राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्यातील जनतेसाठी, विशेषतः बळीराजा आणि क्रीडा क्षेत्रासाठी काही मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी करून संभाव्य आंदोलनाची पूर्वतयारी सुरू केली
अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले.
राज्यात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी, पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून याचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन-४ युवा अभियानाचा’ आज रेशीमबाग मैदानावर फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटातून नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आता एका आलिशान ‘डिफेंडर’ गाडीमुळे चर्चेत आले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना व्हायरस म्हणणं ज्येष्ठ वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना चांगलेच भोवले आहे. बीडमध्ये शनिवारी झालेल्या एका मोर्चामध्ये जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सुट्टे किंवा पॅकेजिंगविना खाद्यतेल विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या कडक कारवाईमुळे व्यापारी आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. खाद्यतेल व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम देत या मुदतीत तोडगा न निघाल्यास राज्यव्यापी आंदोलन आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतील मोकळी मैदाने आणि खेळाची मैदाने वाचवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर ‘मुंबई मैदान बचाओ तिरंगा आंदोलन’ केले.
Sugar Price Surge Raises साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, या दरवाढीचा फायदा साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकऱ्यांना होऊ शकतो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात Gen Z अर्थात तरुण पिढीसोबत संवाद साधला. यावेळी तरुणांनी फडणवीस यांना त्यांच्या राजकीय प्रवासासह यशानंतर येणारा दबाव कसा हाताळतात, याबाबत प्रश्न विचारला.
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
Tukaram Mundhe heads towards ‘Mahaprasad’ अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादाकडे वळले आहेत.
वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसर हादरला आहे.
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची आज आगमन मिरवणूक होती. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत काही वेळापूर्वी अपघात घडलेला आहे.
महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली आहे. आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध लढण्यासाठी आहे असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोरगाव येथे आयोजित रामरक्षा कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान एका महिलेने गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे
महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमधील समन्वय वाढवण्यासाठी महायुतीने विशेष रणनीती आखल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी बंडू फाटक यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे.
राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने उघडीप दिली असून, ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील मानहानीचे प्रकरण सामोपचाराने मिटवण्याची तयारी दर्शवली आहे.
बंडखोर आणि खासदारांमुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीच धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या काही तास आधी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संबंधित वादाला शुक्रवारी रात्री राजकीय वळण मिळाले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App