आपला महाराष्ट्र

दोन्ही राष्ट्रवादींचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!, हे चित्र सलग दोन दिवसांमध्ये दिसले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची हीच अवस्था सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आली.

Aamir Khan

Aamir Khan : आमिर खानचे तिसरे लग्न अवैध – यूपीच्या मुफ्तीचा फतवा; म्हटले- गैर-मुस्लिम महिलेसोबत नाते गुन्हा, करणी सेना म्हणाली- अभिनेता लव्ह जिहादी

चित्रपट अभिनेता आमिर खान यांच्या तिसऱ्या लग्नावरून यूपीमध्ये फतवा जारी करण्यात आला आहे. हा फतवा अलीगढमध्ये यूपीचे शाही चीफ मुफ्ती मौलाना चौधरी इफ्राहीम हुसैन यांनी मंगळवारी दुपारी सुमारे 1 वाजता जारी केला.

Ramesh Mhatre

Ramesh Mhatre : डॉक्टरांना मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.

Bawankule

Bawankule : ‘राहुल गांधींना चुकीचे ब्रीफिंग मिळते’; चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, दुबार पेरणीसाठी मोठ्या मदतीची घोषणाही केली

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, “राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यांना चुकीचे ब्रीफिंग मिळत आहे,” असा दावा केला. याचवेळी त्यांनी राज्य सरकारने पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केल्याचे सांगत, दोषींना पुन्हा अशी हिंमत होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला

Maharashtra Finance

महाराष्ट्राचे अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीचा हक्क की आणखी काही??

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी म्हणे एकत्र जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला. त्यात मोठा भूकंप होणार, अशा बातम्यांचे पेव फुटले. त्यामध्येच अमोल मिटकरी या विधान परिषदेतून निवृत्त झालेल्या आमदाराने आपल्या ट्विट मधून भर टाकली. त्यात राष्ट्रवादीच्या तथाकथित हक्काच्या अर्थ मंत्रालयाच्या बातमीची शेपूट जोडली.

Mumbai FDA

Mumbai FDA : मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सवर FDA चा छापा; स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Pandharpur

Pandharpur : पंढरपुरात 15 दिवस मटण-मांस विक्रीवर कडक बंदी; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत, पंढरपूर शहर आणि नजीकच्या परिसरात १५ जुलै ते २९ जुलै असे सलग १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Sunil Tatkare

Sunil Tatkare : सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड कायदेशीरच; सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीवर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले- पक्षात कोणताही असंतोष नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीला पक्षातूनच आव्हान देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सुनेत्रा पवार यांची निवड पूर्णपणे कायदेशीर असून, सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत कोणतेही तथ्य नाही’, असा दावा तटकरे यांनी केला आहे.

Fadnavis Govt

Fadnavis Govt : ST बसस्थानकांचा कायापालट, बळीराजालाही दिलासा; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Agri Minister

Maharashtra Agri Minister : 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात; कृषीमंत्र्यांची घोषणा; पावसाबाबतही दिले अपडेट

राज्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात सरकारने कडक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 18 बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्जमाफी, पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत चर्चांवरही भूमिका स्पष्ट केली.

शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा दिलासा; २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ!!

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा दिला असून एकूण २३ लाख शेतकऱ्यांना त्या योजनेचा प्रोत्साहनपर लाभ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेतला. त्याचबरोबर अन्य निर्णय देखील घेतले.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मटण – मांस विक्रीवर बंदी; पण खवचट मराठी माध्यमांना “खटकली’ खवय्यांची “कोंडी”!!

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मटण – मांस विक्रीवर बंदी; पण खवचट मराठी माध्यमांना “खटकली” खवय्यांची “कोंडी”!! असला प्रकार आज समोर आला.

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान मिळताच राष्ट्रवादी झटकन explanation mode मध्ये!!; सच्चिदानंद सिंह यांच्या मागे कुणाची चालली बुद्धी??

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला झारखंड सारख्या दुरुस्त राज्यातून आव्हान मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस झटकन explanation mode मध्ये आली, किंबहुना पक्षाला तशा mode मोडमध्ये यावे लागले.

