रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने प्रख्यात कृषी तज्ज्ञ सुभाष शर्मा यांना 2025 चा गोदा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून गोदाजन्मोत्सवाच्या निमित्ताने रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य राष्ट्रजीवन सन्मान आणि आध्यात्मिक समरसता महोत्सवात येत्या 31 जानेवारीला तो प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे आणि काँग्रेसच्या निर्णय असा झाला, की आधी पवार काका – पुतण्यांच्या पक्षांच्या यशात पाचर मारायची, नंतर भाजपशी लढत द्यायची!!.
मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था एखाद्या लटकत्या खेळण्यासारखी झाली. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या पेक्षा सहा पट कमी लेखले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीपासून फारकत घेत मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीने आज 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या निवडणुकीची संपूर्ण धुरा नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, पक्षाने एकूण 100 जागा लढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवारांना उद्यापासूनच अधिकृत एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात फार मोठा राजकीय संगर होऊन ठाकरे बंधू ठरले लढवय्ये; पण शरद पवार ठरले पुतण्या पुढे शरणागत!!, हेच राजकीय वास्तव चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आज समोर आले.
मुंबई, पुणे, नाशिक यांच्यासह बहुतेक महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे कुठल्याही पक्षात विलीनीकरण झाले नाही, तर त्यांनी स्व हस्ते पक्षाची वाताहत करून घेतली. यशवंतराव चव्हाण यांनी दिग्गज नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
गौतम भाई आणि प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नसून, ते माझ्या हक्काच्या मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आमचे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानी कुटुंबाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे स्वागत करताना त्या बोलत होत्या.
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित बहुजन आघाडीला ठरविली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा सहा पट भारी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
शरद पवारांच्या बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम झाला. त्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून विद्या प्रतिष्ठानने शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले.
माओवाद्यांशी लढण्यासाठी फडणवीस सरकारने पोलिसांना बळ दिले. गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस आणि 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
नवी मुंबईतील कळंबोली येथील एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केली. महिलेला मुलगा हवा होता आणि मुलगी मराठीऐवजी हिंदी बोलत असल्याने ती नाराज होती, असे पोलिसांनी सांगितले.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. पण युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच हा मेळावा घेतल्याने युतीबाबत संशय बळावला.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेतील नाराजी उघडपणे समोर आली आहे. शिवसेनेने २५ जागांची मागणी केली आहे. परंतु भाजपकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला सुरूच असून, माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच काँग्रेसलाही आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपकडून विविध पक्षांतील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांनी एकत्रित निवडणूक लढवायची घोषणा केली. पण याला सेक्युलर फ्रंट असे नाव दिले असले, तरी त्या फ्रंट मध्ये प्रत्यक्षात इस्लाम पक्ष सामील झाला. त्यामुळे मालेगावातल्या सेक्युलर आघाडी विषयी राजकीय संशय बळावला.
महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.
पवार काका – पुतण्यांची युती फिसकटली, म्हणून इतर पक्षांवर जाळे टाकण्याची तयारी!!, हे राजकीय चित्र पुण्यातून समोर आले. जपने अजितदादांना महायुतीतून दूर सारल्यामुळे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडले, पण अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी सोडून द्या आणि घड्याळ हाती घ्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवा, असा आग्रह धरल्यामुळे पुण्यातली काका – पुतण्यांची युती फिस्कटली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या दादागिरीला जुमानले नाही.
भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले; पुतण्याच्या आवाजामुळे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकीपुढे तुतारीचा आवाज पिचकला!!,
मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत.
राज्यातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे आधीच वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगुलचालनावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून संबंधित नेत्यांचा विचार, दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App