एकीकडे कापसाच्या जागतिक मागणीमुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसत असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे.
मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे.
देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये १८ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर त्यांचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी टीका केली आहे.
मुंबईची शान आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’ चरणी यंदाही भाविकांनी भरभरून दान अर्पण करण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवानिमित्त आपल्या दरे या गावी आले आहेत. जागतिक बांबू लागवड दिनानिमित्त त्यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली.
दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील काही भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, सप्टेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाड्यासह विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील सेवापूर्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपुरात ‘एक दिवा आशीर्वादाचा’ उपक्रम आयोजित करण्यात आला.
राज्यातील वाढती वाहनसंख्या, रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात वन नेशन वन ई-चलान प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, अभिनेते टॉम हॉलंड आणि मॅट डेमन यांनी भेट दिलेल्या कुलाब्यातील १०८ वर्षे जुन्या ऑलिम्पिया कॉफी हाऊसवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे
दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे वडील सतीश सालियन यांनी उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली आहे.
मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, आता दुष्काळाशी लढा सुरू आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असला, तरी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम सुनावणीत शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांवर आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या
अजितदादा हयात असतानाची आणि सध्याची राजकीय परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होत्या. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होती.
राज्यातील महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख दाव्यांना प्रतिवाद केला.
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास मुंबई पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. परळी येथे जनता दरबार सुरू असतानाच त्यांना अचानक त्रास जाणवू लागला.
मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांनी आता मराठी भाषा शिकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App