वाढती पूरस्थिती, रस्त्यांवर साचणारे पाणी आणि उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई अशा परस्पर विरोधी गोष्टींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र विशेष पथकाला मंजुरी देण्यात आली आहे.
एकीकडे राष्ट्रवादी सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे तर त्याचवेळी शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई टेक वीक 2026’ चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राज् एआय व्हिजन’ या विषयावर संवाद साधला.
विधान परिषदेवर एकाही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीने आपासांत जागावाटप करून घेतले. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ, राष्ट्रवादी (शप)ला तीन, तर ठाकरे सेनेला चार जागा वाट्याला आल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याभोवती सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर अखेर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या दिल्ली भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. ही नियमित आणि अधिकृत भेट आहे,” असे सांगत शिंदेंनी विविध तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे नेते Manoj Jarange Patil यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही,” असा इशारा दिला आहे. त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केल्याने महायुती सरकारची चिंता वाढली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून चंद्रपूर, वर्धा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दे
“रामायण हे केवळ प्रभू श्रीरामचंद्रांचे एकट्याचे चरित्र नसून राम – जानकीचे संयुक्त चरित्र आहे. सीतेच्या उल्लेखाशिवाय रामाचे चरित्र कधीही पूर्ण होऊ शकत नाही.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्रातील कांदा दर घसरणीमुळे शेतकरी आक्रमक झाले असताना राज्य सरकारने आता थेट दिल्ली दरबारात धाव घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महायुती नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी हटवणे, खरेदीदर वाढवणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा करणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार पलटवार करत, “मोदी आणि फडणवीसांवर खालच्या पातळीवर टीका करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही,” असा इशारा दिला.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखाते सोपवले जाणार असल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. अर्थ विभाग सध्या स्वतःकडेच राहणार असून त्याबाबत कोणताही बदल प्रस्तावित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशन आणि देशात जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स येथेमहत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तोंड कडूच राहिल्याचे 26 फेब्रुवारीच्या पक्षाच्या बैठकीतून समोर आले.
नाशिकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील महायुती सरकार विकासकामांवर लक्ष केंद्रित करत असताना काँग्रेसकडे जनतेसमोर मांडण्यासारखे कोणतेही सकारात्मक मुद्दे उरले नसल्याने विरोधक केवळ टीकाटिप्पणी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ‘दिलासा’ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 2 लाखांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये सध्या 12-5-2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी तिन्ही पक्षांचे प्रमुख लवकरच एकत्र बैठक घेऊन जागावाटपावर शिक्कामोर्तब करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले जात नसल्याची उघड खंत व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती’ ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली.
बारक्या पक्षांना गिळून एकनाथ शिंदेंची दमदार वाटचाल; पवार संस्कारितांचा सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे धडपडाट!!, हेच राजकीय चित्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात समोर आले.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मदत वाढ देण्याच्या निर्णयासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले.
टीव्ही मालिका ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी यूट्यूबर ध्रुव राठीच्या एका पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ध्रुव राठीने 19 मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथेही जातील, तिथे त्यांना प्रत्येक ठिकाणी शरमिंदा केले पाहिजे.
राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या उपक्रमात रिक्षा-टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलची नाशिक पोलिसांनी १० तास कसून चौकशी केली. या प्रकरणात दिलेल्या नोटिसीनुसार मतीन पटेल सोमवारी नाशिक पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर झाला.
स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत खरातकडून तब्बल १३.९२ कोटी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि लक्झरी मर्सिडीज अमेरिकन डॉलर असा कोटयावधीचे घबाड जप्त केले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App