अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष भेट घेणार असून, त्यांच्या मागण्यांबाबत पुढील २४ तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जरांगे हे मराठा समाजासाठी लढणारे सामान्य कार्यकर्ते असून त्यांची तळमळ सरकारला माहीत आहे, असे शिंदे म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
समाजमाध्यमांवर आपल्याविरोधात जाणीवपूर्वक खोट्या, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप व्यावसायिक मोहित कंबोज भारतीय यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यातील पाटस येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिढ्यान्पिढ्या सामाजिक उपेक्षेचा सामना करणाऱ्या पारधी समाजातून शिक्षण आणि नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी आदर्श ठरलेल्या संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) यांचा दुर्दैवी अंत झाला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात.
महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू असतानाच नवमतदारांच्या नोंदणीबाबत गंभीर तांत्रिक अडथळा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागाला तडाखा देणाऱ्या भीषण महापुरात महाराष्ट्रातील १४३ भाविकांची सुरक्षित सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कैलास मानसरोवर यात्रेहून परतणारे ३७ भाविक मुंबईत पोहोचले आहेत, तर काठमांडूमध्ये अडकलेले नागपूरचे १०६ भाविक भारतात दाखल झाल्यानंतर आपल्या घराकडे रवाना झाले आहेत.
महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून भाजपमधील काही नेत्यांकडून आपल्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात असल्याची तक्रार महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी बेघर नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या भोजन वाटपाच्या उपक्रमात सहभाग घेतला.
विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]
मुंबई शहराला जर आंतरराष्ट्रीय शहर बनवायचं तर स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी महापालिकेला एफडीएच्या धर्तीवर काम करावं लागेल, अशी टिप्पणी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानं केली.
आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी खरोखरच काँग्रेसला आस्था असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिच्या कथित व्हॉट्सअॅप संभाषणातून पेपर मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये दिल्याचा दावा समोर आलाआहे.
मागील काही दिवसात साखरेच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता. गेल्या दोन महिन्यात साखरेच्या दरात जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली होती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी बारामती येथे सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाची शुक्रवारी (ता. २८) पहाटे पाहणी केली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी कायद्यानं गुन्हा दाखल करत तपास पूर्ण करणं पोलिसांकडून अपेक्षित होतं. ते का झालेलं नाही याचं आम्हाला स्पष्टीकरण द्या, अशी विचारणा गुरूवारी हायकोर्टानं राज्य सरकारला केलीय.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.
अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान अभिनेता अजय देवगन तसेच अभिनेता टायगर श्रॉफ यांना पानमसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातीप्रकरणी प्रशासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला अद्यापही या तिन्ही कलाकारांनी उत्तर दिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. एफडीएने 14 दिवसाच्या आत उत्तर देण्याचे नोटिसेत म्हटले होते.
महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी.
बारामती एमआयडीसी परिसरातील फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ गुरुवारी (ता. २७) कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन महिलांचा मृत्यू झाला.
उत्तर नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठी हानी झाली असून अनेक भारतीय पर्यटक आणि भाविक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
खवड्या डोंगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुणाल चांदगुडेच्या आठवणींनी त्याची मावस बहीण अक्षरा भावूक झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App