मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे.
भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना भाजप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सावध पवित्रा घेत एकनाथ शिंदे यांनी छोट्या पक्षांशी देखील वाटाघाटी सुरू ठेवल्यात.
महापालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये. अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे?? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात. युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केले.
भाजप आणि दोन्ही पवारांनी चालविलेल्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका उद्भवला, इतकेच नाहीतर मतदारांना गृहीत धरल्याचा फटका सुद्धा बसू शकतो, याची शक्यता वाढल्याच्या खुणा आज दिसल्या.
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर नाशिक फार मोठे राजकीय नाट्य घडले. शिवसेना आणि मनसेच्या दोन माजी महापौरांनी काल मोठा जल्लोष केला.
आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर युतीची अधिकृत घोषणा केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खूप वर्षांनी दोघे भाऊ एकत्र आले आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. “काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज-उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. आता झालेली युती ही सत्तेसाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्यांना आपली पोरं सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार? असा तिखट सवालही शिंदेंनी उपस्थित केला.
राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर सुरू झालेला शाब्दिक कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि निवडणूक निकालांवरून जोरदार निशाणा साधला. माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी माझ्यावर टीका केली, असे दानवे यावेळी म्हणाले.
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युती संदर्भात तसेच आगामी महापालिकेच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले आहे. तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुण्याचे माजी महापौर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सहा तास चर्चा केली. त्यांचे मन वळवायचा प्रयत्न केला, पण त्यात सुप्रिया सुळे यांना अपयश आले. प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. अजित पवारांना असलेला विरोध कायम ठेवला.
महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला भाजपने 129 नगराध्यक्ष निवडून आणले. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा 57 नगराध्यक्ष निवडून आणले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 39 नगराध्यक्ष निवडून आणता आले. त्यापाठोपाठ राज्यातल्या फडणवीस सरकार नगराध्यक्षांच्या अधिकारांमध्ये वाढ करायचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत; पण 22 वर्षांच्या मुलीने दाखवून दिले, पवार म्हणजे बारामती नाहीत!!, हे राजकीय वास्तव देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. अशातच, मिरा भाईंदरमध्ये भाजपचे आक्रमक नेते आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या
नाशिक : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित अशी ठाकरे बंधूंची युती आज जाहीर झाली, पण दोघांनीही जागावाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला. युती जाहीर करण्यापूर्वी उद्धव ठाकरे मातोश्रीतून निघून राज […]
एका मौलानाने त्यांना 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सांगितले होते. यावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुले आहेत. तो म्हणतो की मला 30-35 मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका 19 मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन-चार-चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे राणा यांनी म्हटले आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सणीतले होते. यावरून राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे दोन पक्ष आघाडी करण्याची शक्यता बळावली असतानाच मराठी माध्यमांनी शरद पवार सत्तेत सामील व्हायची हवा करत आहेत, अशा दावा करणाऱ्या बातम्या दिल्या त्यासाठी वेगवेगळी आणि भली मोठी कारणे सुद्धा दिली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
एपिस्टाईन फाईल मधून जे धक्कादायक खुलासे झाले, त्यातून मराठी माणसाला पंतप्रधान बनायची संधी आहे, असे मी म्हटले होते. पण ते 19 डिसेंबरलाच होईल, असे मी म्हटले नव्हते. शिवाय जे पंतप्रधान होतील, ते नागपूरातले असतील. बारामती किंवा कराड मधले पंतप्रधान होणार नाहीत, अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला टोचले. पण त्या पलीकडे जाऊन पृथ्वीराज बाबांनी शरद पवारांच्या जुन्या राजकीय जखमेवर मीठ चोळले.
Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal stage aggressive protests Cuff Parade Mumbai. Demonstrators condemn Dipu Das murder Bangladesh following false blasphemy allegations. Police detain activists during South Mumbai agitation. Protesters demand international action against minority atrocities and communal violence.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा बुधवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली.
पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App