शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुढील विधानसभेत भाजपकडून निवडणूक लढवतील असा दावा केला होता. त्यावर आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याणणू त्यांचे संपर्कातील आमदार सांभाळून ठेवावे. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे महाजन यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांनी खरातला 117 वेळेस कॉल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 वेळा कॉल केल्याचा दावा केला आहे. हे कॉल नेमके कशासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी विचारला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांना तातडीने अटक करून त्यांना हे कॉल डिटेल्स कोणी आणि कोणत्या अधिकारात दिले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.
राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी केली असून, याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह तिघांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केल्याच्या रागातून हा कट आखल्याचा गंभीर आरोप तायडे यांनी आपल्या तक्रारीत केला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुराव्यांमध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यात 177 वेळा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला 17 वेळा फोन केल्याचे दिसून येत आहे. हे फोन कॉल नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केला असून, त्यांच्या या आरोपांवर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाश्चिमात्य संकल्पनेतील पर्यटनापेक्षा भारतीय संस्कृतीत तीर्थाटनाला अधिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे केवळ दगडांच्या वास्तू नसून ते आपल्या संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले.
महा-साधना सप्ताह 2026 हा मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित देशातील सर्वात मोठ्या टेक-लर्निंग आठवड्यापैकी एक असून, शिक्षण, आत्मचिंतन व दैनंदिन शासकीय कामकाजात ज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर देतो.
महाराष्ट्र राज्य शासनाने आज प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय घेत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एकूण २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मुद्रांक, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक पीडित महिला आता धैर्याने पुढे येऊन त्याच्याविरुद्ध तक्रारी नोंदवत असून, यामध्ये केवळ लैंगिक शोषणाचेच नव्हे तर आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हेही समोर येत आहेत. खरात हा बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या काळ्या धंद्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचादेखील सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. पत्रकारांनी प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? असा थेट प्रश्न विचारताच, ते कधी येतात, कधी जातात हे तुम्हालाच माहिती असेल, असा टोला सुनेत्रा पवार यांनी लगावला. त्यांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका सुरू असताना अनेक पीडित महिला समोर येत असून केवळ शोषणच नव्हे तर फसवणूक आणि आर्थिक गैव्यवहाराबाबत देखील तक्रारी नोंदवत आहेत. या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. अशोक खरात सावकारकीचा व्यवसाय देखील करत असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये त्याची पत्नी कल्पना ही देखील सामील असल्याचे समोर आले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेची विशेष महासभा गुरुवारी रणधुमाळीत पार पडली. निवडणूक आयोगाच्या मतदारयादी पडताळणी आणि नकाशीकरण (SIR) प्रक्रियेसाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात दोन मुस्लिम पक्षांचे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समर्थनाचे पहिल्यांदाच स्वीट करून पार्थ पवारने रोहित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांना जोरदार धक्का दिला.
अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांचे मिळून साधारण 50 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील आणि दोन्ही पक्ष मोडून टाकतील
राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली. यापूर्वी 31 मार्चपर्यंत असलेली ही मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आवश्यक कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. विविध विभागांशी संबंधित सहा मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून, त्याचा थेट फायदा शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला होणार आहे. जलसंपदा, पर्यावरण, महसूल आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत बदल घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न या निर्णयांतून दिसून येतो.
राजकीय वर्तुळात सध्या एक महत्त्वाची घडामोड चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रात पक्षातील काही निवडक पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, बाकीच्या नेत्यांच्या पदांबाबत मात्र मौन पाळल्याचे दिसते.
जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गंभीर असल्याचे समोर आले आहे. जालन्यातली कडवंची शिवारात ही दुर्घटना घडली. या अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलनाची” घोषणा करण्यात आली.
संजय राऊतांनी सूचक ट्विट करून शरद पवार महाराष्ट्रात फिरणार असल्याची माहिती दिली. पण त्यामुळेच पवार महाराष्ट्रात फिरून करणार काय??, हा सवाल समोर आला.
महाराष्ट्रात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!, हेच राजकीय वास्तव महाराष्ट्रातून समोर आले.
भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात माहिती मला होते. त्याला माझा विरोध नव्हता, असा खळबळजनक खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलीनीकरणात खूप फरक आहे. विलीनीकरण करू पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा, असे शरद पवार गटातील कोणी म्हटले नाही, असेही त्यांनी म्हटले.
बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आता आपला मोर्चा त्याच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली खरातची पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी गेलेल्या नाशिक पोलिसांनी, ती मिळून न आल्याने अखेर खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खरात टोळीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App