चा केली.

Shiv Sena

Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली, आता 12 नोव्हेंबरला निर्णय

शिवसेना पक्षचिन्ह वादावरील पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 16 नंबरला सुनावणीसाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाकडे पुढील तारीख मागितली. सिब्बलांच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर तारीख दिली.

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट आणि गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला लहान भाऊ मानणाऱ्या मराठ्यांविरोधात भुजबळ यांनी विनाकारण एक ‘टोळी’ निर्माण केली असून, या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुत्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा इशाराही मनोज जरांगेंनी अजित पवारांना दिला.

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असते. त्यातच, मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे नाराजीनाट्य उघडपणे पाहायला मिळाले आणि अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपली आरक्षण लढ्यासंदर्भातील स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. दरम्यान, या कार्यक्रमावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मोदीजी लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात येतात, तेव्हा विकासाच्या नवनव्या वाटा खुल्या होतात. मोदी हात लावतात तिथं सोनं होतं; मोदी है तो मुमकीन है, अशा शब्दांत शिंदे यांनी मोदींच्या कामाचा उल्लेख केला.

CM Fadnavis

CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 10 वर्षांचे अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात दूर झाले आणि हे एअरपोर्ट तयार झाले.

डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

शेतकरी कामगार पक्षासारख्या डाव्या कम्युनिस्ट चळवळीत संपूर्ण राजकीय आयुष्य घालविलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव राज्यातल्या भाजप महायुतीच्या सरकारने दिले

भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

काकांबरोबर खरे खोटे भांडण करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आता खरा चटका जाणवतोय.

Fadnavis

Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रमुख निर्णय हे तुकडा बंदी अधिनियम सुधारणा आणि झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये क्लस्टर योजना लागू करण्यासंदर्भात आहेत. तुकडा बंदी अधिनियमातील सुधारणेमुळे महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर दुसऱ्या निर्णयानुसार एसआरएमध्ये क्लस्टर योजना राबवण्यास मंजुरी मिळाली आहे. या दोन महत्त्वाच्या निर्णयांसह बैठकीत इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Raj Thackeray

Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आम्ही युतीसाठी तुमच्याकडे कुठे आलोय, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- छगन भुजबळांमुळे ओबीसींचे वाटोळे होणार; जातीवाद डोक्यात असल्याने मराठ्यांवर अन्याय केला

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. भुजबळ यांनी जरांगे यांच्या ‘अभ्यास’, ‘शिक्षण’ आणि ‘मराठ्यांचे नेतृत्व’ यावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.

Maratha reservation

Maratha reservation : मोठी बातमी : 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Maharashtra Govt Announces

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा: तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Fadnavis government

तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा, मुंबईत झोपडपट्टी समूह पुनर्विकास; फडणवीस सरकारचे निर्णय

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठे पॅकेज देण्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज अनेक धोरणात्मक निर्णय घेतले त्यामध्ये तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा आणि मुंबईत झोपडपट्टी समूह पुनर्विकास या दोन महत्त्वपूर्ण निर्णय यांचा समावेश आहे.

Manoj Jarange Patil,

Manoj Jarange Patil, : मनोज जरांगे यांची टीका- छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा अलीबाबा; ओबीसींचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केला

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणून केला. विजय वडेट्टीवार सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जे काही बोलत आहेत, ते छगन भुजबळांचे शब्द आहेत. या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसींनी यावर चिंतन केले पाहिजेत. या लोकांनीच त्यांचा खरा घात केला आहे, असे ते म्हणालेत.

Gopichand Padalkar

BJP MLA Padalkar : गोपीचंद पडळकरांचा बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप- जेलमध्ये धर्मांतराचे काम; महापुरुषांचे फोटो काढले, कीर्तनही बंद

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता बीड कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच जेलमधील कीर्तन बंद करण्यात आले असून कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयाचे आमिष दाखवले जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

अजितदादांच्या पुण्यातल्या दादागिरीला भाजपचा कोलदांडा; प्रभाग रचनेत राष्ट्रवादीलाच फटका, पण महायुतीत अजितदादा करणार काय??

पुणे महापालिकेतली प्रभाग रचना करताना भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातल्या दादागिरीला चांगलाच कोलदांडा घातला.

Maharashtra

Maharashtra : राज्यातील नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर; 17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याीतल नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींसाठी ही सोडत मंत्रालयात काढण्यात आली. या प्रक्रियेनंतर 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात