पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणात १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तब्बल १,४०० लिटर मिथेनॉल जप्त करण्यात आले आहे.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना, “पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी तुमच्या पक्षातील ४० आमदार का बाहेर पडले, याचा विचार करा,” असा टोला लगावला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. जरांगे यांचे आंदोलन सुरू राहिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा हाके यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार शाहू छत्रपती यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्यांचे माजी सहकारी अमोल खुने यांनी गंभीर आरोप केले आहेत. जरांगे, गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेत अचानक वाढ कशी झाली, याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी व्हावी, अशी मागणी खुने यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी १५ तासांनंतर मागे घेतले. सरकारसोबत झालेल्या मध्यरात्रीच्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याने त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व, अशी धडक कारवाई सुरू आहे.
शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे येथे सुरू झाली. या तीन दिवसीय राष्ट्रीय बैठकीत देशातील ४० हून अधिक प्रांतांमधून २०० पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आंदोलन आणि प्रति आंदोलनांमधून भाजपच्या विरोधात पण वातावरण पेटेना; उलट सत्तेच्या पदांसाठी पवार संस्कारित नेत्यांना भाजपचीच ओढ लागल्याचे चित्र आज दिसून आले.
विशेष प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू केले. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, […]
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विषारी गावठी दारू पिल्याने मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून अनेक जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून संपूर्ण दारू पुरवठा साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.
महायुतीतील विधान परिषद जागावाटप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांदरम्यान अखेर ज्येष्ठ नेते Chhagan Bhujbal आणि प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare माध्यमांसमोर एकत्र आले. “हम साथ-साथ आहेत, आमच्यात कोणताही वाद नाही,” असे सांगत दोन्ही नेत्यांनी मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक नेते Manoj Jarange Patil यांनी ३० मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.
वाढती पूरस्थिती, रस्त्यांवर साचणारे पाणी आणि उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई अशा परस्पर विरोधी गोष्टींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र विशेष पथकाला मंजुरी देण्यात आली आहे.
एकीकडे राष्ट्रवादी सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे तर त्याचवेळी शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई टेक वीक 2026’ चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राज् एआय व्हिजन’ या विषयावर संवाद साधला.
विधान परिषदेवर एकाही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीने आपासांत जागावाटप करून घेतले. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ, राष्ट्रवादी (शप)ला तीन, तर ठाकरे सेनेला चार जागा वाट्याला आल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याभोवती सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर अखेर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या दिल्ली भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. ही नियमित आणि अधिकृत भेट आहे,” असे सांगत शिंदेंनी विविध तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे नेते Manoj Jarange Patil यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही,” असा इशारा दिला आहे. त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केल्याने महायुती सरकारची चिंता वाढली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून चंद्रपूर, वर्धा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दे
“रामायण हे केवळ प्रभू श्रीरामचंद्रांचे एकट्याचे चरित्र नसून राम – जानकीचे संयुक्त चरित्र आहे. सीतेच्या उल्लेखाशिवाय रामाचे चरित्र कधीही पूर्ण होऊ शकत नाही.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्रातील कांदा दर घसरणीमुळे शेतकरी आक्रमक झाले असताना राज्य सरकारने आता थेट दिल्ली दरबारात धाव घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महायुती नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी हटवणे, खरेदीदर वाढवणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा करणार आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App