महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्योग आले पाहिजेत त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना उद्योजक सुद्धा प्रतिसाद देत आहेत ते महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत, पण काही घटक मात्र उद्योगांना त्रास देत असतील, तर त्यांना ठोकून काढू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका!!, असा सल्ला म्हणे, काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिला. काँग्रेस सावध झाल्याच्या नावाखाली या बातम्या सर्व मराठी माध्यमांनी दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. काँग्रेस पक्ष स्वतःच्याच बळावर वाढवा. काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम स्वतंत्रपणे लोकांपर्यंत न्या, असा सल्ला म्हणे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा नुसताच गदारोळ प्रत्यक्षात पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत मतदानाची घसरण आणि त्याकडे कुणाचेच लक्ष नाही, असे राजकीय चित्र आज समोर आले.
अजितदारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच उरली की काय??, अशी शंका येणारी आकडेवारी साम टीव्हीने घेतलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या एक्झिट पोल मधून समोर आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यक्तीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प आणि देवेंद्र फडणवीस विदर्भ – तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!, हेच राजकीय चित्र आज शनिवारी समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026: खासदार औद्योगिक महोत्सव’ अंतर्गत आयोजित ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उदघाटन केले. यावेळी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF) चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, 22 हून अधिक देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच राजनयिक उपस्थित होते.
ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा आणि अजितदादा गेल्यानंतर भाजपच्याच हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!, असेच राजकीय चित्र मुंबई आणि बारामतीतल्या आजच्या घडामोडींमधून समोर आले.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे या सुनिता पवार यांच्या शपथविधीनंतर मात्र पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून अचानक “दूर” झाल्याने त्यांच्याभोवतीचे राजकीय गूढ वाढले.
संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचे सत्तावाटप निश्चित झाले असून, भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची संधी देण्यात आली आहे.
राज्यभरात अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्याने काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक महिलांना ई-केवायसी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते. परंतु, आता या महिलंनया दिलासा मिळणार असल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून ई-केवायसी दुरुस्ती आता 31 मार्चपर्यंत करता येणार आहे.
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी अत्यंत घाईगडबडीत उरकण्यात आला. आता याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या 2 बड्या मंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शपथविधी लवकर कुणी करायला लावला? दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी लोकांना फारसे आवडले नाही, असे या मंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी मतदान सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ही प्रक्रिया पार पडेल. अजित पवार यांच्या निधनामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणारे हे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.
औद्योगिक क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरू असून विदर्भातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे उद्योजक आकर्षित व्हावेत, त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करावी, यासाठी राज्यातल्या फडणवीस सरकारने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांमध्ये प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा स्थापन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवारांनी पार्थ पवार च्या नावाचा आग्रह धरला, अशी बातमी सकाळ समूहाच्या साम टीव्हीने दिली. पण त्यामुळेच कवडीची किंमत वाढली की बाहेरून आलेल्या पवारांची किंमत कमी करण्यासाठी पवारांनी नवी *खेळी” केली??, असा सवाल समोर आला
अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे सध्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी अखेर 32 तासानंतर सुरळीत झाली आहे. महामार्गावर असलेल्या घाटात गॅसचा कंटेनर आडवा झाल्याने या वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. एकीकडे समृद्धी महामार्ग तयार केला आणि आता शक्तिपीठ महामार्गाच्या तयारीत असलेल्या सरकारचे या कोंडीमुळे अपयश समोर आले आहे. विशेष म्हणजे या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला पर्यायी मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी
संजय राऊत यांनी आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत शरद पवारांना महाविकास आघाडी कडून राज्यसभेची निवडणूक लढवायची “ऑफर” दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, सिंचन घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढणारे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या प्रकरणावर आपली अत्यंत रोखठोक आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांचा अपघात दुर्दैवी आहे, मात्र सरकारी चौकशी यंत्रणांवर माझा विश्वास राहिलेला नाही,” अशा शब्दांत पांढरे यांनी प्रशासकीय आणि न्यायालयीन व्यवस्थेवर तोफ डागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “विमानात नक्की काय घडलं? कशा प्रकारे ही दुर्घटना झाली? याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून, ९ फेब्रुवारीनंतर मी यावर स्पष्टपणे भाष्य करणार आहे,” असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली. तसेच त्यांनी पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्यावरून देखील भाष्य केले. यावरून त्यांच्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृत असू शकते, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, जालना-नांदेडसह अनेक जिल्ह्यांमधील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या ‘न्यू टाऊन’ प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली.
पूज्य गुरुदेव – राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषद निवडणूक यांचा प्रचार “शांतपणे” करायचा निर्णय घेतला,
व्यवसायिका बिल गेट्स यांच्या माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी म्हटले आहे की, लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत बिलची जवळीक त्यांच्या घटस्फोटाचे कारण ठरली
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App