आपला महाराष्ट्र

Lohagad Murder Case

Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने घटनेपूर्वी इंटरनेटवर इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती.

Ashadhi Wari 2026

Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती

आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

Raigad Waterfall Rescue

Raigad Waterfall Rescue : रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू

देशभरातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोर धरला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, झेनिथ धबधब्याची पाणी पातळी अचानक वाढल्याने १०० पर्यटक अडकले.

Maharashtra Rain Fur

Maharashtra Rain Fury : राज्यात पावसाचा धुमाकूळ; धरणसाठा 26 टक्क्यांवर, मुंबईत ढगफुटीसदृश परिस्थिती, अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर

राज्यभर मान्सूनने अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे आणि तलाव तुडुंब भरून वाहत असून धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राज्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 26.42 टक्क्यांवर पोहोचला असून आगामी काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Nashik Corporate

Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला.

Dattatray Bharne

Dattatray Bharne : पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; २० पैकी किती राहणार हजर आणि किती राहणार गैरहजर??; आकड्याकडे लक्ष!!

ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. यासोबतच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनीही थेट शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. शिवसेना शिंदे गटात दाखल होताच सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले.

Maharashtra Weather

Maharashtra Weather : आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस; बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

Shrikant Shinde

Shrikant Shinde : पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण; मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असताना, निष्ठावंतांना प्राधान्य देत ओमराजेंना ‘वेटिंग’वर ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी डॉ. श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आघाडीवर आहेत.

Raj Thackeray

Raj Thackeray : आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, अमित साटम यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय. विधानसभेत आवाज उठवून आम्ही 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवले असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

Mumbai

मुंबई कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन नंबर जारी!!

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सरकारने हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत.

पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्दच्या शेतात फुलला ‘तुर्किस्तान बाजरा’चा ऐतिहासिक वारसा

पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्द येथील प्रगतशील शेतकरी संजीव गणपतराव इंदोरे यांनी आपल्या शेतात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या तुर्किस्तान बाजरा या वाणाची यशस्वी लागवड करून कृषी क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Ketan Agarwal Case

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नार्कोटेस्टबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली.

Bandu Jadhav on Uddhav Thackeray

Bandu Jadhav on Uddhav Thackeray: ‘उद्धवसाहेब, तुम्ही नाही तर आदित्य ठाकरेंना तरी महाराष्ट्रभर फिरवा असं सांगितलं होतं’; बंडू जाधवांचा मोठा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांकडून आता एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पक्षांतरानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या सविस्तर भूमिका मांडत, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, 2022 नंतर पक्ष संघटना कमकुवत होत गेली, कार्यकर्त्यांशी संवाद तुटला आणि स्थानिक पातळीवरील अडचणी वाढत गेल्यामुळे अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

Maharashtra Assembly

Maharashtra Assembly : स्मार्ट मीटरवरून विधानसभेत जोरदार गदारोळ; सरकार म्हणाले ‘बंधनकारक’, नाना पटोलेंचा हल्लाबोल, नितेश राणेंचाही इशारा

राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयावरून विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी “स्मार्ट मीटर बंधनकारक असून प्रीपेड मीटर ऐच्छिक आहे,” असे स्पष्टीकरण देताच विरोधी बाकांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ही जनतेची लूट करणारे खोटे बोलणारे सरकार आहे,”

Narhari Zirwal

Narhari Zirwal : ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत मोठी चर्चा:शाळांपासून 500 मीटर परिसरात विक्रीवर बंदीचे आदेश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात एंट्री

राज्यातील शाळकरी मुलांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर अखेर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. या चर्चेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनात उपस्थित असल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : महाआरतीसाठी काँग्रेसची ‘NOC’ घेतली का? उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदे गटाचा जोरदार पलटवार

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘रामरक्षा आंदोलन’ आणि रविवारी ‘महाआरती’ करण्याची घोषणा केली आहे. “आता हिंदू सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या घोषणेवर आता शिवसेना शिंदे गटाने अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला असून, उदय सामंत, शंभुराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर चौफेर टीका केली आहे.

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : आता दूध व्यवसायावर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; भेसळ आढळल्यास थेट परवाना रद्द, राज्यभर कडक नियम लागू

राज्यातील अन्न सुरक्षा अधिक कठोर करण्याच्या दिशेने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि पनीर उत्पादकांवरील धडक कारवाईनंतर आता त्यांनी राज्यातील दुग्ध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. दुधामधील भेसळ, निकृष्ट दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ‘फार्म टू प्लेट’ संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.

Maharashtra monsoon

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 3 ते 7 जुलैदरम्यान अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः 3 ते 7 जुलै या कालावधीत कोकण, घाटमाथा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!

राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!, असला प्रकार आज समोर आला.

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- फाळणीनंतर भारतात आलेले लोक शरणार्थी नाहीत:त्यांनी संपत्ती नाही, देश निवडला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांना ‘शरणार्थी’ म्हणणे योग्य नाही. ते ‘संघर्षाचे योद्धे’ होते, ज्यांनी अनेक पिढ्यांनी कमावलेली जमीन, व्यवसाय आणि मालमत्ता सोडून भारताची निवड केली.

महाराष्ट्रात ब्लॉकचेन – एआयच्या मदतीने जात पडताळणी; आदिवासी विकासाला नवी गती!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची 52 वी बैठक झाली.

Washim Court

Washim Court : वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

MLA Sajid Pathan

MLA Sajid Pathan : काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; फोन रेकॉर्डिंग व्हायरल, विधानसभेत गदारोळ

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Bombay High Court

Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का? लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे; पोलिस PM-CM यांचे नोकर नाहीत

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे किंवा सरकारविरोधात घोषणा दिल्या आहेत. ते म्हणाले- विरोध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? अशा घोषणांसाठी हद्दपारीचा आदेश का?

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात