दृष्टिहीन असतानाही अथांग सागरातील कठीण आव्हानांना धैर्याने सामोरे जात नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने तब्बल 38 किलोमीटरची पाल्कची सामुद्रधुनी अवघ्या 11 तास 15 मिनिटांत पोहून पार केली. तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. अखेर अनेक घटना-घडामोडींच्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने सहाव्या वर्गात तिसरी भाषा लागू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने 9 एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व शाळांना 7 दिवसांच्या आत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याला तातडीचे आणि अनिवार्य (urgent & mandatory) असल्याचे सांगत लगेच अभ्यास सुरू करण्यास सांगितले आहे.
नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे.
बारामतीत बिनविरोध साठी पवार कुटुंबियांचा आटापिटा; पण राहुरीत लढायची पवार गटाची दुटप्पी भूमिका!!, हेच राजकीय वास्तव आज पोटनिवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समोर आली.
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर चबर चबर बोलणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद वर गप्प बसल्याची वास्तुस्थिती आज समोर आली.
याला म्हणतात काँग्रेस!!, नुसती लढाईची चुणूक दाखवून पवारांना आणले गुडघ्यावर!!, तेव्हा कुठे माघार घेतली पवारांनी फोन केल्यावर!!, हेच राजकीय वास्तव बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आजच्या म्हणजे ९ एप्रिल २०२६ या दिवशी समोर आले.
जादू-टोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे एकामागून एक काळे कारनामे समोर येत आहेत. ‘एसआयटी’च्या तपासात आता खरातचा एक अत्यंत धक्कादायक ‘कांड’ उघड झाला असून, तो आपल्याच श्रीमंत भक्तांना लुटण्यासाठी चक्क ‘बोगस प्राप्तिकर (Income Tax) अधिकारी’ पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड आणि भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, ही राजकीय घडामोडी आज घडली.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नाही. भाजप या प्रकरणी मुद्दा अफवा पसवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय? असा परखड सवाल त्यांनी या प्रकरणी केला आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीचा लाभ मिळेल, असा महायुतीचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला असून, या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 55 उमेदवारांनी उडी घेतल्याने लढतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.
नाशिक शहरातील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत इस्लामी जिहाद चालू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या तरुण महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांशीही क्रूर खेळ खेळला गेला. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने आता कठोर पावले उचलून सहा आरोपींना अटक केली.
काँग्रेसचे काही नेते बारामती विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांना उतरवण्याची तयारी करत आहेत. जर काँग्रेस बारामती विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींना बोलणार
नाशिक मध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी पुढे येत खरातविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे एकूण तक्रारींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. महेश सावंत यांच्या वतीने ॲड. अमित कारंडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, जी न्यायालयाने ग्राह्य धरली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचे परखड शब्दांत समर्थन केले आहे. पार्थदादा पवार यांचे विधान काँग्रेसला फारच झोंबले आहे. यामुळेच काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू सुरू असल्याच्या त्यांच्या विधानानंतर एरवी डबक्यात लपून बसलेली बेडके बाहेर पडून एकदम डऱ्याव डऱ्यावर करत आहेत, असे ते म्हणालेत.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करून तिला भांडवली बाजारात सूचीबद्ध करायचा निर्णय राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्राला स्वतंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग म्हणजेच आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय सर्वांत महत्त्वाचा ठरला.
भारताचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!, हीच राजकीय घडामोड काल आणि आज दिसून आली.
महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करून तिला भांडवली बाजारात सूचीबद्ध करायचा निर्णय राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज घेतला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर? राज्यव्यापी आंदोलन औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर?” या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App