राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुढचे काही दिवस गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये प्रसिद्ध उद्योग समूह ‘फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज’ कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी विविध स्तुत्य उपक्रम राबवले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शोकोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोनम वांगचुकला पोलिसांनी जंतर-मंतर वरून हलविल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली पण राष्ट्रवादीतल्या संभाव्य फुटी बद्दल मात्र प्रश्न उडवून लावून त्यांनी मौन बाळगले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘रेणुका माता तांबुल’ या पवित्र प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) बहाल केले आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र : व्यूहरचना आणि कृती आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली.
बुद्धिबळाचा पट समोर येताच शरद पवारांनी राजा आणि वजीरालाच हात घातला, पण त्यामुळे तो दिल्लीतल्या वगैरे हात घातला की गल्लीतल्या वजीराला हात घातला??, असा सवाल समोर आला. त्याचे उत्तरही लगेच मिळाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली दौऱ्यावर गेले. गेल्या ४८ तासांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. याआधी १४ जुलै रोजी ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची राजी – नाराजी आणि अर्थ मंत्रालयाची मागणी यांची नेमकी राजकीय किंमत किती??, या सवालाचे सध्यातरी उत्तर ० (शून्य) या आकड्याने देता येईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत किंवा पक्षबाह्य कितीही राजी किंवा नाराजी व्यक्त केली
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील ‘जेपी नॉर्थ’ या नामांकित निवासी संकुलात गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. संकुलातील एका इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी एक महाकाय क्रेन अचानक थेट रहिवासी भागातील पार्किंग झोनमध्ये कोसळली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. हे दोघेही “अतिशय कपटी नेते” असून पक्षात मोठा राजकीय कट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वेळेत सावध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
अनेक वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात गाजत असलेल्या बहुचर्चित ‘लवासा हिल स्टेशन’ गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वात मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि शरद पवार, सुप्रिया सुळे व दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह इतरांवर गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.
विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत, एमपीएससीची संगणकआधारित (ऑनलाईन) परीक्षा पद्धत लगेचच लागू न करता, ती ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तोपर्यंत सर्व परीक्षा या सध्याच्या प्रचलित (ऑफलाईन) पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत.
पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवरून संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युट्यूबर्स, सोशल मीडियावरील मिम्स आणि नेटीझन्सकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केले जात असताना,
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आता २९ जुलैपर्यंत वाढ केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहोत, असे मोठे विधान नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले होते. या विधानाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत उत्तर दिले आहे.
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी धडपडाट; म्हणून तर फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याचा घालताहेत “घाट”!!, हेच राजकीय वास्तव राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यातून समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या “एक्सप्लेनेशन मोडचा” आज तिसरा दिवस आला. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचा खुलासा केला.
तिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
CBI ने बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग सेंटर मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी केमिस्ट्रीच्या पेपरसाठी 5 लाख रुपये दिले होते.
ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गीतेश आणि सासरे विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील ७ जणांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने राऊत कुटुंबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर संरक्षण नसून, पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई केली जाऊ शकते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App