आपला महाराष्ट्र

Moshi Garbage

Moshi Garbage : मोशी कचरा डेपो दुर्घटना अपडेट: ९ जणांची सुखरूप सुटका; अजूनही ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत बचाव पथकांना मोठे यश मिळाले आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली कोसळलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती कायम असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.

NIA Raids

NIA Raids : महाराष्ट्रातील 3 ठिकाणांसह 9 राज्यांत 20 ठिकाणी एनआयएचे एकदाच छापे; ऑनलाइन कट्टरवाद व आरएसएस कार्यालय बॉम्बहल्ल्याच्या तपासाला वेग

देशात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे ऑनलाइन रॅडिकलायझेशन (कट्टरवादाचा प्रसार) आणि झारखंडमधील रांची येथील १६ जूनच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावरील पेट्रोल बॉम्बहल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मोठी कारवाई केली. एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील ३ ठिकाणांसह देशातील नऊ राज्यांमध्ये २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

कुठेच काही जमत नाय म्हणून पवारांच्या पक्षाचे तीन डगरींवर हात पाय!!

कुठेच काही जमत नाय म्हणून पवारांच्या पक्षाचे तीन डगरींवर हात पाय!!, असला प्रकार शरद पवारांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीतून समोर आला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या सहा महिन्यांमधली अवस्था अशीच झालेली दिसली.

Ashadhi Yatra 2026

Ashadhi Yatra 2026 : आषाढी यात्रा काळात पावसाची शक्यता; यंदा 20 पर्यायी पत्राशेड; जर्मन हँगर मंडप, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी‎

यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर्षीच्या रांगेतील काही शेड कमी झाले असले, तरी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर समितीने यंदा तब्बल २० नवीन पत्राशेड आणि एका भव्य जर्मन हँगर मंडपाची पर्यायी व्यवस्था केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार; धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

Maharashtra Government

Maharashtra Government : राज्यात 20 टक्के गावांत स्मशानभूमीच नाही! राज्य सरकारचा लोकप्रतिनिधींना दणका, स्मशानभूमी असल्याचा दाखला द्या, तरच इतर विकासकामांचा मिळेल निधी

राज्यातील ग्रामीण भागात मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. राज्यात आजही तब्बल 7 हजार 444 (20 टक्के) गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नाही. परिणामी, पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत किंवा उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात.

NEET Paper Leak Case

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरण; मोटेगावकर व कुलकर्णीच्या कोठडीत 11 जुलैपर्यंत वाढ, दिल्ली न्यायालयाचा निर्णय

नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी आणि रेणुकाई करिअर सेंटरचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ११ जुलैपर्यंत वाढ केली आहे. बुधवार, ८ जुलै रोजी जुन्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. सीबीआयच्या सरकारी वकिलांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.

Maharashtra

Maharashtra : महाराष्ट्रात ‘व्यावहारिक मराठी’ अनिवार्य; प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय, महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा

“मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Maharashtra-Karnataka

Maharashtra-Karnataka : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर बैठक; 30 वर्षांनंतर अधिवेशन काळात विधानभवनात शरद पवारांची उपस्थिती, न्यायालयीन लढा अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात उच्चाधिकार समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सीमा भागातील लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, अधिवेशन काळात तब्बल 30 वर्षांनंतर शरद पवार विधानभवनात दाखल झाले.

CM Fadnavis

CM Fadnavis : मी शिव्याप्रूफ, पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर सोडणार नाही- मुख्यमंत्री:पुणे-मुंबई मिसिंग लिंक बंदप्रकरणी टीका करणाऱ्यांना इशारा

दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पुणे-मुंबई मिसिंग लिंक रस्ता बंद झाला होता. तो १९ तासांनंतर खुला झाला. हजारो कोटी रुपये खर्चूनही रस्ता बंद झालाच कसा, असा सवाल विरोधकांनी केला. रस्ता खुला झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी काही विरोधकांनी रस्ता बंद असल्याचे सांगितले. त्याला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करा, मी ‘शिव्याप्रूफ’ आहे; पण महाराष्ट्राला बदनाम कराल तर मी सोडणार नाही.

Assembly Speaker

Assembly Speaker : तुमच्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा! विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश

राज्य सरकारने विधानसभेत दिलेली आश्वासने आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याचा दिलेला शब्द याचा आता लेखाजोखा मांडला जाणार आहे. सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनांबाबत चालू पावसाळी अधिवेशनाचे कामकाज संपण्यापूर्वी सभागृहात श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिले. त्यावर पुढील चार दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

भाजपची रणनीती : ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर; पण पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ!!

उद्धव ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर आणि शरद पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ दाखवायची भाजपची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये बोलून दाखवली.

सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज दुसरे करणार तरी काय??

सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज सुप्रिया सुळे दुसरे करणार तरी काय??, असा सवाल त्यांच्याच एका वक्तव्यामुळे समोर आलाय.

अडकेलेल्या वारकऱ्यांसाठी धर्माचार्य गतिविधी सरसावली; ‘वारी मित्र घर’ अभियान सुरू

– महिला वारकऱ्यांसाठी खासगी स्वच्छतागृहे खुली करण्याचे आवाहन; शाळा, महाविद्यालयांनाही सहभागाची विनंती

Wayanad

Wayanad : वायनाडमध्ये भूस्खलन, 3 मृत्यू; बोगद्याच्या मातीत वाहून आले टँकर-वाहने; अनेकजण दबले; 2024 मध्ये 400 मृत्यू झाले होते

केरळमधील वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली.

Sharad Pawar’

Sharad Pawar’ : शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ती पेरलेली बातमी, आता कोणालाही सोबत जोडणार नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडणार असून हा पक्ष ‘एनडीए’त (NDA) सामील होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगत पडदा टाकला आहे. “शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही केवळ एक पेरलेली बातमी असून यात कोणतेही तथ्य नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Monsoon Break

Monsoon Break : 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस ब्रेक मिळण्याची शक्यता; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा सल्ला

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाची ही विश्रांती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता असून, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

Lonavala

Lonavala : लोणावळ्यात भीषण भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या धोक्यात आणखी भर पडली आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस NDA मध्ये सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नकार!!

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला.

Maharashtra

महाराष्ट्रात 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता!!

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले.

ढगफुटीचा भोवरा सुरत आणि अहिल्या नगरच्या दिशेने सरकला; नाशिकवरचे संकट टळल्याची शक्यता!!

मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवले असताना ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली.

Maharashtra TET

Maharashtra TET : टीईटी अट सक्तीविरोधात नऊ जुलैला ‘शाळा बंद’ आंदोलन:शिक्षक संघटनांनी दिला राज्य शासनाला इशारा

राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

FDA Raids

FDA Raids : केमिकल दुधाच्या रॅकेटवर ‘एफडीए’ची कारवाई; 5 जिल्ह्यांत छापे, 1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले.

Lonavala Tourist

Lonavala Tourist : लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध; कलम 163 लागू; अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या संततधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Rain Fury

Maharashtra Rain Fury : राज्यात अतिवृष्टीने 9 बळी; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत असून, याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. या संततधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन तर विस्कळीत झालेच आहे, पण त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांत काही गंभीर दुर्घटनाही घडल्या आहेत.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात