सरकारने दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर सायबर क्राईम, परीक्षा पेपर लीक, चाइल्ड पोर्नोग्राफी, दहशतवादाशी संबंधित प्रचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात आहे.
Tutari उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर करावे लागले, पण तुतारीवाल्यांचे ऑपरेशन आम्ही करायची गरज नाही. तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करून घेतील, अशा शब्दांत घड्याळ पक्षाच्या नेत्याने राजकीय सत्य सांगून टाकले.
ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाची नजर ठाकरे गटाच्या आमदारांवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यालाच बळ देणारे वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. “ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारही शिंदे गटात येतील. एकनाथ शिंदे यांचे नियोजन नेहमीच अचूक असते,” असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करताना राऊत यांनी आता ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करण्याचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा लोकसभा खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत, “काल ठाकरे गटाच्या एका नेत्याने सहा खासदारांना जाहीरपणे शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट आज झाला आहे,” असा दावा केला. या खासदारांना आता त्या पक्षात राहायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, पुढे ते कोणती भूमिका घेतात यावर सर्व चित्र अवलंबून असेल, असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाची भूमिका घेतल्याचा दावा समोर आला आहे. शिवसेना स्थापना दिनाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीतील गुप्त बैठका, लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचे सांगितले जाणारे पत्र, जयपूरपर्यंत हलवण्यात आलेले खासदार आणि पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या कथित प्रयत्नांवरून आता शिवसेनेतील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे.
ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; नेमका राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा!!, यामुळे सगळ्या देशाचे राजकारण महाराष्ट्रात एकवटले.
नाशिक : शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कथित धोका; ६ बंडखोर खासदारांनी साधला मोका!!, हेच राजकीय वास्तव बंडखोर खासदारांच्या तथाकथित लेटर बॉम्ब मधून समोर आले. उद्धव […]
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेस ही प्रत्यक्षात भाजपचीच ‘ए टू झेड टीम’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, भाजपविरोधी राजकारणाचा दावा करणारी काँग्रेस प्रत्यक्षात भाजपशी तडजोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चांदरम्यान आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांसाठी शिंदे गटाला जबाबदार धरण्यापूर्वी ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही अप्रत्यक्ष टीका केली.
“ऑपरेशन टायगर” मध्ये म्हणे, शरद पवारांची एन्ट्री; प्रत्यक्षात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची साधणार “संधी”!!, हेच राजकीय वास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार कुठल्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिसून आले.
1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
देशाच्या नव्या म्हणजेच ‘जेन झी’ पिढीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचंड आशावादी आहे. आजचे तरुण आपल्या परंपरा आणि भारताच्या गौरवाशी मनापासून जोडले गेले असून समाजात रचनात्मक बदलांसाठी मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुणे येथे केले. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. त्याचवेळी श्री आंबेकर यांनी देशातल्या लोकसंख्या संतुलनाची गरज व्यक्त केली. “डेमोग्राफिक चेंज” मुळेच 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षासाठी हा मोठा धक्का असला तरी खचून न जाता नव्याने संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई अधिक तीव्र झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. “जर ऑपरेशन टायगर खरोखरच यशस्वी झाले असेल, तर संबंधित खासदारांचे चेहरे आणि पुरावे जनतेसमोर आणा,” असे सावंत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले कथित ‘ऑपरेशन टायगर’ अद्यापही गूढतेच्या पडद्याआड आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे फेटाळून लावत आपले सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकांची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून त्यानंतर अंतिम निकाल स्पष्ट होईल.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य बंडाची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना आता या संपूर्ण घडामोडीत नवे वळण आले आहे. ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला आहे की, कथित बंडखोरीशी संबंधित पत्रावर दोन खासदारांनी सहीच केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाचे कथित ‘ऑपरेशन टायगर’ अडचणीत येऊ शकते.
देशातल्या प्रादेशिक नेत्यांनी त्यांचे पक्ष फुटल्याने हतबल होणे पसंत केले; पण त्यांनी काँग्रेसचा पर्याय पर्याय का नाही स्वीकारला??, असा सवाल विचारायची वेळ प्रादेशिक नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली.
मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे
उद्धव ठाकरे यांच्या कुटीर खासदारांची भाजपच्या सत्तेमध्ये “सोय” लावली आणि त्यानंतरच संजय राऊत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टावर खापर फोडले.
महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.
कुंभमेळा हा केवळ पर्वणी आणि स्नानापुरता मर्यादित नसून, त्याला व्यापक धार्मिक व सामाजिक भावजागरणाचे अंग आहे. काळानुरूप परिवर्तन आणि सामाजिक एकत्वाची भावना या पर्वणीतून अधिक दृढ होते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App