चाकण औद्योगिक परिसरातील सततची वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांना कंटाळून चाकणमधील २० कंपन्यांनी खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील महागडी ‘डिफेंडर’ कार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आलिशान कारमधून प्रवास करत असल्यावरून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून होत असलेल्या टीकेला जरांगे यांनी कराड तालुक्यातील सभेत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित मोटार कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान आता अधिक स्पष्टपणे अनिवार्य करण्यात आले आहे.
“मच्छर मारण्यासाठी तलवार वापरली जात असेल तर ते योग्य नाही,” अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) फटकारले.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे.
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे.
मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान अधिक तीव्र केले आहे. अंमली पदार्थांची निर्मिती, तस्करी, पुरवठा आणि विक्रीला आळा घालण्यासोबतच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जिसीसी) भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून, राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे
Fadnavis Cabinet Decide मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध विभागांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे. मुंबईत FDA आणि पोलिसांकडून दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त आहेत.
गावागावातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशव्यापी मोहीम जाहीर केली आहे. येत्या 15 ऑगस्टला केवळ स्वातंत्र्यदिन साजरा न करता सरकारी शाळांच्या सुधारणेला सुरुवात करावी, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.
शिवसेना कोणाची आणि पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावरून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या कायदेशीर लढाईवर आज, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवाप्रमुख तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या भारताची प्रगती आता कोणीही थांबवू शकत नाही. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळी येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीत व्यक्त केला.
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिल्डरांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेल्याचा आरोप नाईक यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर २९ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज सध्या आक्रमक भूमिकेत असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या विमानप्रवासावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी जयंत पाटील यांच्यावर मिश्कील टोला लगावला आहे. या विमानप्रवासानंतर पाटील यांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे यांच्यात झालेल्या कथित शाब्दिक वादाचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. दुपारी २ वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत किंवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.
राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बहुप्रतीक्षित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मूळ आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकणमार्गेच ठेवावा, या मागणीसाठी रविवारी आंदोलनाचा भडका उडाला. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा परिसरात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच समृद्धी महामार्गाजवळ ‘रास्ता रोको’ करण्यात आला.
राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष पुन्हा तीव्र होत असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात थेट मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या कडक आणि परखड कार्यशैलीसाठी ओळखले जातात.
शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांची आधारवाडी कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App