राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरच्या मोर्चात काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र, पण ठाकरे सेना आणि शप राष्ट्रवादी दोघांपासून विभक्त!!, असेच चित्र आज नागपूरात दिसले.
अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याचसोबत रुपाली ठोंबरे यांनी अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले.
देशाच्या अर्थव्सवस्थेचे आणि रुपयांचे काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते, त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनता आमच्यासोबत उभी राहील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, आज या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे. हे सर्व सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिले गेले होते.
राज्यात घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आणि महारेराच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांविरुद्ध ( बिल्डर) आता राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. गृहखरेदीदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विकासकांच्या मालमत्तांचा लिलाव करणे, बँक खाती सील करणे आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे व इतर सदस्यांन
राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेचालक, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्राने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात २०% अतिरिक्त वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्याचा पूर्वीचा ३०% कोटा आता ५०% वर पोहोचला असून उद्यापासून म्हणजेच २३ मार्च २०२६ पासून याची अंमलबजावणी सुरू होईल.
महाराष्ट्रात वीजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामागचे मुख्य कारण म्हणजे कोळशाच्या किमतीत झालेली वाढ होय. महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महानिर्मिती) च्या २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अहवालात वीजनिर्मिती खर्च वाढल्याचे नमूद करण्यात आले असून, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या वीजबिलावर होऊ शकतो.
राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मका खरेदीसाठी राज्य सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने मका खरेदीची मुदत आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवून दिली आहे. तसेच मूळ मंजूर उद्दिष्टाव्यतिरिक्त अतिरिक्त ५ लाख क्विंटल मका खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने मका विकावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
हिंदू समाजातील दोषांवर परिपूर्ण उपाय म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ जरी मोठ्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असला, तरी ही प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य आहे. खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या सहभागाच्या माध्यमातून घडणारी परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे संघ होय,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या पक्षात पाडली फूट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केले टार्गेट!!, असे आज घडून आल्याचे दिसले.
उपराष्ट्रपती श्री सीपी राधाकृष्णन आणि राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येथे उपस्थिती दर्शवली आणि उपस्थितांना संबोधित केले. या पहिल्याच दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. उपराष्ट्रपती यांची उपस्थिती लाभल्याने या विद्यापीठाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुसक्या आवळेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे विरोधक झोपले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी “डाव” टाकल्यामुळे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीचे आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!, असला प्रकार आज समोर आला.
महाराष्ट्रात फक्त पवार कुटुंबीयांना Political Immunity आणि बाकी सगळ्यांना नैतिकता आणि कायद्याची कसोटी!!, हेच राजकीय चित्र अशोक खरात प्रकरणात अडकल्यानंतर रूपाली चाकणकरांना द्यायला लागलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीचे आणि बड्या ओळखींचे धागेदोरे आता वेगाने समोर येत आहेत. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि उद्योजकांची नियमित ये-जा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असतानाच, आता खरातच्या अफाट मालमत्तेचाही उलगडा झाला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. मी व माझ्या कुटुंबाने खरातला गुरु मानले होते. परंतु, त्यांची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
Rupali Chakankar गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पा’चे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केले.
भोंदू बाबा अशोक खरातच्या भोंदू उद्योगात राष्ट्रवादीचेच नेते संशयाच्या घेऱ्यात!!, अशी अवस्था येऊन ठेपलीय. कारण ज्या पद्धतीने “पवार संस्कारित” रूपाली चाकणकर अशोक खरातच्या प्रकरणात अडकल्या,
भाषा तोंडात पुरोगामी, पण पवार संस्कारित लागले भोंदू बाबांच्या नादी!!, असेच म्हणायची वेळ अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेले भाषण ऐकल्यावर प्रबोधनकारांचे उद्बोधनकार नातू हेच नामाभिधान त्यांना शोभले असे वाटले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा खास आहे. आजच्या मेळव्यात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील विकासाचा बोजवारा, नोकऱ्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला धारेवर धरलेच, पण त्याचबरोबर इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही अत्यंत बोचरी टीका केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App