राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओक येथे तब्बल तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) फेरपरीक्षेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. २८ जून रोजी झालेली टीईटी परीक्षा भिवंडी येथे पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती.
त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, शनिवार आणि सोमवार या गर्दीच्या दिवशी VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पैसे घेऊन मागच्या दाराने दर्शन देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे भेट घेतली होती. या भेटीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे त्यावेळी सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.
नवी मुंबईतील कथित ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. या प्रकरणात बिवलकर कुटुंबातील गंगाधर बिवलकर आणि यशवंत बिवलकर यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दिकी यांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी, त्यांना पाठवलेल्या एका ऑडिओ संदेशातील आवाज फरार गुंड झीशान अख्तरचा असल्याचे ओळखले आहे.
ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. कथित TDR प्रकरणावरून वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, गणेश नाईक यांनी ठाण्यातील विकासकामांवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना युवा नेते युगेंद्र पवार यांनी सूचक उत्तर देत विराम देण्याचा प्रयत्न केला. “आमचा पक्ष भाजपसोबत जाणार का, हे आता पवार साहेबांनाच विचारले पाहिजे.
ओला, उबेर आणि रॅपिडोसह ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांवर आता परिवहन विभागाची अधिक कडक नजर राहणार आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक उत्पादने तसेच अस्वच्छता आढळणाऱ्या हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांवर सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या नूतनीकरण आणि क्षमता वाढीच्या निविदांमधील कथित गैरव्यवहारप्रकरणी दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना अटक केली आहे.
राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गर्दीमुळे रेल्वे प्रवासाच्या यातना सहन करणाऱ्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा मिरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा आता सुखद आणि गारेगार होणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.
राज्यातील विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली.
पुढच्या वर्षी निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे माजी मंत्री विनाेद तावडे यांच्यावर माेठी जबाबदारी साेपवली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
बारामती विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 16 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केज तालुक्यात २० जून रोजी झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आपल्या मुलाचे नाव जोडले जात असल्याच्या आरोपांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सवाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा
पुनर्तपासणीत ९८ टक्के अन्न सुरक्षा नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही परवाना निलंबित ठेवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) चांगलाच दणका दिला आहे.
विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १८ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन करार, सातवा वेतन आयोग, महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी यांसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
गणेशोत्सव तोंडावर आला असताना पुणे शहरातील रस्ते, वाहतूक आणि नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य शासनाने नाशिकच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केली
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App