राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त देशभर आणि जगभरात अनेक कार्यक्रम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजधानी नवी दिल्लीतल्या संघ शताब्दीच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
देशाच्या इतिहासात प्रथमच भारत मातेची तस्वीर शंभर रुपयांच्या नाण्यावर छापण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नाण्याचे अनावरण केले.
राहुल गांधी आणि शरद पवारांच्या सकट लिबरल लोकांनी Gen Z च्या पोरांवर ठेवला भरवसा; पण त्या पोरांनी JNU मध्ये फडकवला संघाचा झेंडा!!, असला प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने घडलेला समोर आला.
बिहारची निवडणूक वाऱ्यावर सोडून राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेलेत. दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियात बोगाटाला पोहोचण्याचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला.
क्रिकेटच्या मैदानावर केले माकड चाळे; पण दणकून पराभवानंतर पाकिस्तान्यांना आले खिलाडू वृत्तीचे उमाळे!!, असला प्रकार दुबईतल्या क्रिकेट स्टेडियम मधून समोर आला.
महाराष्ट्रातल्याच काय, पण देशातल्या विरोधकांचा सगळ्या कारभारच उफराटा; मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर बाकी सगळ्यांचा ओला दुष्काळी दौरा!!, असला प्रकार महाराष्ट्रात घडला आणि घडणार आहे.
NCP म्हणजे दमबाजी – दमदाटी हे समीकरणच जणू बनले की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात असताना महाराष्ट्र सोडून वेगळेच ते समीकरण उदयाला आलेले दिसले.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपने आज दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या राजकीय मुहूर्तावर तगड्या जबाबदाऱ्या सोपविल्या.
महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!, असं म्हणायची वेळ सध्याच्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीमुळे आली.
संतोष देशमुख आणि वाल्मीक कराड प्रकरणाच्या फटक्यामुळे मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे “रिकाम्या” झालेल्या धनंजय मुंडे यांनी आज काम मागितले. छगन भुजबळांनी त्यांना लगेच कामाला लावले. असे आज रायगड मध्ये घडले.
युती दोन ठाकरे बंधूंची; पण माध्यमांमध्ये लढाई रंगली जागावाटपाच्या फॉर्मुल्याची!!, असे आज घटस्थापनेच्या म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडले. दोन ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या अनेक भेटीगाठी घेतल्या
भाजपच्या सत्तेच्या वळसणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी आली असल्याचे आज दिसून आले. पण त्याच वेळी मागच्या दाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी केल्याचा डावही समोर आला.
राहुल गांधींचा Vote chori चा “हायड्रोजन बॉम्ब” आला, पण कोर्टात जायला घाबरला!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली.
शरद पवार + सुरेश कलमाडी भेटीने (न मिळालेल्या) पंतप्रधान पदाच्या चर्चेला उजाळा; दोन्ही नेत्यांमध्ये nostalgic चर्चा!!, ही राजकीय घडामोडी आज पुण्यात घडली.
फक्त कामाने सगळे राजकारण स्वतःभोवती खेळवत ठेवणारा नेता!!, या शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या 75 वर्षांच्या व्यक्तीचे वर्णन करावे लागेल. मोदींकडे ना स्वतःचे कुठले मोठे नाव होते
Good economics is bad politics, असा 1990 च्या दशकानंतर भारतात समज व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती हे खरे. कारण त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था सुधारणारे नेते राजकारणात मात्र जिंकण्याची चमक दाखवू शकले नव्हते. राजकीय प्रतिभेने हे नेते कमी नव्हते.
आसाम मध्ये पैशासाठी हिंदू महिला अधिकाऱ्याने लँड जिहाद केल्याची धक्कादायक बाब चौकशी आणि तपासात समोर आली. संबंधित हिंदू महिला अधिकाऱ्याच्या घरी आसाम पोलिसांनी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तिच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आढळली.
महाराष्ट्राचा “नेपाळ” करणे पवारांसारख्या घराणेशाही चालाविणाऱ्या नेत्यांना परवडेल का??, असे विचारायची वेळ खुद्द शरद पवारांच्याच इशाऱ्यामुळे आली आहे.
“साहेबांचा पक्ष” ही प्रतिमा पुसण्याचा शरद पवारांच्या भाषणातून प्रयत्न; पठडीबाज मराठा राजकारणातून बाहेर पडायचा यत्न!!,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नाशिक मधल्या शिबिरात राहुल गांधींचा चालला अजेंडा; सफरचंद + कलिंगड + केळी निवडणूक चिन्हे वापरून मतं चोरीचा डेमो दिला. शरद पवारांच्या समोर व्यासपीठावर हे आज घडून आले.
नाशिक मधल्या मोठ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या स्वतंत्र आणि वेगळ्या विद्यापीठाबद्दल शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने मोठा संभ्रम निर्माण झाला.
शरद पवारांनी मनोज जरांगेंचा “पार्थ पवार” केला; राजकीय इंधन वाया गेल्यावर कवडीवर आणला!!, असला प्रकार आज नाशिकमध्ये घडला.
लंडनमध्ये बेकायदा स्थलांतरांविरुद्ध लाखो ब्रिटिशांचा मोर्चा; पण सर्वाधिक बेकायदा स्थलांतरित कोण??, वाचून बसेल धक्का!!, असं खऱ्या अर्थाने म्हणायची वेळ अधिकृत आकडेवारीमुळे आली आहे.
नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!, नेपाळमध्ये शपथविधीच्याच दिवशी घडले.
महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली राजकीय अपरिहार्यता आणि ठाकरे बंधूंच्या पक्षांना निर्माण झालेला राजकीय अस्तित्वाचा धोका या संमिश्र राजकीय वातावरणाचा परिणाम म्हणून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मध्ये पुन्हा एकदा बेबनावाची काडी घालणे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App