श्रीमंत मराठ्यांना ओबीसी समाजाने विरोध करू नये, यासाठी शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या जातीय राजकारणाची पोलखोल केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनानिमित्त महिलांना मोठे आश्वासन दिले आहे. “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार आहे. सध्या मिळणाऱ्या मानधनात आणखी वाढ केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मुलुंड येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!, हेच आजपासून सुरू झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेचे वर्णन करावे लागेल.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतांनाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (ता.९), मुंबई येथील एका पत्रकार परिषदेत बोलतांना या शक्यतांना दुजोरा दिला.
महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी (ता.६) मनसेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा तेथील सुरक्षा रक्षकांसाठी डोकेदुखी होऊन बसलाय. सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी त्यावेळी कामावर असणाऱ्या कंत्राटी आणि कायम सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
शरद पवार आणि राहुल गांधींना 160 जागांची गॅरंटी दिली कुणी??; दोन माणसे भेटल्याची पवारांनी सोडली नवी पुडी??, असा सवाल शरद पवारांच्या आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेमुळे समोर आला.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद बोलवून तीन राज्यात मतदान चोरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगावर लावला. यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु झालाय. अशातच, राहुल गांधींपाठोपाठ आता रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
खराडी या उच्चभ्रू वसाहतीत चालू असलेल्या एका स्टुडीओ अपार्टमेंटमधील रेव्ह पार्टी वर २६ जुलैच्या मध्यरात्री पोलीसांनी धाड टाकली. त्या ठिकाणी पोलिसांना दारू, हुक्कापॉट आणि कोकेन सापडलं. तेव्हाच, ड्रग्ज घेतल्याप्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह चार पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आतंकवादासाठी भगवा शब्द वापरू नये, त्याऐवजी सनातनी आतंकवाद म्हणा, असे विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. सनातन संस्थेला दहशतवादी संबोधल्याने सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागण्याचीही मागणी केली.
Municipal Commissioner पुण्यात मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात झालेला वाद आता चांगलाच टोकाला गेला आहे. बुधवारी आयुक्तांची बैठक चालू असताना शिंदे हे जबरदस्ती आत घुसले, आयुक्तांवर धावून आले, असा आरोप आयुक्तांनी केलाय. तर, तुमचं वर्तन गुंडाप्रमाणे आहे, असं आयुक्तांनी शिंदेंना सुनावलं असल्याचही बोललं जातंय. दुसरीकडे आयुक्त नवल किशोर राम हे शिंदेंना हिंदीत ‘तुम बाहर निकल जाओ’ असं म्हणाले. त्यामुळे या वादाला हिंदी मराठी वादाचीही किनार असल्याचं बोललं जातंय.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी कबुतरखान्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली होती. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली होती. त्यानंतर आज देखील दादरमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज उच्च न्यायालयात झाली. यात न्यायालयाने आधी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. इतकेच नाही तर आदेशाचे पालन केले जाईल, याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.
स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे मराठी नेते दिल्लीश्वरांसमोर झुकले; तिसऱ्या – चौथ्या रांगेत जाऊन बसले!!, हे राजकीय वास्तव चित्र काल राहुल गांधींच्या निवासस्थानी अधोरेखित झाले.
“मला वाकड्यात जायला लावू नका. सांगूनही ऐकले नाही, तर मोक्का लावल्याशिवाय राहणार नाही,” अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थेट इशारा दिला. बीड जिल्ह्याच्या बदनामीला कारणीभूत ठरणाऱ्या कोणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका मांडत, कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस गेली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या कुटुंबातील एका सदस्याला देखील ईडीची नोटीस गेलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांवरही संभावना व्यक्त केल्या.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडला नसून निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार आणि गरजू व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांना सांगितले.
पुण्यात काही दिवसांपूर्वी कथित रेव्ह पार्टीवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप चाकणकर यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने भाजपसोबत मिळून निवडणूक चोरल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. महाराष्ट्रात 40 लाख संशयित नावे असल्याचा दावाही त्यांनी केला. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी हरतात तेव्हा आरोप करतात, हा त्यांचा करंटेपणा असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तर राहुल गांधी हे बालिषपणासारखे आरोप करत असून, तो त्यांचा पोरकटपणा असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
महाराष्ट्रात आणि देशात कुठेही मतदानाची चोरी झालेली नाही. तर राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी प्रत्येक वेळी खोटे बोलून पळून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वास्तविक आगामी काळातील निवडणुकीत त्यांना पराजय दिसत आहे. त्यामुळे आधीच कव्हर फायरिंग साठी ते असे आरोप करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
जो कोणी चुकीचं वागेल त्याला मकोका लावू आणि थेट जेलमध्ये घालू. त्यानंतर मग “चक्की पीसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग,” असे सांगत मला वाकड्यात जायला लावू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवित धमकी देण्यात आली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
Municipal Commissioner पुणे महापालिकेमध्ये बुधवारी (ता.६) माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यातला वाद चांगलाच पेटला. किशोर शिंदे यांनी आयुक्तांना मी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर काढेल अशी धमकी दिली तर शिंदे हे गुंडागर्दी करतात मी त्यांना घरात घुसून मारेल अशी संतप्त प्रतिक्रिया आयुक्तांनी त्यावर दिली.
Pune Commissioner पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातुन लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. ज्यात एसी, झुंबर, ॲक्वागार्ड, टीव्ही, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, कॉफी मशिन, फुलांच्या कुंड्या यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. एकूण २० ते ३० लाखांचं सामान चोरीला गेल्याचं सध्या म्हटलं जातंय. मात्र याबाबत कुठलीही तक्रार अजून झालेली नाही.
शरद पवार हे तर भाजपचे हस्तक आहेत मोदींच्या विरोधकांना लकवा मारलाय, त्यामुळे ते मोदींच्या विरोधात लढू शकत नाहीत
पोलिस अधिकाराच्या कानशिलात लगावणं शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते आणि कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना चांगलंच महागात पडलं आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अखेर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावास आणि वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
एकीकडे उबाठा सेनेच्या भास्कर जाधव यांना मंत्रीपदाची घाई झाली, तर दुसरीकडे महाविकास आघाडी बिघाडीची शशिकांत शिंदे यांनी कबुली दिली. त्यामुळे महायुतीतल्या एकाही मंत्र्याची विकेट काढू शकलो नाही, असे शशिकांत शिंदेंना म्हणावे लागेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App