आपला महाराष्ट्र

Nitesh Rane

Nitesh Rane : संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही; संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

Sambhajinagar

Sambhajinagar : संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM आहे का? उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सवाल; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

: संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Anjali Damania

Anjali Damania : भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा दावा

भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Rupali Chakankar

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते.

Nitin Gadkari

Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव; पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक

देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे.

WCD Department

WCD Department : बदली प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होणार; महिला व बाल विकास विभागाच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने; कर्मचाऱ्यांत आनंद

महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे.

CM Fadnavis

CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे; पीएम मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग स्वीकारण्यास सांगितले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे. पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय ‘ते’ पाळावे,” असे आवाहन केले आहे.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना युद्धपातळीवर गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद आणि जलसंधारण विभागाची आढावा बैठक पार पडली

Sharad Pawar

अघोषित रिटायरमेंट : INDI आघाडी फुटल्यानंतरही शरद पवार “शांत”; संस्थात्मक कारभारात भाग घेऊन राजकारणापासून अलिप्त!!

पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.

Sohrabuddin Case

Sohrabuddin Case : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण- सर्व 22 आरोपी निर्दोष; बॉम्बे HC म्हणाले- ठोस पुरावे नाही, संशयावरून शिक्षा देऊ शकत नाही

बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी २००५ च्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्व २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणात सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांचीही हत्या झाली होती.

वारकऱ्यांना घुसखोर म्हणणाऱ्या विकास लवांडेंच्या अटकेसाठी वाघोली पोलिसांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा

वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदू साधूसंतांचा अपमान करणाऱ्या विकास लवांडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

TCS corporate Jihad

TCS corporate Jihad : निदा खानला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!

नाशिक मधून समोर आलेल्या TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.

Jihad Fallout

Jihad Fallout : कॉर्पोरेट जिहाद उघड झाल्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर; पॉश कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखत त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘पॉश’ (प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्सुअल हरॅशमेंट) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ज्या शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे ‘अंतर्गत तक्रार समिती’ (आयसीसी) स्थापन करणे आता बंधनकारक असेल.

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले-जात तेव्हा संपेल जेव्हा समाज बदलेल; लोकसंख्या नियंत्रण धोरण आणि समान नागरी संहिता लोकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रण धोरण आणि समान नागरी संहिता (UCC) यांसारखे कायदे लोकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, जातीय राजकारण तेव्हाच संपेल, जेव्हा समाज जातीच्या आधारावर विचार करणे थांबवेल.

Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदू खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, तुमच्यामुळे मी वादात अडकलो; साक्षीदारही आक्रमक

शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली.

Nida Khan

TCS corporate Jihad : मास्टरमाईंड निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी; जिहादी आश्रयदात्या AIMIM चा नगरसेवक मतीन पटेल विरुद्धही गुन्हा दाखल!!

टीसीएस कॉर्पोरेट जिहादची मास्टर माईंड निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक केल्यानंतर आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आले.

तमिळनाडूतील एक आमदाराचा भाजप सत्ता स्थापनेच्या खेळापासून अधिकृतपणे बाजूला; पण राज्यपालांमार्फत “डाव” टाकायचे सगळे पर्याय खुले!!

तमिळनाडूतील एक आमदाराचा भाजप सत्ता स्थापनेच्या खेळापासून अधिकृतपणे बाजूला; पण राज्यपालांमार्फत “डाव” टाकायचे सगळे पर्याय खुले!!

मुलाने आईच्या नावाची रिंग टाकली; आत्याबाईंची दांडी गुल केली!!

मुलाने आईच्या नावाची रिंग टाकली; आत्याबाईंची दांडी गुल केली!!, अशीच घडामोड जय पवारांच्या एका वक्तव्यामुळे घडली.

Pawar family

पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!

पवार कुटुंबाची उफाळली महत्त्वाकांक्षा; भाजप आणि काँग्रेसने दाखविला आरसा!!, हे राजकीय वास्तव कालच जय पवारच्या वक्तव्यानंतर समोर आले.

Nashik Corporate

Nashik Corporate : कॉर्पोरेट जिहाद, निदा खानला संभाजीनगरातून अटक; 27 दिवसांपासून फरार निदा नारेगावच्या कैसर कॉलनीत लपली होती

नाशिकमधील आयटी कंपनी ‘टीसीएस’मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि त्यांना धर्मांतरासाठी सक्ती केल्याप्रकरणी 27 दिवसांपासून फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथ

जंग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!

ग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!, असंच म्हणायची वेळ जय पवार यांच्या आजच्या वक्तव्याने आली.

Kalaram temple

ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना; वैदिक मंत्रोच्चारात समतेचा गजर!!

नाशिक येथील पवित्र श्री काळाराम मंदिर येथे धर्मध्वज स्थापना समारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक पूजा विधी आणि भक्तांच्या जयघोषात माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, स्वामी श्री. गोविंददेव गिरी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली.

vijaya rahatkar

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा नाशिक दौरा; TCS कॉर्पोरेट जिहाद आणि खरात प्रकरणांच्या पोलीस तपासाचा घेतला आढावा!!

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात TCS कॉर्पोरेट जिहाद आणि अशोक खरात प्रकरणांसंदर्भात पोलीस तपासाचा आढावा घेतला. त्यासाठी त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांसमवेत विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक आयोजित केली. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला हजर होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विजयाताई रहाटकर यांना दोन्ही प्रकरणांच्या चौकशी आणि तपासाची सविस्तर माहिती दिली. विजयाताई रहाटकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना परिणामकारक चौकशी, तपास आणि कारवाई संदर्भात निर्देश दिले.

Dr. Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe : पालघर अत्याचार प्रकरणात न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू; ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक व शैक्षणिक मदत मिळणार- डॉ. नीलम गोऱ्हे

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेत, त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची मनःस्थिती जाणून घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Uday Samant

Uday Samant : भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द; मंत्री उदय सामंत यांची माहिती; राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदीची करण्यात आली होती सक्ती

\
राज्याच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी येत्या 28 जून रोजी आयोजित केलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा हिंदी सक्तीच्या मुद्यामुळे वादात सापडली होती. मनसेने या प्रकरणी प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात