मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती केल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला गुढीपाडवा मेळावा होणार असून मनसैनिकांनी त्याची जोरदार तयारी केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळात आज ‘महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026’ एकमताने मंजूर केले असून, यामुळे राज्यातील जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विधेयकाची माहिती देताना स्पष्ट केले की, वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासोबतच पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत राज्य सरकारने सीबीआय चौकशीसाठी केंद्राला अद्याप पत्र दिले नसल्याचा गंभीर आरोप केला होता.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या “शेट्टी टॉवर’ निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर सध्या परदेशात असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
समान नागरी कायद्या’बाबत राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या कायद्यासंदर्भात विधी व न्याय, सामान्य प्रशासन तसेच महिला व बालकल्याण विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. येत्या महिनाभरात सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन सरकार अधिकृत भूमिका मांडेल, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केले, ते पाहून ते वडेट्टीवार यांचे स्वतंत्र वक्तव्य आहे की शरद पवारांची नेहमीचीच double game आहे??, असा सवाल समोर आला.
हिंदू नववर्ष स्वागत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी तीरावर “पंच परिवर्तन हेच समाज परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित भव्य महारांगोळी साकारण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चित केली जावी
नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात अमली पदार्थ (ड्रग्ज) तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस वाटपाचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गरजा ओळखून प्राधान्य क्षेत्रांना पुरवठ्याची कार्यवाही जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होईल.
राज्य परिवहन मंडळामध्ये लवकरच 17 हजार 742 पदांची कंत्राटी भरती करण्यात येणार असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने 8300 बस गाड्या येणार असल्याने ही भरती करण्यात येणार आहे
नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला
\पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे पडसाद भारतातही उमटत असून एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडर मिळण्यात अडथळे येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकांचे वाटप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 5 इमारतींमधील या सदनिकांचे वितरण पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले असून, यामध्ये विशेष बाब म्हणजे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी, त्यांचे वारस आणि कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 423 सदनिकांचा समावेश आहे.
विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत दिलेल्या एका संदर्भामुळे सभागृहात वादाचे वातावरण निर्माण झाले. इतिहासातील विविध दाखले देत असताना आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर आक्षेप घेतला गेल्याने मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, ज्याची तातडीने दखल घेत आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला.
राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. “देशात एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. एलपीजीचे उत्पादन 11 हजार मेट्रीक टनापर्यंत वाढवले आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊन रांगा लावण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात सरकारने आक्रमक पवित्रा घेतला असून आतापर्यंत ३३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला’तील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण पार पडले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 14 चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांची चावी आणि ताबापत्राचे वाटप करण्यात आले.
नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववे गुरु तेगबहादुरसिंग जी यांच्या ३५० व्या स्मृती वर्ष निमित्त त्यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आलेल्या भव्य महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल – ताशांच्या गजरात दणाणून गेले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, तामिळनाडू, आसाम, केरळ व पुदूचेरीमध्ये एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांसोबतच देशातील विविध राज्यांमधील 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, या दोन्ही जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन संपन्न झाले. या इमारतीच्या रूपाने पुणे मेट्रोला स्वतःचे हक्काचे घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.
राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. या प्रकरणी केवळ संभ्रम व अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9 हजार मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत, असे ते म्हणालेत.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित 39 व्या पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत. इतरांनी लावले तर ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App