केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे दौऱ्यानंतर आता अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जहाल साहित्याविरोधात महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. बॉम्ब तयार करण्याची माहिती देणारी पुस्तके, दहशतवादी संघटनांचा प्रचार करणारी मासिके, ऑनलाइन माध्यमातून प्रसारित होणारे डिजिटल साहित्य आणि इतर आक्षेपार्ह सामग्रीवर राज्य सरकारने बंदी घातली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आषाढी एकादशीला घोषित करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज जवळपास 5 हजार 29 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयआयटी मुंबई कॅम्पसमधील दोन कॅन्टीनना नोटीस बजावली आहे.
नाशिकमधील टीसीएसशी संबंधित प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या मालमत्तेत आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन माजिद पटेल यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेची आधारवाडी कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झालाय. शुक्रवारी (दि.7) सकाळी उच्च न्यायालया म्हात्रेच्या सुटकेचे सविस्तर आदेश जारी करणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर आणि स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. चीनमधील परीक्षा पद्धतीचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील वाढता संताप व्यक्त केला आणि सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न विचारले.
मराठा समाजातील काही व्यक्तींची जात प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) च्या अचानक वाढणाऱ्या भाड्यामुळे त्रस्त झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘तिरंगा रॅली’ अभियान राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या कर्मचारीवर्गासाठी सोशल मीडिया वापराबाबत नवी वर्तन आचारसंहिता लागू केली आहे. या नव्या नियमांनुसार, कर्तव्यावर असताना किंवा एसटीच्या गणवेशात रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करून महामंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा धोरणात केलेल्या बदलांचा परिणाम आता भारतीय विद्यार्थ्यांवरही दिसून येत आहे.
नागपूरच्या प्रसिद्ध सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रथमच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता अधिकच चिघळला असून, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडीया’ या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत अॅनॉलॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.
महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांच्या (मार्ड) आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
बालविकास आणि महिला सक्षमीकरण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी सक्रिय योगदान देणे आवश्यक आहे.
राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांची कालमर्यादा निश्चित करून नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेल्या कथित ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून कथितरित्या करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र पोलीस’ अशी अक्षरे, पोलीस किंवा लाल रंगाच्या नावाच्या पाट्या लावून फिरणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सर्व विभागांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (4 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, न्यायव्यवस्था, ऊर्जा आणि प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
देशातील शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App