उद्धव ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर आणि शरद पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ दाखवायची भाजपची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये बोलून दाखवली.
सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज सुप्रिया सुळे दुसरे करणार तरी काय??, असा सवाल त्यांच्याच एका वक्तव्यामुळे समोर आलाय.
– महिला वारकऱ्यांसाठी खासगी स्वच्छतागृहे खुली करण्याचे आवाहन; शाळा, महाविद्यालयांनाही सहभागाची विनंती
केरळमधील वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची माहिती आहे. ही दुर्घटना कल्लाडी येथील मीनाक्षी पुलाजवळ घडली.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडणार असून हा पक्ष ‘एनडीए’त (NDA) सामील होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगत पडदा टाकला आहे. “शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही केवळ एक पेरलेली बातमी असून यात कोणतेही तथ्य नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाची ही विश्रांती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता असून, या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या धोक्यात आणखी भर पडली आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील करून घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले.
मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवले असताना ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली.
राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले.
मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या संततधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत असून, याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. या संततधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन तर विस्कळीत झालेच आहे, पण त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांत काही गंभीर दुर्घटनाही घडल्या आहेत.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा येथील भोर घाट सेक्शनमध्ये दोन ठिकाणी भूस्खलन झाले. तिन्ही रेल्वे लाईन प्रभावित झाल्या. 20 रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.
सध्या मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने घटनेपूर्वी इंटरनेटवर इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती.
आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोर धरला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, झेनिथ धबधब्याची पाणी पातळी अचानक वाढल्याने १०० पर्यटक अडकले.
राज्यभर मान्सूनने अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे आणि तलाव तुडुंब भरून वाहत असून धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राज्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 26.42 टक्क्यांवर पोहोचला असून आगामी काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला.
राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. यासोबतच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनीही थेट शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. शिवसेना शिंदे गटात दाखल होताच सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले.
महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App