राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधारी महायुतीत जाणे किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र, या सर्व चर्चांना आता खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पंढरपूर येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या शेतकरी अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याची किंवा अर्थमंत्रिपद स्वीकारण्याची कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले.
स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून निष्पाप भक्तांना आणि श्रीमंत व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या अशोक एकनाथ खरात ऊर्फ ‘भोंदू कॅप्टन बाबा’ याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठा कायदेशीर फास आवळला आहे. ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात 42.88 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तब्बल 3 हजार पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, महायुतीमधील अर्थखात्याचा तिढा आणि मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप या सर्वच मुद्द्यांवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध असून सर्व नेत्यांची नाराजी लवकरच दूर होईल’, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. मात्र सीबीआयच्या ७ सदस्यीय पथकाने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता या क्लासेसच्या कार्यालयात धाड टाकली. रात्री ९ वाजेपर्यंत पथकाने कागदपत्रांची सखोल झडती घेतली.
शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तरच शरद पवार गटाला एनडीएमध्ये सोबत घेऊ, अशी अट भाजप हायकमांडने टाकली आहे. विलीनीकरण झाले तर सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांना केंद्रात आणि जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद मिळेल, असे भाजपचे म्हणणे आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. आम्ही “जय श्रीराम’ जरूर म्हणतो, पण आम्हाला आता “भाजपमुक्त राम’ पाहिजे. प्रभू श्रीराम ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये प्रसिद्ध उद्योग समूह ‘फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज’ कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी विविध स्तुत्य उपक्रम राबवले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शोकोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोनम वांगचुकला पोलिसांनी जंतर-मंतर वरून हलविल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली पण राष्ट्रवादीतल्या संभाव्य फुटी बद्दल मात्र प्रश्न उडवून लावून त्यांनी मौन बाळगले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘रेणुका माता तांबुल’ या पवित्र प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) बहाल केले आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र : व्यूहरचना आणि कृती आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली.
बुद्धिबळाचा पट समोर येताच शरद पवारांनी राजा आणि वजीरालाच हात घातला, पण त्यामुळे तो दिल्लीतल्या वगैरे हात घातला की गल्लीतल्या वजीराला हात घातला??, असा सवाल समोर आला. त्याचे उत्तरही लगेच मिळाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली दौऱ्यावर गेले. गेल्या ४८ तासांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. याआधी १४ जुलै रोजी ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची राजी – नाराजी आणि अर्थ मंत्रालयाची मागणी यांची नेमकी राजकीय किंमत किती??, या सवालाचे सध्यातरी उत्तर ० (शून्य) या आकड्याने देता येईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत किंवा पक्षबाह्य कितीही राजी किंवा नाराजी व्यक्त केली
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील ‘जेपी नॉर्थ’ या नामांकित निवासी संकुलात गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. संकुलातील एका इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी एक महाकाय क्रेन अचानक थेट रहिवासी भागातील पार्किंग झोनमध्ये कोसळली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. हे दोघेही “अतिशय कपटी नेते” असून पक्षात मोठा राजकीय कट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वेळेत सावध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
अनेक वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात गाजत असलेल्या बहुचर्चित ‘लवासा हिल स्टेशन’ गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि शरद पवार, सुप्रिया सुळे व दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.
विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत, एमपीएससीची संगणकआधारित (ऑनलाईन) परीक्षा पद्धत लगेचच लागू न करता, ती ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तोपर्यंत सर्व परीक्षा या सध्याच्या प्रचलित (ऑफलाईन) पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत.
पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवरून संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युट्यूबर्स, सोशल मीडियावरील मिम्स आणि नेटीझन्सकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केले जात असताना,
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आता २९ जुलैपर्यंत वाढ केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहोत, असे मोठे विधान नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले होते. या विधानाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत उत्तर दिले आहे.
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App