आपला महाराष्ट्र

ममता बॅनर्जींची विरोधात बसल्यावर वजाबाकी; राष्ट्रवादीची सत्तेच्या खुर्चीवर बसूनही वजाबाकीच!!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सत्तेपासून दूर झाल्यानंतर विरोधात बसून वजाबाकी सुरू केली, पण सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असूनही पक्षातून वजाबाकी सुरू झाली. हे राजकीय वास्तव आज समोर आले.

संघ शताब्दीनिमित्त शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धा महोत्सव; दीड लाखांची बक्षिसे; १५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीने पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धेचे आणि महोत्सवाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : ‘काँग्रेसने तरी ओबीसींचे काय भले केले?’; वडेट्टीवारांवर जरांगेंचा पलटवार, धनंजय मुंडेंनाही दिला इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तरी ओबीसी समाजासाठी काय केले? झोके बांधून दिले होते का?” असा सवाल करत जरांगेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाने एकमेकांशी संघर्ष न करता सरकारविरोधात एकत्र लढले पाहिजे, असेही ते म्हणाले.

हे कसले सुरू झाले पार्थ पवार पर्व??; वजाबाकीतून पक्ष संघटनेची वाताहात झाली हेच खरे वर्म!!

राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून विक्रम काकडे यांना उमेदवारी काय जाहीर केली लगेच “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार नावाचे पर्व सुरू झाले

भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!

भाजपने राष्ट्रवादीत घुसविलेल्या विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना सुनेत्रा आणि पार्थ पवारांची दमछाक; पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेची वाताहात!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.

Manoj Jarange Patil

Wadettiwar : जरांगेंचे उपोषण संपल्यानंतर राजकारण तापले; ‘डबल ढोलकी सरकार’ म्हणत वडेट्टीवारांचा हल्लाबोल, हाकेंकडूनही तीव्र टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण अवघ्या १५ तासांत मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले असले,

भाजप – शिवसेनेचे मिळून १५ उमेदवार झटकन जाहीर; पण राष्ट्रवादीची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक!!

भाजप आणि शिवसेना यांनी मिळून एका झटक्यात 15 उमेदवार जाहीर करून टाकले, पण राष्ट्रवादी काँग्रेसची दोन उमेदवार जाहीर करताना दमछाक झाली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे राजकीय सत्य सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड झाले.

Vikas Lawande

Vikas Lawande : ‘सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?’; विकास लवांडेंचा गंभीर आरोप, कुटुंबालाही धोका असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाकडे वारंवार संरक्षणाची मागणी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने, “सरकार माझ्या हत्येची वाट पाहत आहे का?” असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला.

Dattatray Bharne

Dattatray Bharne : ‘कर्जमाफीची घोषणा लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे संकेत, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत मोठे संकेत दिले आहेत. “शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकार सकारात्मक असून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल,” असे त्यांनी अहिल्यानगर येथे बोलताना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.

CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis : मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

Mahayuti

Mahayuti : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादीला २ जागा

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ११ जागांवर उमेदवार देणार असून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

Garib Nagar

Garib Nagar : मुंबईत दहशतवादी कटाचा मोठा खुलासा; ‘गरीब नगर’चा बदला घेण्यासाठी हल्ल्याची तयारी

मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ‘गरीब नगर’ भागातील कारवाईचा बदला घेण्यासाठी काही संशयितांकडून दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू होती. या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Monsoon Update

Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम; जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता, पेरणीसाठी शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नजर सध्या मान्सूनकडे लागली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला कोकणात दणका द्यायच्या तयारीत; अनिकेत सुनील तटकरेंना निवडणूक अवघड!!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसला दणका द्यायच्या तयारीत असल्याची चिन्हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसली.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; 10 जून पर्यंत मान्सूनच्या पावसाच्या आगमनाची शक्यता धूसर; IMD चा इशारा

राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही.

Garib Nagar

गरीब नगर मधील कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान; दिल्लीत नऊ आरोपींच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासा!!

मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाच दिवसांत जवळपास 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या तपासात ही अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे.

Pune-Pimpri

Pune-Pimpri : पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर; एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे.

Bhiwandi

Bhiwandi : पुणे विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर धडक कारवाई; भिवंडीत १,४०० लिटर मिथेनॉल जप्त, तुकाराम मुंढेंची मोठी मोहीम

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तब्बल १,४०० लिटर मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे.

Navnath Ban

Navnath Ban : ‘पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी ४० आमदार का गेले ते पाहा’; नवनाथ बन यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना, “पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी तुमच्या पक्षातील ४० आमदार का बाहेर पडले, याचा विचार करा,” असा टोला लगावला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले.

Prajakt Tanpure

Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाने शरद पवार गटाला धक्का; सुप्रिया सुळे म्हणाल्या- शुभेच्छा, जयंत पाटील म्हणाले- धक्कादायक निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Laxman Hake

Laxman Hake : ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’; लक्ष्मण हाकेंचा इशारा, मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. जरांगे यांचे आंदोलन सुरू राहिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

Shahu Chhatrapati

Shahu Chhatrapati : मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका; शाहू महाराजांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार शाहू छत्रपती यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो.

Amol Khune

Amol Khune : मनोज जरांगेंच्या मालमत्तेची ‘ईडी’ चौकशी करा; माजी सहकारी अमोल खुने म्हणाले- सध्याचे आंदोलन 900 कोटींच्या टेंडरसाठी!

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्यांचे माजी सहकारी अमोल खुने यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे, गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेत अचानक वाढ कशी झाली, याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी खुने यांनी केली आहे.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : 15 तासांनंतर मनोज जरांगेंचे उपोषण मागे; सरकारकडून सर्व प्रमुख मागण्या मान्य, राधाकृष्ण विखे पाटलांची शिष्टाई यशस्वी

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी १५ तासांनंतर मागे घेतले. सरकारसोबत झालेल्या मध्यरात्रीच्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याने त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

Tukaram munde

राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई, तर ३३ जणांना बेड्या!!

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व, अशी धडक कारवाई सुरू आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात