नाशिक : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी मुंबईत एकत्रित बैठक घेतली, पण महाविकास आघाडीच्या या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. […]
नाशिक : एकीकडे शरद पवार आजारी असताना आणि तरीसुद्धा शरद पवार गटाने त्यांच्याच नावाचा आग्रह राज्यसभेसाठी धरला असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र परस्पर […]
आजोबांचा नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला!!, हेच राजकीय चित्र आज दिल्लीतून समोर आले. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी गेले
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरण झाले असते, तर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार होते
मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा आणि विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!, असलाच प्रकार रोहित पवारांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून समोर आला.
शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!, अशी राजकीय घडामोड आज घडली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या मार्फत शरद पवारांनी स्वतःच्याच नावाचा “वजीर” पुढे सरकवला
एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवर जबाबदारी ढकलली, अशी पुन्हा एकदा पवारांनी “डबल गेम” खेळली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदा घ्यायला लावले जात आहे, ते पाहता रोहित पवारांचा “राहुल गांधी” आणि “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या झाल्यात आणि शरद पवार सुद्धा “सुरक्षित” राहिलेत, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांच्या मनानुसार आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे लक्षात येताच रोहित पवारांनी आपले सगळे लक्ष अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर केंद्रित केले.
अजितदादांच्या अपघाताविषयी संभ्रम आणि संशयाच्या जाळ्यात; रोहित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीय तोट्यात!!, हेच राजकीय चित्र आता कायमचे टिकून राहण्याची शक्यता आहे.
अंजली दमानियांचा आरोप; खारगे समितीचा अहवाल निव्वळ धुळफेक; विजय कुंभारांचा आरोप
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला सरकारी यंत्रणा विलंब लावत असल्याचा आरोप करून अपघाताचा तपास खाजगी गुप्तहेर संस्थांकडे सोपवून रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात कायमचा खोडा घातला.
मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टीपू सुलतानचा फोटो लावल्याने राज्यात मोठा वादंग झाला. या फोटोला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला.
जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची अख्खी बसत नाही मांड तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!, हीच राजकीय वस्तुस्थिती सुनेत्रा पवारांच्या गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय कृती आणि हालचालींमधून समोर आली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजितदादांची “चूक” काढताच सुनील तटकरे यांनी गंभीर इशारा दिला. या गंभीर इशार्याचा अर्थ एवढाच की शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणात मोठा खोडा घालून ठेवला.
कुठल्याही पवारांनीच सत्ता भोगायची, पण इतरांवर फोडायचे खापर; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी ही तर मोठी तडफड!!, हेच राजकीय वास्तव आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वक्तव्यांमधून समोर आले.
रोहित पवार हे नवे राहुल गांधी बनलेत की ते संजय राऊत इन मेकिंग बनत चाललेत??, असा सवाल विचारायची वेळ त्यांच्याच गेल्या तीन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून पुढे आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर 14 दिवसांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत येऊन भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुत्र पार्थ आणि जय पवार होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीलाच मोठ्या गाठीभेटी घेतल्या. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानिमित्ताने पवार कुटुंबाची “डबल गेमच” राजधानीतून समोर आली.
अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??, असा सवाल समोर आलाय.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालात शिंदे सेनेला मागे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास, पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!,
जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल कुणी संशय आणि संदेह पसरवेल तितके दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण दूरच जाईल.
अजितदारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच उरली की काय??, अशी शंका येणारी आकडेवारी साम टीव्हीने घेतलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या एक्झिट पोल मधून समोर आली.
संजय राऊत यांनी आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत शरद पवारांना महाविकास आघाडी कडून राज्यसभेची निवडणूक लढवायची “ऑफर” दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुढे रेटू शकतील का??,
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App