दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे वडील सतीश सालियन यांनी उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली आहे.
मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, आता दुष्काळाशी लढा सुरू आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असला, तरी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम सुनावणीत शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांवर आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या
अजितदादा हयात असतानाची आणि सध्याची राजकीय परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होत्या. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होती.
राज्यातील महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख दाव्यांना प्रतिवाद केला.
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यास मुंबई पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. परळी येथे जनता दरबार सुरू असतानाच त्यांना अचानक त्रास जाणवू लागला.
मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांनी आता मराठी भाषा शिकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जगाच्या व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका सूचक सोशल मीडिया पोस्टने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, वर्षअखेरीस मुदत संपणाऱ्या या मतदारसंघांसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच विदर्भातील बळीराजाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. पुढील १५ दिवस विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता अत्यल्प असल्याचे नागपूर वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका सकारात्मक असून, केवळ घोषणा करून थांबण्याऐवजी न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे
महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) FIR दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBI ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.
प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्रीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारली जावी.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. मुंबईला जाण्यासाठी समाजाकडून सुरू असलेली तयारी सध्या थांबवावी
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App