शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबात सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचे गंभीर आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही. जंतरमंतरवर सोनम वांगचुक आणि युवक करत असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे,” अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज मांडली. ‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच मोठा सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान दिले आहे. या अत्यंत अनपेक्षित कायदेशीर पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ३,५४२ कोटी रुपयांच्या खर्चावर ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आणि योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेषतः बीड जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या आकडेवारीवरून राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व घडामोडींवर आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, पात्र आणि अपात्र महिलांची नेमकी आकडेवारी समोर ठेवली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या दरे गावी गेले की त्यांच्या नाराजीच्या बातम्यांना पेव फुटते, पण पण शिंदे यांच्या खेरीज दुसरेही राजकारणी कधीतरी मूळ गावी जाऊ जुन्या आठवणींमध्ये रमतात, असे चित्र नुकतेच दिसले.
कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेली एक ४ ते ५ मजली भलीमोठी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी जागेवरच कोसळली. या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत चित्तथरारक असून, इमारत कोसळतानाचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी जर ४० वारकरी एकत्र आले, तर महामंडळाकडून त्यांना थेट विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात ही मोठी घोषणा केली.
वेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी अतिशय योग्य नेतृत्व आहेत. महाराष्ट्र त्यांच्या हातात राहिलेला नाही, महाराष्ट्रात गुंडाचे राज्य आले आहे. आम्ही तर म्हणू की 2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधानपद मिळवावे. जर एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये आपला गट विलीन केला
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘माजी खासदार’ झाल्याचे शल्य मनात असले तरी आपण शांत बसलेलो नाही, असा सज्जड इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना दिला आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. यावेळी त्यांनी राज्यसभा खासदारकीवरूनही मोठा दावा केला आहे.
माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राऊत विरुद्ध सून असा थेट वाद पेटला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे गिरीजा राऊत यांनीही सासरच्यांनी फसवणूक आणि छळ केल्याचा पुनरुच्चार केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचे कुटुंब एका मोठ्या वादात सापडले आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पती, सासऱ्यांसह संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे.
NCP(SP) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत झालेल्या बदलाचे कौतुक केले. ते म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकल प्रवासादरम्यान एका प्रवाशाने केवळ मराठीत बोलण्याची मागणी केली म्हणून रेल्वेच्या तिकीट परीक्षकाने (TC) त्याला तब्बल एक तास कार्यालयात बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या उद्दाम वर्तणुकीवर मराठी नेटिझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), उत्तर प्रदेश सरकार आणि मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही वैयक्तिक टीका करत, “अमित शाह यांनी एका पायावर उभं राहायला सांगितलं तर ते तसेही उभे राहतील,” असा टोला लगावला.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ‘दिल्लीवारीच्या’ चर्चांना मिश्किल उत्तर दिले. यासोबतच राज्यातील पावसाची स्थिती, ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी, बोगस सोयाबीन बियाणे, नागपुरातील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आणि मोशी इमारत दुर्घटना अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना कमोडिटी करून ठेवलेय आणि त्यांना विनोदाचा विषय करून ठेवलेय, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशिक मधल्या कार्यक्रमात व्यक्त केली.
संजय राऊत यांनी त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत आजपर्यंत केलेली सगळी भाकिते खोटी ठरली असताना सुद्धा आज त्यांनी धडाक्याने नवे राजकीय भाकित केले.
विधान परिषदेत विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही घरात बसणारे ‘फेसबुकवाले’ नसून थेट जनतेत जाणारे ‘फेस टू फेस’ काम करणारे लोक आहोत,” असा सणसणीत टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
विधानसभेतील भाषणानंतर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंकवरील पुलाबाबत पसरवलेल्या खोट्या माहितीवर संताप व्यक्त करत, त्यांनी आधी वापरलेल्या ‘भाडे की टट्टू’ या शब्दाचा संदर्भ स्पष्ट करत ‘भाटक गदर्भ’ आणि ‘सुपारीबाज’ असे शब्द वापरले
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत १८ विधेयके पारित झाली, १०१ तास १० मिनिटे कामकाज चालले. सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची माहिती आज सदनासमोर ठेवली.
राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी ५० हजार रुपये भरण्याची जाचक अट सरकारने पूर्णपणे काढून टाकली आहे. यामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम 155’ चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे करणाऱ्या आणि जमिनींचे फेरफार करणाऱ्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली.
मिसिंग लिंकच्या मुद्द्यावर विरोधकांचा फुलटॉस; देवेंद्र फडणवीसांचा षटकार; बाकीच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गमावली संधी!!, हेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. विरोधकांनी फडणवीस सरकारला खऱ्या अर्थाने कधी घेरलेच नाही.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.
सशक्त लोकशाहीत विरोधकांची सुद्धा संवाद हवा, असे पालुपद शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोलापूर दुसऱ्यांदा लावले. पण या संवादातून सगळ्या डगरींवर हात पाय ठेवण्याची सोय त्यांनी करून घेतली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App