आपला महाराष्ट्र

जरांगेंशी थेट संवाद साधणार उदय सामंत; शिंदे-फडणवीसांबाबत काय म्हणाले?

अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष भेट घेणार असून, त्यांच्या मागण्यांबाबत पुढील २४ तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

‘जरांगेंची तळमळ आम्हाला माहीत’; शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांकडून मराठा नेत्याचं कौतुक

जरांगे हे मराठा समाजासाठी लढणारे सामान्य कार्यकर्ते असून त्यांची तळमळ सरकारला माहीत आहे, असे शिंदे म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मोहित कंबोज संतापले; खोट्या बातम्यांवरून कठोर कारवाईचा इशारा

समाजमाध्यमांवर आपल्याविरोधात जाणीवपूर्वक खोट्या, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप व्यावसायिक मोहित कंबोज भारतीय यांनी केला आहे.

लक्ष्मण हाके यांच्या मोर्चावर पोलिसांची नजर; मार्गासह वाहनांची माहिती मागवली

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजासाठी आदर्श, पण पतीच्या छळाने खचली; संगीताने मृत्यूला कवटाळले

पिढ्यान्‌पिढ्या सामाजिक उपेक्षेचा सामना करणाऱ्या पारधी समाजातून शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श ठरलेल्या संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) यांचा दुर्दैवी अंत झाला.

जरांगे-हाके आंदोलनावर सरकारचा मोठा दावा; ‘एक-दोन दिवसांत तोडगा निघेल’

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Supriya Sule

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे’

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात.

१८ वर्षे पूर्ण झाली, तरी मतदार होता येईना! ‘जेन-झी’च्या नोंदणीला ब्रेक

महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच नवमतदारांच्या नोंदणीबाबत गंभीर तांत्रिक अडथळा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Nepal floods 

नेपाळच्या महापुरातून महाराष्ट्रातील १४३ भाविकांची सुखरूप सुटका; मायदेशी परतले

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागाला तडाखा देणाऱ्या भीषण महापुरात महाराष्ट्रातील १४३ भाविकांची सुरक्षित सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कैलास मानसरोवर यात्रेहून परतणारे ३७ भाविक मुंबईत पोहोचले आहेत, तर काठमांडूमध्ये अडकलेले नागपूरचे १०६ भाविक भारतात दाखल झाल्यानंतर आपल्या घराकडे रवाना झाले आहेत.

‘झारीतील शुक्राचार्या’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? महापौर रितू तावडे यांनी घेतली भेट

महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून भाजपमधील काही नेत्यांकडून आपल्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात असल्याची तक्रार महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते.

न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिरात मोहन भागवत; बेघरांसाठी भोजन वाटप, ‘कृष्ण चेतना’तून एकतेचा संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी बेघर नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या भोजन वाटपाच्या उपक्रमात सहभाग घेतला.

अमित शाह-शिंदेंमध्ये बंद दाराआड १० मिनिटं चर्चा; शिवसेनेतील नाराजीवर मोठा निर्णय?

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

Bombay HC

‘FDAसारखी कार्यपद्धती हवी’; मुंबईच्या कारभारावर हायकोर्टाचे महापालिकेला खडेबोल

मुंबई शहराला जर आंतरराष्ट्रीय शहर बनवायचं तर स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी महापालिकेला एफडीएच्या धर्तीवर काम करावं लागेल, अशी टिप्पणी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानं केली.

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे रिलाँचिंग’; बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात

आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी खरोखरच काँग्रेसला आस्था असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा.

औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपर मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिच्या कथित व्हॉट्सअॅप संभाषणातून पेपर मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये दिल्याचा दावा समोर आलाआहे.

साखरेचे दर १५०० रुपयांनी घसरले; आठवडाभरात नेमका उलटफेर कसा झाला?

मागील काही दिवसात साखरेच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता. गेल्या दोन महिन्यात साखरेच्या दरात जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली होती.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून बारामतीतील क्रीडा संकुलाची पाहणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी बारामती येथे सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाची शुक्रवारी (ता. २८) पहाटे पाहणी केली.

दिशा सालियन प्रकरणी वडिलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळायलाच हवीत; हायकोर्टाची भूमिका

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी कायद्यानं गुन्हा दाखल करत तपास पूर्ण करणं पोलिसांकडून अपेक्षित होतं. ते का झालेलं नाही याचं आम्हाला स्पष्टीकरण द्या, अशी विचारणा गुरूवारी हायकोर्टानं राज्य सरकारला केलीय.

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीसाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ

अवघ्या दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

विमल इलायची प्रकरणी शाहरुख, अजय आणि टायगर अडचणीत; FDAच्या नोटिशीला उत्तर नाही

अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान अभिनेता अजय देवगन तसेच अभिनेता टायगर श्रॉफ यांना पानमसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातीप्रकरणी प्रशासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला अद्यापही या तिन्ही कलाकारांनी उत्तर दिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. एफडीएने 14 दिवसाच्या आत उत्तर देण्याचे नोटिसेत म्हटले होते.

गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी.

बारामती एमआयडीसीत काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन महिला ठार

बारामती एमआयडीसी परिसरातील फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ गुरुवारी (ता. २७) कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन महिलांचा मृत्यू झाला.

नेपाळच्या जलप्रलयात महाराष्ट्रातील ७ पर्यटक अडकले; ४ जणांशी संपर्क, देशभरातील १३० हून अधिक भारतीय बेपत्ता

उत्तर नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठी हानी झाली असून अनेक भारतीय पर्यटक आणि भाविक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

कुणालच्या मृत्यूनंतर मावस बहीण अक्षरा भावूक; ‘त्याच्यावर असे आरोप करू नका!’

खवड्या डोंगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुणाल चांदगुडेच्या आठवणींनी त्याची मावस बहीण अक्षरा भावूक झाली आहे.

MPSC Paper Leak

MPSC पेपरफुटीचा धक्कादायक ‘लव्ह अँगल’; प्रेयसी पास, प्रियकर नापास, ब्रेकअपनंतर तक्रारीने फुटलं पेपरफुटीचं बिंग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात