जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि विशेषतः भाजपला बहुतांश ठिकाणी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत देखील महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. तर पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकांच्या निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ उडाल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच नंबर 1; अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा; 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता!!
जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर निकालांपैकी 43 जागा जिंकल्या. त्यांनी बहुमताचा आकडा आधीच पार केला.
ग्रामीण महाराष्ट्र शरद पवारांना “मानतो”, हे राजकीय मिथक जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी उद्ध्वस्त केले; त्याचवेळी अजितदादांच्या ब्रँडची देखील मर्यादा या निकालांनी स्पष्ट केली.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चिल्ले पिल्ले असा उल्लेख करून त्यांना हिणवणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांना आपल्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा निवडून आणता आले नाही.
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महात्मा फुलेंचा अपमान हा देश कदापि सहन करणार नाही,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी इशारा दिला आहे.
2029 च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे शरद पवारांशी संधान साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपला आव्हान देतील. तसेच उद्धव ठाकरेही पवारांची साथ सोडून भाजपसोबत जातील, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
नागपुरात सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित बैठकीत ओबीसींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन करण्यात आले असून, या बैठकीत 17 फेब्रुवारी रोजी नागपुरात भव्य आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
यवतमाळ येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफुर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन तसेच नृत्य सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रकरणावर आक्षेप घेत भाजपचे उमरखेडचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्योग आले पाहिजेत त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना उद्योजक सुद्धा प्रतिसाद देत आहेत ते महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत, पण काही घटक मात्र उद्योगांना त्रास देत असतील, तर त्यांना ठोकून काढू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका!!, असा सल्ला म्हणे, काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिला. काँग्रेस सावध झाल्याच्या नावाखाली या बातम्या सर्व मराठी माध्यमांनी दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. काँग्रेस पक्ष स्वतःच्याच बळावर वाढवा. काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम स्वतंत्रपणे लोकांपर्यंत न्या, असा सल्ला म्हणे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा नुसताच गदारोळ प्रत्यक्षात पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मतदानाची घसरण आणि त्याकडे कुणाचेच लक्ष नाही, असे राजकीय चित्र आज समोर आले.
अजितदारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच उरली की काय??, अशी शंका येणारी आकडेवारी साम टीव्हीने घेतलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या एक्झिट पोल मधून समोर आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यक्तीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प आणि देवेंद्र फडणवीस विदर्भ – तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!, हेच राजकीय चित्र आज शनिवारी समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026: खासदार औद्योगिक महोत्सव’ अंतर्गत आयोजित ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उदघाटन केले. यावेळी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF) चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, 22 हून अधिक देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच राजनयिक उपस्थित होते.
ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा आणि अजितदादा गेल्यानंतर भाजपच्याच हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!, असेच राजकीय चित्र मुंबई आणि बारामतीतल्या आजच्या घडामोडींमधून समोर आले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे या सुनिता पवार यांच्या शपथविधीनंतर मात्र पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून अचानक “दूर” झाल्याने त्यांच्याभोवतीचे राजकीय गूढ वाढले.
संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचे सत्तावाटप निश्चित झाले असून, भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची संधी देण्यात आली आहे.
राज्यभरात अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्याने काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक महिलांना ई-केवायसी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते. परंतु, आता या महिलंनया दिलासा मिळणार असल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून ई-केवायसी दुरुस्ती आता 31 मार्चपर्यंत करता येणार आहे.
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी अत्यंत घाईगडबडीत उरकण्यात आला. आता याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या 2 बड्या मंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शपथविधी लवकर कुणी करायला लावला? दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी लोकांना फारसे आवडले नाही, असे या मंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी मतदान सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ही प्रक्रिया पार पडेल. अजित पवार यांच्या निधनामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.
औद्योगिक क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरू असून विदर्भातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे उद्योजक आकर्षित व्हावेत, त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करावी, यासाठी राज्यातल्या फडणवीस सरकारने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांमध्ये प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा स्थापन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवारांनी पार्थ पवार च्या नावाचा आग्रह धरला, अशी बातमी सकाळ समूहाच्या साम टीव्हीने दिली. पण त्यामुळेच कवडीची किंमत वाढली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी *खेळी” केली??, असा सवाल समोर आला
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App