नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे गुरु तेगबहादुरसिंग जी यांच्या ३५० व्या स्मृती वर्ष निमित्त त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आलेल्या भव्य महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल – ताशांच्या गजरात दणाणून गेले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, तामिळनाडू, आसाम, केरळ व पुदूचेरीमध्ये एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांसोबतच देशातील विविध राज्यांमधील 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, या दोन्ही जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन संपन्न झाले. या इमारतीच्या रूपाने पुणे मेट्रोला स्वतःचे हक्काचे घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.
राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. या प्रकरणी केवळ संभ्रम व अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9 हजार मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत, असे ते म्हणालेत.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित 39 व्या पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत. इतरांनी लावले तर ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
मिठी नदीचे नाव काढत संजय राऊत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. मिठी नदी कोणाला विकली, तिचा गाळ खात कोण श्रीमंत झाले, त्यातून कुणी घरे बांधले हे मुंबईकरांना माहिती आहे. दिनु मोर्या कुणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटले याची संपूर्ण माहिती सर्वांना आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा? यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. यात काही क्षेत्रांना 100 टक्के, तर काही क्षेत्रांना 70 ते 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतांवर सौर यंत्रणा बसविण्याच्या उपक्रमाला देशभरात वेग आला असून, देशातील एकूण छतावरील सौर यंत्रणांपैकी जवळपास 20 % सौर यंत्रणा महाराष्ट्रात असून, या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्रात 1,08,327 घरांमध्ये छतावरील सौर यंत्रणा बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
काही पक्ष विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्यात, असा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपल्याला महिनाभर पुरेल इतका पुरवठा आधीच करण्यात आला आहे. आवश्यकतेप्रमाणे गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र देशात पॅनिक तयार करायचे, ही काँग्रेसची बुद्धी आहे आणि ही देशाला घातक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पत्रकारिता किंवा सामाजिक कार्याकडे केवळ ‘पॅशन’ म्हणून नाही, तर ‘प्रोफेशन’ म्हणून पाहावे असे सांगितले जाते. मात्र, आमच्या वैयक्तिक अनुभवातून ही दोन्ही क्षेत्रे व्यवसायाच्या पलिकडे जात तुमची जीवनदृष्टी विकसित करतात, असा सूर विश्व संवाद केंद्र आयोजित ‘कर्तृत्त्ववान ती’ या कार्यक्रमात उमटला. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या दोन सेवाव्रती अलका वैद्य आणि वीणा बेडेकर यांनी पूर्वांचलातील सेवा कार्यातले अनुभव सांगितले.
विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!, हेच राजकीय वास्तव जयंत पाटलांनी झी24तासला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. मुलींना 100 टक्के शिक्षण शुल्क माफ आणि मुलांना 50 टक्के शिक्षण शुल्क माफीचा लाभ देण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात जी महाविद्यालये शुल्क आकारतील त्या महाविद्यालयांवर कारवाई करणार येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.
इराण – इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे.
राज्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व-प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची पोर्टलवर अनिवार्य नोंदणी, नियमन, व गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अधिनियम आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.
केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केली आहे पण त्यात ओबीसीसाठी रकाना नाही.ओबीसी जनगणना होणार अशी घोषणा असताना ओबीसी साठी वेगळा रकाना नाही. ओबीसी लोकसंख्या किती आहे हे स्पष्ट झालं नाही तर त्यांना त्यांचे अधिकार मिळणार कसे? त्यामुळं राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा, पत्रव्यवहार करून जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना करण्याची मागणी करावी अशी भूमिका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात जबरदस्तीने किंवा प्रलोभने देऊन केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेले महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026, आज महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात मांडले गेले. या विधेयकाला मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आज ते औपचारिकरीत्या विधानसभेत सादर केले गेले. यावरून आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9.32 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना ₹ 18,640 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 22 व्या हप्त्याचे हस्तांतर झाले.
इराण-अमेरिका व इस्राइल युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा भारतालाही काही प्रमाणात बसत असल्याचे दिसत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत सरकारची चांगलीच गोची केली आहे. एपस्टीन फाइलवरून देखील कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली आहे.
भारत सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नाही, परंतु स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यामुळे एलपीजी (LPG) आपल्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सरकारने सांगितले की, इराणमधील युद्धामुळे देशात गॅस बुकिंगच्या संख्येत सुमारे 20 लाखांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांना प्रथम समज देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर थेट मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी दोन्ही सभागृहांत विविध मुद्यांवर चर्चा झाली. आज सभागृहात विविध शासकीय व अशासकीय कामकाज झाले. यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत आत थेट अटक होत नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रथम समिती चौकशी होते आणि त्यात गुन्हा सिद्ध झाला तरच संबंधिताला अटक होते अन्यथा गुन्हा रद्द होतो, असे ते म्हणालेत.
नरेंद्र मोदी हे पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झाले आहेत. त्यामुळे देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला मोदींनी सुरुवात केली आहे. एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. त्यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या समोर गहाण ठेवले आहे, असे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सोडले. चारित्र्य नसलेला पंतप्रधान संघाला कसा काय चालतो??, असा सवाल सुद्धा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मोदी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App