आपला महाराष्ट्र

Sunil Tatkare

Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाले असून, या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आता एक नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला असला तरी, भविष्यात या पदावर खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का, या सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे.

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशात लाठीचार्ज अन् संतापाची लाट पसरली नसती,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली.

Gunratna Sadavarte

Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली

नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा रॅली’ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण आंदोलनावर आणि ठाकरे बंधूंवर कडाडून टीका केली आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde : राहुल गांधींना पंतप्रधान निवासावर घातपात घडवायचा होता; महाराष्ट्राने नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होते – एकनाथ शिंदे

नीट’ परीक्षा घोटाळा ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उद्या संसदेत नवा कायदा मांडला जाणार असून, त्यात १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे मूळतः अराजकीय होते; मात्र राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील पराभूत नेत्यांनी देशात बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनाचा राजकीय वापर केला, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : ‘मी महाराष्ट्रातच राहणार!’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम

शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे, फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. गेल्या महिन्याभरापासून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून आणि सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. मात्र, या सर्व तर्क-वितर्कांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णविराम लावला असून, “मी सध्या मुंबईतच असून यापुढेही महाराष्ट्रातच राहणार आहे,” असे स्पष्ट करत केंद्रात जाण्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

TET Paper Leak

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांच्या बिहारमध्ये मुसक्या आवळल्या:8 हजारांचा पेपर फोडून दीड कोटीला विकण्याचा कट उधळला

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला त्याच्या एका साथीदारासह बिहारमधील पाटणा येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भिवंडी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही फिल्मी स्टाइल धाडसी कारवाई केली.

Pandharpur Ashadhi

Pandharpur Ashadhi Ekadashi : पंढरपुरात सुरक्षेवर तैनात असलेल्या गंगाखेडच्या जवानाची आत्महत्या; शासकीय महापूजेच्या सुमारास सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी जमा झालेली असतानाच एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे जीवनयात्रा संपवलेल्या जवानाचे नाव आहे.

Gadchiroli

Gadchiroli : गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का; वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात ‘ऑपरेशन लोटस’; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला.

Abhijit Dipke

Abhijit Dipke : दीपके म्हणाले- आम्हाला कॉकरोच म्हटल्याबद्दल CJI यांचे आभार; नाहीतर आज प्रधान यांचा राजीनामा नसता; पंगा नाही, कॉकरोच आत शिरले की बाहेर येत नाहीत

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दीपके यांनी CJI सूर्यकांत यांचे आभार मानले. दीपके म्हणाले- जर तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हटले नसते, तर तरुण रस्त्यावर उतरले नसते. प्रधान यांनी राजीनामा दिला नसता.

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल शब्द नाही; पोलिसांच्या अत्याचारावर मौन, नुकसानभरपाईचे काय? प्रधानांच्या राजीनाम्यावर आंबेडकरांची टीका

वृत्तसंस्था मुंबई : ‘Prakash Ambedkar  नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय […]

Sharad Pawar

Sharad Pawar : युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- हा एकजुटीचा विजय

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. आता त्यावर पुढे काय निर्णय होती हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा पिढीच्या या आंदोलनाच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. युवा पिढीच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

CM Fadnavis'

CM Fadnavis’ : धर्मेंद्र प्रधानांचा व्यापक जनहिताप्रती वचनबद्धता दर्शवत राजीनामा:भाजप परिवार त्यांच्या पाठीशी – CM फडणवीस यांची प्रतिक्रिया

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “धर्मेंद्र प्रधानांनी व्यापक जनहिताप्रती वचनबद्धता दर्शवत राजीनामा दिला. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे,” असे ते म्हणाले.

Maharashtra government

Maharashtra government : कर्जमाफीतील पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहूनच करावी लागणार KYC; मोबाईल ओपीटीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद

राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनच आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मोबाईलवर ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. योजनेमध्ये योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा तसेच पारदर्शकता रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

Girish Mahajan

“बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना…” ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून गिरीश महाजनांचा खोचक टोला, संजय राऊतांवरही टीका

सध्या देशात तसेच महाराष्ट्रात देखील नीट पेपर प्रकरणावरून तसेच दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंचा संतप्त सवाल; विद्यार्थ्याला मारल्यावर शिक्षकांवर कारवाई होते; मग लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई का नाही?

नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर, सरकारवर आणि न्यायव्यवस्थेवरही सडकून टीका केली आहे.

Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जातोय; संजय शिरसाट यांचा ठाकरे, राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला स्वयंस्फूर्तीने उभे राहिले होते. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत होता. मात्र, आता काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून आंदोलनाला राजकीय रंग देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर टीका करत आंदोलनाच्या मूळ उद्देशापासून लक्ष विचलित होत असल्याचा दावा केला.

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात; ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य

राज्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, “सरकारविरोधात एखादा मुद्दा मिळाला की विरोधी पक्ष त्याचा फायदा घेतो. तेच त्यांचे काम असते,” असे म्हणत विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले.

Thackeray Brothers

Thackeray Brothers : नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला यावं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान, म्हणाले- विद्यार्थी आंदोलनातून ठाकरे बंधूंचा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न

नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असेही म्हटले.

Supreme Court

Supreme Court : ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून दिलासा नाही; 6 खासदारांच्या विलीनीकरणाला स्थगिती देण्यास नकार, लोकसभा अध्यक्षांना नोटीस

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झालेले विलीनीकरण तात्पुरते स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाला नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Uday Samant

Uday Samant : पोलिसांच्या लाठीचार्जला विरोधकच जबाबदार; मंत्री उदय सामंतांचा दावा, म्हणाले- आंदोलनात विरोधकांनी घुसखोरी केली

राजधानी दिल्लीत विद्यार्थी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला असताना, सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या कारवाईची पाठराखण केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळाच दावा करत या घटनेचे खापर थेट विरोधकांवर फोडले आहे.

Shambhuraj Desai

Shambhuraj Desai : खासदारांचे विलीनीकरण पूर्णपणे घटनात्मक; ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला दिलेल्या मान्यतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. सहा खासदारांचे शिवसेनेत झालेले विलिनीकरण हे पूर्णपणे संविधान, कायदा आणि संसदीय नियमांच्या चौकटीत झाले असून न्यायालयात गेल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; वंचितकडून 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : जंतरमंतरवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंची हजेरी; म्हणाले- देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले. ते मंचावर येताच, ‘महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आपल्यात आले आहेत’, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी देताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. या उत्साही वातावरणात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत आपली सविस्तर भूमिका मांडली.

Pandharpur

Pandharpur : पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल:दर्शनास लागतात 12 तास, मंदिर परिसरातील 65 एकर मैदानात झाले 650 दिंड्यांचे बुकिंग

आषाढी एकादशीचा सोहळा 25 जुलै रोजी साजरा होत असून पंढरपुरात दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल दर्शन रांगेत सध्या २० हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी 12 ते 14 तासांचा अवधी लागत आहे. दर्शनरांग गोपाळपूरजवळील सोळा नंबर शेडपर्यंत गेली असून दर्शन वेग प्रति मिनिट 32 ते 35 आहे. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी रांगेत घुसखोरी आणि पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीच्या अनेक तक्रारी आहेत.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात