गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातील एका न्यायालयाने आम आदमी पार्टी (आप) चे आमदार चैतर वसावा, त्यांची पत्नी आणि इतर 7 जणांना 7-7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण आणि खंडणी मागितल्याचा आरोप होता.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग चौथ्या दिवशी आपले धरणे-प्रदर्शन सुरू ठेवले. यावेळी दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दहशतवाद्यांची B टीम असल्याच्या विधानाला उत्तर दिले.
श्री सद्गुरू कृपेनें रामतीर्थ निरंजन मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान होणारे श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा भव्य पट्टाभिषेक सोहळा(चादर विधी) शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी अभिजित मुहूर्तावर संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. हा सोहळा महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज, विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मठांचे साधू – महंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले. विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!
द्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यात बरेच राजकारण घडले, पण राष्ट्रवादीतले अस्तनीततले निखारे कधी विझवणार??, असा सवाल आज विधानसभेतल्या एका भाषणामुळे आला.
विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या बंडखोर खासदारांच्या खात्यात ‘खासदार निधी’चे (MPLADS) कोट्यवधी रुपये पडून असल्याचे आकडेवारीसह समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली.
पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न काढता याला मूक संमती दिली,” अशी टीका राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
धानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत
इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडासारखेच एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आज खायचे दात दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भारतात कुराण लागू करायची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी सना मलिक यांचे भाषण उचलून धरले.
माहितीचा अधिकार (RTI) हा शासनाने जनतेवर केलेला उपकार नसून तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, राज्य सरकारने १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेले ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ हे या कायद्याची धार बोथट करणारे आणि भ्रष्टाचाराला ढाल देणारे आहेत. प्रशासनातील ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी आणि माहितीचा अधिकार वाचवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही,” असा थेट आणि निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सुरू असलेला राजकीय विद्रोह तीव्र झाला आहे. सोमवारी बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी टीएमसीच्या समांतर कार्यसमितीची घोषणा केली. आमदार अरूप रॉय यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. याला ममता बॅनर्जींसमोरील आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे,” असा घणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे सहा खासदार आज अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व खासदार सध्या मुंबईत दाखल झाले असून ते शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र या राजकीय घडामोडींदरम्यान शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक खुलासा केला असून, त्यांच्या माहितीनुसार या प्रवेशासाठी केवळ सहा नव्हे, तर तब्बल सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग, बंडखोरी, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणांनी निकालांवर मोठा प्रभाव टाकल्याचे दिसून आले.
मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आम्ही कोणतेही ‘ऑपरेशन’ अर्धवट सोडत नाही, तर ते ‘फुलप्रूफ’ करतो. 2022 मध्ये आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा चाळीस आमदारांचा चौकार मारला होता आणि आता थेट 6 खासदारांचा षटकार (सिक्सर) मारला आहे,” अशी तुफान फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन राज्याच्या काही भागांत पाऊस पडला असला तरी, त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली होती. जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून सोमवारी अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सकारात्मक वातावरणातच भारतीय हवामान विभागाने आपला नवा अंदाज वर्तवला असून, त्यानुसार पुढील 48 तासांत संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये दुष्काळ आणि पुराचा धोका आहे. याचे कारण अल निनोची मजबूत स्थिती आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) नुसार, पश्चिम प्रशांत महासागरात 1997 नंतर अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
शिवसेनेच्या परिवारामध्ये ६ नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेतून फुटून आलेल्या खासदारांना दिला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या पराभव झाला. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पाडला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लेबनॉनमधील त्यांची इस्रायल-समर्थक संघटना, हिजबुल्लाहच्या कारवाया थांबवण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर इराण हिजबुल्लाहला रोखण्यात अयशस्वी ठरला, तर अमेरिका गेल्या आठवड्यापेक्षाही अधिक तीव्र हल्ला करेल.
शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची टंचाई हेच असल्याचे स्पष्ट केले आहे.
विधान परिषद निवडणुकांचा निकाल समोर आला. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीत मिठाचा खडा पडला. त्यामुळे विजयी अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांच्यावर माफी मागायची वेळ आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App