शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड (दादा) आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना यंदाचा पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुढे रेटू शकतील का??,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक पार पडली
बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा double game खेळली. सुनेत्रा पवारांना संधी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली असतानाच, आता बड्या नेत्यांच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक महत्त्वाचा आणि मित्रत्वाचा सल्ला देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. “अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद असून, नितीन गडकरी यांनी आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करणे टाळावे. असे सांगणार आहे.” असे अनिल देशमुख म्हणालेत.
सुप्रीम कोर्टाने एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवर तीव्र आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना खडेबोल सुनावलेत. एवढी बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी? असा खडा सवाल कोर्टाने या प्रकरणी रोहित पवार यांना केला आहे. कोर्टाच्या या भूमिकेनंतर रोहित पवार यांनी यासंबंधीची आपली याचिका मागे घेतली आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कोण? काय? कसे? कुठे हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट आहे
जणू पवार एकटेच टाकतात “डाव” आणि बाकीचे खेळतात गोट्या; अजितदादांचे कट्टर विरोधक काळूराम चौधरी काय म्हणाले??, ते तरी वाचा!!, असे म्हणायची वेळ काही youtubers आणि “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी चालविलेल्या “youtube वर गोंधळ आणि बारामतीत मुजरा” या सिनेमामुळे आली.
जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करत नसले, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचाराचा धडाका लावला. त्यांनी मराठवाड्यात दुष्काळ मुक्तीचा आहे का काढला!!
भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार झाला. गेली सुमारे दीड वर्षे भिजत पडलेले घोंगडे अखेर धुतले गेले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचे टेरिफ कमी केले. त्यामुळे दोन्ही बाजूंमधला संघर्ष कमी व्हायला मदत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संयम दाखवून भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार व्हायला मोकळीक दिली. या महत्त्वपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार झाला.
विलीनीकरणवाल्यांना दिल्लीतून टोला; पवारांच्या पक्षातल्या उतावळ्यांची काढली हवा!!, असेच प्रफुल पटेल यांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेचे वर्णन करावे लागेल.
मुंबईत चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर शनिवारी रात्री उशिरा चार राऊंड गोळीबार झाला. पोलिसांनी रविवारी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून, त्यांची ओळख पटली आहे.
गुजराती उद्योगपतीच्या मध्यस्थीने दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण, सत्ताधारी भाजप प्रणित NDA आघाडीला पाठिंबा देण्याची ठेवली अट, असा शब्दांमध्ये काँग्रेसचे विदर्भातले नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची पोलखोल केली.
समाज संघाकडे सकारात्मकतेने, विश्वासाने बघतो. ही आपल्यासाठी संधी आणि आव्हान दोन्ही आहे. समर्थ भारतसारखी नियोजनबद्ध कामे पूर्व योजनेने हाती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला, ते एकत्र झाले आणि मला बाहेर केले, त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला, हे लोकनेते होऊच शकत नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगाव रंगारी येथे सभेत बोलताना महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.
दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावे लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या घडामोडीने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या टप्प्यावर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करत या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले.
आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाची भूमिका ठरली, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, विलीनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतर आम्ही बोलू, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच भारतीय जनता पक्षाचा गटनेता अखेर ठरला आहे. अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक गणेश खणकर यांची भाजपच्या गटनेतेपदी वर्णी लागली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आणि विषयांची सखोल जाण असलेला चेहरा म्हणून खणकर यांच्याकडे पाहिले जाते. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश खणकर यांच्या गटनेतेपदी निवडीची घोषणा केली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलचे सगळे नेते लाभार्थी; त्यामुळे मग story किती खरी, किती खोटी??, असा सवाल समोर आला.
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांमध्ये भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!!
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मित्र प्रेमापोटी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा त्याग केला, पण एकनाथ शिंदे यांच्या मात्र या निवडणुकीतला प्रचार जोरात आला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App