सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शेतकरी कृती समितीनेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदत्वाबाबत साखर आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केवळ संबंधित कारखान्याला ऊस पुरवठा करतात म्हणून सभासद करून घेता येणार नाही, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या शंकेवर मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत आपल्या मनात आता कोणतीही शंका नसल्याचे सांगत, उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती असल्यास त्यांनी ती स्पष्ट करावी, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
नागपूर शहरातील अमृत २.० योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती देतानाच रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरणाच्या निकृष्ट कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अमृत २.० अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
भारताचे लोहपुरुष आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रन फॉर युनिटी मॅरेथॉन’च्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी कथित पूर्वनियोजित कटाचे अनेक तपशील उघड केल्याचा दावा केला आहे.
शहरातील बहुप्रतीक्षित इंदोरा चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. सुमारे 8.9 किलोमीटर लांबीचा हा नागपूरमधील सर्वात लांब उड्डाणपूल असून, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा मोठी घडामोड समोर आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल 500 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदामाची व्यवस्था करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्याचे वृत्त समोर आले असून, त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून हटविण्यात आल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी जळगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाच्या हंगामात जागतिक बाजारातून आशादायक संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या उत्पादनाच्या तुलनेत मागणी अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त […]
एकीकडे कापसाच्या जागतिक मागणीमुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसत असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे.
मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे.
देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये १८ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर त्यांचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी टीका केली आहे.
मुंबईची शान आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’ चरणी यंदाही भाविकांनी भरभरून दान अर्पण करण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवानिमित्त आपल्या दरे या गावी आले आहेत. जागतिक बांबू लागवड दिनानिमित्त त्यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली.
दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील काही भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, सप्टेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाड्यासह विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील सेवापूर्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपुरात ‘एक दिवा आशीर्वादाचा’ उपक्रम आयोजित करण्यात आला.
राज्यातील वाढती वाहनसंख्या, रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात वन नेशन वन ई-चलान प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, अभिनेते टॉम हॉलंड आणि मॅट डेमन यांनी भेट दिलेल्या कुलाब्यातील १०८ वर्षे जुन्या ऑलिम्पिया कॉफी हाऊसवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे
दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे वडील सतीश सालियन यांनी उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली आहे.
मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, आता दुष्काळाशी लढा सुरू आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असला, तरी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App