Rupali Chakankar गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पा’चे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केले.
भोंदू बाबा अशोक खरातच्या भोंदू उद्योगात राष्ट्रवादीचेच नेते संशयाच्या घेऱ्यात!!, अशी अवस्था येऊन ठेपलीय. कारण ज्या पद्धतीने “पवार संस्कारित” रूपाली चाकणकर अशोक खरातच्या प्रकरणात अडकल्या,
भाषा तोंडात पुरोगामी, पण पवार संस्कारित लागले भोंदू बाबांच्या नादी!!, असेच म्हणायची वेळ अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेले भाषण ऐकल्यावर प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू हेच नामाभिधान त्यांना शोभले असे वाटले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा खास आहे. आजच्या मेळव्यात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील विकासाचा बोजवारा, नोकऱ्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला धारेवर धरलेच, पण त्याचबरोबर इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही अत्यंत बोचरी टीका केली.
नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने आधीपासूनच लक्ष घातल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यंत्रणा हलवली आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी सुरू झाली. त्यामुळे ही कारवाई अचानक नसून पूर्णपणे नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामती तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत २३ एप्रिलला विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यात सुनेत्रा पवारांविरुद्ध मविआ उमेदवार देणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसने बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मविआतील मतभेद समोर आले आहेत.
मोहन भागवत म्हणाले की, आरएसएसचे काम खूप वेगाने वाढत आहे आणि लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत, त्यामुळे आता कामाचे विकेंद्रीकरण करून ते वेगवेगळ्या भागांमध्ये विभागण्याची सुरुवात केली जात आहे.
दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण टाळल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिले सत्तेपासून वंचित; पण मधल्या मध्ये ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने ठाकरेंच्याच खासदारांना लागले सत्तेच्या चांदीचे वेध!!, अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींची चर्चा महाराष्ट्रात रंगली.
भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात धडक कारवाईच्या बातम्या आज जरी आल्या असल्या, प्रत्यक्षात राज्याच्या गृह मंत्रालय आधीपासूनच सतर्क होते.
मराठी नववर्षाच्या शुभारंभी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नविन नाशिक परिसरात “नववर्ष स्वागत यात्रा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजित करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने निषेध केला “एपस्टीन मोदींचा”; पण फोटो चिकटवला आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!, असला विचित्र प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया हँडल वरून समोर आला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती केल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला गुढीपाडवा मेळावा होणार असून मनसैनिकांनी त्याची जोरदार तयारी केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळात आज ‘महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026’ एकमताने मंजूर केले असून, यामुळे राज्यातील जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विधेयकाची माहिती देताना स्पष्ट केले की, वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासोबतच पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत राज्य सरकारने सीबीआय चौकशीसाठी केंद्राला अद्याप पत्र दिले नसल्याचा गंभीर आरोप केला होता.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या “शेट्टी टॉवर’ निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर सध्या परदेशात असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
समान नागरी कायद्या’बाबत राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या कायद्यासंदर्भात विधी व न्याय, सामान्य प्रशासन तसेच महिला व बालकल्याण विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. येत्या महिनाभरात सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन सरकार अधिकृत भूमिका मांडेल, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केले, ते पाहून ते वडेट्टीवार यांचे स्वतंत्र वक्तव्य आहे की शरद पवारांची नेहमीचीच double game आहे??, असा सवाल समोर आला.
हिंदू नववर्ष स्वागत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी तीरावर “पंच परिवर्तन हेच समाज परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित भव्य महारांगोळी साकारण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चित केली जावी
नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात अमली पदार्थ (ड्रग्ज) तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस वाटपाचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गरजा ओळखून प्राधान्य क्षेत्रांना पुरवठ्याची कार्यवाही जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होईल.
राज्य परिवहन मंडळामध्ये लवकरच 17 हजार 742 पदांची कंत्राटी भरती करण्यात येणार असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने 8300 बस गाड्या येणार असल्याने ही भरती करण्यात येणार आहे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App