राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या ‘एमआयएम’ पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना करारा जवाब मिळेल,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे २०२९ च्या निवडणुकांपासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी प्रयत्न केंद्र सरकारने केला. मात्र, दुर्दैवाने राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या विधायक प्रयत्नात अडसर आल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती,” असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.
नाशिक मधले TCS कार्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच मराठी माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!, असलाच प्रकार गेल्या दोन दिवसांपासून समोर आला.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने यासाठी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवशी संध्याकाळी निकालही घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
नाशिक TCS मधले हे केवळ धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित डाव आहे,” असा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशाची सद्सद्वविवेकबुद्धी हादरल्याचा उल्लेखही या याचिकेत करण्यात आलाय. नाशिक TCS प्रकरणाने देशभर हलकल्लोळ माजवला आहे. हे सक्तीचे किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर ही केवळ धार्मिक बाब नसून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असे सांगणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाची मागणी केली आहे. “माजी खासदार आणि माजी आमदारांना दिली जाणारी पेन्शन योजना कायमची बंद करावी,” अशी मागणी करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे.
नाशिक येथे गाजत असलेल्या कथित “कॉर्पोरेट जिहाद” प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला आहे. टीसीएस कंपनीतील धर्मांतर, तरुणींचे शोषण आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी राष्ट्रीय तपास संस्था कडे दिली असून, त्यावरून प्राथमिक चौकशी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
देशभर चर्चेत राहिलेल्या नाशिक TCS कांडात आता आणखी एक बाजू समोर आलीय. या प्रकरणातला संशयित आरोपी शाहरुखची पत्नी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तिने सर्व आरोप फेटाळले. धर्मांतरासारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. सोबतच शाहरुख सहकाऱ्यांशी फक्त थट्टा-मस्करी करायचा. त्याला केलेली अटक, पुरावे या साऱ्यांवरच तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून, एचआर मॅनेजर निदा खान अद्यापही फरार असल्याचे समजते.
निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.
शरद पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी नाईलाजाने पाठिंबा देणारी काँग्रेस विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार का??, असा सवाल आज समोर आला.
परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली म्हणूनच तुमच्यावर ही ‘मरणअवकळा’ आली आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत दानवे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात भेटीबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले असून, हा सर्व प्रकार केवळ अज्ञानातून आणि दीपक केसरकर यांच्या आग्रहामुळे घडल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा त्यांना खरातच्या पार्श्वभूमीबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, असे विखे पाटलांनी सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनेक नेत्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणातील नवे कंगोरे समोर येण्याची शक्यता वाढली आहे.
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ‘वेषांतर’ करून कंपनीत प्रवेश मिळवला आणि पुराव्यांसह या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास केला जात असल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१५ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय नेते, पत्रकार आणि उद्योजकांचा समाचार घेतला.
नाशिक मध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गोदावरी आरती केली, तर त्या उपक्रमाला कम्युनिस्टांनी आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध करून पाहिला. शेवटी पोलीस बंदोबस्तात आंबेडकर जयंतीची गोदावरी महाआरती करावी लागली.
धर्मांतराच्या विरोधात नाशिकच्या गोदा तीरावर प्रचंड शंखनाद होणार असून येत्या 30 एप्रिल रोजी धर्म जागरणाची महा गोदावरी आरती आयोजित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण देशाचा राजकीय नकाशा बदलायची तयारी; पण ठाकरे + पवार खेळत बसलेत घरातल्या घरात “खेळी”!!,
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. आतापर्यंत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा होत असलेल्या या प्रकरणात आता थेट पोलिस प्रशासनालाही धक्का बसला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणावरून महाराष्ट्र सरकार आणि जस्टिस बदर समितीवर निशाणा साधला आहे. या समितीने तज्ज्ञ संस्था किंवा लोकांचा सहभाग न घेता केलेले वर्गीकरण अशास्त्रीय असल्याचे सांगत, हे विभाजन केवळ ‘कास्ट’ पद्धतीने न होता ‘इक्वल डिस्ट्रिब्यूशन’च्या तत्त्वावर व्हायला हवे होते
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App