महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यभरात आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी (TET Exam) पेपर फुटल्याच झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश दिले.
वराती मागून घोडे हेच ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे!!, असं म्हणायची वेळ उद्धव ठाकरेंच्या आजच्या यवतमाळ दौऱ्यामुळे आली. उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटली आधी त्यांचे ४० आमदार निघून गेले, नंतर ६ खासदार निघून गेले.
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे यांनी सांगितले की, केवळ मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (23 जून 2026) ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी ‘भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी’ असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एक अधिकृत निवेदन जारी करत सना मलिक यांच्या विधानापासून पक्षाला वेगळे केले आहे. “सना मलिकांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्ष त्यांच्याशी सहमत नाही,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात जर आपण भाजपचे कमळ फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात ते का शक्य नाही? येथील कार्यकर्त्यांची परिस्थिती बंगालपेक्षा वेगळी आहे का? तुम्हालाही तिथे मिळणारा त्रास सहन करावा लागतोच आहे ना? जर आपल्याला ‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा घेऊन पुढे चालायचे असेल, तर पंकजा मुंडे यांच्या जीवावर निवडून येऊन, तीन वर्षे आमदारकी पचवून त्यांच्यावरच गरळ ओकणारे लोक आता नको आहेत,
मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, याच वेळी सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारण्याच्या नव्या ट्रेंडवरून राज ठाकरे यांनी जैन समाजाला खडे बोल सुनावत अत्यंत कडक इशारा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी “ऑपरेशन टायगर 3.0” सुरू झाल्याचा दावा करत आणखी 14 हून अधिक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, या विमान प्रवासात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते. दोन राजकीय विरोधकांच्या या अनपेक्षित सहप्रवासामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या लोहगड हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचाराची एक अतिशय गंभीर बाजू समाजासमोर आणली आहे. स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला (केतन अग्रवाल) आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून निर्दयीपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार यात उघडकीस आला आहे. या भीषण गुन्ह्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
भाजप महायुतीच्या राजवटीला काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीची “अवकळा”; आमदार – खासदारांच्या तोंडी शिव्या आणि जातिवादाची भाषा!!, हे गंभीर राजकीय वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकारण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “ऑपरेशन टायगरच्या नावाखाली फुटलेल्या प्रत्येक खासदाराला 80 ते 90 कोटी रुपये कॅश आणि अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे,” असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, धाराशिवमधील सभेत त्यांनी खोटी शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. नागपूर मेट्रो रेल टप्पा 2 अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारीत उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटाला पुन्हा एकदा बंडखोरीला सामोरे जावे लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील काही आमदारांची अनुपस्थिती होती. यावरून पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असून आता यात भाजप नेते नारायण राणे यांनी मोठे विधान करत म्हटले, खासदार गेले आता आमदारही फुटू शकतात.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
शिवसेना शिंदे गटात गेलेले ठाकरे गटातील फुटीर नेते संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला होता. यावरून चांगलेच राजकारण पेटले होते.
शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारण्याची खुलेआम धमकी दिल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त नाही. संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसे गेले आहेत. आपल्याला कोणीही काहीच करू शकत नाही
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (२४ जून २०२६) दिवस विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये अत्यंत वादळी ठरला. एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वीजदर, धर्मांतर आणि कायदा-सुव्यवस्थेवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक घोषणा करण्यात आल्या.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!, असला प्रकार आज समोर आला.
णे महापालिकेतील बांधकाम विभागाचे निवृत्त मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या तब्बल 2000 कोटी रुपयांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यास तत्कालीन महापालिका आयुक्तांनी नकार दिला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन आयुक्तांच्या नकारघंटेला फेटाळून लावले आहे. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सद्य:स्थिती सभागृहात मांडली.
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सावंत आणि देसाई यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. आरोपी भीमराव कांबळेला दोषी असल्याचा निकाल न्यायाधीशांनी दिला, पण अंतिम निकाल 29 जून रोजी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. न्यायधीशांनी आरोपीला दोषी ठरविले.
राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती दिली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार फुटल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर राहिले. पण उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले असले तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत NEET-UG पुनर्परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा दावा वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. यावेळी मोदींनी विविध विभागांमध्ये समन्वयावरही भर दिला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App