श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना आता वेग आला आहे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस सुरू असतानाच राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे.
राज्यातील स्वयंअर्थसहायित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत असताना शालेय शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवच्या उपस्थितीने गोविंदांचा जोश आणखी वाढला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करताना ओबीसी आरक्षणाशी कोणतीही तडजोड करू नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ हा मुद्दा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवादरम्यान डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काही गणेश मंडळांकडून विरोध झाल्याचेही समोर आले आहे.
नेपाळमधील त्रिशुली-3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल नऊ दिवस अडकून राहिल्यानंतर 30 वर्षीय संजय साह यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या काळात त्यांनी सतत ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करत देवाकडे प्रार्थना केली.
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राला आणखी बळ मिळणार असून पुण्यात बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी कॅम्पसची पायाभरणी आणि स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले.
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) मधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी झालेल्या नव्या करारानुसार त्यांच्या पगारात दरमहा ₹7,250 ची वाढ होणार असून, वर्षाला ₹50 हजार बोनस मिळणार आहे. भाजप-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून हा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स (NSW) राज्यांमधील ऐतिहासिक भागीदारीला नव्याने बळ मिळाले आहे. न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर ख्रिस मिन्स आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
महाराष्ट्रात आधीच महागाईचा मोठा प्रश्न असताना आता वीज दरवाढीचा अतिरिक्त भार जनतेवर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजातील नागरिकांनी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.
मुंबई आणि कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन दैनिक रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने आतापर्यंत दिलेल्या बांधकाम परवानग्यांमुळे आगामी चार वर्षांत शहरात तब्बल ६ कोटी ५० लाख चौ. फुटांचे बांधकाम होणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे, कर्णकर्कश ध्वनिक्षेपक आणि लेझरच्या वापरावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलिस तक्रारीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले विद्यानंद बापट यांना गुरुवारी पुण्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज बुधवारी 2 सप्टेंबर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने हे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत बँक ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा, सरकारची सुधारित परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने संप पुकारण्याची घोषणा केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून राज्यभरात गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App