सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना अखेर पक्षाने पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या, तसेच प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेश नाकारल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार खंडन केले आहे. मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत अशा बातम्या देणाऱ्या संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
देशासमोर सध्या निर्माण झालेले भीषण आर्थिक आणि ऊर्जा संकट पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या सुरक्षेसाठी शासनाकडून देण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहने तातडीने काढून घेण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अधिकृत आवाहन केले असून, त्यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास चक्रे फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १५ दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता फास्टट्रॅक कोर्टात होणार असून, दररोज जलद गतीने हा खटला चालवला जाणार आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या ‘नीट-युजी 2026’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या प्राध्यापिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेमुळे परीक्षा यंत्रणेतील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.
पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक विजय मिळविण्यात नेहमीच अपयश!!
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा,’ अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी सुनावले…
NEET (UG) पेपर लीक प्रकरणात शुक्रवारी 8वी अटक झाली. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे सांगितली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चाव्यांचे वाटप केले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी पुन्हा धडपड; पुण्यात म्हणे, शरद पवार गटाची गुप्त बैठक!!, अशीच राजकीय घडामोड शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर घडली.
देशातील वाढती इंधन आयात, प्रदूषण आणि पर्यायी ऊर्जेचा वाढता वापर व जवळपास २२ लाख कोटी रुपयांच्या इंधनाची आयात थांबविण्यासाठी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महा मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे शेतकरी, साखर उद्योग आणि वाहन क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, ही वाहने नेमकी कधी बाजारपेठेत येतील, याची माहिती त्यांनी दिली नाही.
हडपसर परिसरातील रुग्णालयात बुधवारी सायंकाळी सापडलेली संशयास्पद वस्तू ही केवळ बॉम्ब सदृश नसून ती प्रत्यक्षात आयईडी (इम्प्रुव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक यंत्रणाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयात घातपात घडवण्याचा डाव होता का, याचा तपास आता दहशतवादविरोधी पथक तसेच पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू केला आहे.
पश्चिम आशियातील युद्ध संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले. या आवाहनानुसार ते स्वतः वागले. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. पंतप्रधान मोदींचे बाकीच्या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनुकरण केले. मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या. इंधन बचतीचे इतर मार्गही अवलंबले.
पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यातली बॉटनिकल गार्डनची जमीन अखेर फडणवीस सरकारने ताब्यात घेऊन ती जमीन पुण्यातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांची राजकीय वाटचाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांच्या दिशेने सुरू असल्याची चिन्हे त्यांच्याच राजकीय कृतीतून दिसून आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प व अंधेरी संकुल हे 15 वर्षांसाठी भाड्याने देऊन जवळपास 100 कोटींचा घोटाळा केला, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत उमेदवारांना उपलब्ध असलेले ‘ऑप्टिंग आऊट’ तसेच ‘संमती’ (Give Up / Accepted) हे पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार असून, त्यांचे आगामी सर्व परदेश दौरे तातडीने रद्द करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर किमान निंदा करू नये, असा सल्ला फडणवीसांनी विरोधकांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळवायसाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेते बाजूलाच होत नाहीत म्हणून सगळी तडफड!!, हेच राजकीय वास्तव सुनेत्रा पवारांच्या आणि रोहित पवारांच्या राजकीय हालचालींमधून आणि वक्तव्यांमधून समोर आली.
CS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिका प्रशासनाने आज पहाटे बुलडोझर चालवून ते घर उद्ध्वस्त केले.
विशेष प्रतिनिधी नाशिक : TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिका प्रशासनाने आज पहाटे […]
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ होणार असल्याने पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत कडक उन्हाचे असणार आहेत.
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलिसांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. यापैकी एक निर्णय पोलिसांना घरे देण्याचा होता.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App