राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेत्यांना डावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे थेट मंत्री नितेश राणे यांच्याबरोबर एकाच रथात मिरवणुकीत सामील झाले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!, हे राजकीय वास्तव आज दोन महिन्यांनी पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.
ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातून समोर आले.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी वाल्मीक कराड यांची बीड जिल्हा कारागृहात अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना गुप्तांगाच्या भागात तीव्र वेदना आणि गंभीर संसर्गाचा त्रास होत असून त्यामुळे कारागृह प्रशासन आणि वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून सध्या त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचे मूळ आणि तांत्रिक दुवे शोधण्यासाठी न्यायालयाने मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
मुंबई येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) ७० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (पैशांची बेकायदेशीर उलाढाल) प्रकरणात अशोक खरात याला अटक करण्याची परवानगी दिली. बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आधीच सामना करत असलेल्या खरातला नाशिक जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. नाशिक रोड कारागृहातून मंगळवारी सकाळी १० वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अशोक खरात याचा ताबा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ आणि ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१९ मे) एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशातील चार बड्या उद्योगसमूहांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रात तब्बल २५,४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करतानाच तब्बल १ लाख २० हजार तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या ६ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या अभूतपूर्व अणुऊर्जा करारांवर मंगळवारी मंत्रालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू आणि पूर्णगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे हा प्रकल्प होणार आहेत.
राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांना आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण प्रशासकीय पावले उचलली आहेत. नॉन क्रीमी लेअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा सध्याच्या ८ लाख रुपयांवरून थेट १५ लाख रुपये करण्याची शिफारस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने केली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच अंतिम बैठक होणार आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संदर्भात नुसती बातमी आली, तर लगेच खासदार पार्थ पवारांनी खुलासा करून टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरापासून गदारोळ सुरू आहे, त्यावर मात्र पार्थ पवारांनी मौन बाळगले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील 6 तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली.
राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??, असे दोन परखड सवाल विचारायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस मधल्याच घडामोडींमधून आली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लग्नघरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. काही लोक पक्षाविषयी मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. पण आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतून भाजप जाणाऱ्या 40 लोकांची नावे असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर येत असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्याचे समोर आले आहे.
विद्येचे माहेरघर आणि महिलांसाठी सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरात धावत्या कारमध्ये एका महिला वकिलावर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले मुख्य संशयित अशोक खरात आणि पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे
महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना लवकरच विकासाची नवी झळाळी मिळणार असून आज त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुढील विषयांवर चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतील विजेते व उपविजेत्यांना धनादेश आणि पुरस्कारांचे वितरण केले.
देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट ३ रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. “आज ९६ रुपयांना मिळणारा डॉलर महिन्याभरात १०० रुपयांवर जाईल, तर पेट्रोलचे दर १२० ते १३० रुपयांवर पोहोचतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही जण थोडक्यात बचावले आहेत.
“राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह पार्थ पवार यांची भेट, कथित ऊर्जा संकट, ड्रग्जविरोधी मोहीम आणि मराठा समाजाच्या कल्याणकारी योजना अशा विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
हिंदुंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र, बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्यांचे पालन हा ‘पंचपरिवर्तनाचा’ मंत्र आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!
शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा हा नाशिक आणि धुळे जिल्ह्या येत्या २१ मे ते २२ मे रोजी पार होणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App