कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी X वर पोस्ट करून म्हटले, ‘जर विद्यार्थ्यांविरोधातील कारवाई थांबली नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतील.”
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कोठडीत मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नुकतीच महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने सादर केलेला शासकीय ठराव कोर्टाने पुन्हा एकदा अमान्य केला आहे. “या प्रकरणात कायदा करण्याची गरज नसून शासकीय ठरावावरच काम चालेल,” ही सरकारची भूमिका याचिकाकर्त्यांचे वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मोडून काढली.
मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जलसंपदा तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राजधानी दिल्लीत सध्या राजकीय भेटीगाठींना वेग आला असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “नीट आंदोलनाच्या नावाखाली काही लोक ‘गजवा-ए-हिंद’चा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही ते खपवून घेणार नाही,” असा थेट इशारा राणे यांनी दिला आहे. आपल्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टवरून झालेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
रोहित पवार हे जाणीवपूर्वक रोज खोटे बोलत आहेत, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांनाही खोटे बोलण्याची सवय लागल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघात कामे करायची नसल्याने केवळ खोट्या गोष्टी पसरवणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत बोलताना शिक्षण क्षेत्रातील माफियांना रोखण्यासाठी आणलेल्या नव्या कठोर विधेयकाचे जोरदार स्वागत केले आहे. ‘पेपरफुटीमुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त होते’, असे सांगत त्यांनी परीक्षा पद्धतीत बदल करून ती अधिक लवचिक करण्याची आणि कोचिंग क्लासेसच्या अवाढव्य शुल्कावर नियंत्रण आणण्याची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित केली आहे. तसेच सरकारमध्ये नैतिकता आहे आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला, विरोधकांच्या आंदोलनामुळे नाही दिला, असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कॉकरोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात झालेल्या नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Sharad Pawar
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी २०२६ परीक्षेतील प्रश्नफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने १३ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. लातूरमधील आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर तसेच पुण्यातील एपीएमए कोचिंग इन्स्टिट्यूटचा भौतिकशास्त्र शिक्षक तेजस शाहवर फुटलेले प्रश्न विद्यार्थ्यांसाठी वापरल्याचा ठपका आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे यांसह भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत आरोप ठेवले आहेत.
राज्यातील आणि देशातील शिक्षण व्यवस्थेत सातत्याने होणाऱ्या पेपरफुटी, मराठी शाळा बंद पडण्याची स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून काँग्रेसची विद्यार्थी आघाडी ‘एनएसयूआय’ (NSUI) आणि युवक काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांना आता नवे वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता नेमकी काय, याबाबत चर्चा सुरू झाली असून अंतिम निष्कर्ष चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमधून तक्रारदाराच्या खुलाशावर आक्षेप घेतले आहेत.
डोंबिवलीत एका महिला डॉक्टरसह अन्य डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना तत्काळ जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे तूर्तास तरी म्हात्रे यांना दिलासा मिळाला नसून, जामिनासाठी त्यांना आणखी काही दिवस कारागृहातच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाले असून, या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आता एक नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला असला तरी, भविष्यात या पदावर खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का, या सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे.
नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशात लाठीचार्ज अन् संतापाची लाट पसरली नसती,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली.
नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा रॅली’ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण आंदोलनावर आणि ठाकरे बंधूंवर कडाडून टीका केली आहे.
नीट’ परीक्षा घोटाळा ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उद्या संसदेत नवा कायदा मांडला जाणार असून, त्यात १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे मूळतः अराजकीय होते; मात्र राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील पराभूत नेत्यांनी देशात बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनाचा राजकीय वापर केला, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे, फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. गेल्या महिन्याभरापासून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून आणि सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. मात्र, या सर्व तर्क-वितर्कांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णविराम लावला असून, “मी सध्या मुंबईतच असून यापुढेही महाराष्ट्रातच राहणार आहे,” असे स्पष्ट करत केंद्रात जाण्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला त्याच्या एका साथीदारासह बिहारमधील पाटणा येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भिवंडी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही फिल्मी स्टाइल धाडसी कारवाई केली.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी जमा झालेली असतानाच एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे जीवनयात्रा संपवलेल्या जवानाचे नाव आहे.
गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दीपके यांनी CJI सूर्यकांत यांचे आभार मानले. दीपके म्हणाले- जर तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हटले नसते, तर तरुण रस्त्यावर उतरले नसते. प्रधान यांनी राजीनामा दिला नसता.
वृत्तसंस्था मुंबई : ‘Prakash Ambedkar नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय […]
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. आता त्यावर पुढे काय निर्णय होती हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा पिढीच्या या आंदोलनाच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. युवा पिढीच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App