उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना पूर्ण होत असतानाच, हवाई उड्डाण मंत्रालयाच्या ‘एएआयबी’ (AAIB) तपास यंत्रणेने या घटनेचा २२ पानांचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका झाडाला धडकले होते, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे. या प्राथमिक अहवालात अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी, अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत मनोज जरांगे पाटील यांना थेट धमकी दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय,” अशा आशयाची ही पोस्ट सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद व प्रतिष्ठेचा तथा त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा, असे ते म्हणालेत.
भक्ती चळवळीने समाजातील दोष दूर करत तथाकथित वंचित आणि उपेक्षित समाजाला नेतृत्त्वाची संधी दिली. परकीय आक्रमणांच्या अंधकारमय काळात जेव्हा राजकीय व्यवस्था कोलमडली होती, तेव्हा भक्ती आंदोलनानेच खंबीरपणे देशाचे नेतृत्व केले, असे प्रतिपादन भारतीय संतवाड़मयाचे अभ्यासक डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले.
अजित पवारांच्या विमाना अपघाता संदर्भात DGCI ने आपला प्राथमिक अहवाल आज जाहीर केला त्यामध्ये 22 पाने आहेत.
समाजात अनेक समस्या असून त्या सोडविण्याचे आणि समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य सामाजिक संस्था करत आहेत. ‘मी अधिकारी नाही, तर कार्यकर्ता आहे
आदित्य ठाकरे बरोबर बोलत आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी आज पुन्हा रेटली शरद पवार यांची राज्यसभा उमेदवारी!!, असे आज संजय राऊत यांच्या नियमित पत्रकार परिषदेत घडले. पण संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यातले between the lines न वाचता साधे तपशील जरी वाचले तरी शरद पवारांची राज्यसभा खासदारकी अवघड आहे हेच राजकीय वास्तव आज समोर आले.
मुंबईत सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विविध विभागांच्या बैठकांचा आणि नियोजनाचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आणि ब्रीफिंग बोलावले होते. मात्र, मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मंत्र्यांच्या ब्रीफिंगला दांडी मारणे आणि शासकीय कामात कसूर करणे ही बाब गंभीर मानत अखेर त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या तपासाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व 23 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आरोपपत्रात लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा सोडण्यास ठाम नकार दिला आहे. आम्ही राज्यसभेच्या जागेवरील आमचा दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आमच्या आमदारांनी आपली भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे, असे ते म्हणालेत.
अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सरकार FIR दाखल करून घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे त्यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा संशय निर्माण होतोय, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. अजित पवारांच्या अपघाताविषयी FIR का नोंदवला जात नाही? या प्रकरणी सरकार का अडथळे आणत आहे? सरकार एका FIR ला का घाबरत आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी या प्रकरणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात चुकीची आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत, भाजप आमदार योगेश सागर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुंबईत आल्यानंतर आपल्याला आलेल्या भाषिक अडचणीची आठवण सांगितली. मी मुंबई आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या. तेव्हा मी शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असे ‘सांस्कृतिक’ मराठी बोलायचो. पण इथे आल्यानंतर ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नसल्याची बाब माझ्या लक्षात आली आणि मी माझी भाषा बदलली, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून, रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘चौथे विश्व मराठी संमेलन 2026’ च्या उदघाटन प्रसंगी मराठी भाषा विभागामार्फत आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित, ‘जावे विनोदाच्या गावा… उलगडूया अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखराच्या बेतात असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आत्तातरी ठाम भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले.
दोन राष्ट्रवादींच्या घमासानात सगळ्याच पवारांचा एकछत्री अंमल धोक्यात!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले.
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली. मुंबईतील वरळी येथे आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे राज्याच्या राजकारणात आता अधिकृतपणे “सुनेत्रा पर्व’ सुरू झाले असून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
दहा वर्षांत अर्थव्यवस्था तीनपट झाली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार ६६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून पुढील ४ ते ५ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होईल, असा दुर्दम्य विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण, दावोस दौरा, मराठी शाळांचा मुद्दा यावर सविस्तर माहिती देताना विरोधकांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनेत्रा पवारांची निवड झाली त्याचवेळी प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षपदी कायम राहिले. त्यामुळे विलीनीकरणाच्या विरोधातला खुंटा हलवून अधिक बळकट झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनिता पवारांची निवड झाली. त्यांच्यासमोरच कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयाचे सावट अधिक गडद होत आहे. हा केवळ दुर्दैवी अपघात होता की नियोजित घातपात
टिपू सुलतानने 75000 हिंदू आणि 33000 नायर यांची हत्या केली हा खरा इतिहास गेल्या 70 वर्षांमध्ये आम्हाला कोणी शिकवला नाही पण म्हणून खरा इतिहास बाहेर यायचा राहिला नाही
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App