\ राज्याच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी येत्या 28 जून रोजी आयोजित केलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा हिंदी सक्तीच्या मुद्यामुळे वादात सापडली होती. मनसेने या प्रकरणी प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा यांचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांना आपले राज्यसभा सदस्यत्व सोडणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार, त्यांनी आज उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, सुनेत्रा पवार आपल्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे.
: दापोलीतील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांना खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या जमीन हडप आणि सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाच्या गंभीर आरोपांनंतर, न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आणि कायदेशीर वादावर तूर्तास पडदा पडला असून, परब यांच्यासाठी हा मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून पोलिसांनी मंगळवारी मृताच्या नातेवाइकांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार नोंदवले आहेत.
राहुल गांधी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जींना फोन केले. त्यांच्या पराभवाविषयी सांत्वन केले. त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे आश्वासन दिले, पण या सगळ्यांत शरद पवारांनी ममता बॅनर्जींना ना फोन केला, ना पश्चिम बंगालवर त्यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले. शरद पवारांचे सोडा, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ममता बॅनर्जींना पवारांच्या वतीने फोन केल्याची कुठली बातमी आली नाही. त्यामुळेच बाकीचे सगळे नेते INDI आघाडीमध्ये एकवटले असताना शरद पवार मात्र आघाडीपासून तुटले की काय?? याविषयी दाट संशय निर्माण झाला.
जिल्हा विकास अन् उद्योगवाढीसाठी गुंतवणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योग विभागाने आता सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये तब्बल 11,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये तब्बल 294 सामंजस्य करार आज ( 6 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर उद्या (६ मे) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांचे शहरात विविध कार्यक्रम होणार आहे.
आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिले की बंगालचा खरा पक्ष कोणता आहे, असे म्हणत ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मिरवणुका न काढण्याचे व गुलाल न उधळण्याचे आवाहन केले आहे. बारामतीकरांनी या मतदानाद्वारे दादांनी केलेल्या विकासकामांचे प्रतीक म्हणून त्यांना भावांजली वाहिली, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी राज्य सरकार कायद्यातील कोणतीही पळवाट (लूपहोल) न ठेवता हा खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, जलदगतीने न्याय देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने पीडितेच्या कुटुंबाला लेखी पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही लोक शनिवारी रात्री झालेल्या आंदोलनाचा फायदा घेऊन याला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची वेगाने कामे सुरू असताना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध असणाऱ्या “हाउसिंग स्टॉक’चा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या घरांचा केवळ साठा करून न ठेवता त्यांचा प्रभावी आणि सुनियोजित वापर करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवे धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या विशेष आढावा बैठकीत याचे निर्देश दिले.
नसरापूर येथे भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला असून हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी होत असताना फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या प्रकरणाचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडे सोपविला.
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आमदार रोहित पवार यांनी मात्र राजकारण घुसवले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी वेगळीच नावे सूचवून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाचर मारून ठेवली.
नसरापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. काहीजण या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नरसापूर येथील मुलीच्या हत्येनंतर भोर तालुक्यासह पुण्यात संतप्त पडसाद उमटले होते. शनिवारी संध्याकाळी नसरापूरमधील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूल गाठला होता. याठिकाणी तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले होते.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील फालता मतदारसंघातील मतदान रद्द केले आहे. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत.
प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या वाटा वेगळ्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडू यांनाही टोला हाणला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे ‘महालक्ष्मी सरस 2026’ चे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत ‘इस्लाम राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना टाळण्याच्या भूमिकेचेही स्वागत केले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App