उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल काही चित्रपट कलाकारांनी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे समर्थन केले तर काहींनी त्यांना विरोध केला. अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, विनोदाच्या नावाखाली एखाद्याची बदनामी करणे चुकीचे आहे. हे तेच लोक आहेत जे आयुष्यात काहीही करू शकले नाहीत.
हातामध्ये लाल संविधान घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विडंबनात्मक काव्यातून खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामराला पोलिसांनी समन्स पाठवले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणीमुळे विनोदी अभिनेता कुणाल कामरा सध्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. ताज्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कामराला आज म्हणजेच २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
फडणवीस सरकार मधले मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात पवारांच्या पक्षाचा हात असल्याचे आढळले
शिवसेना – भाजप युती तुटली, त्यावर दावे – प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??, असा विचार करायची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्या – प्रतिदाव्यांनी आणली.
कुणाल कामराने विंडबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली होती. या टीकेमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या सर्व वादावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने विचारले, तर मी माफी मागेन अशी एका वाक्यात कुणालने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे कुणालच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी “जिवंत सातबारा’ मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सातबारा करण्याची मोहीम राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे महापारेषण प्रलंबित प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 100 दिवसांच्या आराखड्यानुसार ऊर्जा विभागाअंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन केले.
प्रकल्पग्रस्तांना एक महिन्यात सानुग्रह अनुदान वितरित करण्यासही सांगतिले आहे.
राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या विविध भागांत सामाजिक न्याय विभागाकडून १२५ वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.
कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी कलाकार कुणाल कामराने केलेल्या टीकेमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शिंदे समर्थक प्रचंड चिडले असून, कारवाई करण्याची मागणी होत आहे.
औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत नागपूरमध्ये झालेल्या निदर्शनानंतर अचानक हिंसाचार उफाळला होता. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आता हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाई केली आहे
विनोदी अभिनेता कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणावर टिप्पणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेली टीका यामुळे शिवसैनिक प्रचंड चिडलेले आहेत. मुंबईतील याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“लाल संविधानी” कुणाल कामराभोवती लिबरल लोकांचा प्रचंड जमावडा; तरीही समोरून लढण्याऐवजी तो पळून का गेला??, असा सवाल हातात लाल संविधान फडकावून स्टॅन्ड अप कॉमेडी करणाऱ्या कुणाल कामराच्या पळून जाण्यामुळे समोर आलाय!!
नागपुरात औरंगजेब प्रेमींनी घडविलेल्या दंगल आणि हिंसाचाराचा मास्टर माईंड फहीम खान याने अतिक्रमण करून बांधलेल्या तीन मजली घरावर अखेर नागपूर महापालिकेने बुलडोझर चालविला.
कुणाल कामराच्या हातात लाल संविधान; ठाण्याच्या रिक्षावाल्यावर टीका करताना पप्पूचा “सन्मान”!!, असला प्रकार झाल्याने कुणाल कामराची कॉमेडी एका झटक्यात खाली आली.
सध्या देशात औरंगजेबच्या थडग्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी रविवारी विचारले की औरंगजेब भारतातील लोकांसाठी एक आदर्श असू शकतो का? देशाचा आयकॉन बाहेरचा किंवा दुसरा कोणी असेल. यावर विचार करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशन व प्रदर्शन’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा ठोस रोडमॅप सादर केला.
आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, असे बोललेलो नाही. पण सध्या आमची परिस्थिती नाही. परिस्थिती बदलल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड येथे एका सभेत बोलताना केला. राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो.
सत्तेच्या वळचणीला यायची जयंत पाटलांची तडफड; त्यांच्याबरोबरच इतर पवार संस्कारितांची देखील तीच तगमग!!, हे चित्र महाराष्ट्रात सध्या समोर येऊन राहिले आहे.
महाराष्ट्रातील नागपूर शहरातील हिंसाचाराच्या सहा दिवसांनंतर रविवारी उर्वरित चार भागांतून संचारबंदी उठवण्यात आली. 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पंचपोली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबारा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App