राज्यातील विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली.
पुढच्या वर्षी निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे माजी मंत्री विनाेद तावडे यांच्यावर माेठी जबाबदारी साेपवली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
बारामती विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 16 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केज तालुक्यात २० जून रोजी झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आपल्या मुलाचे नाव जोडले जात असल्याच्या आरोपांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सवाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा
पुनर्तपासणीत ९८ टक्के अन्न सुरक्षा नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही परवाना निलंबित ठेवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) चांगलाच दणका दिला आहे.
विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १८ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन करार, सातवा वेतन आयोग, महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी यांसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
गणेशोत्सव तोंडावर आला असताना पुणे शहरातील रस्ते, वाहतूक आणि नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य शासनाने नाशिकच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा केली
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील विवाहसंबंधांचा उल्लेख करत त्यांनी मराठा समाजातील तरुणींविषयी केलेल्या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “मराठा समाजाला आरक्षण द्यावे
चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंब्राच्या नामांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंब्राला ‘मुंब्रादेवी’ असे संबोधण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात ‘दादा उद्योगिनी’ अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषण करत असताना महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त घोषणेमुळे वातावरण भावनिक झाले. “वहिनी, I LOVE YOU,” अशी हाक महिला कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर सुनेत्रा पवार हसल्या आणि त्यांनीही “I LOVE YOU TOO” असे म्हणत कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक आणि सडेतोड कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. विशेषतः अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधातील कारवायांमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीतील भीषण वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या सुमारे २० लघुउद्योगांनी कंपन्या बंद करण्याची किंवा स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. Uday Samant
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक घेतली.
विशेष प्रतिनिधी धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री प्रताप […]
परळी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळ्यात मुंडे बंधू-भगिनी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.
चाकण एमआयडीसीतील खड्डे, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यातील उद्योगांची स्थिती आणि चाकण एमआयडीसीतील समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्ष चांगलाच रंगला आहे.
चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था, प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील जलद वितरण कंपन्यांच्या साठवण केंद्रांवर मोठी कारवाई करत १४ अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्टशी संबंधित काही केंद्रांमध्ये अन्नसुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि तापमान नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उपहारगृहाच्या तपासणीत अन्न आणि औषध प्रशासनाला अस्वच्छता आढळून आल्यानंतर राज्य सरकारने उपहारगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App