आपला महाराष्ट्र

संशयाचा फायदा आणि पुराव्यांचा अभाव म्हणून पवनराजे हत्याकांडातून पद्मसिंह पाटलांचा सर्व आरोपींची निर्दोष सुटका!!; तपास आणि खटल्यात कुठे राहिल्या उणिवा??

20 वर्षांपूर्वी विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडावर आज (दि.20) अंतिम निकाल दिला. केवळ संशयाचा फायदा आणि ठोस पुराव्यांचा अभाव या कारणांमुळे पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

Pawanraje Nimbalkar

Pawanraje Nimbalkar : 20 वर्षांनंतर पवनराजे हत्याकांडाचा निकाल आज; ओमराजेंच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त, राजकीय भवितव्याकडेही नजर

धाराशिवचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज अखेर निकाल लागणार आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय आज, 20 जून रोजी सुनावणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आ

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे देशाची वाटचाल; आमदार-खासदारांचा हमीभाव ठरलाय, शेतकऱ्याचा नाही! उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते

Sanjay Raut

Sanjay Raut : उबाठाच्या वर्धापन दिनी राऊतांना भाषणाची संधी नाही:आदित्य ठाकरेंनीच भोंगा बंद केल्याचा भाजपचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

Shinde's

Shinde’s : ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते; वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.

Vijay wadettiwar

Vijay Wadettiwar : आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले

महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात भाजप – शिंदे सेनेच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर; एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव!!

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार का फुटले??, याविषयी याविषयी अनेक कारणे दिली गेली. अनेकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ तोंडावर त्याचे खापर फोडले. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर राहिले.

Delhi High Court

Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

सरकारने दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर सायबर क्राईम, परीक्षा पेपर लीक, चाइल्ड पोर्नोग्राफी, दहशतवादाशी संबंधित प्रचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात आहे.

तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करतील; घड्याळाच्या नेत्याने सांगितले राजकीय सत्य!!

Tutari उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर करावे लागले, पण तुतारीवाल्यांचे ऑपरेशन आम्ही करायची गरज नाही. तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करून घेतील, अशा शब्दांत घड्याळ पक्षाच्या नेत्याने राजकीय सत्य सांगून टाकले.

Bachchu Kadu

Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. “ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते,” असा दावा त्यांनी केला.

Sanjay Raut

Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करताना राऊत यांनी आता ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde : सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदेंची ताकद वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवा पॉवर सेंटर’ उदयास?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा लोकसभा खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.

Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : कालच्या शिवीगाळीचाच आज स्फोट!; 6 खासदारांच्या बंडावर शिरसाटांचा दावा, पुढचा निर्णय शिंदे घेतील

महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.

Operation Tiger

Operation Tiger : द फोकस एक्सप्लेनर : कसे घडले ‘ऑपरेशन टायगर’? 6 खासदारांचा पत्रातून दावा- ‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव होता’

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाची भूमिका घेतल्याचा दावा समोर आला आहे. शिवसेना स्थापना दिनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीतील गुप्त बैठका, लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचे सांगितले जाणारे पत्र, जयपूरपर्यंत हलवण्यात आलेले खासदार आणि पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या कथित प्रयत्नांवरून आता शिवसेनेतील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे.

Amit Shah

ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा; पुढचे टार्गेट कोण??

ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; नेमका राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा!!, यामुळे सगळ्या देशाचे राजकारण महाराष्ट्रात एकवटले.

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!

नाशिक : शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!, हेच राजकीय वास्तव बंडखोर खासदारांच्या तथाकथित लेटर बॉम्ब मधून समोर आले. उद्धव […]

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : काँग्रेस भाजपचीच ‘ए टू झेड टीम’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, नांदेडमधील उदाहरण देत साधला निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस ही प्रत्यक्षात भाजपचीच ‘ए टू झेड टीम’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भाजपविरोधी राजकारणाचा दावा करणारी काँग्रेस प्रत्यक्षात भाजपशी तडजोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

Naresh Mhaske

Naresh Mhaske : “तुमचे ‘राजे’ कधी मातोश्रीबाहेर पडले का?”; नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, 65 नगरसेवकांचाही उल्लेख

महाराष्ट्रातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चांदरम्यान आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांसाठी शिंदे गटाला जबाबदार धरण्यापूर्वी ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका केली.

“ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची “एन्ट्री”; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!

“ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.

1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!

1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

Gen Z

Gen Z : ‘जेन झी’ तरुणांवर संघाचा पूर्ण विश्वास; लोकसंख्येच्या असंतुलनामुळेच 1947 मध्ये फाळणी, सध्या लोकसंख्या संतुलनाची गरज!!

देशाच्या नव्या म्हणजेच ‘जेन झी’ पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे. आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे येथे केले. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. त्याचवेळी श्री आंबेकर यांनी देशातल्या लोकसंख्या संतुलनाची गरज व्यक्त केली. “डेमोग्राफिक चेंज” मुळेच 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav : ‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षासाठी हा मोठा धक्का असला तरी खचून न जाता नव्याने संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Arvind Sawant

Arvind Sawant : ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचा पलटवार; “यशस्वी झाले असेल तर चेहरे दाखवा”, अरविंद सावंतांचे थेट आव्हान

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई अधिक तीव्र झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. “जर ऑपरेशन टायगर खरोखरच यशस्वी झाले असेल, तर संबंधित खासदारांचे चेहरे आणि पुरावे जनतेसमोर आणा,” असे सावंत यांनी म्हटले आहे.

Operation Tiger

Operation Tiger : ऑपरेशन टायगर खरोखर यशस्वी की फक्त राजकीय दबावतंत्र?; ठाकरे-शिंदे संघर्षात सस्पेन्स कायम

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले कथित ‘ऑपरेशन टायगर’ अद्यापही गूढतेच्या पडद्याआड आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे फेटाळून लावत आपले सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.

Vidhan Parishad

Vidhan Parishad : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान; ६ जागा बिनविरोध, २२ जूनला निकाल

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून त्यानंतर अंतिम निकाल स्पष्ट होईल.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात