काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना भाजप सोडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात एका आरोपीची भररस्त्यात धिंड काढून त्याला कथितरीत्या अमानुष वागणूक दिल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींवर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात ३० जुलैपासून लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून अभ्यास, संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि माणुसकी यांचा दुर्मीळ संगम आहे.
विद्यार्थी आंदोलनांवरील गुन्हे, आदित्य ठाकरे, SOP, महाराष्ट्र सरकार आणि DGP हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात झालेल्या विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनांशी संबंधित गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला
कॉकरोच जनता पार्टी (CJP), विदेशी निधी, ईडी चौकशी आणि गृह विभागाची तपासणी हे मुद्दे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत.
पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या वादानंतर आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत.
दिल्ली पोलिसांचे उपायुक्त (DCP) सुमित झा यांच्या नावाने AI-निर्मित बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील चित्रपट, मालिका व वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत तसेच त्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत भेट घेतली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य, सांस्कृतिक राष्ट्रवाद, पत्रकारिता आणि शिक्षणाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आणि लेखणी आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
प्रशासनात नियमाने काम करणारे अनेक चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचाही हाच प्रयत्न आहे
‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गैरव्यवहार होऊन गुण कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा दावा अखेर उच्च न्यायालयात फेटाळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावल्या आहेत. याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले काही पुरावे चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने बनवलेले बनावट दस्तावेज असल्याचे तपासात समोर आल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’तून राज्यातील ९४,०८३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कारण सहकार विभागाने ३१ लाख ६४ हजार २८ शेतकऱ्यांची डेटा पडताळणी केली. त्यात हे शेतकरी आयकरदाते असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपात्रतेमुळे राज्य सरकारचे १,८८१ कोटी ६६ लाख रुपये वाचले आहेत.
नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र कायम असून गुरुवारी (३० जुलै) दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का पहाटे २.३७ वाजून ४१ सेकंदांनी ३.८ रिश्टर तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का सायंकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी जाणवला. याची तीव्रता ३.१ रिश्चर स्केल होती. जिल्ह्यात गत ६ दिवसात एकुण १० वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले आहेत.
महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि खर्चाच्या बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयांत तसेच शासकीय निवासस्थानी राज्य सरकारकडून पुरवली जाणारी छापील वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. यापुढे मंत्र्यांना वृत्तपत्रांचे ऑनलाइन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
हायकोर्टाच्या दणक्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी या न्यायालयाच्या आवारातील बॉम्बे बार असोसिएशनच्या (बीबीए) वकिलांच्या कॅन्टीनच्या पाहणीसाठी पोहोचले होते. पाहणीपूर्वीच कॅन्टीनने आपली सेवा तात्पुरती बंद केली होती. हा निर्णय आम्ही स्वयंस्फूर्तीने घेतल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या RE – NEET परीक्षेचा निकाल पारदर्शक लागल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला. निकालात त्रुटी असल्याचा दावा करत दिशाभूल करू पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चपराक हाणली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केलेला निकाल पूर्णपणे पारदर्शक व अचूक असल्याचे स्पष्ट करत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘ड्रग फ्री मुंबई’ या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या
कॉकरोच जनता पार्टीचा म्होरक्या अभिजीत दिपके आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या स्पर्धेत उतरला. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App