राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार जर महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार झाले तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण आणखी दूर जाईल. यातल्या राजकारणात पवार कुटुंबाचा फायदा जरूर होईल, पण त्यांचे अनुयायी मात्र तोट्यात जातील.
राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तरच शरद पवार अर्ज दाखल करणार का आणि पराभवाच्या भीतीने तसा निर्णय घेणार का??, असे दोन सवाल त्यांच्याच समर्थकांनी केलेल्या काही विश्लेषणावरून समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026’ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, एआयमुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल घडत आहे. आपल्या शासनाने हा बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला असून, महाराष्ट्राला भविष्यसज्ज करण्याचा संकल्प आहे
एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागते आहे, हीच खरी बातमी आहे, असे म्हणायची वेळ सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हालचालींवरून आली आहे.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात सोमवारी सुमारे ३७, ८५८ हेक्टरवरील पिके, फळांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या जिल्ह्यांत गहू, ज्वारीचे पीक आडवे झाले. काढून ठेवलेला हरभरा भिजला. द्राक्षालाही मोठा फटका बसून भाजीपाला खराब झाला.
देशाच्या कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कुणालाही डिजिटली अटक करता येत नाही. असा कोणताही फोन किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो १००% फ्रॉड आहे हे ओळखा,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सायबर भामट्यांबाबत माहिती दिली. आमदार अबू आसिम आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या गुन्ह्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि धक्कादायक ‘मोडस ऑपरेंडी’ सभागृहासमोर मांडली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखला. कथित लाचखोरीच्या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारला धारेवर धरले. “मंत्रालय चालते हप्त्याने, फाइल हलते पैशाने’’ अशा जळजळीत घोषणा देत विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ग्वाही दिली.
केंद्रातल्या मोदी सरकारने अविकसित राहिलेल्या पूर्व भारताकडे विशेष लक्ष पुरवून त्या परिसरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले इतकेच नाही
केंद्रातल्या मोदी सरकारने पुढाकार घेऊन राबविलेल्या मेक इन इंडिया या उपक्रमाला महाराष्ट्रात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय.
महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता मिळेना, पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बांधल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या माड्या!!, असेच आज घडले.
अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर रंगलेल्या राजकारणाचे वर्णन करताना काही मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे हे “अजितदादांची जागा” घेत असल्याची मखलाशी चालविली आहे, पण मूळात काँग्रेसी विचारांच्या पक्षांची political space कमी होत चालली आहे याकडे मात्र त्यांचे लक्ष नाही.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. त्यात ते म्हणाले की, अजितदादांच्या रूपाने मी एक जवळचा मित्र गमावला. अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती. नियतीने कधीतरी त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले असते.
विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द रुट्स स्पा’ येथे स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाहून दोघेजण दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करताना पडून जखमी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर एक पुरुष जखमी झाला आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.
सह्याद्रीच्या धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा असोत की मेळघाटचे दुर्गम भाग, आता प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत ‘लालपरी’ पोहोचणार आहे. ‘केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आता आदिवासी पाडा तिथे एसटी’ असा ठाम निर्धार करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू केला आहे.
महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकात एक सुभाषित आहे. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो, असे त्यामध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच उरली नाही. याचे प्रत्यंतर काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आले. कारण महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी दांडी मारली, तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी संजय राऊत आज उतावळे झाले.
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या घटनेनंतर अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली आहे. या लाचखोरी प्रकरणात संबंधित मंत्र्यांविरोधात कोणताही ठोस पुरावा समोर आला नसल्याचे स्पष्ट करत, जर पुरावे उपलब्ध असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वतःहून योग्य ती कारवाई करते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? यावर सरकारने मौन सोडून स्पष्टीकरण द्यावे. देशात यावर चर्चा सुरू असताना सरकार केवळ दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे?” असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. तसेच अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीने आज साठी मध्ये पदार्पण केले. 1967 मध्ये ते विधानसभेवर निवडून पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या संसदीय निवडणुकीत एकदाही पराभव झाला नाही. ते संसदीय परंपरेतल्या विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहांचे सदस्य राहिले. बारामती पासून ते दिल्ली पर्यंत शरद पवार हे व्यक्तिमत्व कायम माध्यमांच्या चर्चेत राहिले. पंतप्रधान पदाची स्पर्धेपासून ते राज्यसभा सदस्यत्वासाठी धडपड या सगळ्या पातळ्यांवर शरद पवारांची चर्चा झडली
नाशिक : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी मुंबईत एकत्रित बैठक घेतली, पण महाविकास आघाडीच्या या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App