सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!, असला प्रकार ठाकरे सेनेकडून विधान परिषदेत समोर आला.
महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने माओवादी हिंसाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवलंबलेल्या झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली.
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आज (३० जून) संपत आहे. “आम्ही आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. उद्यापासून (१ जुलै) विना HSRP नंबर प्लेट धावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून ठोस आणि कडक कारवाई केली जाईल,” अशी स्पष्ट घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली आहे.
सोशल मीडियावर मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील सायबर छळछावण्यांमध्ये अडकवून त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
राज्यात, विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये लहान मुलांचा गुन्ह्यांमध्ये वापर होण्याचे आणि वाढत्या बालगुन्हेगारीचे प्रमाण गंभीर स्वरूप धारण करत आहे. या ज्वलंत मुद्द्यावर विधानसभेत गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका मांडली
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आणि त्यांचे भविष्य घडवणारे पवित्र ठिकाण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत घडलेल्या घटनेने या विश्वासालाच मोठा हादरा दिला आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ठाकरे कुटुंबाचे अत्यंत विश्वासून आणि निष्ठावान नेते मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर यांना थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान केले जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत.
चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून तो सामाजिक न्यायासाठी केलेला ऐतिहासिक संघर्ष होता. तथागत गौतम बुद्धांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे दैवत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडूनच मिळाली आहे,
“देशाच्या आर्थिक विकासात समाजातील प्रत्येक घटकाचा वाटा असायला हवा. त्यासाठी उत्पन्नाची साधने गाव-खेड्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
सचिन अहिरांनी शिंदे सैनिक येऊन उद्धव ठाकरेंना दिल्या त्यांच्या पक्षाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’चा शुभारंभ केला.
वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकताच नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीवरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडले. “माझी कटिबद्धता केवळ भारतीय संविधानाशी असून, त्या कार्यक्रमात मी कोणत्याही ‘कंडक्ट रुल्स’चा (सेवा नियमांचा) भंग केलेला नाही,” असे स्पष्टीकरण नांगरे पाटील यांनी दिले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी आलेल्या राजू प्रयाग शाम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून परीक्षेचे प्रश्नपत्रिका संचदेखील जप्त करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून झालेल्या मोठ्या स्थित्यंतरानंतर आता आणखी एका संभाव्य बदलाची चर्चा रंगू लागली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार) पुन्हा एकदा राज्याचे महत्त्वाचे मानले जाणारे अर्थखाते सोपवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामतीमधील एका जाहीर कार्यक्रमात यावर अत्यंत भाष्य केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्यंत अमानुष आणि राक्षसी अत्याचार-हत्या प्रकरणाचा विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवत थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे.
टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे. “राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज असून, जर पोलिस निरीक्षकाने वेळीच कारवाई करून हा डाव उधळला नसता, तर परीक्षा झाल्यावर राज्यात मोठी बोंबाबोंब झाली असती,” अशी थेट कबुली देत मुनगंटीवार यांनी भर अधिवेशनात सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सियाने लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने केतनकडून १ कोटी रुपये घेतले होते. मात्र, खरेदी करण्याऐवजी तिने ती सर्व रक्कम तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिली.
उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, तपास पूर्ण झाल्याने कोठडीत वाढ करू नये असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
नसरापूर येथील चिमुकलीवरील अमानवी अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल पुण्यात ‘महिला शक्ती समूह’ आणि ‘संघटित नारी शक्ती’ तर्फे आनंद व्यक्त करण्यात आला. या ऐतिहासिक आणि न्याय्य निकालाचे स्वागत करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ‘कलाकार कट्टा’ येथे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न झाली. या परिषदेने तीन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर केले. यामध्ये ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘एकसंघ भारताचा संकल्प’ आणि ‘नक्षलमुक्त भारत अभियान’ या ठरावांचा समावेश आहे
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
बंडखोर खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा; तरीही शिंदे सेनेत कार्यकर्त्यांची भरती!!, असला प्रकार समोर आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App