राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना कमोडिटी करून ठेवलेय आणि त्यांना विनोदाचा विषय करून ठेवलेय, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशिक मधल्या कार्यक्रमात व्यक्त केली.
संजय राऊत यांनी त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत आजपर्यंत केलेली सगळी भाकिते खोटी ठरली असताना सुद्धा आज त्यांनी धडाक्याने नवे राजकीय भाकित केले.
विधान परिषदेत विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही घरात बसणारे ‘फेसबुकवाले’ नसून थेट जनतेत जाणारे ‘फेस टू फेस’ काम करणारे लोक आहोत,” असा सणसणीत टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
विधानसभेतील भाषणानंतर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंकवरील पुलाबाबत पसरवलेल्या खोट्या माहितीवर संताप व्यक्त करत, त्यांनी आधी वापरलेल्या ‘भाडे की टट्टू’ या शब्दाचा संदर्भ स्पष्ट करत ‘भाटक गदर्भ’ आणि ‘सुपारीबाज’ असे शब्द वापरले
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत १८ विधेयके पारित झाली, १०१ तास १० मिनिटे कामकाज चालले. सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची माहिती आज सदनासमोर ठेवली.
राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी ५० हजार रुपये भरण्याची जाचक अट सरकारने पूर्णपणे काढून टाकली आहे. यामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम 155’ चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे करणाऱ्या आणि जमिनींचे फेरफार करणाऱ्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली.
मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर विरोधकांचा फुलटॉस; देवेंद्र फडणवीसांचा षटकार; बाकीच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गमावली संधी!!, हेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. विरोधकांनी फडणवीस सरकारला खऱ्या अर्थाने कधी घेरलेच नाही.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.
सशक्त लोकशाहीत विरोधकांची सुद्धा संवाद हवा, असे पालुपद शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोलापूर दुसऱ्यांदा लावले. पण या संवादातून सगळ्या डगरींवर हात पाय ठेवण्याची सोय त्यांनी करून घेतली.
मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील “मिसिंग लिंक” प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
महाराष्ट्रामध्ये संस्कार जपण्याची पद्धत आहे. शरद पवार यांच्यासारखे देशाचे आणि राज्याचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असेल, तर त्यात वावगे काय? प्रत्येक घटनेला राजकीय रंग आणि आयाम देऊ नये,” अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच विधानभवनात सीमाप्रश्नासंदर्भातील एका बैठकीला हजेरी लावली. यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक बोलावली. विशेष म्हणजे, ही बैठक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत दालनात पार पडली. यावेळी शिंदेंनी पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या सन्मानाने स्वागत केले. मात्र, या सदिच्छा भेटीवरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.
महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने मोठा वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे
“पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरतात आणि चक्क हिंदीतून बोलतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, समोर बसलेले आमदार मराठी आहेत, मग तुम्ही विधानसभेत हिंदीतून कुणाला दम देत आहात? दिल्लीत बसलेल्या तुमच्या पक्षातील वरिष्ठांना संदेश द्यायचा आहे का?” अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.
भांडवली बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी सेबी म्हणजेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या माजी प्रमुख माधबी पुरी बुच यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. बुच यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मंजुरी देणारा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं दिलेला आदेशच मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.
मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले. त्यामुळे दोन कट्टर पवार विरोधक एकमेकांच्या विरोधात गेल्याचे सगळ्या महाराष्ट्रासमोर आले.
राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर केला असून, विशेषतः कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी प्रशासनाकडून विविध स्तरांचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत बचाव पथकांना मोठे यश मिळाले आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली कोसळलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती कायम असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.
देशात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे ऑनलाइन रॅडिकलायझेशन (कट्टरवादाचा प्रसार) आणि झारखंडमधील रांची येथील १६ जूनच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावरील पेट्रोल बॉम्बहल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मोठी कारवाई केली. एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील ३ ठिकाणांसह देशातील नऊ राज्यांमध्ये २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
कुठेच काही जमत नाय म्हणून पवारांच्या पक्षाचे तीन डगरींवर हात पाय!!, असला प्रकार शरद पवारांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेतलेल्या बैठकीतून समोर आला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या सहा महिन्यांमधली अवस्था अशीच झालेली दिसली.
यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर्षीच्या रांगेतील काही शेड कमी झाले असले, तरी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर समितीने यंदा तब्बल २० नवीन पत्राशेड आणि एका भव्य जर्मन हँगर मंडपाची पर्यायी व्यवस्था केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील ग्रामीण भागात मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. राज्यात आजही तब्बल 7 हजार 444 (20 टक्के) गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नाही. परिणामी, पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत किंवा उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App