वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलनाची” घोषणा करण्यात आली.
संजय राऊतांनी सूचक ट्विट करून शरद पवार महाराष्ट्रात फिरणार असल्याची माहिती दिली. पण त्यामुळेच पवार महाराष्ट्रात फिरून करणार काय??, हा सवाल समोर आला.
महाराष्ट्रात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.
शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!, हेच राजकीय वास्तव महाराष्ट्रातून समोर आले.
भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात माहिती मला होते. त्याला माझा विरोध नव्हता, असा खळबळजनक खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलीनीकरणात खूप फरक आहे. विलीनीकरण करू पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा, असे शरद पवार गटातील कोणी म्हटले नाही, असेही त्यांनी म्हटले.
बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आता आपला मोर्चा त्याच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली खरातची पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी गेलेल्या नाशिक पोलिसांनी, ती मिळून न आल्याने अखेर खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खरात टोळीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने कुणाच्या सांगण्यावरून या फोटोंवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? असा सवाल रोहित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा धोशा लावणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी कधीच विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांना नेता निवडा असे म्हटले नव्हते
मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे कुटुंबावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी?’ त्यांचे राजकारण हे केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी सुरूआहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अशोक खरात एकटा प्रकरणात नाही. त्याला कोणाचे तरी पाठबळ होत. ते राजकारणी, पोलिस प्रशासनातील लोक, अधिकारी यांचं पाठबळ आणि संरक्षण असल्याशिवाय असे घडूच शकत नाही.एसआयटी आणि सरकारकडे सगळे व्हिडिओ पुरावे आहेत. यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, समाजकारणात काम करणारी लोक, नेत्यांच्या कुटुंबातील लोक यांच्या माध्यमातून सुद्धा शोषण झाले आहे. या सगळ्या प्रकरणाचा मूळापासून छडा लावला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांचा पक्ष तटकरे व चाकणकरांमुळे बदनाम झाला आहे. दादा आज असते तर त्यांनी हे अजिबात सहन केले नसते. त्यामुळे खरातला आधार व पाठबळ देणाऱ्यांना तुम्ही अभय देऊ नका, असे शरद पवार गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला. सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या राजकारणावर सडकून टीका केली.
एकटे पवार मालक आणि बाकीचे बटाईदार!!; हेच का पवारांच्या 60 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीचे लोकशाही संस्कार??, असा सवाल विचारायची वेळ आमदार रोहित पवारांच्या एका ट्विटमुळे आली.
सेवा संस्थांच्या पाठीशी उभी राहणारी समाजाची शक्ती मोठी आणि संवेदनशील आहे. उमेद फाउंडेशनसारख्या संस्था अत्यंत कठीण परिस्थितीत दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठी जे कार्य करत आहेत, त्याला समाजाने आपली जबाबदारी मानून साथ दिली पाहिजे
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाच, याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर १०० टक्के परिणाम होणार असून, देशातील माल निर्यात न झाल्याने बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिंता व्यक्त केली असून, भविष्यात युरिया खताच्या साठ्याबाबतही काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाने सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरवर तटकरे कुटुंबातील सदस्यांचे फोटो झळकले, मात्र राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर, अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांना टोला देखील लगावला आहे.
मराठा समाजातल्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशोक खरातची खरी जात शोधा. तो मराठा आहे की अन्य जातीचा आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता बॅनर वॉरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरून पक्षाचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅनरवर केवळ खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबाचेच वर्चस्व दिसून आल्याने, रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोचरा वार केला आहे.
मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1.75 लाख कोटी रुपयांनी घटले. मध्य पूर्वेतील तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या भीतीने ही घसरण झाली आहे.
धार्मिक श्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि कोट्यवधींची माया जमवणारा नराधम अशोक खरात महिलांना गुंगीकारक पेढा आणि कडवट पाणी देऊन संमोहित करायचा आणि नंतर अत्याचार करायचा, असा खळबळजनक आरोप रविवारी (दि. २९) नाशिक जिल्हा न्यायालयात सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. खरातच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला हजर केले असता, अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश श्रीमती बराडे यांनी त्याला १ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे.
30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना सावध केले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील का??, असा गंभीर सवाल राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नव्या चर्चेमुळे समोर आला.
राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये 30 मार्चपासून शनिवारपर्यंत ढगाळ वातावरणासह दुपारनंतर वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशात कंडोमच्या किमती 50% पर्यंत वाढू शकतात, कारण अमेरिका-इराणमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे तेल आणि गॅसनंतर आता कंडोम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App