आपला महाराष्ट्र

ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टवर एफडीएचा दणका; १४ परवाने निलंबित

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील जलद वितरण कंपन्यांच्या साठवण केंद्रांवर मोठी कारवाई करत १४ अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्टशी संबंधित काही केंद्रांमध्ये अन्नसुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि तापमान नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

एफडीएच्या कारवाईनंतर मंत्रालय उपहारगृह कात टाकणार; नूतनीकरणावर 3 कोटींचा खर्च

राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उपहारगृहाच्या तपासणीत अन्न आणि औषध प्रशासनाला अस्वच्छता आढळून आल्यानंतर राज्य सरकारने उपहारगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

साखरपट्ट्यात सोमेश्वरचा पुन्हा दबदबा; अनुदानासह ४ हजारांचा विक्रमी ऊसदर

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे.

‘कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग’; प्रताप सरनाईकांचा मोठा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा रंगली आहे. धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग’ असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पुणे पोलिस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना सेवा पदके

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांचा समावेश झाला आहे.

चार दिवस, चार शहरे; संघटनेच्या तळागाळापर्यंत भाजपचे फिल्डवर्क

राज्यात सुरू असलेल्या ‘एसआयआर’ अभियानाच्या निमित्ताने भाजपने आता केवळ एक मोहीम राबविण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, राज्यातील आपली संघटनात्मक ताकद नव्याने तपासून, विस्तारून आणि अधिक मजबूत करण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारीने खळबळ

राज्यातील आदिवासी विभागाच्या अखत्यारित असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

‘२८ ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर…’; जरांगेंचा बावनकुळेंना थेट इशारा!

मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना २८ ऑगस्टपर्यंत कथित चूक दुरुस्त करण्याचा इशारा दिला आहे. रद्द करण्यात आलेली चार कुणबी जात प्रमाणपत्रे पुन्हा वैध करून द्यावीत, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

आमदार कल्याणशेट्टींच्या हत्येसाठी चालकाला पैशांची ऑफर? मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात; तपासाला वेग

अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवल्याच्या कथित प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

नार्वेकरांचा निर्णय खरंच टिकणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान म्हणाले, “मला पूर्ण खात्री…”

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठा दावा केला आहे.

मैदान मिळणार, पण ‘ही’ अट पाळावी लागणार! ढोल-ताशा पथकांसाठी पुणे महापालिकेचा नवा मुद्दा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांच्या सरावासाठी पुणे महापालिकेची मैदाने आणि मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. मात्र, या जागांचा वापर करण्यासाठी रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे व शुल्क आकारावे

सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याने खळबळ; मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब परिसरातील माता साहिब गुरुद्वाराजवळ […]

काही दिवसांत पुन्हा भूकंपाचा धक्का! नाशिक हादरलं; तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ कारण

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईत घर घेणार असाल तर ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार? ताडदेवच्या जाहिरातीने उडवली खळबळ

मुंबईतील ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर न देण्याबाबतची रिअल इस्टेट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

चाकणच्या कोंडीचा उद्योगांवर ‘ब्रेक’; २० कंपन्या स्थलांतर करणार, पवारांनी सरकारला सुनावलं

चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून उद्योगविश्वात नाराजी वाढत आहे. वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वीज समस्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे चाकण एमआयडीसीतील तब्बल २० कंपन्यांनी खंडाळा एमआयडीसीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

संविधानाच्या गप्पा, पण चर्चेपासून पळ! फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

विरोधक संविधानाचा वारंवार उल्लेख करत असले, तरी प्रत्यक्षात संसदेतील चर्चेला सामोरे जाण्यापासून ते पळ काढत आहेत. चर्चा झाली तर त्यांचे दुहेरी मापदंड देशासमोर उघड होतील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली नेमकं काय सुरू होतं? FDAचा दणका; पुण्यातील ३ कंपन्यांचे परवाने रद्द

आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन संस्थांचा समावेश आहे.

उड्डाणाच्या काही क्षण आधीच घडला ‘खेळ’! उदय सामंत हेलिकॉप्टरमध्ये बसले अन् अचानक…

गडचिरोलीच्या दौऱ्यावर निघालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! १५ ऑगस्टनंतर ‘हा’ नियम मोडला तर परवाना होणार निलंबित?

महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांशी व्यवहार करण्याइतपत मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य करण्यात आले

मोठी बातमी! पार्थ पवारांचा ‘गेम’ सुरू? राष्ट्रवादीत बड्या नेत्यांना धक्का देणारी मोठी खेळी; मुंबई अध्यक्षपदासाठी ‘या’ नावाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रं सुनेत्रा पवार यांच्या हातात आली असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.

धाराशिव भाजपमध्ये पुन्हा खळबळ! ‘मल्हार पर्व’च्या पोस्टने वरिष्ठांची डोकेदुखी वाढली?

धाराशिवच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या बॅनरबाजीवरून पक्षांतर्गत नाराजी आणि कारवाईची चर्चा रंगली होती.

2 कोटींची डिफेंडर मनोज जरांगेंच्या ताफ्यात कशी आली? मालकाने सांगितलं खरं कारण; म्हणाले, ‘देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती…’

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या आलिशान डिफेंडर कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये किंमत असलेली पांढऱ्या रंगाची नवीकोरी डिफेंडर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

NEET protest case नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा? सरकारचा आदेश आला; पण पुढे काय होणार?

NEET protest case नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलने केली होती.

flag hoisting

राज्यात १५ ऑगस्ट रोजी ९.०५ वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ, पुणे येथे राज्यपाल तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार,  १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

एफडीएचा डोमिनोजला पिझ्झाला दणका; मुंबईतील तीन आउटलेटचे परवाने निलंबित

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईतील डोमिनोजला पिझ्झाच्या तीन आउटलेटचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात