राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त आहेत.
गावागावातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशव्यापी मोहीम जाहीर केली आहे. येत्या 15 ऑगस्टला केवळ स्वातंत्र्यदिन साजरा न करता सरकारी शाळांच्या सुधारणेला सुरुवात करावी, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.
शिवसेना कोणाची आणि पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावरून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या कायदेशीर लढाईवर आज, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवाप्रमुख तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या भारताची प्रगती आता कोणीही थांबवू शकत नाही. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळी येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीत व्यक्त केला.
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिल्डरांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेल्याचा आरोप नाईक यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर २९ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज सध्या आक्रमक भूमिकेत असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या विमानप्रवासावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी जयंत पाटील यांच्यावर मिश्कील टोला लगावला आहे. या विमानप्रवासानंतर पाटील यांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे यांच्यात झालेल्या कथित शाब्दिक वादाचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. दुपारी २ वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत किंवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.
राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बहुप्रतीक्षित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मूळ आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकणमार्गेच ठेवावा, या मागणीसाठी रविवारी आंदोलनाचा भडका उडाला. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा परिसरात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच समृद्धी महामार्गाजवळ ‘रास्ता रोको’ करण्यात आला.
राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष पुन्हा तीव्र होत असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात थेट मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या कडक आणि परखड कार्यशैलीसाठी ओळखले जातात.
शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांची आधारवाडी कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसणार आहे. राज्यात ११ ऑगस्टपासून गाय आणि म्हशीच्या दूधाच्या विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सध्या सर्वच भागांत मुसळधार पावसाची स्थिती नसली तरी पुढील काही दिवसांत पावसाचा जोर (Rain In Maharashtra) पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जाती-जमाती तसंच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यास कायदेशीर मान्यता असल्यानं, त्याच धर्तीवर इतर मागासवर्गीय प्रवर्गात मराठा समाजाचाही उपवर्ग म्हणून विचार केला जाऊ शकतो
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे दौऱ्यानंतर आता अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जहाल साहित्याविरोधात महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. बॉम्ब तयार करण्याची माहिती देणारी पुस्तके, दहशतवादी संघटनांचा प्रचार करणारी मासिके, ऑनलाइन माध्यमातून प्रसारित होणारे डिजिटल साहित्य आणि इतर आक्षेपार्ह सामग्रीवर राज्य सरकारने बंदी घातली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आषाढी एकादशीला घोषित करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज जवळपास 5 हजार 29 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयआयटी मुंबई कॅम्पसमधील दोन कॅन्टीनना नोटीस बजावली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App