दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा, असे उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या. त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले. काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेबाची कबर काढली, तर ती या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अलीकडच्या घटनांमध्ये 9 गुन्हे नोंद झाले असून, त्यामध्ये 19 आरोपींपैकी 13 आरोपी हे विधि संघर्षित बालक आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. १ मार्च रोजी लिहिलेले हे पत्र नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांनी पाठवले होते. हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर शेअर केले आहे.
नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येईल.
नागपूरच्या हिंदूंच्या घरावर पेट्रोल बॉम्बचे गोळे; फडणवीस केव्हा आवरणार अस्तनीतले निखारे??, असे विचारायची वेळ नागपूरमध्ये औरंगजेब प्रेमींनी दंगल घडवून आणल्यानंतर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दंगलीबाबत विधानसभेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी दंगलीची सगळी भयानकता वर्णन केली संबंधित दंगल कशी पूर्वनियोजित होती तिथे पेट्रोल बॉम्ब, ट्रॉली भरून दगड, लाठ्या काठ्या तलवारी कुऱ्हाडी कसे आणले गेले, शेकडोंचा जमाव तिथे कसा जमवला गेला, याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विधान परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा त्यांची माफी मागितली होती. आम्ही तुमच्यासोबत सरकार स्थापन करायचे आहे असे सांगितले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी या विषयावर आपले मत बदलले होते.
नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीची मणिपूरच्या दंगलीशी तुलना करून महाराष्ट्रात मणिपूर करायची भीती विरोधकांनी दाखवली पण यातून औरंगजेबाची कबर वाचवायची त्यांची तयारीच उघड दिसली.
नागपुरातील दंगली दरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना कठोर शासन करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलून दाखवला.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत प्रचंड संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनटीटी डेटा ‘गेटवे टू द वर्ल्ड’ कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्यानमार, मलेशिया, भारत आणि सिंगापूर (MIST) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ केला.
नागपुरातले औरंगजेब समर्थक दंगलखोर भालदार पुऱ्यातून महाल भागात घुसले. आधी त्यांनी सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ केली.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पाच पैकी तीन जागांसाठी भाजपने काल उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली.
नागपूर मध्ये Nagpur औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले.
महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे महिमा मंडन होईल. क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमा मंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल
अजितदादांना मुख्यमंत्री करायची त्यांच्या शिलेदारांची घाई, पण फडणवीस सरकारच पाच वर्षे टिकण्याची अजितदादांना विधानसभेत द्यावी लागली ग्वाही!
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीला तीव्र विरोध करत असताना दुसरीकडे त्यांच्याच भाजप पक्षाच्या पाठिंब्यावर अजित पवारांनी घराणेशाहीला पसंती दिली आणि विदर्भातल्या आमदाराच्या पतीला विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली.
उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यात झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. धारावीनंतर गोरेगाव येथील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी ठामपणे सांगितले, “जो जातीची भाषा करेल, त्याला लाथ मारीन!”
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा अपमान केला आहे.” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
..त्यामुळे जर हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्रात विद्रोह दिसणारच नाही. अशीही आव्हाडांनी चिंता व्यक्त केली आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीला उखडून फेकण्याची हिंदुत्ववाद्यांनी तयारी चालवली असताना शरद पवारांचे आमदार नातू औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ बाहेर आले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नेत्यांना संधी दिली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार प्रस्तावित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून राज्यात पोलिसराज आणण्याच्या प्रयत्नांत असल्याचा आरोप केला आहे. सरकारने सदर कायद्याच्या माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान केलेत. यामुळे शासनाला राज्यात पोलिसराज प्रस्थापित करण्याचे लायसन्स मिळेल. विशेषतः या माध्यमातून शासनाच्या विरोधात असणाऱ्या, परंतु लोकशाही मार्गाने विधायक विरोध करणाऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बीडमधील कथित गुन्हेगारीवर थेट भाष्य केले. राज्यातील सरसकट वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थिती बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याविरोधात योग्य ती कारवाई सरकारने करावी, असे ते म्हणालेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App