शरद पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी नाईलाजाने पाठिंबा देणारी काँग्रेस विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार का??, असा सवाल आज समोर आला.
परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत फेरबदलांच्या हालचाली सुरू असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच ‘कार्याध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या संभाव्य नेतृत्व बदलावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. “केवळ माणसं बदलून पक्ष वाढत नसतो, तुम्ही विचारांना मुठमाती दिली म्हणूनच तुमच्यावर ही ‘मरणअवकळा’ आली आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत दानवे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात भेटीबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले असून, हा सर्व प्रकार केवळ अज्ञानातून आणि दीपक केसरकर यांच्या आग्रहामुळे घडल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा त्यांना खरातच्या पार्श्वभूमीबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, असे विखे पाटलांनी सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनेक नेत्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणातील नवे कंगोरे समोर येण्याची शक्यता वाढली आहे.
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ‘वेषांतर’ करून कंपनीत प्रवेश मिळवला आणि पुराव्यांसह या रॅकेटचा पर्दाफाश केला. तसेच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास केला जात असल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१५ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय नेते, पत्रकार आणि उद्योजकांचा समाचार घेतला.
नाशिक मध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गोदावरी आरती केली, तर त्या उपक्रमाला कम्युनिस्टांनी आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध करून पाहिला. शेवटी पोलीस बंदोबस्तात आंबेडकर जयंतीची गोदावरी महाआरती करावी लागली.
धर्मांतराच्या विरोधात नाशिकच्या गोदा तीरावर प्रचंड शंखनाद होणार असून येत्या 30 एप्रिल रोजी धर्म जागरणाची महा गोदावरी आरती आयोजित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण देशाचा राजकीय नकाशा बदलायची तयारी; पण ठाकरे + पवार खेळत बसलेत घरातल्या घरात “खेळी”!!,
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. आतापर्यंत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा होत असलेल्या या प्रकरणात आता थेट पोलिस प्रशासनालाही धक्का बसला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणावरून महाराष्ट्र सरकार आणि जस्टिस बदर समितीवर निशाणा साधला आहे. या समितीने तज्ज्ञ संस्था किंवा लोकांचा सहभाग न घेता केलेले वर्गीकरण अशास्त्रीय असल्याचे सांगत, हे विभाजन केवळ ‘कास्ट’ पद्धतीने न होता ‘इक्वल डिस्ट्रिब्यूशन’च्या तत्त्वावर व्हायला हवे होते
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात ४० मिनिटांचा दूरध्वनी संवाद झाला, ज्या दरम्यान दोन्ही नेत्यांनी इराण युद्धावर चर्चा केली आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर भर दिला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, समतेचे अखंड पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदातीरी अत्यंत भव्य, भावपूर्ण आणि ऐतिहासिक असा अभिवादन सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व समाजातील भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले असून, विशेषतः आंबेडकरी जनतेचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
शरद पवारांनी वारकरी संप्रदायात “घुसलेले” “प्रतिगामी” “शोधून” काढले, पण त्यांना स्वतःच्याच पक्षातले दर्शनाचा काळाबाजार मांडणारे नेते नाही दिसले
राज्यातील पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत’ आता वराह पालनाचा समावेश करण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आज, १३ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री नितेश राणे यांनी या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचे नुसतेच धुमारे; पण बिहारमध्ये भाजपचे सत्तांतर बंगाल सत्तांतराच्या दिशेने!!, हे राजकीय वास्तव काल आणि आज समोर आले.
राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी “खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत” असा दावा केला होता. प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. “KYC केलेले खाते कधीही बनावट असू शकत नाही,” असे सांगत दमानिया यांनी चाकणकर कुटुंब आणि आरोपी अशोक खरात यांच्यातील कथित संपर्काची धक्कादायक आकडेवारीच सादर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही गंभीर आत्मचिंतन केले पाहिजे, असे त्या म्हणाल्यात.
राज्य सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाची स्थापना यांसारख्या मुद्द्यांसह ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकॅडमी उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा करत, पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App