राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र पोलीस’ अशी अक्षरे, पोलीस किंवा लाल रंगाच्या नावाच्या पाट्या लावून फिरणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सर्व विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (4 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, न्यायव्यवस्था, ऊर्जा आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
देशातील शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा प्रवाशांना १ सप्टेंबरपासून अधिक भाडे मोजावे लागणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात टीडीआरएफ (TDRF) जवान विकास लहू गोरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर करुणा मुंडे यांनी दोघांवर जोरदार टीका केली आहे.
पक्षाच्या संविधानातील बदलांबाबत अधिकृत ठराव आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची आयोगाची सूचना
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना भाजप सोडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात एका आरोपीची भररस्त्यात धिंड काढून त्याला कथितरीत्या अमानुष वागणूक दिल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींवर प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात ३० जुलैपासून लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून अभ्यास, संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि माणुसकी यांचा दुर्मीळ संगम आहे.
विद्यार्थी आंदोलनांवरील गुन्हे, आदित्य ठाकरे, SOP, महाराष्ट्र सरकार आणि DGP हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात झालेल्या विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनांशी संबंधित गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला
कॉकरोच जनता पार्टी (CJP), विदेशी निधी, ईडी चौकशी आणि गृह विभागाची तपासणी हे मुद्दे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत.
पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या वादानंतर आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत.
दिल्ली पोलिसांचे उपायुक्त (DCP) सुमित झा यांच्या नावाने AI-निर्मित बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील चित्रपट, मालिका व वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत तसेच त्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत भेट घेतली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य, सांस्कृतिक राष्ट्रवाद, पत्रकारिता आणि शिक्षणाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आणि लेखणी आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
प्रशासनात नियमाने काम करणारे अनेक चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचाही हाच प्रयत्न आहे
‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गैरव्यवहार होऊन गुण कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा दावा अखेर उच्च न्यायालयात फेटाळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावल्या आहेत. याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले काही पुरावे चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने बनवलेले बनावट दस्तावेज असल्याचे तपासात समोर आल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’तून राज्यातील ९४,०८३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कारण सहकार विभागाने ३१ लाख ६४ हजार २८ शेतकऱ्यांची डेटा पडताळणी केली. त्यात हे शेतकरी आयकरदाते असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपात्रतेमुळे राज्य सरकारचे १,८८१ कोटी ६६ लाख रुपये वाचले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App