सुनेत्रा पवारांचे राष्ट्रवादी वरचे नियंत्रण ढिल्ले, की खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रकार??

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच आव्हान मिळाल्याचे चित्र आज एकदम समोर आले.

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात FDA चा दणका; तब्बल 2.93 कोटींचे संशयित खाद्यतेल जप्त; 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

सेफ फूड-सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी धडक कारवाई केली आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, या ठिकाणाहून तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांचा संशयित निकृष्ट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून यामुळे खळबळ उडाली आहे.

Vinayak Raut

Vinayak Raut : विनायक राऊतांवर सूनेचे जादूटोण्याचे गंभीर आरोप; राऊतांचा पलटवार; माझ्या बदनामीचे षडयंत्र, 12.50 कोटींची मागणी!

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबात सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचे गंभीर आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ‘कॉकरोच’च्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा; सर्व पक्षांना समर्थनाचे आवाहन

नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही. जंतरमंतरवर सोनम वांगचुक आणि युवक करत असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे,” अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज मांडली. ‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Suneetra Pawar

Suneetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्फोट? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान; ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस

दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच मोठा सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान दिले आहे. या अत्यंत अनपेक्षित कायदेशीर पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Aditi Tatkare

Aditi Tatkare : ‘लाडकी बहीण’मधून 92 लाख महिला का वगळल्या गेल्या? कॅगचे ताशेरे आणि बीडमधील गोंधळावर मंत्री अदिती तटकरेंचा मोठा खुलासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ३,५४२ कोटी रुपयांच्या खर्चावर ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आणि योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेषतः बीड जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या आकडेवारीवरून राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व घडामोडींवर आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, पात्र आणि अपात्र महिलांची नेमकी आकडेवारी समोर ठेवली आहे.

राजकारणाच्या धकाधकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रमले मूल गावी!!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या दरे गावी गेले की त्यांच्या नाराजीच्या बातम्यांना पेव फुटते, पण पण शिंदे यांच्या खेरीज दुसरेही राजकारणी कधीतरी मूळ गावी जाऊ जुन्या आठवणींमध्ये रमतात, असे चित्र नुकतेच दिसले.

Kalyan West

Kalyan West : कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले

कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेली एक ४ ते ५ मजली भलीमोठी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी जागेवरच कोसळली. या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत चित्तथरारक असून, इमारत कोसळतानाचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

MSRTC Ashadhi Wari

MSRTC Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा; 40 भाविक एकत्र आल्यास थेट घरापासून मिळणार विशेष बस; परिवहन मंत्र्यांची माहिती

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी जर ४० वारकरी एकत्र आले, तर महामंडळाकडून त्यांना थेट विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात ही मोठी घोषणा केली.

Sanjay Raut

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी योग्य नेतृत्व; 2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधान व्हावे, संजय राऊत यांचे वक्तव्य

वेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी अतिशय योग्य नेतृत्व आहेत. महाराष्ट्र त्यांच्या हातात राहिलेला नाही, महाराष्ट्रात गुंडाचे राज्य आले आहे. आम्ही तर म्हणू की 2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधानपद मिळवावे. जर एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये आपला गट विलीन केला

Navneet Rana

Navneet Rana : शेरनी अगर शांत है, तो डकारना नहीं भूलती; नवनीत राणांचा विरोधकांना थेट इशारा, स्वाभिमानामुळे राज्यसभेला ठोकर मारल्याचा दावा

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘माजी खासदार’ झाल्याचे शल्य मनात असले तरी आपण शांत बसलेलो नाही, असा सज्जड इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना दिला आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. यावेळी त्यांनी राज्यसभा खासदारकीवरूनही मोठा दावा केला आहे.

Vinayak Raut

Vinayak Raut : 12 कोटी, 3 बीएचके फ्लॅट न दिल्यामुळेच सुनेचे खोटे आरोप; यामागे षडयंत्र! विनायक राऊतांचा सून गिरीजा राऊत यांच्यावर प्रतिआरोप

माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राऊत विरुद्ध सून असा थेट वाद पेटला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे गिरीजा राऊत यांनीही सासरच्यांनी फसवणूक आणि छळ केल्याचा पुनरुच्चार केला आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात