Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन, नागपूर येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उदघाटन केले. महाराष्ट्रात टाचणी पडली तरी तिचा आवाज विधिमंडळात पोहोचतो हीच संविधानाची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नागपूर येथील विधानसभेच्या समिती सभागृह येथे आज परिवहन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते “झेब्रू” या रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकरचे आज अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभेतले आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पद मिळावे म्हणून संख्याबळ कमी असलेले विरोधक फारच उतावळे झाले असताना भाजपने एक खेळी करून महाविकास आघाडीत पाचर मारली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्ध्याहून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. हे आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्याकडे या आमदारांची नावे असल्याचाही व प्रसंगी ते जाहीर करण्याचाही इ्शारा दिला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत असून आमची त्याबाबतची भूमिका कायम आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
विदर्भाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर ‘वेगळा विदर्भ’ हाच एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणे कठीण आहे, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, ओबीसी समाजावरील अन्याय आणि निधी वाटपातील तफावतीवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील आमगाव येथे एक प्रशिक्षणार्थी विमान 33 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला धडकून कोसळले. हा अपघात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. प्रशिक्षक पायलट अजित अँथनी आणि प्रशिक्षणार्थी पायलट अशोक छावडा जखमी झाले आहेत. तथापि, दोघेही धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात आयुष्य वेचलेले, हमाल–रिक्षाचालकांचे आधारस्तंभ, ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेते आणि समाजवादी विचारसरणीचे अजोड मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री 8.25 वाजता पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
राज्याची आर्थिक परिस्थिती जरी ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे जात नाहीये. देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्व निकषांमध्ये चढणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे.
तृणमूल काँग्रेसमधून निलंबित केलेले आमदार हमायून कबीर यांनी आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी मोठी राजकीय चाल खेळली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे.
चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांच्यावर उदयपूरमधील एका व्यापाऱ्याची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी एक वर्ष पूर्ण झाले असतानाच, राज्यातील राजकीय वातावरण मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून चांगलेच तापले आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.
महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर एकही नेता नाही. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सरकार विरोधी पक्षनेते पदाशिवाय पुढे रेटणार असल्याचा आरोप करून सगळ्या विरोधकांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय गदारोळ माजविला. विरोधकांना मराठी माध्यमांनी सुद्धा साथ दिली. महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद नसेल तर ती राज्याला लाज आणणारी जाणारी गोष्ट आहे, अशी मखलाशी काही मराठी माध्यमांनी केली.
बारामती नगरपरिषद निवडणूक लढवणारे कार्यकर्ते वाऱ्यावर; पण सुप्रिया सुळे भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात नाचल्या डान्स फ्लोअर वर नाचताना आढळल्या!!महाराष्ट्रात नुकत्याच नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावले. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने ठिकठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी तुटली. वेगवेगळ्या नेत्यांनी आपल्या स्थानिक सोयीनुसार आघाडी किंवा युती केली.
पवार काका – पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!, हेच राजकीय वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले. पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींना महाराष्ट्राच्या जनतेची किंवा 5 % सुद्धा पसंतीची पावती मिळाली नाही. सगळा महाराष्ट्र तळहातावरच्या रेषांप्रमाणे ओळखणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने फक्त 3 % पसंती दिली. यातून पवारांचा संपूर्ण महाराष्ट्रव्यापी नेतृत्व करण्याचा दावाही फोल ठरला.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही. त्याऐवजी पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येऊनच निवडणूका लढवायच्या या धोरणाला शरद पवारांनी मान्यता दिली, असा दावा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला होता. परंतु, प्रशांत जगताप यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छेद दिला.
देशातील सर्वात मोठी विमानसेवा म्हणून ओळख असलेल्या इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुणेसह देशातील अनेक विमानतळांवर उड्डाणे रद्द, अवधीपेक्षा अधिक विलंब आणि प्रवाशांच्या तक्रारींचा भडिमार वाढला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने इंडिगोवर कठोर कारवाई करावी आणि हा प्रकार कसा घडला, याची चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ही अपेक्षा कुणालाही नव्हती. यामागे जबाबदार कोण? याला उत्तर मिळालेच पाहिजे.
महाराष्ट्रात विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री पद रद्द करा, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला खरा, पण प्रत्यक्षात त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर घाव घातला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
दादरच्या इंदू मिलच्या परिसरात राज्यघटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात तयार होत असलेल्या इंदू मिल स्मारकाची पाहणी करून कामाची प्रगती जाणून घेतली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हेदेखील सोबत होते.
पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचं म्हणणं पवारांनी ऐकलं??; पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नाही??, असा सवाल विचारायची वेळ प्रशांत जगताप यांच्याच आजच्या वक्तव्याने आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App