मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत आणि अभिनंदन करून संवाद साधला.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरला आहे. त्यात चव्हाणांच्या दाव्याची री ओढत पाकने भारताला अर्ध्या तासातच पाणी पाजल्याचा दावा केला जात आहे. भाजपने पाक माध्यमांचा हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते बोलतात पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेसला पाकच्या मदतीची आशा, असे भाजपने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते.
सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच पाच वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला यावरूनच कळते कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्षनेता होणार म्हणून बसले होते. मात्र, बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून आता त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘ऋषभायन 2’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यानिमित्त भरवलेल्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची नावे ब्राह्मी लिपीत लिहून मांडली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘ॲन्युअल वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ पूजा पद्धती नसून एक जीवनदृष्टी, विचारपद्धती आणि व्यवस्थात्मक संस्कृती आहे, ज्यामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षे अखंड टिकून आहे. भारताचा सांस्कृतिक अभिमान हा दंतकथांवर नव्हे, तर ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहे. मात्र, या अभिमानाला आत्माभिमानाचे बळ देत आधुनिक काळात नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी नमूद केले.
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खोडा; मुंबईत 22 जागांचा वाटा मागून घालणार कोलदंडा!!, अशी राजकीय खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केल्याचे समोर आले.
मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाचा देखील फॉर्म्युला अमित साटम यांनी यावेळी सांगितला. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत सांगितले की, भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यात सरासरी 1.8 लाख लोकांचा जीव जातो. यापैकी 66% मृत्यू तरुणांचे (18 ते 34 वर्षे) होतात.
आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचा महापौर होईल, असेही ते म्हणाले. २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसचे फारसे अस्तित्व राहणार नाही, असे मत त्यांनी मांडले.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असून, यानंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते उरणार नाहीत, असे भाकीत दानवे यांनी वर्तवले. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारची पाठराखण करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे खाते बुधवारी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांनी हा राजीनामा पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलिस कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात कराडने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यामुळे तो पुढील काळासाठीही कोठडीतच राहणार आहे. या निकालामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, गावासह संपूर्ण परिसरात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. या संवेदनशील प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले होते आणि आजचा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा आली, पण पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात तीच नैतिकता त्यांनी खुंटीला टांगून ठेवली.नाशिक मधले मुख्यमंत्री कोट्यातून चार फ्लॅट लाटल्ययाप्रकरणी माणिकराव कोकाटेंना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना ५०००० दंड ठोठावला. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. पोलिसांनी त्या अटक वॉरंट वर कायदेशीर कार्यवाही सुरू केली. त्यामुळे भाजपने माणिकरावांवर दबाव वाढविला. या राजकीय दबावातून त्यांना राजीनामा देणे भाग पडले. तो राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला. तो राजीनामा अजितदादांनी स्वतःकडे ठेवून घेतला होता.
पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये घातला अडसर!!, अशी राजकीय परिस्थिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाजूला काढून ठेवल्यानंतर पवार काका – पुतण्यांचे पक्ष एक आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवतील, अशी शक्यता निर्माण झाली. कारण दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांवर तसा दबाव आणला आणि आघाडी करण्याचा आग्रह धरला. याला अपवाद फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ठरले. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यास नकार दिला. पण पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे बाकीचे नेते आघाडीसाठी अनुकूलच राहिले.
महापालिकेच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांची तयारी, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकेच नव्हे, तर यात भर म्हणून आता अजित पवारांच्याच पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकांची मते मिळवण्यासाठी “नैसर्गिक युती” आणि सत्ता भोगण्यासाठी “महायुती”!!, ही राजकीय दुटप्पी भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ना वाल्मीक कराडला जामीन मिळणार, ना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार, अशी टीका सोनवणे यांनी केली आहे
चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटेंना एक न्याय लावून त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्याच्या आधी त्यांची मंत्रिपदाची खाती काढून घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात सुनावणी केली. न्यायालयाने NHAI आणि MCD ला आदेश दिले की दिल्ली सीमेवरील 9 टोल प्लाझा काही काळासाठी बंद करावेत किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवावेत.
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला असून आता माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाशी संबंधित मुद्यांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. त्याचा मोठा लाभ सत्ताधाऱ्यांना मिळण्याचा दावा केला जात आहे.
राज्यात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास मिळणाऱ्या गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने, आता गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या नवीन वर्षात या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App