विरोधक संविधानाचा वारंवार उल्लेख करत असले, तरी प्रत्यक्षात संसदेतील चर्चेला सामोरे जाण्यापासून ते पळ काढत आहेत. चर्चा झाली तर त्यांचे दुहेरी मापदंड देशासमोर उघड होतील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन संस्थांचा समावेश आहे.
गडचिरोलीच्या दौऱ्यावर निघालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांशी व्यवहार करण्याइतपत मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य करण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रं सुनेत्रा पवार यांच्या हातात आली असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
धाराशिवच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या बॅनरबाजीवरून पक्षांतर्गत नाराजी आणि कारवाईची चर्चा रंगली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या आलिशान डिफेंडर कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये किंमत असलेली पांढऱ्या रंगाची नवीकोरी डिफेंडर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
NEET protest case नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलने केली होती.
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईतील डोमिनोजला पिझ्झाच्या तीन आउटलेटचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
चाकण औद्योगिक परिसरातील सततची वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांना कंटाळून चाकणमधील २० कंपन्यांनी खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील महागडी ‘डिफेंडर’ कार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आलिशान कारमधून प्रवास करत असल्यावरून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून होत असलेल्या टीकेला जरांगे यांनी कराड तालुक्यातील सभेत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित मोटार कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान आता अधिक स्पष्टपणे अनिवार्य करण्यात आले आहे.
“मच्छर मारण्यासाठी तलवार वापरली जात असेल तर ते योग्य नाही,” अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) फटकारले.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे.
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे.
मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान अधिक तीव्र केले आहे. अंमली पदार्थांची निर्मिती, तस्करी, पुरवठा आणि विक्रीला आळा घालण्यासोबतच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जिसीसी) भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून, राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे
Fadnavis Cabinet Decide मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध विभागांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे. मुंबईत FDA आणि पोलिसांकडून दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त आहेत.
गावागावातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशव्यापी मोहीम जाहीर केली आहे. येत्या 15 ऑगस्टला केवळ स्वातंत्र्यदिन साजरा न करता सरकारी शाळांच्या सुधारणेला सुरुवात करावी, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.
शिवसेना कोणाची आणि पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावरून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या कायदेशीर लढाईवर आज, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवाप्रमुख तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या भारताची प्रगती आता कोणीही थांबवू शकत नाही. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळी येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीत व्यक्त केला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App