नरेंद्र मोदी हे पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झाले आहेत. त्यामुळे देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला मोदींनी सुरुवात केली आहे. एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. त्यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या समोर गहाण ठेवले आहे, असे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सोडले. चारित्र्य नसलेला पंतप्रधान संघाला कसा काय चालतो??, असा सवाल सुद्धा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मोदी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरले.
देशभरात गेल्या वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५,८२० शाखा वाढल्या; एकूण शाखांची संख्या ८८ हजार ९४९ वर पोहोचली आहे, अशी माहिती संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी जाहीर करण्यात आली.
एकीकडे गॅस टंचाईची होरपळ आणि दुसरीकडे राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता अशा कात्रीत सामान्य जनता अडकली आहे.
प्रभावी अस्त्रांचा निकामी वापर; “राहुल बुद्धीच्या” मागे विरोधकांची फरफट!!, हेच राजकीय चित्र राजधानी नवी दिल्लीतल्या संसद अधिवेशनादरम्यान दिसले.
फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई वाढून 3.21% वर पोहोचली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये ती 2.74% होती. आज 12 मार्च रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना महागाईत ही वाढ झाली आहे.
विलीनीकरणाचा विषय हवेत विरला; महाराष्ट्रातला उंट काँग्रेसच्या तंबूत शिरला, असंच म्हणायची वेळ गेल्या काही दिवसांमधल्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींमुळे आली.
इराण – इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामती विमानतळावर झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. “अजितदादांच्या अपघाताला महिना उलटूनही राज्य सरकारने सीबीआय चौकशीचा अधिकृत प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही,” असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचे रोहित पवार म्हणालेत. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेला संशयाचा धूर अद्याप शमलेला नाही. या प्रकरणातील ‘डीजीसीए’चा प्राथमिक अहवाल नाकारणारे जय पवार यांच्यावर ही सत्य परिस्थिती दडपण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? अशा चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर, “माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, पूर्ण माहितीनिशी पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार आहे,” असा मोठा खुलासा जय पवार यांनी आज केला.
“सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मदतीसाठी राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले. मात्र, सध्या जगभरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यावर तातडीने उपाय करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. बारामती विमानतळावर झालेला अपघात हा घातपात होता की अपघात? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत आहेत. तसेच त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची भेट देखील घेतली आहे. आता त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी दोन महामार्गांना अजितदादांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Aditi Tatkare महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची सुरुवात करण्यात आली व […]
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. मराठवाड्यासाठी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर मराठा समाजाला अपेक्षित प्रमाणपत्र मिळाले नाही, तर 2029 च्या निवडणुकीत संबंधित आमदारांना पराभवाचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटी रुपयांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युरोपमधल्या ऑस्ट्रिया आणि पूर्व आशियातल्या काही देशांना महाराष्ट्र आणि मागे टाकल्याचे आकडेवारीनिशी स्पष्ट केले
काशी येथील ऐतिहासिक मनिकर्णिका घाटाचे संवर्धनाचे काम सुरू असताना तेथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काही मुद्दे उपस्थित केले होते.
महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये शेती क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आज महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात बोलवून सन्मान केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत सुद्धा या महिलांनी आपला आत्मविश्वास न गमावता शेती क्षेत्रात बहुमूल्य योगदान केले. नवीन प्रयोग करून सगळ्या महाराष्ट्राला अनमोल प्रेरणा दिली, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
राज्यातील ‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
लोकसभेत, विरोधी पक्षाने सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला. ५० हून अधिक खासदारांनी बाजूने मतदान केले. त्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा केली. रोहित यांनी यावेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम व दिग्विजय सिंहांसारख्या इतरही काही काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी या दुर्घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या बदनामीविरोधात कायदेशीर तरतूद करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारला या प्रकरणी एखादा नवा कायदा किंवा आहे त्याच कायद्यात एखादी दुरुस्ती करण्याची गरज आहे काय? हे पडताळून तशी शिफारस सरकारला करेल, असे ते म्हणालेत. सरकारच्या या घोषणेमुळे सोशल मीडियातील बदनामीकारक मजकुराला लगाम घातला जाण्याची शक्यता आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली. विधानपरिषदेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या, लवकर जा, ही योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे सभागृहातील सर्वांचे लक्ष वेधले गेले. अजित पवार यांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्याचेही दिसून आले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात जगभरातल्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून भारतातल्या सर्वसामान्यांना त्याची झळ पोहोचू नये म्हणून केंद्रातील मोदी सरकारने ESMA कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज अॅक्ट लागू केला आहे. या कायद्याद्वारे देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडू दिला जात नाही. युद्धकाळात किंवा अन्य अकस्मिक परिस्थितींमध्ये हा कायदा लागू करण्यात येतो.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचा खोडा आहे तो निघता निघत नाही, हे लक्षात आल्यावर शरद पवारांच्या गटाने वेगळाच “डाव” टाकला. रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या भेटीगाठींमधून तो समोर आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App