नागपूर मध्ये औरंगजेब समर्थकांनी केलेल्या दंगलीची मणिपूरच्या दंगलीशी तुलना करून महाराष्ट्रात मणिपूर करायची भीती विरोधकांनी दाखवली पण यातून औरंगजेबाची कबर वाचवायची त्यांची तयारीच उघड दिसली.
नागपुरातील दंगली दरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना कठोर शासन करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलून दाखवला.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत प्रचंड संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एनटीटी डेटा ‘गेटवे टू द वर्ल्ड’ कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्यानमार, मलेशिया, भारत आणि सिंगापूर (MIST) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील केबल यंत्रणेचा शुभारंभ केला.
नागपुरातले औरंगजेब समर्थक दंगलखोर भालदार पुऱ्यातून महाल भागात घुसले. आधी त्यांनी सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ केली.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पाच पैकी तीन जागांसाठी भाजपने काल उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली.
नागपूर मध्ये Nagpur औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले.
महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे महिमा मंडन होईल. क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमा मंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल
अजितदादांना मुख्यमंत्री करायची त्यांच्या शिलेदारांची घाई, पण फडणवीस सरकारच पाच वर्षे टिकण्याची अजितदादांना विधानसभेत द्यावी लागली ग्वाही!
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीला तीव्र विरोध करत असताना दुसरीकडे त्यांच्याच भाजप पक्षाच्या पाठिंब्यावर अजित पवारांनी घराणेशाहीला पसंती दिली आणि विदर्भातल्या आमदाराच्या पतीला विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली.
उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यात झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. धारावीनंतर गोरेगाव येथील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी ठामपणे सांगितले, “जो जातीची भाषा करेल, त्याला लाथ मारीन!”
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा अपमान केला आहे.” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
..त्यामुळे जर हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्रात विद्रोह दिसणारच नाही. अशीही आव्हाडांनी चिंता व्यक्त केली आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीला उखडून फेकण्याची हिंदुत्ववाद्यांनी तयारी चालवली असताना शरद पवारांचे आमदार नातू औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ बाहेर आले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नेत्यांना संधी दिली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार प्रस्तावित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून राज्यात पोलिसराज आणण्याच्या प्रयत्नांत असल्याचा आरोप केला आहे. सरकारने सदर कायद्याच्या माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान केलेत. यामुळे शासनाला राज्यात पोलिसराज प्रस्थापित करण्याचे लायसन्स मिळेल. विशेषतः या माध्यमातून शासनाच्या विरोधात असणाऱ्या, परंतु लोकशाही मार्गाने विधायक विरोध करणाऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बीडमधील कथित गुन्हेगारीवर थेट भाष्य केले. राज्यातील सरसकट वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थिती बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याविरोधात योग्य ती कारवाई सरकारने करावी, असे ते म्हणालेत.
पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे.
लोकसभा निवडणुका त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका आणि आता साखर कारखान्यांच्या निवडणुका यात शरद पवारांनी खेळी केली. मुलीला “सेफ” ठेवून पुन्हा नातवाचाच राजकीय बळी द्यायची तयारी चालवली.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीला उखडून फेकण्याची हिंदुत्ववाद्यांनी तयारी चालवली असताना शरद पवारांचा आमदार नातू औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ बाहेर आलेत.
बीडमध्ये पवार संस्कारित नेत्यांनचे सगळे राडे उघड्यावर आल्यानंतर शरद पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता वाटायला लागली. त्यांनी ती पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पण अंजली दमानिया नेमकेपणाने बोट ठेवत पवारांच्या “संस्कारांचे” वाभाडे काढले. बीड मधली कायदा आणि व्यवस्था बिघडवणाऱ्या नेत्यांना मोठं करण्यात तुमचाच तर हातभार लागला होता, अशा शब्दांमध्ये अंजली दमानिया यांनी पवारांना सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारायची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चा गेल्या ८-१० दिवसांपासून सुरू आहेत. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज (शनिवार, १५ मार्च) सांगलीतील भोसले सभागृहात त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये ते अजित पवार गटात जाणार की थेट भाजपमध्ये प्रवेश करणार, यावर चर्चा होईल.
देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये कृषिमंत्री असलेली माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची होणारी कारवाई टळली आहे. मात्र, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना जे निरीक्षण नोंदवलेले ते निरीक्षण आता चर्चेत आले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App