शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारण्याची खुलेआम धमकी दिल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त नाही. संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसे गेले आहेत. आपल्याला कोणीही काहीच करू शकत नाही
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (२४ जून २०२६) दिवस विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये अत्यंत वादळी ठरला. एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वीजदर, धर्मांतर आणि कायदा-सुव्यवस्थेवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक घोषणा करण्यात आल्या.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!, असला प्रकार आज समोर आला.
णे महापालिकेतील बांधकाम विभागाचे निवृत्त मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या तब्बल 2000 कोटी रुपयांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यास तत्कालीन महापालिका आयुक्तांनी नकार दिला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन आयुक्तांच्या नकारघंटेला फेटाळून लावले आहे. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सद्य:स्थिती सभागृहात मांडली.
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सावंत आणि देसाई यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. आरोपी भीमराव कांबळेला दोषी असल्याचा निकाल न्यायाधीशांनी दिला, पण अंतिम निकाल 29 जून रोजी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. न्यायधीशांनी आरोपीला दोषी ठरविले.
राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती दिली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार फुटल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर राहिले. पण उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले असले तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत NEET-UG पुनर्परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा दावा वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. यावेळी मोदींनी विविध विभागांमध्ये समन्वयावरही भर दिला.
शिवसेना (UBT) ला संसद भवनातील त्यांचे सध्याचे कार्यालय रिकामे करावे लागू शकते. संसद भवनाच्या नियमांनुसार, फक्त 5 किंवा त्याहून अधिक खासदार असलेल्या पक्षाला संसद भवनात कार्यालय मिळू शकते.
विधान परिषदेत वीजदर, स्मार्ट मीटर, सौर ऊर्जा आणि खंडित वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील आणि भाई जगताप यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या या प्रश्नांना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नियम 293 अन्वये शेतीच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. “महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, 30 जूनपूर्वी राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल,” अशी मोठी माहिती त्यांनी सभागृहात दिली. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हाच या सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत कृषिमंत्र्यांनी खते, बियाणे, पीक विमा आणि नवीन कृषी योजनांबाबत सविस्तर माहिती सभागृहात मांडली.
बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित हिंदू महिलांवर होणारे धर्मांतराचे प्रयत्न, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाचा गंभीर मुद्दा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला
आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला. न्यायालयाने त्या खटल्यातून पद्मसिंह पाटील आणि अन्य आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सोडले. त्यामुळे बरेच राजकारण घडले.
गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातील एका न्यायालयाने आम आदमी पार्टी (आप) चे आमदार चैतर वसावा, त्यांची पत्नी आणि इतर 7 जणांना 7-7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण आणि खंडणी मागितल्याचा आरोप होता.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग चौथ्या दिवशी आपले धरणे-प्रदर्शन सुरू ठेवले. यावेळी दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दहशतवाद्यांची B टीम असल्याच्या विधानाला उत्तर दिले.
श्री सद्गुरू कृपेनें रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा(चादर विधी) शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी अभिजित मुहूर्तावर संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. हा सोहळा महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज, विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मठांचे साधू – महंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले. विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!
द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यात बरेच राजकारण घडले, पण राष्ट्रवादीतले अस्तनीततले निखारे कधी विझवणार??, असा सवाल आज विधानसभेतल्या एका भाषणामुळे आला.
विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली.
पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली,” अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
धानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडासारखेच एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आज खायचे दात दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भारतात कुराण लागू करायची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी सना मलिक यांचे भाषण उचलून धरले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App