आपला महाराष्ट्र

Maharashtra

डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्रात भारत – सायप्रस मैत्री अधिक मजबूत; महाराष्ट्र $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य!!

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित ‘सायप्रस-इंडिया बिझनेस फोरम’मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली.

महाराष्ट्रातल्या कौशल्य विकासासाठी दक्षिण कोरियातल्या लर्निंग फॅक्टरी मॉडेलची मदत; अनेक करारांवर स्वाक्षऱ्या!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एमओयू सायनिंग सेरेमनी फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्किल्स इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत विविध संस्था आणि विभागांमध्ये आणि कोरिया प्रजासत्ताकच्या संस्थांदरम्यान करार करण्यात आले.

राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!

राष्ट्रवादी काँग्रेसवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; कारण सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!, असेच आज नवी दिल्लीत घडले.

Piyush Goyal

Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला

भारतातून टॉफीची निर्यात गेल्या 12 वर्षांत 166% वाढून आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹132 कोटींवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज, म्हणजेच 20 मे रोजी, सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये देशातून टॉफीची एकूण निर्यात ₹49.68 कोटी होती.

भारत – सायप्रस यांच्यात संरक्षण, गुंतवणूक, सायबर सुरक्षा आणि व्यापार विकास करार; राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या!!

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायप्रस – इंडिया बिझनेस फोरम येथे विविध संस्थांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.

Manoj Jarange

Manoj Jarange : समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या; प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे

मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार किंवा पक्षासाठी मराठा समाजाशी दगाफटका करू नये, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. प्रसाद लाड यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गावो

Bhumi Abhilekh

Bhumi Abhilekh : राज्यात भूमी अभिलेखची 50 नवी कार्यालये हाेणार:संभाजीनगरसह चार जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालये

राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचा ‘मेगा’ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात तब्बल ५० नवीन कार्यालयांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला १०,६८३ पदांचा आकृतिबंध आता प्रत्यक्ष अस्तित्वात आला आहे.

Shashikant Shinde

Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मात्र आमदार रोहित पवार यांनी पाथ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांनी अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची काही दिवसांपूर्वी स्तुती केली होती, त्यामुळे रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे. तर पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी बैठकीबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर अनेक महत्त्वाचे करार करत असून, त्यामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांवर विनाकारण टीका करू नका, ते देशाच्या हिताचे काम करत आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते आणि त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे,असे फडणवीस म्हणाले. याचवेळी राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले की, राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहेत. मी मागच्या वेळी त्यांच्यावर अशी टीका केली तेव्हा शरद पवारांना राग आला होता आणि मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला होता.

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी कोरडेठाक पडले आहेत. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात केवळ 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामु्ळे मध्यपूर्वेतील स्थिती सुधारली नाही तर राज्याला मोठ्या इंधन टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra

Maharashtra : शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार; कृषिमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील

शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या काळात शेतकरी कर्जमाफी होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या सर्व चर्चांवर पडदा टाकत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे.

Fadnavis

राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!

राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेत्यांना डावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली‌ त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे थेट मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर एकाच रथात मिरवणुकीत सामील झाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!, हे राजकीय वास्तव आज दोन महिन्यांनी पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.

ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!

ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातून समोर आले.

Valmik Karad

Valmik Karad : वाल्मीक कराडची कारागृहात प्रकृती खालावली; आंबेजोगाई येथे हलवण्याची शक्यता

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी वाल्मीक कराड यांची बीड जिल्हा कारागृहात अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना गुप्तांगाच्या भागात तीव्र वेदना आणि गंभीर संसर्गाचा त्रास होत असून त्यामुळे कारागृह प्रशासन आणि वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून सध्या त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

NEET Paper Leak Case

NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरण; मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही चकित

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचे मूळ आणि तांत्रिक दुवे शोधण्यासाठी न्यायालयाने मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Money Laundering Case

Money Laundering Case : ईडीने घेतला खरातचा ताबा; मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी:नाशिक रोड कारागृहातून बंदोबस्तात मुंबईकडे

मुंबई येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) ७० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (पैशांची बेकायदेशीर उलाढाल) प्रकरणात अशोक खरात याला अटक करण्याची परवानगी दिली. बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आधीच सामना करत असलेल्या खरातला नाशिक जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. नाशिक रोड कारागृहातून मंगळवारी सकाळी १० वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अशोक खरात याचा ताबा घेतला.

Maharashtra

Maharashtra : राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ आणि ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१९ मे) एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशातील चार बड्या उद्योगसमूहांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रात तब्बल २५,४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करतानाच तब्बल १ लाख २० हजार तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या ६ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या अभूतपूर्व अणुऊर्जा करारांवर मंगळवारी मंत्रालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू आणि पूर्णगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे हा प्रकल्प होणार आहेत.

cabinet

Cabinet : ओबीसी नॉन क्रीमी लेअर मर्यादा 15लाख करण्याची मंत्रिमंडळ उपसमितीची शिफारस; 43 नव्या जातींचा केंद्रीय यादीत समावेशाचा प्रस्ताव

राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांना आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण प्रशासकीय पावले उचलली आहेत. नॉन क्रीमी लेअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा सध्याच्या ८ लाख रुपयांवरून थेट १५ लाख रुपये करण्याची शिफारस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने केली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच अंतिम बैठक होणार आहे.

Parth Pawar

प्रशांत किशोर संदर्भात बातमी आल्यानंतर लगेच पार्थ पवारांचा खुलासा; पण राष्ट्रवादीतल्या राजकीय गदारोळाबद्दल मात्र मौन!!

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संदर्भात नुसती बातमी आली, तर लगेच खासदार पार्थ पवारांनी खुलासा करून टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरापासून गदारोळ सुरू आहे, त्यावर मात्र पार्थ पवारांनी मौन बाळगले.

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील 6 तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली.

राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??, असे दोन परखड सवाल विचारायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस मधल्याच घडामोडींमधून आली.

Palghar Highway Accident

Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्नघरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Sunetra Pawar

Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. काही लोक पक्षाविषयी मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. पण आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतून भाजप जाणाऱ्या 40 लोकांची नावे असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.

NEET Paper Leak

NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर

NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर येत असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्याचे समोर आले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात