शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झालेले विलीनीकरण तात्पुरते स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाला नोटीस बजावत दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजधानी दिल्लीत विद्यार्थी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला असताना, सत्ताधाऱ्यांकडून मात्र पोलिसांच्या कारवाईची पाठराखण केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळाच दावा करत या घटनेचे खापर थेट विरोधकांवर फोडले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला दिलेल्या मान्यतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. सहा खासदारांचे शिवसेनेत झालेले विलिनीकरण हे पूर्णपणे संविधान, कायदा आणि संसदीय नियमांच्या चौकटीत झाले असून न्यायालयात गेल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले. ते मंचावर येताच, ‘महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आपल्यात आले आहेत’, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी देताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. या उत्साही वातावरणात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत आपली सविस्तर भूमिका मांडली.
आषाढी एकादशीचा सोहळा 25 जुलै रोजी साजरा होत असून पंढरपुरात दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल दर्शन रांगेत सध्या २० हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी 12 ते 14 तासांचा अवधी लागत आहे. दर्शनरांग गोपाळपूरजवळील सोळा नंबर शेडपर्यंत गेली असून दर्शन वेग प्रति मिनिट 32 ते 35 आहे. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी रांगेत घुसखोरी आणि पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीच्या अनेक तक्रारी आहेत.
सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या 25 पैकी 20 मजुरांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना रात्री उशिरापर्यंत उर्वरित पाच मजुरांपर्यंत पोहोचता आले नाही.
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारने आज, म्हणजेच 20 जुलै रोजी स्पष्ट केले आहे की, घरगुती आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी इक्विटी व्यवहारांवर लागणारा दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर रद्द करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.
पंतप्रधान मोदींनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मीडिया ब्रीफिंगमध्ये राहुल गांधींच्या वयावरून टोमणा मारला. पंतप्रधान भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेट ‘विक्रम-1’ ला कक्षेत पाठवणाऱ्या स्कायक्रूट एरोस्पेस कंपनीचा उल्लेख करत होते.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात दगडफेक करून हिंसाचार माजवून दहशत निर्माण करणाऱ्या आंदोलकांचा पोलिसांनी पर्दाफाश केला
मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच. मुंडेंना पुन्हा मंत्री केले, तर मराठा समाज अंगावर येईल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली किंवा कुठलाही खडा पडला, तरी त्याची पावती थेट माझ्या नावावरच फाडली जाते आणि माझ्याविरोधात भाषणे सुरू होतात. केवळ एका व्यक्तीला सातत्याने बदनाम करून तुम्ही गावाची आणि परिसराची प्रगती थांबू शकत नाही. काल माझ्या संपूर्ण जीवनात मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना राजकीय प्रवासातील संघर्षावर भाष्य केले.
डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरद पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या नियामक मंडळाची बैठक पार पडली.
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायला मिळाली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या प्रवाशाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
“राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही,” अशा सूचक शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत चौफेर टीका केली.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांशी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे हत्या आणि बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. विचारांची हत्या आणि पक्ष संपवण्याचं काम राऊत यांनी केले असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर राहुल गांधींची गुलामगिरी करण्यापलीकडे राऊतांकडे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही.
राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत, खोटे फोटो तयार करणाऱ्या बालाजी म्हस्के या मुख्य संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे.
सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज (१९ जुलै) मुंबईत एका मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनावरून आता नवा वाद निर्माण झाला असून, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ठाकरेंचे हे आंदोलन बेकायदेशीर ठिकाणी होत असल्याचा दावा करत सदावर्ते यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न ताकतीने मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात ओबीसी समाजाचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई आणि ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सर्वपक्षीय कॅन्डल मार्च काढण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. तर आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक राजकीय फटका बसला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या ६ खासदारांच्या स्वतंत्र गटाला अखेर लोकसभा सचिवालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीन होण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केल्यामुळे आता हे ६ बंडखोर खासदार तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या शिंदे यांच्या पक्षाचाच अधिकृत भाग बनले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App