अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना मिळणार, अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी चालवली असताना प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते
दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा आणि नेतृत्वाची देखील खेचाखेच!!, हे राष्ट्रवादी काँग्रेस मधले राजकीय वास्तव आता उघड झाले.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून धक्का बसला. न्यायालयाने आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात दाखल केलेली त्यांची याचिका फेटाळून लावली. या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार आपल्याकडे नाही, असे न्यायालयाने म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीच्या विमानतळावर लँड करत असतानाच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला आहे. आता हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता याची चौकशी एएआयबी या संस्थेने सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच, त्यात मध्येच राष्ट्रवादीचा ऐक्याचा खोडा घालायचा आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे, असा डाव राष्ट्रवादीतले काही नेते खेळत असल्याचे उघड झाले.
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य समोर आले आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी थेट सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करत अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. झिरवाळ यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर त्यांचे विमान लँड होत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. विमान लँड करत असताना दृश्यमानता कमी असल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शंका उपस्थित केली आहे.
अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!, हे राजकीय वास्तव अजितदादांना निरोप देण्याच्या दिवशी समोर आले.
अजितदादांचा राजकीय वारस एकटे शरद पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??, हा खरं तर “सवालच” नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरोप देताच त्यांच्या राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आता आणि विशिष्ट निर्णयाक वळणावर आले आहे.
आम्ही बारामतीकर आहोत, असा आम्हाला माज असतो पण दादा गेले आणि आमच्या बारामतीकरांचा माज गेला!!, अशा शब्दांमध्ये बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या आठवणी सांगितल्या. या संदर्भातली बातमी सकाळने दिली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल होणार नाही. कारण नियमांमध्ये तशी तरतूद नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयोगाने केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
आम्ही दोघे मंगळवारी (दि. २७) मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत भावुक अंतःकरणाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे हे मोठे नुकसान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा निव्वळ एक अपघात असून यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट करतानाच, शरद पवार यांना शोक अनावर झाल्याने बोलणेही कठीण झाले होते. खरे तर आज मी प्रसारमाध्यमांसमोर येणार नव्हतो, असे नमूद करत त्यांनी आपल्या पुतण्याला गमावल्याचे दुःख अत्यंत जड अंतःकरणाने व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी, असे ते म्हणाले.
अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, असे देखील फडणवीस म्हणाले.
बारामती जवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार कालवश झाले. या दुर्घटनेबद्दल देशात अनेकांनी संशयाचे मळभ निर्माण केले. संशयाने भरलेल्या या वातावरणात शरद पवारांनी एक वक्तव्य केले.
बारामतीच्या विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार कालवश झाले. त्यानंतर या अपघाताविषयी अनेकांनी अनेक संशय व्यक्त केले. पण त्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी राजकीय संशय पेरणी केली
आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान सकाळी 8:15 ते 8:30 वाजेदरम्यान बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या तयारीत असताना शेजारच्या शेतात कोसळले. या भीषण विमान अपघातात काळाने महाराष्ट्राचा एक करारी, कामाचा मोठा झपाटा असलेला, रोखठोक भूमिका घेणारा नेता हिरवला. अजितदादांच्या विमानाचा मोठा स्फोट झाला. या मृत्यूने महाराष्ट्राला,
एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये कालवश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. आहे.
बारामतीतल्या विमान अपघातात घडलेल्या अजित पवारांच्या अकाली exit नंतर महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड shock wave आली.
बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकलहर पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोरकेपणाची भावना आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि हजारो कार्यकर्त्यांना अश्रू आवरले नाहीत. सगळे शोक सागरात बुडाले.
अजित पवार आपल्या राजकीय कर्मभूमीत बारामती मध्येच विमान अपघातात कालवश झाले. एक अत्यंत कार्यक्षम पण वादग्रस्त नेत्याची अचानक political exit झाली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App