दिल्लीतून महाराष्ट्रात आपल्या स्वार्थाचे राजकारण साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मात्र मतदारांनी जोरदार धक्का दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या नगरपरिषदेतली सत्ता सुद्धा राखता आली नाही.
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरण्याची भाषा करणाऱ्या शरद पवारांवर पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात स्व पक्ष विलीन करण्याची वेळ आली, ती सुद्धा अमित शहांच्या परवानगीने!! अशी राजकीय परिस्थिती शरद पवारांवर आज ओढवली.
संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने अनेक बिले मांडली आणि ती पास करून घेतली तरीसुद्धा काँग्रेसच्या दृष्टीने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची वेगळीच फलश्रुती झाली.
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खोडा; मुंबईत 22 जागांचा वाटा मागून घालणार कोलदंडा!!, अशी राजकीय खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केल्याचे समोर आले.
लोकांची मते मिळवण्यासाठी “नैसर्गिक युती” आणि सत्ता भोगण्यासाठी “महायुती”!!, ही राजकीय दुटप्पी भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये समोर आली आहे.
चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटेंना एक न्याय लावून त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्याच्या आधी त्यांची मंत्रिपदाची खाती काढून घेतली.
अजितदादांची विरोधकांकडून नव्हे, तर भाजपकडून चोहोबाजूंनी कोंडी; माणिकरावांपासून पार्थ पर्यंत उडाली दांडी!!, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हीच राजकीय अवस्था महाराष्ट्रात दिसून राहिलीय.
Epstein files उघडण्याच्या निमित्ताने 19 डिसेंबर 2025 रोजी भारताचा राजकारणात असा काही भूकंप होईल की, ज्यामुळे मराठी माणसाला पंतप्रधान पदाची संधी मिळेल, असे राजकीय भाकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून मोठी राळ उडवून दिली.
MGNREGA अर्थात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचे नामांतर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नवी विकसित भारत ग्रामीण रोजगार योजना VB – G RAM G मांडली. पण ती मांडताना पंतप्रधान मोदींनी जी राजकीय चतुराई केली
राहुल गांधींनी Vote Chori आणि मतदार यादी सुधारणा अर्थात SlR विरोधात कितीही आदळआपट केली, तरी Vote Chori चा मुद्दा भाजपच्या बाबतीत खरा नाही, तर तो इतर प्रादेशिक पक्षांच्याच बाबतीत खरा आहे. इतर प्रादेशिक पक्ष बनावट मतदार बनवून वाट चोरी करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेसच्याच नेत्यांनी करून राहुल गांधींच्या आरोपांमधली हवा काढून टाकली
नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे देशातल्या लिबरल लोकांच्या वर्तुळाला पहिला धक्का बसला.
काँग्रेसी चष्म्यातून भाजपचे विश्लेषण; मुख्य प्रवाहातील माध्यमे पडली तोंडावर!!, असेच काय ते नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध माध्यमांनी केलेल्या माखलाशीचे वर्णन करावे लागेल.
मोदींच्या भाजपने आज पुन्हा नवा धक्का दिला ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड पुन्हा मोडला. बिहार मधले मंत्री नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या समस्त मोदी समर्थक आणि मोदी विरोधक पत्रकारांचा पुरता पचका केला.
जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा दौरा झाला, त्याच दिवशी काँग्रेसने कम्युनिस्टांना आणि ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला.
केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांनी भाजपची तिथे घोड्यावरून एन्ट्री केली, तर काँग्रेसची हत्तीवरून केली पण त्यामुळेच हत्तीवर बसविलेले नेते त्याच्यावर स्थिर राहतील का??, हा सवाल तयार झाला.
केरळ मधल्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा पराभव झाला आणि काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट जिंकले, ही झाली जुनी बातमी.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पवार काका – पुतणे एकत्र येणार पवार हळूच मागच्या दाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःचीच राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करून टाकणार अजित पवारांकडे पक्षाची सूत्रे सोपवणार इथपासून ते अजित पवारांची शरद पवार तडजोड करायला तयार आहेत
मुंबई परिसरातल्या नऊ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची सफल चर्चा झाली, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मात्र भाजपने अजितदादांना धक्का द्यायचे ठरविले.
महाराष्ट्रातल्या महायुती सरकार मध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या “डबल गेमा” सुरू आहेत.
वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच बदनामी का करता??, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत केला
वंदे मातरम वरील लोकसभेतल्या चर्चेत नवीन काहीच नाही नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!! या मुद्द्यांभोवतीच सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा केंद्रित ठेवली
पश्चिम बंगाल मधले आमदार हुमायून कबीर यांनी सहा डिसेंबरला आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांग मध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली. पण यातून ममता बॅनर्जींच्या दुटप्पी राजकारणाची नीतीच समोर आली.
पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचं म्हणणं पवारांनी ऐकलं??; पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नाही??, असा सवाल विचारायची वेळ प्रशांत जगताप यांच्याच आजच्या वक्तव्याने आली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणाच्याही दबावाखाली बिलकूल काम करत नसल्याचा निर्वाळा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी दिला.
एरवी मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या ममता बॅनर्जींनी सुद्धा बाबरीची धास्ती घेतली. पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची त्यांनी तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी करून टाकली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App