अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!, हेच राजकीय चित्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी येत्या काही दिवसांत मोठी खुशखबर मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची मोठी भेट, अशा आशयाचे पोस्टर सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.
महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!, असलाच प्रकार महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने समोर आलाय. महापालिकांच्या निवडणुकात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला जातोय. त्यात स्थानिक मुद्द्यांपासून ते नेत्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे विषय चघळले जात आहेत. त्यातच काही नेत्यांनी शरद पवारांच्या पासून ते हिजाबवाल्या महिलेच्या पंतप्रधान पदापर्यंतची चर्चा या निवडणुकीत पुढे आणली. त्यामुळे ही निवडणूक जास्तच रंगतदार झाली.
विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने; पण अजितदादांनी त्याचे श्रेय दिले शरद पवारांना!!, असे आज लातूरमध्ये घडले.
अंबरनाथच्या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठी खेळी केली खरी, पण ती सुद्धा तोकडी ठरली. अंबरनाथ नगर परिषदेत बहुमताची बाजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच मारली.
मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची आर्थिक नाडी आहे. कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांना कवेत घेणाऱ्या या महानगराची ओळख ‘धावणारी मुंबई’ अशी आहे.
बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही अशी ओरड काही जण करतात, पण घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या व्यथा समजतील का??, असा रोकडा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना केला.
ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर उतारा; देवेंद्र फडणवीसांचा तर्री पोहा!!, असेच चित्र माध्यमांमधून तरी समोर आले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी फक्त मुंबई आणि ठाणे या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केले, पण तिथे सुद्धा ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरून प्रचारात भाग घेतला, असे दिसले नाही. त्यांनी मुंबई परिसरात सहा सभांचे नियोजन केले. पण प्रत्यक्षात सभाच घेतल्या नाहीत. ठाकरे बंधू ठाण्यात आणि नाशिक मध्ये सुद्धा एकत्र सभा घेणार, असे जाहीर झाले. पण ते या दोन्ही शहरांमध्ये फिरकले नाहीत. दोघांनी मुंबईत आपापल्या पक्षांच्या काही शाखांना भेटी दिल्या.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पवारांना आणि त्यांच्या अनुयायांना काही फायदा जरूर झाला, पण क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला मात्र कायमचा फटका बसला. पवारांची महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर एकहाती सत्ता होती, तिला भाजपने टप्प्याटप्प्याने सुरुंग लावला. क्रिकेट पासून कुस्तीपर्यंत वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्ष पवारच राहिले. शरद पवार अजित पवार रोहित पवारांनी वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद कायम आपल्या ताब्यात ठेवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे गेले असताना एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या नगरसेवकाच्या काळातला किस्सा विचारण्यात आला, यावर फडणवीसांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. तसेच महापौर आणि नगरसेवकाचा जॉब एकदम टफ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो, असेही फडणवीस यांनी गंमतीने विधान केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, ‘दै. सामना’साठी दिलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी थेट राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सध्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर केले. आपण आता मुख्यमंत्रिपदावर नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर किंवा आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई महापालिकेत उद्या सत्ता आली तर उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्या बायकांत भांडण लागेल, अशी टीका मनसेतून नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाजन म्हणाले, राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे? चंदू मामा कुठे आणि रशीद मामूला त्यांनी जवळ केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून वाद निर्माण करत आहेत. महायुतीतल्या सहयोगी पक्षावर किती आणि कसे बोलायचे हे त्यांनी ठरविले पाहिजे. अन्यथा मी बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, कसे बोलू शकतो आणि कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला. फडणवीसांनी या इशाऱ्यातून आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला.
शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.
अंबरनाथ नगपरिषदेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ठाकरेंपासून शिंदेपर्यंत साऱ्यांनी भाजपवर आरोप केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अभद्र युती तोडण्याचे आदेश दिले. आता या राजकीय नाट्याचा दुसरा प्रसंग रंगला असून, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना आता भाजपने प्रवेश दिलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
देशाची आर्थिक राजधानी आणि मराठी माणसाच्या संघर्षातून उभे राहिलेले शहर. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली
शरद पवार “सिंह” आणि अजित पवार “वाघ’; पण दोघेही अडकलेत दोन महापालिकांच्या पिंजऱ्यात!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवार आणि अजित पवारांची झाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना आली जाग, महाराष्ट्रात अजून दोन-चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!, अशी अवस्था अजित पवारांची झाली आहे.
कुलाबा वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेल्या वादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हा केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न आहे,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्या महिलेने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, तिला आपण कधी पाहिले नाही किंवा भेटलोही नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी केला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
“आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा नेत्यांमध्ये विलासरावांचे नाव प्रमुख आहे, हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही,”
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App