मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवले असताना ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली.
राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले.
मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या संततधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत असून, याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. या संततधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन तर विस्कळीत झालेच आहे, पण त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांत काही गंभीर दुर्घटनाही घडल्या आहेत.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा येथील भोर घाट सेक्शनमध्ये दोन ठिकाणी भूस्खलन झाले. तिन्ही रेल्वे लाईन प्रभावित झाल्या. 20 रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.
सध्या मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने घटनेपूर्वी इंटरनेटवर इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती.
आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोर धरला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, झेनिथ धबधब्याची पाणी पातळी अचानक वाढल्याने १०० पर्यटक अडकले.
राज्यभर मान्सूनने अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले, ओढे आणि तलाव तुडुंब भरून वाहत असून धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राज्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 26.42 टक्क्यांवर पोहोचला असून आगामी काही दिवसांत तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला.
राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. यासोबतच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनीही थेट शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. शिवसेना शिंदे गटात दाखल होताच सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले.
महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असताना, निष्ठावंतांना प्राधान्य देत ओमराजेंना ‘वेटिंग’वर ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी डॉ. श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आघाडीवर आहेत.
आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय. विधानसभेत आवाज उठवून आम्ही 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवले असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सरकारने हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्द येथील प्रगतशील शेतकरी संजीव गणपतराव इंदोरे यांनी आपल्या शेतात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या तुर्किस्तान बाजरा या वाणाची यशस्वी लागवड करून कृषी क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांकडून आता एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पक्षांतरानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या सविस्तर भूमिका मांडत, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, 2022 नंतर पक्ष संघटना कमकुवत होत गेली, कार्यकर्त्यांशी संवाद तुटला आणि स्थानिक पातळीवरील अडचणी वाढत गेल्यामुळे अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयावरून विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी “स्मार्ट मीटर बंधनकारक असून प्रीपेड मीटर ऐच्छिक आहे,” असे स्पष्टीकरण देताच विरोधी बाकांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “ही जनतेची लूट करणारे खोटे बोलणारे सरकार आहे,”
राज्यातील शाळकरी मुलांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर अखेर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. या चर्चेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनात उपस्थित असल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘रामरक्षा आंदोलन’ आणि रविवारी ‘महाआरती’ करण्याची घोषणा केली आहे. “आता हिंदू सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या घोषणेवर आता शिवसेना शिंदे गटाने अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला असून, उदय सामंत, शंभुराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर चौफेर टीका केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App