केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी ठामपणे सांगितले, “जो जातीची भाषा करेल, त्याला लाथ मारीन!”
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा अपमान केला आहे.” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
..त्यामुळे जर हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्रात विद्रोह दिसणारच नाही. अशीही आव्हाडांनी चिंता व्यक्त केली आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीला उखडून फेकण्याची हिंदुत्ववाद्यांनी तयारी चालवली असताना शरद पवारांचे आमदार नातू औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ बाहेर आले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नेत्यांना संधी दिली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार प्रस्तावित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून राज्यात पोलिसराज आणण्याच्या प्रयत्नांत असल्याचा आरोप केला आहे. सरकारने सदर कायद्याच्या माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान केलेत. यामुळे शासनाला राज्यात पोलिसराज प्रस्थापित करण्याचे लायसन्स मिळेल. विशेषतः या माध्यमातून शासनाच्या विरोधात असणाऱ्या, परंतु लोकशाही मार्गाने विधायक विरोध करणाऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बीडमधील कथित गुन्हेगारीवर थेट भाष्य केले. राज्यातील सरसकट वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थिती बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याविरोधात योग्य ती कारवाई सरकारने करावी, असे ते म्हणालेत.
पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे.
लोकसभा निवडणुका त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका आणि आता साखर कारखान्यांच्या निवडणुका यात शरद पवारांनी खेळी केली. मुलीला “सेफ” ठेवून पुन्हा नातवाचाच राजकीय बळी द्यायची तयारी चालवली.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीला उखडून फेकण्याची हिंदुत्ववाद्यांनी तयारी चालवली असताना शरद पवारांचा आमदार नातू औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ बाहेर आलेत.
बीडमध्ये पवार संस्कारित नेत्यांनचे सगळे राडे उघड्यावर आल्यानंतर शरद पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता वाटायला लागली. त्यांनी ती पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पण अंजली दमानिया नेमकेपणाने बोट ठेवत पवारांच्या “संस्कारांचे” वाभाडे काढले. बीड मधली कायदा आणि व्यवस्था बिघडवणाऱ्या नेत्यांना मोठं करण्यात तुमचाच तर हातभार लागला होता, अशा शब्दांमध्ये अंजली दमानिया यांनी पवारांना सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारायची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चा गेल्या ८-१० दिवसांपासून सुरू आहेत. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज (शनिवार, १५ मार्च) सांगलीतील भोसले सभागृहात त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये ते अजित पवार गटात जाणार की थेट भाजपमध्ये प्रवेश करणार, यावर चर्चा होईल.
देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये कृषिमंत्री असलेली माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची होणारी कारवाई टळली आहे. मात्र, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना जे निरीक्षण नोंदवलेले ते निरीक्षण आता चर्चेत आले आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांना बाहेर बोलायची झाली चोरी बारामतीत जाऊन स्वतः दिली कबुली!!, असे आज बारामतीत घडले.
शरद पवारांनी केलेले वेगवेगळे संस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या कृतीमधून रोज महाराष्ट्र समोर उघड्यावर येत आहेत असाच पवारांचा एक संस्कार अहिल्या नगरात उघड्यावर आला आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर पैसे उकळण्याचा गुन्हा दाखल झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिलधारकरांनी चुका केल्या होत्या. त्यांच्यावर कारवाईही झाली होती. आता तशाच कारवाया परत करण्याची धमकी त्यांना दिली जात आहे. सभागृहात लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू. तुमची राईस मिल बंद करू. तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारचे इशारे राईस मिलधारकांना दिले जात असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर आमदार फुके यांनी याबाबत एजंटासोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बुरा न मानो, होली है!! होळीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगात रंगून कोण कुठले विनोद करेल काही सांगता येत नाही त्यातच राजकारण्यांच्या विनोदांना असा काही बहर येतो, की ज्याचे नाव ते!!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांना भाजपपासून दूर होत काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्याची “ऑफर” दिली.
मोगल बादशहा औरंगजेबाविषयी वक्तव्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयाने कानउघाडणी केली आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याचे कोणतेही बेजबाबदार विधान दंगली भडकवू शकते. त्यामुळे आझमींनी प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देताना संयम आणि सावधगिरी बाळगावी, अशी ताकीद न्यायालयाने त्यांना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे ‘वेव्ह्स 2025’ संदर्भात परराष्ट्र मिशनचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित करण्यात आलेले सत्र संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे महायुती सरकारवर सातत्याने टीका करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर निशाणा साधत काही प्रश्न विचारले आहेत.
अमरावतीकरांची गगनभरारी घेण्याची स्वप्नपूर्ती दृष्टीक्षेपात असून हवाई प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App