सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी धडपडाट; म्हणून तर फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याचा घालताहेत “घाट”!!, हेच राजकीय वास्तव राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यातून समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या “एक्सप्लेनेशन मोडचा” आज तिसरा दिवस आला. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचा खुलासा केला.
तिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
CBI ने बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग सेंटर मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी केमिस्ट्रीच्या पेपरसाठी 5 लाख रुपये दिले होते.
ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गीतेश आणि सासरे विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील ७ जणांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने राऊत कुटुंबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर संरक्षण नसून, पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई केली जाऊ शकते.
राज्य सरकारने दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासनादेश जारी केला आहे.
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजासाठी आणखी दोन अत्यंत मोठ्या घोषणा केल्या.
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली.
वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण पडत असल्याने, प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साध्या बसगाड्यांसाठी लागू करण्यात आलेली १० टक्के तात्पुरती भाडेवाढ आता ३१ जुलै २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकाद्वारे ही अधिकृत माहिती दिली असून, प्रवाशांनी या निर्णयास सहकार्य करावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा “एक्सप्लेनेशन मोड” संपेना; करावा लागलाय वारंवार खुलासा!!, हे चित्र सलग दोन दिवसांमध्ये दिसले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची हीच अवस्था सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आली.
चित्रपट अभिनेता आमिर खान यांच्या तिसऱ्या लग्नावरून यूपीमध्ये फतवा जारी करण्यात आला आहे. हा फतवा अलीगढमध्ये यूपीचे शाही चीफ मुफ्ती मौलाना चौधरी इफ्राहीम हुसैन यांनी मंगळवारी दुपारी सुमारे 1 वाजता जारी केला.
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, “राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यांना चुकीचे ब्रीफिंग मिळत आहे,” असा दावा केला. याचवेळी त्यांनी राज्य सरकारने पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केल्याचे सांगत, दोषींना पुन्हा अशी हिंमत होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी म्हणे एकत्र जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला. त्यात मोठा भूकंप होणार, अशा बातम्यांचे पेव फुटले. त्यामध्येच अमोल मिटकरी या विधान परिषदेतून निवृत्त झालेल्या आमदाराने आपल्या ट्विट मधून भर टाकली. त्यात राष्ट्रवादीच्या तथाकथित हक्काच्या अर्थ मंत्रालयाच्या बातमीची शेपूट जोडली.
हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत, पंढरपूर शहर आणि नजीकच्या परिसरात १५ जुलै ते २९ जुलै असे सलग १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीला पक्षातूनच आव्हान देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सुनेत्रा पवार यांची निवड पूर्णपणे कायदेशीर असून, सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत कोणतेही तथ्य नाही’, असा दावा तटकरे यांनी केला आहे.
राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात सरकारने कडक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 18 बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्जमाफी, पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत चर्चांवरही भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा दिला असून एकूण २३ लाख शेतकऱ्यांना त्या योजनेचा प्रोत्साहनपर लाभ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेतला. त्याचबरोबर अन्य निर्णय देखील घेतले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मटण – मांस विक्रीवर बंदी; पण खवचट मराठी माध्यमांना “खटकली” खवय्यांची “कोंडी”!! असला प्रकार आज समोर आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला झारखंड सारख्या दुरुस्त राज्यातून आव्हान मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस झटकन explanation mode मध्ये आली, किंबहुना पक्षाला तशा mode मोडमध्ये यावे लागले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App