देशातल्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांचे पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय पर्याय का नाही स्वीकारला??, असा सवाल विचारायची वेळ प्रादेशिक नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.
मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे
उद्धव ठाकरे यांच्या कुटीर खासदारांची भाजपच्या सत्तेमध्ये “सोय” लावली आणि त्यानंतरच संजय राऊत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टावर खापर फोडले.
महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.
कुंभमेळा हा केवळ पर्वणी आणि स्नानापुरता मर्यादित नसून, त्याला व्यापक धार्मिक व सामाजिक भावजागरणाचे अंग आहे. काळानुरूप परिवर्तन आणि सामाजिक एकत्वाची भावना या पर्वणीतून अधिक दृढ होते.
राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच पडीत सरकारी जमिनींचे संरक्षण आणि उत्पादनक्षम वापर हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून 30 जूनपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेल्या या आश्वासनाची शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. कर्जमाफीचे नेमके स्वरूप आणि निकष ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका विशेष अभ्यास समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफी जाहीर केली जाईल, अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सूचक विधान केले आहे.
नागपूरमध्ये भारतीय वायुसेना (IAF) च्या एका अधिकाऱ्याच्या 24 वर्षीय पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. मुख्य आरोपी अयाज ताज मदारे हा तिचा शाळेतील जुना वर्गमित्र आहे.
हो नाही करता करता अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेलेच. पण त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठहीच्या आठ खासदार सत्तेपासून वंचित राहून हात चोळत बसले.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची मोहीम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीपासूनच सुरू केली असून, आता त्याला केंद्र सरकारचे सुद्धा बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.
महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलून महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण आज जाहीर केले. त्यामध्ये दीर्घकालीन नियोजनावर भर ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेतले.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज १६ जूनला कोर्टात निकाल लागणार होता. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जयपूरमध्ये दोन तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली.
28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे.
केंद्र सरकारने देशात 100% शुद्ध इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, 13 जून रोजी नागपूर येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.
ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे आज भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत, “राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत,” असा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार सत्ताधारी महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. विशेषतः मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून ठाकरे गटातील काही खासदार फुटण्याच्या शक्यतेबाबत दावे केले जात होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत Uddhav Thackeray यांनी पक्षातील सर्व नऊ खासदारांना एकत्र आणत एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून टाकल्याचा गंभीर आरोप पटोले पटोले यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारातून भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा अक्षरशः गळा घोटला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेल्या तीन दिवसांपासून पंढरपुरात सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरकारने अधिवेशनापूर्वी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली.
जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या सोयीसाठी मुंबईतील विविध रस्त्यांवर मारण्यात आलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दादर पाठोपाठ आता गिरगाव आणि घाटकोपरमध्येही मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पट्ट्यांवर काळा रंग फासण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट शब्दांत भाष्य केले असून, “प्रत्येक गोष्टीला वादात ओढून राजकारण केल्याने कधीच मते मिळत नाहीत,” असा सणसणीत टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App