अशोक खरातच्या संबंधित वादाने आता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे ‘पल्स – प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन’ चे उदघाटन केले.
देशात इंधन टंचाई निर्माण झाली असली, तरी केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिकचा कथित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखे पसरल्यानंतर आता पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तांत्रिक विधीच्या नावाखाली विवाहित महिला आणि तरुणींचे शोषण करणाऱ्या खरातच्या या कृत्यांचे व्हिडिओ व्हायरल करून पीडितांची ओळख उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोपरगाव आणि बीडमधील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘खारगे समिती’चा अहवाल समोर आल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या अहवालात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असतानाच, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पार्थ पवार यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पवार कुटुंबातील सदस्य पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले होते. आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुटवडा नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सुरू असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचाही एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सावध भूमिका मांडली असून, व्हिडिओतील सर्व व्यक्ती सज्ञान असल्याने आणि कोणाची तक्रार नसल्यास यावर राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, संबंधित महिलेची काही तक्रार असल्यास नरहरी झिरवाळ यांना सोडायचे नाही, असा स्पष्ट इशाराही पवार यांनी यावेळी दिला आहे.
“हिंदू धर्म आणि राष्ट्र टिकवण्यासाठी कुटुंब टिकविणे काळाची गरज आहे. हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम कुटुंब टिकवणे अत्यावश्यक आहे.
राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखणीतून साकारली नवी राम धून!!, आज रामनवमीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्वतःच्या घटनेतून साकारलेली नवी राम धुन आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल वरून सादर केली.
अशोक खरातसारखा अघोरी आणि विकृत माणूस पुन्हा कधीही जेलबाहेर येऊ शकणार नाही, याची खात्री व्यवस्थापनाने करावी. जर राजकारणासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी त्याला बाहेर काढले, तर मी गप्प बसणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे. हे सगळे काही एकटा माणूस बनवू शकत नाही, त्यांचे सहकारी होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे त्याची गत जेफ्री एपस्टीनसारखी होऊ नये यासाठी त्याला कायम कॅमेऱ्याखाली ठेवा. तो जिवंत राहील याची व्यवस्था करा, असे ते म्हणालेत. राज्यातील 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचा दावाही आव्हाड यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी विधानसभा सभागृहात पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) च्या सर्वांगीण विकासाबाबत माझी भूमिका ठामपणे मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा खळबळजनक इशारा तटकरे यांनी दिला आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर तटकरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तसह तपासाचे तपशीलही मांडले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत आपण अपघाताच्या चौकशीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यात कोणाच्या बापालाही सोडणार नसल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना दिले आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात आज एका अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला आहे.
पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीचा तब्बल ४ हजार ३९२ पानांचा सविस्तर अहवाल अखेर विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत समितीने सावध पवित्रा घेतला आहे. अहवालात त्यांच्या नावाचा थेट कारवाईसाठी उल्लेख नाही. मात्र, “भविष्यातील फौजदारी तपासात जर अधिक लोकांचा सहभाग किंवा पुरावे आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते,” असे समितीने नमूद केल्याने हा विषय अद्याप संपलेला नाही, हे स्पष्ट होते.
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात.
स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??, असा सवाल रोहित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आणि सोशल मीडिया पोस्ट मुळे समोर आला.
राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे. दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.
राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दगडखाणी आणि गौण खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, गौण खनिज क्षेत्रातील मागील पाच वर्षांतील उत्खननाचे तीन महिन्यांत ईटीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट सिस्टीम) द्वारे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले. त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केला, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App