राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर तब्बल सात वर्षे काम करून कंटाळलेले जयंत पाटील आज अखेर पद मुक्त झाले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना ते प्रदेशाध्यक्षपदी निवडले गेले होते.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला, पण याचा फक्त आनंद साजरा करू नका
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला होता. तर एका नेत्याने त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांची पुन्हा जीभ घसरल्याचे समोर आले आहे.
आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर आज अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. यामुळे त्यांच्या अडचणींत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. पण गायकवाड यांनी चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला त्याची परवा नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे या विधेयकाचे नाव ‘जनसुरक्षा विधेयक’ऐवजी ‘भाजप सुरक्षा विधेयक’ ठेवा असा टोला, उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनसुरक्षा विधेयकात काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.
पुण्यात उघडकीस आलेल्या आयसिस स्लीपर मॉड्यूल प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या दहशतवादी कटात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने अकरावा संशयित रिझवान अली उर्फ अबू सलमा उर्फ मौला याला अटक केली आहे. देशात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराचा कट रचणाऱ्या या गटात रिझवानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे NIA च्या तपासात स्पष्ट झाले आहे.
राज्यातल्या फडणवीस सरकारने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभेत पाठिंबा दिला. तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनीच फक्त जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात अधिकृत मत नोंदविले.
महाराष्ट्रात फडणवीस सरकारने जन सुरक्षा कायदा विधानसभेत मंजूर करून घेतला त्यावेळी विरोधी पक्षांपैकी फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी त्या कायद्याला अधिकृतपणे विरोध केला त्यांचे विरोधी मत विधानसभा अध्यक्षांना नोंदवावे लागले. त्यामुळे तो कायदा आवाजी मतदानाने मंजूर झाला असला तरी तो एकमताने मंजूर झाल्याचा दावा सरकारला करता आला नाही.
शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. देशभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या भूमिकेवर टीका केली आहे.
देशात मोठ्या प्रमाणात काही राज्ये ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा कडवी डावी विचारसरणीग्रस्त आहेत. विचारांनी प्रेरित होऊन अनेक लोक हातात बंदूक घेऊन संविधानाने उभ्या केलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारत आहेत. याच नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार आपण जनसुरक्षा विधेयक आणल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
शहापूर येथील शाळेत घडलेल्या अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह प्रकाराची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संबंधित शाळेला भेट देत पालकांशी संवाद साधला. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, मुलींच्या मानसिकतेचा विचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शाळा पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
महाराष्ट्रात शहरी नक्षलवादाला वेसण घालणारे जन सुरक्षा विधेयक विधानसभेने मंजूर केले. सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं होतं.
आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक वेदिका प्रकाश हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वेदिकावर आलियाची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, वेदिकाने गेल्या २ वर्षांपासून अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि प्रॉडक्शन हाऊसच्या खात्यांमधून लाखो रुपये लुटले आहेत. वेदिका १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत राहील. तिचा शोध सुमारे ५ महिन्यांपासून सुरू होता. मुंबई पोलिसांनी तिला बंगळुरू येथून अटक केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे, आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत.
शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.
आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातील अन्नाच्या निकृष्ट दर्जावरून उफाळलेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उपहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
अडीच वर्षात ज्यांनी शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही, ते शिक्षण संस्थांच्या अनुदानावर राजकारण करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आरसा दाखविला.
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४ यावरील संयुक्त समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सभागृहात सादर केला. शहरी नक्षलवादाला आळा घालण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेल्या या विधेयकावर सखोल चर्चा आणि जनतेकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अशा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची बैठक झा औषध खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रीकरण आणल्यास औषधांचा तुटवडा भासणार नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने औषधे, साधनसामग्री आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी एकाच ई-औषध संगणक प्रणालीचा वापर करावा. गुणवत्तेनुसार एकसमान दराने आणि विहित वेळेत औषध पुरवठा करण्यासह दोन वर्षांचा दरकरार निश्चित करावा. दरवर्षी 70% औषध खरेदी ही एकसमान होत असते. यासंदर्भात एक सामायिक योजना आखून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असून तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. मात्र काही राजकीय पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद निर्माण करून जनतेच्या भावना भडकवत असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
शिक्षकांच्या आंदोलनात पवार + ठाकरेंची राजकीय घुसखोरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पुरती पोलखोल केली!!, असे आज विधान परिषदेत घडले.
राज्यात सध्या मराठी भाषा आणि हिंदी भाषिकांवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी उडी घेतली आहे. “हिम्मत असेल तर बॉलिवूडला मुंबईबाहेर काढून दाखवा,” असे थेट खुले आव्हान त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App