आपला महाराष्ट्र

Chandrakant Patil

Chandrakant Patil : अजितदादा जनता खुळी नाही; तुमची सत्ता असताना विकास का नाही केला? चंद्रकांत पाटलांचा पलटवार

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच आता जुंपल्याचे पाहायला मिळत असून, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उभय पक्षांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे

लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील म्हटल्यावर काँग्रेसवाले भडकले; पण…

लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले

Suresh Kalmadi

Suresh Kalmadi : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन; बऱ्याच काळापासून आजारी होते; कॉमनवेल्थ गेम्ससारख्या जागतिक स्पर्धा भारतात आणण्यासाठी प्रसिद्ध होते.

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कलमाडी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार, मी मुख्यमंत्री असेपर्यंत योजना बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे विधान फडणवीसांनी केले आहे.

Chandrashekhar Bawankule : बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा; यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत,” असे ते म्हणाले.

Bombay High Court

Bombay High Court : बिनविरोध निवडीविरोधात मनसे-काँग्रेस हायकोर्टात; चौकशीची मागणी, आयोगाच्या तटस्थतेवर प्रश्नचिनह

राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काँग्रेसने अखेर महापालिका निवडणुकांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे या दोन्ही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Thackrey brothers

ठाकरे बंधूंचे फक्त मुंबई, ठाण्याकडे लक्ष; मराठवाडा, विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष!!

ठाकरे बंधूंचे फक्त मुंबई, ठाण्याकडे लक्ष; मराठवाडा विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, अशीच अवस्था ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीच्या रणनीतीतून समोर आली. बलाढ्य भाजपचे आव्हान परतवून लावण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्यामध्ये युती केली. त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची पूर्ण रणनीती आखली. मुंबई आणि ठाणे या परिसरात आणि फार तर छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरे बंधूंनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, पण मराठवाडा आणि विदर्भातल्या महापालिकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. इतकेच काय पण ठाकरे बंधूंनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांकडे देखील लक्ष दिले नाही.

Eknath Shinde

महापालिका निवडणूक प्रचाराच्या धबडग्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वराच्या यात्रेला दरे गावात!!

एकीकडे महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धबडगा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावातल्या उत्तरेश्वराच्या यात्रेला विसरले नाहीत. त्यांनी प्रचारातून थोडा अवधी बाजूला काढून दरे गावाला भेट दिली आणि उत्तरेश्वराच्या यात्रेत महापूजा केली.

दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने…, पण…

दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत…, पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही.

एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांची स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!!

एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले- कार्यकर्त्यांना बाजूला करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही; पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ

पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.

BJP’s Amit Satam

BJP’s Amit Satam : भाजपचा पलटवार- ठाकरेंचा महापौर झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल; 25 वर्षांत मुंबई पालिकेत 3 लाख कोटी लुटले

मुंबई महानगरपालिकेमध्ये १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा खळबळजनक आरोप भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. देशात आजवर झालेले २जी, कोल स्कॅम किंवा कॉमनवेल्थ यांसारख्या मोठ्या घोटाळ्यांचा आकडा १ लाख ७६ हजार कोटींच्या वर गेला नाही, मात्र ठाकरेंनी एकट्या मुंबई पालिकेत ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे. तसेच महापौर ठाकरेंचा झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल, असा दावा अमित साटम यांनी केला.

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : शरद पवारांच्या नादी लागणे म्हणजे दाऊदच्या नादी लागणे, प्रकाश आंबेडकरांची कॉंग्रेसवरही खोचक टीका

महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आंबेडकरांची आज सभा पार पडली. या सभेत बोलताना कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. इतके दिवस तुम्ही शरद पवारांच्या नादी लागलात, म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली, असे म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली, दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचे निलंबन करा; उद्धव ठाकरेंची मागणी

निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते.

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंचा भाजपला सवाल- सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही; पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही?

पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला.

CM Fadnavis

CM Fadnavis : फडणवीस म्हणाले- ठाकरे बंधूंचे मिलन म्हणजे करप्शन अन् कन्फ्यूजनची युती, आज जाहीर झालेला वचननामा नाही तर वाचूननामा

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत.

अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसच्या डोक्याला ताप!!

अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसला डोक्याला ताप!!, हेच राजकीय चित्र महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच समोर आले. कारण अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आपापल्याच मित्र पक्षांना अडचणीत आणले.

prakash ambedkar

काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊदच्या नादी लागले म्हणून त्यांचे वाटोळे झाले; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एकीकडे मुंबईत काँग्रेसशी आघाडी केली असताना दुसरीकडे परभणीत मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार तोंडसुख घेतले. काँग्रेसवाले शरद पवारांच्या नादी लागले म्हणजेच दाऊद इब्राहिमच्या नादी लागले म्हणूनच त्यांचे वाटोळे झाले, असे टीकास्त्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडले.

अनोळखी मुलगा हिंदू मुलीला भुलवू शकतोच कसा??; मोहन भागवतांनी Love Jihad रोखण्यासाठी मांडली त्रिसूत्री!!

अनोळखी मुलगा एखाद्या हिंदू मुलीला भुलवू शकतोच कसा??, यात आपण समाज म्हणून कमी पडतो आपला घरातला संवाद कमी पडतो.

Kedar Jadhav

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत नातेवाईकांचा भरणा करून रोहित पवारांचा मतदारसंख्या वाढविण्याचा घोटाळा!!

एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी मतदारसंख्या वाढविण्याचा घोटाळा केला.

CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा- ‘फ्लड डायव्हर्शन’चा पहिला टप्पा लवकरच; शहरांना पुरापासून मिळणार संरक्षण अन् दुष्काळी भागाला पाणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीत भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी सांगली व कोल्हापूर सारख्या शहरांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले

Imtiaz Jaleel

Imtiaz Jaleel : हिजाब वादावर इम्तियाज जलील म्हणाले- मुस्लिम महिलांना चुकीच्या हेतूने स्पर्श केल्यास हात कापेन

हिजाब वादावरून एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी म्हटले की, जर कोणताही व्यक्ती मुस्लिम महिलांना चुकीच्या हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल, तर ते त्याचा हात कापतील.

BJP President

BJP President : भाजप प्रदेशाध्यक्षांचा अजित पवारांना थेट इशारा; तुम्ही नरेंद्र मोदी अन् देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षावर आरोप करत आहात हे लक्षात ठेवा!

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट अजित पवारांनाच निर्वाणीचा इशारा दिला. अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणालेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी अजित पवारांना मनभेद किंवा मतभेद निर्माण होतील असे विधान टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray : बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे कोर्टात जाणार; राज ठाकरे म्हणाले- उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक पाहिली नाही

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असले तरी, अनेक प्रभागांमध्ये आतापासूनच विजयाचा उत्सव सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील 70 जागी विरोधी उमेदवारांची माघार किंवा एकच उमेदवार रिंगणात उरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली

Ajit Pawar

Ajit Pawar : पुण्याचा त्रिकुट कारभार बदला; इच्छाशक्तीअभावी शहराची अवस्था बिकट, अजित पवार यांची भाजपवर टीका

पुण्याचा त्रिकुट कारभार बदलण्याची गरज असून इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार विकासकामे, कारभार आणि नागरी सुविधांचा विचार करतात. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक पुण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात