मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून वाचवा, अशी विनवणी करत, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर लोटांगण घातल्याचा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. मोठा घातपात घडवून आणल्याचा कट असतानाही सरकार मुंडेंना ‘क्लीन चीट’ देणार असेल, तर हा अत्यंत वाईट प्रकार असून आपला या ‘नालायक’ सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात झालेल्या दिरंगाईवरही या अधिवेशनात गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता.
येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!, अशा पद्धतीचे दुहेरी राजकारण आज भाजपने खेळले
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी सांगितले की, “१९८९-९० मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला आणि हळूहळू मुंबई, पुणे आणि दिल्लीत पसरला. गेल्या ३० वर्षांपासून भारत दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे. आता, मजबूत आणि प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे.”
विरोधक हे सातत्याने आरोप करतात, पण कोर्ट जेव्हा त्यांना पुरावे मागते, तेव्हा ते देत नाहीत. निवडणूक आयोग देखील त्यांना पुरावे मागतो, पण एक पुराव देखील विरोधक देऊ शकत नाहीत. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, मात्र अजुनही ते सुधरले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची अशाच प्रकारची माती होणार असल्याचे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट भाजपचा हात धरला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. आता योगेश क्षीरसागर हे भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरून बीड नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.
मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तेजस्वी यादवांच्या प्रचार सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती, ती एआयची होती का? असा सवाल करत, बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे आहेत, असे म्हणत निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालाच्या ‘गणितावर’ प्रश्न उपस्थित केले.
बिहार निवडणुकीच्या निकालांवर देशभरात चर्चा सुरू असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीतीवर थेट बोट ठेवले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेसच्या सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजी नगरात जाऊन मराठवाड्यात निवडणूक पूर्व राजकीय पेरणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण व परिसरातील विकासकामांचे उदघाटन संपन्न झाले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घराणेशाहीतून तयार केलेले रेकॉर्ड बिहार विधानसभा निवडणुकीत तुटले.
वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला, भाजपने घेतला; पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेता नाही फिरकला!!, असे आज छत्रपती संभाजी नगर मध्ये घडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमसी स्वबळावर लढवण्याची भूमिका पोकळ असल्याचेही ते म्हणालेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि प्रचाराला वेग येत असतानाच, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र आले, तर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, असे खैरे म्हणालेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसला फटकारत, आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
शिल्पकलेतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नवी दिल्ली नजीक नोएडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.
बिहारमध्ये अब्रू पुरती गेली; त्यानंतर काका फुटण्याला सुचली पश्चात बुद्धी!!, असंच म्हणायची वेळ पवार काका – पुतण्यांच्या प्रतिक्रियांवरून आली.
बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे.
जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीने विक्रमी बहुमत मिळविले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे.
जसे तुम्ही पाहिले तसे आम्ही पाहिले आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App