राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांचा पक्ष तटकरे व चाकणकरांमुळे बदनाम झाला आहे. दादा आज असते तर त्यांनी हे अजिबात सहन केले नसते. त्यामुळे खरातला आधार व पाठबळ देणाऱ्यांना तुम्ही अभय देऊ नका, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला. सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या राजकारणावर सडकून टीका केली.
एकटे पवार मालक आणि बाकीचे बटाईदार!!; हेच का पवारांच्या 60 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीचे लोकशाही संस्कार??, असा सवाल विचारायची वेळ आमदार रोहित पवारांच्या एका ट्विटमुळे आली.
सेवा संस्थांच्या पाठीशी उभी राहणारी समाजाची शक्ती मोठी आणि संवेदनशील आहे. उमेद फाउंडेशनसारख्या संस्था अत्यंत कठीण परिस्थितीत दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठी जे कार्य करत आहेत, त्याला समाजाने आपली जबाबदारी मानून साथ दिली पाहिजे
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाच, याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर १०० टक्के परिणाम होणार असून, देशातील माल निर्यात न झाल्याने बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिंता व्यक्त केली असून, भविष्यात युरिया खताच्या साठ्याबाबतही काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाने सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरवर तटकरे कुटुंबातील सदस्यांचे फोटो झळकले, मात्र राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर, अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांना टोला देखील लगावला आहे.
मराठा समाजातल्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशोक खरातची खरी जात शोधा. तो मराठा आहे की अन्य जातीचा आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता बॅनर वॉरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरून पक्षाचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅनरवर केवळ खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबाचेच वर्चस्व दिसून आल्याने, रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोचरा वार केला आहे.
मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1.75 लाख कोटी रुपयांनी घटले. मध्य पूर्वेतील तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या भीतीने ही घसरण झाली आहे.
धार्मिक श्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि कोट्यवधींची माया जमवणारा नराधम अशोक खरात महिलांना गुंगीकारक पेढा आणि कडवट पाणी देऊन संमोहित करायचा आणि नंतर अत्याचार करायचा, असा खळबळजनक आरोप रविवारी (दि. २९) नाशिक जिल्हा न्यायालयात सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. खरातच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला हजर केले असता, अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश श्रीमती बराडे यांनी त्याला १ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे.
30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना सावध केले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील का??, असा गंभीर सवाल राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नव्या चर्चेमुळे समोर आला.
राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये 30 मार्चपासून शनिवारपर्यंत ढगाळ वातावरणासह दुपारनंतर वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशात कंडोमच्या किमती 50% पर्यंत वाढू शकतात, कारण अमेरिका-इराणमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे तेल आणि गॅसनंतर आता कंडोम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे.
सोनिया ते सुनेत्रा; पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा चुकलेला पाढा!!, असंच म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नव्या चर्चेमुळे समोर आली.
राज्यातील विविध शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कदाचित 3 महिन्यांत एलपीजी गॅस बंद होईल असे पोटात गोळा उठवणारे विधान केले आहे. सध्या पीएनजी गॅस स्वस्त पडत आहे. त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. केंद्राच्या एका पत्रकात 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा उल्लेख आहे. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या घेतल्या पाहिजेत, असे ते म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. यामध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी करून भल्या भल्या गुंडांना गजाआड करणारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा सन्मान करण्यात आला.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची पुन्हा सोडून पुडी, सूत्रे जाऊ लागली सुनेत्रा चरणी!!, असेच राजकीय चित्र अजित पवारांच्या अकाली एक्झिटला दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिसून आले.
दोन राष्ट्रवादींच्या भांडणात अशोक खरात प्रकरणाची आग; पवारांचे पुरोगामी संस्कार जळून खाक!!, अशीच अवस्था महाराष्ट्रात दिसून आली.
नाशिक फाटा ते खेड ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने अखेर निर्णायक टप्पा गाठला असून, हा पिंपरी-चिंचवड आणि खेड परिसरासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.
राज्यातील अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. सरकारी जमिनीवर १ जानेवारी २०११ पर्यंत बांधलेली आणि सध्या राहण्यासाठी वापरली जाणारी घरे आता नियमित (कायदेशीर) करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आ
महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणात त्यांचा राजीनामा होणार का, याबाबत स्पष्टता आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सध्या तरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतलेला नाही आणि तातडीने असा कोणताही निर्णय होणार नाही.
राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून ही रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरातच्या संबंधित वादाने आता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App