“धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या ३० वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू होत्या, मात्र आमच्या सरकारने प्रत्यक्ष कृती करून प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धारावीकरांना केवळ घरेच नाही, तर एक समृद्ध आर्थिक इकोसिस्टिमही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी येथे केले. यावेळी त्यांनी धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नसल्याचे स्पष्ट करत, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्याच्या गृह विभागाकडे सादर केलेल्या एका अहवालामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांना २०१६ सालच्या एका गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, असा गंभीर ठपका या अहवालात ठेवला आहे.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी हराकरी केली, पण त्याचवेळी भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस भारी ठरली. 29 महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने एकवटून निवडणुका लढवलेली नाही. उलट सर्वच्या सर्व महापालिकांमध्ये सगळे विरोधक विस्कटलेल्या अवस्थेत निवडणूक लढवताना दिसतात. त्यामुळे भाजप समोर विरोधकांचे कुठले आव्हानच नाही. मुंबईत ठाकरे बंधू, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका – पुतणे या दोन राजकीय घराण्यांनीच भाजपकडे थोडेफार आव्हान निर्माण केले. काँग्रेसवाले तर यात फार मागे पडले, पण असे असताना सुद्धा भाजपवाल्यांनी सरळपणे स्वतःची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून “सेल्फ गोल” करण्यात “धन्यथा” मानली.
पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांनी केली “गेम”; महापालिकेला तसे करण्याचे अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन, ती वस्तुस्थिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या हमीपत्र नंतर समोर आली.
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे हृदय असलेल्या मुंबईचे राजकारण सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन ठेपले आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक नेतृत्व एकवटून अजित पवारांना थेट “आवाज” टाकणाऱ्या भाजपा आमदार महेश लांडगे यांना घेण्यासाठी पवार कुटुंबाला एकवटावे लागले.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन न मिळाल्याबद्दल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ओवैसी यांनी आरोप केला की, काँग्रेस पक्ष सत्तेत असताना त्यांनी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) मध्ये बदल केले, त्यामुळे या दोघांना तुरुंगात राहावे लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पिंपरी चिंचवड महापालिका परिक्षेत्रात आपण मोठा विकास केला, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्याचवेळी त्यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केले.
अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची; घड्याळापुढे शरणागती तुतारीची!!, हेच राजकीय चित्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने समोर आले.
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी येत्या काही दिवसांत मोठी खुशखबर मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची मोठी भेट, अशा आशयाचे पोस्टर सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.
महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!, असलाच प्रकार महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने समोर आलाय. महापालिकांच्या निवडणुकात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला जातोय. त्यात स्थानिक मुद्द्यांपासून ते नेत्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे विषय चघळले जात आहेत. त्यातच काही नेत्यांनी शरद पवारांच्या पासून ते हिजाबवाल्या महिलेच्या पंतप्रधान पदापर्यंतची चर्चा या निवडणुकीत पुढे आणली. त्यामुळे ही निवडणूक जास्तच रंगतदार झाली.
विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री केले काँग्रेसने; पण अजितदादांनी त्याचे श्रेय दिले शरद पवारांना!!, असे आज लातूरमध्ये घडले.
अंबरनाथच्या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठी खेळी केली खरी, पण ती सुद्धा तोकडी ठरली. अंबरनाथ नगर परिषदेत बहुमताची बाजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच मारली.
मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची आर्थिक नाडी आहे. कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांना कवेत घेणाऱ्या या महानगराची ओळख ‘धावणारी मुंबई’ अशी आहे.
बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही अशी ओरड काही जण करतात, पण घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या व्यथा समजतील का??, असा रोकडा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना केला.
ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर उतारा; देवेंद्र फडणवीसांचा तर्री पोहा!!, असेच चित्र माध्यमांमधून तरी समोर आले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी फक्त मुंबई आणि ठाणे या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केले, पण तिथे सुद्धा ठाकरे बंधूंनी रस्त्यावर उतरून प्रचारात भाग घेतला, असे दिसले नाही. त्यांनी मुंबई परिसरात सहा सभांचे नियोजन केले. पण प्रत्यक्षात सभाच घेतल्या नाहीत. ठाकरे बंधू ठाण्यात आणि नाशिक मध्ये सुद्धा एकत्र सभा घेणार, असे जाहीर झाले. पण ते या दोन्ही शहरांमध्ये फिरकले नाहीत. दोघांनी मुंबईत आपापल्या पक्षांच्या काही शाखांना भेटी दिल्या.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पवारांना आणि त्यांच्या अनुयायांना काही फायदा जरूर झाला, पण क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला मात्र कायमचा फटका बसला. पवारांची महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर एकहाती सत्ता होती, तिला भाजपने टप्प्याटप्प्याने सुरुंग लावला. क्रिकेट पासून कुस्तीपर्यंत वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्ष पवारच राहिले. शरद पवार अजित पवार रोहित पवारांनी वेगवेगळ्या क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद कायम आपल्या ताब्यात ठेवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे गेले असताना एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या नगरसेवकाच्या काळातला किस्सा विचारण्यात आला, यावर फडणवीसांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. तसेच महापौर आणि नगरसेवकाचा जॉब एकदम टफ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो, असेही फडणवीस यांनी गंमतीने विधान केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, ‘दै. सामना’साठी दिलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी थेट राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सध्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर केले. आपण आता मुख्यमंत्रिपदावर नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर किंवा आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई महापालिकेत उद्या सत्ता आली तर उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्या बायकांत भांडण लागेल, अशी टीका मनसेतून नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाजन म्हणाले, राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे? चंदू मामा कुठे आणि रशीद मामूला त्यांनी जवळ केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे सोडून वाद निर्माण करत आहेत. महायुतीतल्या सहयोगी पक्षावर किती आणि कसे बोलायचे हे त्यांनी ठरविले पाहिजे. अन्यथा मी बोलायचे ठरविले तर मी काय बोलू शकतो, कसे बोलू शकतो आणि कशी उत्तरे देऊ शकतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला. फडणवीसांनी या इशाऱ्यातून आमदार महेश लांडगे यांना बूस्टर डोस दिला.
शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App