महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील जलद वितरण कंपन्यांच्या साठवण केंद्रांवर मोठी कारवाई करत १४ अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्टशी संबंधित काही केंद्रांमध्ये अन्नसुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि तापमान नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उपहारगृहाच्या तपासणीत अन्न आणि औषध प्रशासनाला अस्वच्छता आढळून आल्यानंतर राज्य सरकारने उपहारगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा रंगली आहे. धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग’ असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांचा समावेश झाला आहे.
राज्यात सुरू असलेल्या ‘एसआयआर’ अभियानाच्या निमित्ताने भाजपने आता केवळ एक मोहीम राबविण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, राज्यातील आपली संघटनात्मक ताकद नव्याने तपासून, विस्तारून आणि अधिक मजबूत करण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे.
राज्यातील आदिवासी विभागाच्या अखत्यारित असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना २८ ऑगस्टपर्यंत कथित चूक दुरुस्त करण्याचा इशारा दिला आहे. रद्द करण्यात आलेली चार कुणबी जात प्रमाणपत्रे पुन्हा वैध करून द्यावीत, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवल्याच्या कथित प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठा दावा केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांच्या सरावासाठी पुणे महापालिकेची मैदाने आणि मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. मात्र, या जागांचा वापर करण्यासाठी रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे व शुल्क आकारावे
विशेष प्रतिनिधी नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब परिसरातील माता साहिब गुरुद्वाराजवळ […]
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर न देण्याबाबतची रिअल इस्टेट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून उद्योगविश्वात नाराजी वाढत आहे. वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वीज समस्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे चाकण एमआयडीसीतील तब्बल २० कंपन्यांनी खंडाळा एमआयडीसीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
विरोधक संविधानाचा वारंवार उल्लेख करत असले, तरी प्रत्यक्षात संसदेतील चर्चेला सामोरे जाण्यापासून ते पळ काढत आहेत. चर्चा झाली तर त्यांचे दुहेरी मापदंड देशासमोर उघड होतील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन संस्थांचा समावेश आहे.
गडचिरोलीच्या दौऱ्यावर निघालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांशी व्यवहार करण्याइतपत मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य करण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रं सुनेत्रा पवार यांच्या हातात आली असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
धाराशिवच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या बॅनरबाजीवरून पक्षांतर्गत नाराजी आणि कारवाईची चर्चा रंगली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या आलिशान डिफेंडर कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये किंमत असलेली पांढऱ्या रंगाची नवीकोरी डिफेंडर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
NEET protest case नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलने केली होती.
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईतील डोमिनोजला पिझ्झाच्या तीन आउटलेटचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App