विशेष प्रतिनिधी पुणे: Double-Decker Buses in Pune : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत व्यस्त असणाऱ्या खराडी हिंजवडी आणि मगरपट्टा भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिकेने नवीन […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सत्ताधारी एनडीए खासदारांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेला संबोधित केले. ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ या थीमवर भर देत, त्यांनी खासदारांना त्यांच्या मतदारसंघात २०-३० स्वदेशी मेळावे आयोजित करण्यास सांगितले
तचोरीचा मुद्दा भाजपची पाठ सोडताना दिसत नाही. राहुल गांधी यांनी सुरुवातीला भाजपावर मतचोरीचे आरोप केले. लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी रान उठवले होते.
मराठा आरक्षणावर जीआर करणाऱ्या फडणवीस सरकारला आव्हान देणाऱ्या छगन भुजबळ यांचे अवसान अवघ्या दोन दिवसांमध्ये गळाले.
ओबीसी समाजातल्या ताटातले आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मात्र, दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील. पुरावे द्यावे लागतील, अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या इशाऱ्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले आहे तो अन्य कोणीही सोसलेले नाही, असे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर हल्ले असतील किंवा टार्गेट केले गेले असेल, पण मी जबाबदारीने सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही यासाठी मी आश्वस्त करतो, असे आश्वासन गोरे यांनी दिले आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्ताने झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासकीय निर्णय (जीआर) मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय न्यायालयाच्या निकालाविरोधात आहे आणि त्यामुळे ते या जीआरला न्यायालयात आव्हान देणार आहेत.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येत आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे तसेच विनंती देखील केली आहे की मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ, असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!, अशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि आमदार अमिन पटेल हे आज उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. तिथे त्यांनी राज्याच्या राजकारणा संदर्भात विविध अंगांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. या भेटीचे फोटो सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर शेअर केले.
विशेष प्रतिनिधी बीड: Hake Pandit controversy : काही दिवसांपूर्वी गेवराईत गेलेल्या लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी दगडफेक केली होती. त्याला प्रतिउत्तर […]
महाराष्ट्राच्या राजकारणातले पवार खानदान राजकीय मखलाशा करण्यात आणि कोलांट उड्या मारण्यात कसे “तयार” आहे, याचे वर्णन परस्पर वैचारिक विरोधक असलेले भाऊ तोरसेकर आणि राजू परुळेकर हे दोन ज्येष्ठ पत्रकार एकमताने करत असतात.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. तसेच ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासह पवार कुटुंबावर देखील हल्लाबोल सुरू केला आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांनी मागत राहावे, आम्ही शक्य तेवढे देत राहू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिले आहे, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे भोसले यांनी म्हटले आहे. क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत आहेत. शरद पवारांनीच जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका त्यांनी शुक्रवारी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी ताेडगा काढल्यानंतर आता ओबीसींना भडकावत आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग देण्याची तयारी काॅंग्रेसने केली आहे. काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय रंग देत आहेत. स्वतःच्या पक्षीय हितासाठी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका भाजप व शिंदे गटाकडून केली जाते.
मुंबई : Sanjay Raut on Raj Thackeray : हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलनापासून ठाकरे बंधूंमधील अंतर कमी होत असल्याचे दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून उद्धव ठाकरे […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर : Laxman Hake : महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे अजित पवार यांना सातत्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणासंदर्भात अजित […]
विशेष प्रतिनिधी हिंगोली : Banjara Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत ठाण मांडून बसलेले मनोज जरांगे यांचे आंदोलन अखेर सरकारने शांत केले. मराठा समाजाला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sanjay Lakhe Patil On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Deva Bhau’ hoarding : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच गोंधळ उडाला आहे. कारण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘देवा भाऊ’ असा […]
हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांना मदतीसाठी 2.20 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून पुढील काही दिवसांतच आवश्यक पडताळणी करून सदर मदतीचे त्यांच्या वारसांना वाटप केले जाणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App