नसरापूर येथे भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला असून हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी होत असताना फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या प्रकरणाचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडे सोपविला.
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आमदार रोहित पवार यांनी मात्र राजकारण घुसवले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळीच नावे सूचवून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाचर मारून ठेवली.
नसरापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. काहीजण या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नरसापूर येथील मुलीच्या हत्येनंतर भोर तालुक्यासह पुण्यात संतप्त पडसाद उमटले होते. शनिवारी संध्याकाळी नसरापूरमधील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूल गाठला होता. याठिकाणी तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले होते.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील फालता मतदारसंघातील मतदान रद्द केले आहे. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत.
प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या वाटा वेगळ्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडू यांनाही टोला हाणला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे ‘महालक्ष्मी सरस 2026’ चे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत ‘इस्लाम राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना टाळण्याच्या भूमिकेचेही स्वागत केले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला.
राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी बारामती आणि राहुरी मतदारसंघात मतदान पार पडले असून, आता 4 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयापेक्षा त्यांच्या मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांनी बारामतीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या संभाव्य मताधिक्याचा आकडा वर्तवला आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले.
विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला डावलल्याची खंत व्यक्त करत थेट बंडाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मैदानावर उतरत हा निर्णय भावनेच्या भरात नाही, तर मेरिटवर आधारित आहे, असे सांगत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
सोळाव्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा आज सुरू झाला असून आजपासून स्व – गणनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची स्व – गणना डिजिटल स्वरूपात केली. त्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तयार केलेल्या मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले.
पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या दोन दिवसांमधल्या काही मुलाखतींमधून समोर आली.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी मध्ये मध्ये अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माफी मागितली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील सुनावून घेतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या शेजारी बसला होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी पक्षांतर्गत अनेक ज्येष्ठ नेते इच्छुक असतानाही झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली असून, या निवडीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली.
प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे.
केंद्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर तसेच येथील पायाभूत सुविधांवर भाष्य केले. तसेच महायुतीमधील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App