महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेतील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळाले असून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडाचा मार्ग स्वीकारल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ओमराजेंच्या भूमिकेकडे लागले आहे. ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार, यावर ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले.
शिवसेना ठाकरे गटातील दुसऱ्या मोठ्या संभाव्य बंडामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
ओमराजे निंबाळकर म्हणे, दोन दिवसांनी निर्णय जाहीर करतील. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार हे ते स्वतःच धाराशिव मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगतील. पण ओमराजे निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केलेल्या वक्तव्यात त्यांच्या निर्णयाचे “रहस्य” दडलेय. किंबहुना ते “रहस्य” सुद्धा नाही, तर ते उघड “राजकीय सत्य” बोलून गेलेत!!
परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले आहेत. शनिवार असल्याने मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, त्याच वेळी हा सभामंडप कोसळला. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू व्हावा यासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या नव्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नुकतेच एक राजपत्र प्रसिद्ध करून माहिती अधिकार कायद्याच्या नियमांमध्ये अत्यंत जाचक आणि महागडे बदल केले आहेत. या बदलांमुळे माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त करत, अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.
ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली, मात्र जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागला आणि काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना आणि भाजप यांच्या गळ्यात येऊन पडले!! पवनराजेंची हत्या झाली 2006 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्रात राज्य होते
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आणि पद्मसिंह पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!! त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदाचा शब्द कुणी दिला होता आणि कुणी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले??,
पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.
कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विशेष प्रतिनिधी मुबई : Nitesh Rane शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे […]
कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा संपूर्ण ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ कागदपत्रांसह जरांगे यांच्यासमोर मांडला.
20 वर्षांपूर्वी विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडावर आज (दि.20) अंतिम निकाल दिला. केवळ संशयाचा फायदा आणि ठोस पुराव्यांचा अभाव या कारणांमुळे पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते
धाराशिवचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज अखेर निकाल लागणार आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय आज, 20 जून रोजी सुनावणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.
बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.
महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार का फुटले??, याविषयी याविषयी अनेक कारणे दिली गेली. अनेकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ तोंडावर त्याचे खापर फोडले. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर राहिले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App