भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका सुरू असताना अनेक पीडित महिला समोर येत असून केवळ शोषणच नव्हे तर फसवणूक आणि आर्थिक गैव्यवहाराबाबत देखील तक्रारी नोंदवत आहेत. या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. अशोक खरात सावकारकीचा व्यवसाय देखील करत असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये त्याची पत्नी कल्पना ही देखील सामील असल्याचे समोर आले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेची विशेष महासभा गुरुवारी रणधुमाळीत पार पडली. निवडणूक आयोगाच्या मतदारयादी पडताळणी आणि नकाशीकरण (SIR) प्रक्रियेसाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात दोन मुस्लिम पक्षांचे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समर्थनाचे पहिल्यांदाच स्वीट करून पार्थ पवारने रोहित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांना जोरदार धक्का दिला.
अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांचे मिळून साधारण 50 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील आणि दोन्ही पक्ष मोडून टाकतील
राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली. यापूर्वी 31 मार्चपर्यंत असलेली ही मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आवश्यक कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. विविध विभागांशी संबंधित सहा मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून, त्याचा थेट फायदा शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला होणार आहे. जलसंपदा, पर्यावरण, महसूल आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत बदल घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न या निर्णयांतून दिसून येतो.
राजकीय वर्तुळात सध्या एक महत्त्वाची घडामोड चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रात पक्षातील काही निवडक पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, बाकीच्या नेत्यांच्या पदांबाबत मात्र मौन पाळल्याचे दिसते.
जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गंभीर असल्याचे समोर आले आहे. जालन्यातली कडवंची शिवारात ही दुर्घटना घडली. या अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलनाची” घोषणा करण्यात आली.
संजय राऊतांनी सूचक ट्विट करून शरद पवार महाराष्ट्रात फिरणार असल्याची माहिती दिली. पण त्यामुळेच पवार महाराष्ट्रात फिरून करणार काय??, हा सवाल समोर आला.
महाराष्ट्रात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!, हेच राजकीय वास्तव महाराष्ट्रातून समोर आले.
भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात माहिती मला होते. त्याला माझा विरोध नव्हता, असा खळबळजनक खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलीनीकरणात खूप फरक आहे. विलीनीकरण करू पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा, असे शरद पवार गटातील कोणी म्हटले नाही, असेही त्यांनी म्हटले.
बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आता आपला मोर्चा त्याच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली खरातची पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी गेलेल्या नाशिक पोलिसांनी, ती मिळून न आल्याने अखेर खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खरात टोळीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने कुणाच्या सांगण्यावरून या फोटोंवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? असा सवाल रोहित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा धोशा लावणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी कधीच विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांना नेता निवडा असे म्हटले नव्हते
मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी?’ त्यांचे राजकारण हे केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी सुरूआहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अशोक खरात एकटा प्रकरणात नाही. त्याला कोणाचे तरी पाठबळ होत. ते राजकारणी, पोलिस प्रशासनातील लोक, अधिकारी यांचं पाठबळ आणि संरक्षण असल्याशिवाय असे घडूच शकत नाही.एसआयटी आणि सरकारकडे सगळे व्हिडिओ पुरावे आहेत. यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, समाजकारणात काम करणारी लोक, नेत्यांच्या कुटुंबातील लोक यांच्या माध्यमातून सुद्धा शोषण झाले आहे. या सगळ्या प्रकरणाचा मूळापासून छडा लावला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांचा पक्ष तटकरे व चाकणकरांमुळे बदनाम झाला आहे. दादा आज असते तर त्यांनी हे अजिबात सहन केले नसते. त्यामुळे खरातला आधार व पाठबळ देणाऱ्यांना तुम्ही अभय देऊ नका, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला. सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या राजकारणावर सडकून टीका केली.
एकटे पवार मालक आणि बाकीचे बटाईदार!!; हेच का पवारांच्या 60 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीचे लोकशाही संस्कार??, असा सवाल विचारायची वेळ आमदार रोहित पवारांच्या एका ट्विटमुळे आली.
सेवा संस्थांच्या पाठीशी उभी राहणारी समाजाची शक्ती मोठी आणि संवेदनशील आहे. उमेद फाउंडेशनसारख्या संस्था अत्यंत कठीण परिस्थितीत दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठी जे कार्य करत आहेत, त्याला समाजाने आपली जबाबदारी मानून साथ दिली पाहिजे
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाच, याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर १०० टक्के परिणाम होणार असून, देशातील माल निर्यात न झाल्याने बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिंता व्यक्त केली असून, भविष्यात युरिया खताच्या साठ्याबाबतही काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाने सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरवर तटकरे कुटुंबातील सदस्यांचे फोटो झळकले, मात्र राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर, अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांना टोला देखील लगावला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App