महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची मोहीम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीपासूनच सुरू केली असून, आता त्याला केंद्र सरकारचे सुद्धा बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.
महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलून महाराष्ट्राचे ग्रामीण पेय जल धोरण आज जाहीर केले. त्यामध्ये दीर्घकालीन नियोजनावर भर ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेतले.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज १६ जूनला कोर्टात निकाल लागणार होता. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जयपूरमध्ये दोन तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांना मारहाण केली.
28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४ प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे.
केंद्र सरकारने देशात 100% शुद्ध इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, 13 जून रोजी नागपूर येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.
ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे आज भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत, “राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत,” असा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार सत्ताधारी महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. विशेषतः मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून ठाकरे गटातील काही खासदार फुटण्याच्या शक्यतेबाबत दावे केले जात होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत Uddhav Thackeray यांनी पक्षातील सर्व नऊ खासदारांना एकत्र आणत एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून टाकल्याचा गंभीर आरोप पटोले पटोले यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारातून भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा अक्षरशः गळा घोटला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर गेल्या तीन दिवसांपासून पंढरपुरात सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरकारने अधिवेशनापूर्वी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली.
जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या सोयीसाठी मुंबईतील विविध रस्त्यांवर मारण्यात आलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दादर पाठोपाठ आता गिरगाव आणि घाटकोपरमध्येही मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पट्ट्यांवर काळा रंग फासण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट शब्दांत भाष्य केले असून, “प्रत्येक गोष्टीला वादात ओढून राजकारण केल्याने कधीच मते मिळत नाहीत,” असा सणसणीत टोला त्यांनी मनसेला लगावला आहे.
राज्यात मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सध्या निराशाजनक चित्र आहे. केरळमध्ये वेळेवर दाखल होऊन वेगाने पुढे सरकलेल्या मान्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये उकाडा आणि दमट हवामानाचा त्रास कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!, असे राजकीय चित्र आज पंढरपुरात दिसले. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनात मराठा आंदोलन मनोज जरांगे आले आणि त्यांनी भाषण करून रोहित पवारांची पुरती गोची करून ठेवली.
‘370 रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने संपूर्ण प्रकरणाबाबत जाहीर माफी मागितली असून, आपल्याकडून मोठी चूक झाल्याची कबुली दिली आहे. प्रेक्षकाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांना वेळेवर विरोध करता आला असता, मात्र आपण तसे करू शकलो नाही, असे म्हणत त्याने टीकेलाही योग्य ठरवले आहे.
रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना थकावट दिसली, ना त्यांच्या उत्साहात कुठली कमी झाली.
त्यांनी “ऑपरेशन टायगर” केले, तर आम्ही “ऑपरेशन लांडगा” करू, या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे 2019 साली काय केले होते?? आणि त्यानंतर काय झाले??, असा सवाल विचारायची वेळ आली.
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलयाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (RPI) नेते Ramdas Athawale यांनी शरद पवारांना थेट NDAमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. “काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा NDAमध्ये सहभागी व्हा. भाजपसोबत काही अडचण असेल तर माझ्या RPIमध्येही येऊ शकता,” असे म्हणत आठवलेंनी नवी राजकीय ऑफर दिली.
वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या घटनेत संबंधित पोलिस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानाच्या विकासकामांना वेग आला असून पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील सुमारे 90 टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखड्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी हा दावा केला.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि तिचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष लेपन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या दोन दिवसांत दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन भाविकांना केले आहे.
रोहित पवारांनी पंढरपूर मध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केले खरे पण त्याचा सरकारवर दुष्परिणाम व्हायच्या ऐवजी त्यांच्यावरच “रिव्हर्स इफेक्ट” झाला. रोहित पवारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची संधी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App