आपला महाराष्ट्र

Tukaram munde

राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई, तर ३३ जणांना बेड्या!!

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व, अशी धडक कारवाई सुरू आहे.

Shiksha Sanskriti Utthan

शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक पुण्यात सुरू; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारतीय ज्ञानपरंपरेवर मंथन

शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे येथे सुरू झाली. या तीन दिवसीय राष्ट्रीय बैठकीत देशातील ४० हून अधिक प्रांतांमधून २०० पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

आंदोलन आणि प्रति आंदोलनांमधून भाजपच्या विरोधात काही वातावरण पेटेना; उलट सत्तेच्या पदांसाठी पवार संस्कारित नेत्यांना भाजपचीच ओढ!!

आंदोलन आणि प्रति आंदोलनांमधून भाजपच्या विरोधात पण वातावरण पेटेना; उलट सत्तेच्या पदांसाठी पवार संस्कारित नेत्यांना भाजपचीच ओढ लागल्याचे चित्र आज दिसून आले.

मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू; संविधानाच्या कक्षेत राहून सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची फडणवीस यांची तयारी!!

विशेष प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू केले. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, […]

Pune Toxic

Pune Toxic : पुणे विषारी दारूकांडात मृतांचा आकडा १५ वर; मुख्य आरोपीसह ८ जण अटकेत, फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विषारी गावठी दारू पिल्याने मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून अनेक जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून संपूर्ण दारू पुरवठा साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : ‘आमच्यात कोणताही वाद नाही’; महायुतीतील जागावाटपावरून सुरू चर्चांदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र

महायुतीतील विधान परिषद जागावाटप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांदरम्यान अखेर ज्येष्ठ नेते Chhagan Bhujbal आणि प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare माध्यमांसमोर एकत्र आले. “हम साथ-साथ आहेत, आमच्यात कोणताही वाद नाही,” असे सांगत दोन्ही नेत्यांनी मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन पुन्हा पेटणार; मनोज जरांगे-पाटील उद्यापासून उपोषणावर, सरकारचे शिष्टमंडळ भेटीस

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक नेते Manoj Jarange Patil यांनी ३० मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

Fadnavis

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी जलसंधारणाच्या दिशेने मोठे पाऊल; दोन्ही ठिकाणच्या विशेष पथकाला फडणवीस सरकारची मंजुरी

वाढती पूरस्थिती, रस्त्यांवर साचणारे पाणी आणि उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई अशा परस्पर विरोधी गोष्टींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र विशेष पथकाला मंजुरी देण्यात आली आहे.

Eknath Shinde.1

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे; शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!

एकीकडे राष्ट्रवादी सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे तर त्याचवेळी शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.

Maharashtra

AI च्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम काळ आणि संधी; AI क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज!!- मुंबई टेक वीक २०२६ चे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘मुंबई टेक वीक 2026’ चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राज् एआय व्हिजन’ या विषयावर संवाद साधला.

tutari

विधान परिषदेवर एकही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर; काँग्रेस ८, राष्ट्रवादी (शप) ३, ठाकरे सेना ४!!

विधान परिषदेवर एकाही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीने आपासांत जागावाटप करून घेतले. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ, राष्ट्रवादी (शप)ला तीन, तर ठाकरे सेनेला चार जागा वाट्याला आल्या.

Eknath Shinde

Eknath Shinde : “दिल्ली दौऱ्यामागे कोणतेही राजकारण नाही”; एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण, चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याभोवती सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर अखेर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या दिल्ली भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. ही नियमित आणि अधिकृत भेट आहे,” असे सांगत शिंदेंनी विविध तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : “मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर सरकारला झोप लागू देणार नाही”; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, उपोषणाचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे नेते Manoj Jarange Patil यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही,” असा इशारा दिला आहे. त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केल्याने महायुती सरकारची चिंता वाढली आहे.

Vidarbha

Vidarbha : विदर्भात उष्णतेचा कहर; चंद्रपूर- वर्ध्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, प्रशासन सतर्क

विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून चंद्रपूर, वर्धा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दे

रामायण हे राम – जानकीचे संयुक्त चरित्र, ते डोळसपणे वाचावे; “न सांगितलेली सीतेची कथा” पुस्तकाचे प्रकाशन

“रामायण हे केवळ प्रभू श्रीरामचंद्रांचे एकट्याचे चरित्र नसून राम – जानकीचे संयुक्त चरित्र आहे. सीतेच्या उल्लेखाशिवाय रामाचे चरित्र कधीही पूर्ण होऊ शकत नाही.

साखर, इथेनॉल आणि कांदा प्रश्नांवर केंद्र सरकारचे सकारात्मक निर्णय; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा!!

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थिती

Sunetra Pawar

Sunetra Pawar : कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी दिल्ली दरबारात हालचाली; अमित शहांसोबत सुनेत्रा पवारांची महत्त्वाची बैठक

महाराष्ट्रातील कांदा दर घसरणीमुळे शेतकरी आक्रमक झाले असताना राज्य सरकारने आता थेट दिल्ली दरबारात धाव घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महायुती नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी हटवणे, खरेदीदर वाढवणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा करणार आहेत.

Bawankule

Bawankule : मोदी-फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका सहन करणार नाही; बावनकुळेंचा सपकाळांना इशारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार पलटवार करत, “मोदी आणि फडणवीसांवर खालच्या पातळीवर टीका करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही,” असा इशारा दिला.

CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis : अर्थखाते सुनेत्रा पवारांकडे जाणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट विधान; चर्चांना दिला पूर्णविराम

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखाते सोपवले जाणार असल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. अर्थ विभाग सध्या स्वतःकडेच राहणार असून त्याबाबत कोणताही बदल प्रस्तावित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातल्या नदीजोड प्रकल्पांना मोदी सरकारची गती; जलजीवन मिशनच्या योजनेलाही नवसंजीवनी!!

जलजीवन मिशन आणि देशात जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स येथेमहत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

sunetra pawar

भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंड कडूच!!; देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत तीव्र पडसाद!!

भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तोंड कडूच राहिल्याचे 26 फेब्रुवारीच्या पक्षाच्या बैठकीतून समोर आले.

Bawankule

Bawankule : मोदी-फडणवीसांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा; बावनकुळे यांचा सपकाळांवर पलटवार

नाशिकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील महायुती सरकार विकासकामांवर लक्ष केंद्रित करत असताना काँग्रेसकडे जनतेसमोर मांडण्यासारखे कोणतेही सकारात्मक मुद्दे उरले नसल्याने विरोधक केवळ टीकाटिप्पणी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Relief for Farmers

Relief for Farmers : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ‘दिलासा’ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 2 लाखांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Ravindra Chavan

Ravindra Chavan : विधान परिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला

राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये सध्या 12-5-2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी तिन्ही पक्षांचे प्रमुख लवकरच एकत्र बैठक घेऊन जागावाटपावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

Sunetra Pawar

Sunetra Pawar : अर्थखाते मिळत नसल्याने सुनेत्रा पवार नाराज; राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली खंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले जात नसल्याची उघड खंत व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात