आपला महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यासाठी सगळी तडफड!!

राष्ट्रवादी काँग्रेस वर पूर्ण नियंत्रण मिळवायसाठी पवार कुटुंबीयांची धडपड; ज्येष्ठ नेते बाजूलाच होत नाहीत म्हणून सगळी तडफड!!, हेच राजकीय वास्तव सुनेत्रा पवारांच्या आणि रोहित पवारांच्या राजकीय हालचालींमधून आणि वक्तव्यांमधून समोर आली.

TCS corporate Jihad

TCS corporate Jihad : जिहाद्यांकडून बुलडोझर कारवाईचे फुले उधळून स्वागत; इथून पुढे बुलडोझरच्या पलीकडची कारवाई आवश्यक!!

CS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिका प्रशासनाने आज पहाटे बुलडोझर चालवून ते घर उद्ध्वस्त केले.

TCS corporate Jihad : निदा खानचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; पण पटेलला आलिशान घर बांधून द्यायची इम्तियाज जलीलची भाषा!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिका प्रशासनाने आज पहाटे […]

Sangli temple

Sangli temple : सांगलीच्या जतमध्ये मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू; मरगुबाई देवीच्या यात्रेत भीषण दुर्घटना, वादळी वारा आणि पावसामुळे पडली भिंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा हाहाकार माजवला असून, येथील एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत अन्य काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Heatwave Alert

Maharashtra Heatwave Alert : महाराष्ट्रात उष्णतेची लाट: राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ होणार असल्याने पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत कडक उन्हाचे असणार आहेत.

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांची सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी; मोदींना म्हणाले- राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय – प्रक्रिया राबवा

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलिसांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. यापैकी एक निर्णय पोलिसांना घरे देण्याचा होता.

पवार कुटुंबाच्या राजकीय गेमा; सुनेत्रा पवारांचे पटेल + तटकरेंच्या बरोबर कार्यक्रम, पण क्लेरिकल मिस्टेक मधून दोघांना वगळले राष्ट्रवादीच्या कार्यकारणीतून!!

सुनेत्रा पवारांचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबरोबर कार्यक्रम, पण क्लेरिकल मिस्टेक मधून दोघांना वगळले राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून!!, असल्या पवार कुटुंबाच्या राजकीय गेमा आज समोर आल्या.

Nashik TCS

Nashik TCS : नाशिक TCS प्रकरण; महिलांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ, राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

नाशिक येथील TCS बीपीओ युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने सखोल चौकशीअंती 50 पानांहून अधिकचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे.

Nida Khan Case

Nida Khan Case : निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक; संजय शिरसाटांचा थेट आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार माजी खासदार इम्तियाज जलील असल्याचा थेट दावा त्यांनी केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis : राहुल गांधी देशाच्या राजकारणातील रिजेक्टेड माल; CM देवेंद्र फडणवीस म्हणाले – आम्ही त्यांना महत्त्व देत नाही

महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर’ इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, त्याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज ‘सीआयआय’च्या (CII) वार्षिक बैठकीतनंत माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्योगांसाठी आणि घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात मोठी कपात होणार असल्याची माहिती दिली. तसेच, इंधन बचतीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचा ‘रिजेक्टेड माल’ असा उल्लेख करत, आम्ही त्यांना महत्त्व देत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ऐक्याची अनुभूती कार्यकर्ता विकास वर्गातून मिळते; नागपूरात द्वितीय शिक्षा वर्गाला प्रारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सुरू झाला.

Nitesh Rane

Nitesh Rane : संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही; संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

Sambhajinagar

Sambhajinagar : संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM आहे का? उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सवाल; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

: संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Anjali Damania

Anjali Damania : भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा दावा

भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

Rupali Chakankar

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते.

Nitin Gadkari

Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव; पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक

देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे.

WCD Department

WCD Department : बदली प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होणार; महिला व बाल विकास विभागाच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने; कर्मचाऱ्यांत आनंद

महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे.

CM Fadnavis

CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे; पीएम मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग स्वीकारण्यास सांगितले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे. पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय ‘ते’ पाळावे,” असे आवाहन केले आहे.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना युद्धपातळीवर गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद आणि जलसंधारण विभागाची आढावा बैठक पार पडली

Sharad Pawar

अघोषित रिटायरमेंट : INDI आघाडी फुटल्यानंतरही शरद पवार “शांत”; संस्थात्मक कारभारात भाग घेऊन राजकारणापासून अलिप्त!!

पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.

Sohrabuddin Case

Sohrabuddin Case : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण- सर्व 22 आरोपी निर्दोष; बॉम्बे HC म्हणाले- ठोस पुरावे नाही, संशयावरून शिक्षा देऊ शकत नाही

बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी २००५ च्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्व २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणात सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांचीही हत्या झाली होती.

वारकऱ्यांना घुसखोर म्हणणाऱ्या विकास लवांडेंच्या अटकेसाठी वाघोली पोलिसांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा

वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदू साधूसंतांचा अपमान करणाऱ्या विकास लवांडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

TCS corporate Jihad

TCS corporate Jihad : निदा खानला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!

नाशिक मधून समोर आलेल्या TCS corporate Jihad ची मास्टर माईंड निदा खान हिला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.

Jihad Fallout

Jihad Fallout : कॉर्पोरेट जिहाद उघड झाल्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर; पॉश कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखत त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘पॉश’ (प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्सुअल हरॅशमेंट) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ज्या शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे ‘अंतर्गत तक्रार समिती’ (आयसीसी) स्थापन करणे आता बंधनकारक असेल.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात