पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले. त्यामुळे खटला सुनावणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे.
कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विशेष प्रतिनिधी मुबई : Nitesh Rane शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे […]
कोल्हापुरात येऊन अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!, ही राजकीय घडामोड आज कोल्हापुरात घडली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा संपूर्ण ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ कागदपत्रांसह जरांगे यांच्यासमोर मांडला.
20 वर्षांपूर्वी विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडावर आज (दि.20) अंतिम निकाल दिला. केवळ संशयाचा फायदा आणि ठोस पुराव्यांचा अभाव या कारणांमुळे पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते
धाराशिवचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आज अखेर निकाल लागणार आहे. तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय आज, 20 जून रोजी सुनावणार आहे. या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, यावरून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.
बाळासाहेब मनात, विचारात अन् कामात असावे लागतात. रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. वाघाचे कातडे पांघरुण लांडगा वाघ होत नाही. असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवा वर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देणार. हिंमत असेल तर समोर या. हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला.
महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार का फुटले??, याविषयी याविषयी अनेक कारणे दिली गेली. अनेकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ तोंडावर त्याचे खापर फोडले. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर राहिले.
सरकारने दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर सायबर क्राईम, परीक्षा पेपर लीक, चाइल्ड पोर्नोग्राफी, दहशतवादाशी संबंधित प्रचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात आहे.
Tutari उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर करावे लागले, पण तुतारीवाल्यांचे ऑपरेशन आम्ही करायची गरज नाही. तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करून घेतील, अशा शब्दांत घड्याळ पक्षाच्या नेत्याने राजकीय सत्य सांगून टाकले.
ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. “ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते,” असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करताना राऊत यांनी आता ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा लोकसभा खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाची भूमिका घेतल्याचा दावा समोर आला आहे. शिवसेना स्थापना दिनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीतील गुप्त बैठका, लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचे सांगितले जाणारे पत्र, जयपूरपर्यंत हलवण्यात आलेले खासदार आणि पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या कथित प्रयत्नांवरून आता शिवसेनेतील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे.
ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; नेमका राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा!!, यामुळे सगळ्या देशाचे राजकारण महाराष्ट्रात एकवटले.
नाशिक : शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!, हेच राजकीय वास्तव बंडखोर खासदारांच्या तथाकथित लेटर बॉम्ब मधून समोर आले. उद्धव […]
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस ही प्रत्यक्षात भाजपचीच ‘ए टू झेड टीम’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भाजपविरोधी राजकारणाचा दावा करणारी काँग्रेस प्रत्यक्षात भाजपशी तडजोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चांदरम्यान आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांसाठी शिंदे गटाला जबाबदार धरण्यापूर्वी ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका केली.
“ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.
1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App