मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!, असेच राजकीय चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर समोर आले.
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मोहाळा (ता. अकोट) येथे एका प्रार्थना-स्थळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारीला दुपारी घडली. जीवघेण्या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर, मानेवर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील हिदायत पटेल यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अकोला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दहा मनपात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ६८ तर मालेगावात इस्लाम पक्षाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला. त्यानंतर ७२ तासांनी विरोधकांनी त्यावर आगपाखड करत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी कधी होणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, बिनविरोधवरून सुरू झालेला वाद अजून पेटलेलाच आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट हल्ला केला.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. विकास, संवेदनशीलता आणि जनतेशी थेट संवाद या बळावर पुण्यात शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार, असा विश्वास शिवसेनेच्या ( शिंदे गट) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला
केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील का??, असा सवाल अजित पवार आणि भाजप नेते यांच्या दुहेरी राजकारणातून समोर आलाय.
सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे आहेत, तर ते मुंबई + ठाण्यात आणि पुणे + पिंपरी चिंचवड मध्येच काय अडकलेत??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलाय.
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक आयोगाची भरारी पथके सध्या अत्यंत सतर्क आहेत. मुंबईसह विविध महानगरांमध्ये संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच आता जुंपल्याचे पाहायला मिळत असून, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उभय पक्षांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे
लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कलमाडी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे विधान फडणवीसांनी केले आहे.
बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत,” असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काँग्रेसने अखेर महापालिका निवडणुकांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे या दोन्ही पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ठाकरे बंधूंचे फक्त मुंबई, ठाण्याकडे लक्ष; मराठवाडा विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, अशीच अवस्था ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीच्या रणनीतीतून समोर आली. बलाढ्य भाजपचे आव्हान परतवून लावण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्यामध्ये युती केली. त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची पूर्ण रणनीती आखली. मुंबई आणि ठाणे या परिसरात आणि फार तर छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरे बंधूंनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, पण मराठवाडा आणि विदर्भातल्या महापालिकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. इतकेच काय पण ठाकरे बंधूंनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांकडे देखील लक्ष दिले नाही.
एकीकडे महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धबडगा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावातल्या उत्तरेश्वराच्या यात्रेला विसरले नाहीत. त्यांनी प्रचारातून थोडा अवधी बाजूला काढून दरे गावाला भेट दिली आणि उत्तरेश्वराच्या यात्रेत महापूजा केली.
दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत…, पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही.
एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.
पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेमध्ये १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा खळबळजनक आरोप भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. देशात आजवर झालेले २जी, कोल स्कॅम किंवा कॉमनवेल्थ यांसारख्या मोठ्या घोटाळ्यांचा आकडा १ लाख ७६ हजार कोटींच्या वर गेला नाही, मात्र ठाकरेंनी एकट्या मुंबई पालिकेत ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे. तसेच महापौर ठाकरेंचा झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल, असा दावा अमित साटम यांनी केला.
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आंबेडकरांची आज सभा पार पडली. या सभेत बोलताना कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. इतके दिवस तुम्ही शरद पवारांच्या नादी लागलात, म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली, असे म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे.
निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते.
पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App