राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या Muslim outreach मध्ये ज्यांनी भाग घेतला, संघाने ज्यांच्याशी संवाद साधला, त्या मौलानानेच मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मुसलमान बनायला सांगितले.
एकीकडे महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकींची रणधुमाळी उडाली असताना दुसरीकडे मुंबईत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा हाय प्रोफाईल विवाह सोहळा निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने वेगवेगळी कायदेशीर कारणे देऊन महाराष्ट्रातल्या 22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या.
महाराष्ट्रातील नगरपंचायती, नगरपालिकांची निवडणूक शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी “सोडून” दिली.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लवकरच काँग्रेसमध्ये फूट पडेल असे राजकीय भाकीत केले होते.
दोघांत तिसरा यायची वाटली भीती, म्हणून कर्नाटकात झाली दोघांची “युती”!!, हेच खरे चित्र कर्नाटक आणि दिल्लीतून एकत्रित रित्या समोर आले.
जिथे भाजपला कुणी नव्हते विचारत; तिथे पक्षाला आणि NDA ला उमेदवार मिळाले 21 हजार 65!!, हा राजकीय चमत्कार केरळ मध्ये दिसून आला.
महाराष्ट्रातली नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक शिगेला पोहोचली पण तरीसुद्धा शरद पवारांनी अजून विरोधकांना “हा” सवाल का नाही विचारला
बुडत्याला दिसली आधाराची काडी; पवारांच्या नेत्याने पाहिली भविष्याची नांदी!!, असेच म्हणायची वेळ पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाषणामुळे आली.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीने बरेच झोल केले. याची सगळी यादी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविली.
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती, नगरपरिषदांच्या काही निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना लोकशाही टिकण्याविषयी चिंता वाटायला लागली. त्यांनी पत्रकार परिषदांमधून आणि सोशल मीडिया पोस्ट मधून ती चिंता जाहीरपणे व्यक्त केली.
बारामती आणि माळेगाव या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून अजून तरी सुप्रिया सुळे दूर आहेत कारण इथेही शरद पवारांनी Game केली आहे.
अजित पवारांनी बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार उमेदवारांना 20 – 20 लाख रुपये देऊन त्यांना माघार घ्यायला लावली.
एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात भाजपने स्वबळाचा असा काही तडाखा दिलाय, की त्यामुळे अजितदादांना शरद पवारांचा पक्ष फोडावा लागला. उमेदवार आयात करावे लागले आणि आपल्या पारंपरिक विरोधकांशी तडजोड करावी लागली
G20 चे नव्या अलिप्त राष्ट्र संघटनेमध्ये रूपांतर; नरेंद्र मोदी ठरले जवाहरलाल नेहरूंची replacement!!, असे राजकीय चित्र दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग मध्ये भरलेल्या जी 20 शिखर परिषदेतून समोर आले.
नाराज बिराज काही नाही एकनाथ शिंदेही तेवढेच “तयार”; भाजपला जे जमले नाही ते करून दाखविणार!!, राजकीय चित्र एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून समोर आले.
लोकप्रतिनिधींना सन्मान द्या. त्यांनी लिहिलेल्या पत्रांना वेळेत उत्तरे द्या. जिल्हा तालुक्यांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शासकीय प्रोटोकॉल पाळा वगैरे आदेश देणाऱ्या GR म्हणजेच शासनादेश राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला काढावा लागला.
मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू यांनी स्वतंत्र भूमिका जाहीर करत मुंबई महापालिका निवडणुका लढवायचे निर्णय घेतले
कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा दिला. भाजपच्या स्वबळाने अजितदादांच्या राष्ट्रवादीला असा फटका दिला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये टिकवून धरायचे आहे, म्हणून तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काल गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना भेटीची वेळ देऊन प्रत्यक्ष भेट दिली
राष्ट्रवादीतल्या “दादा” लोकांना भाजपने केले “सरळ”; स्थानिकच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीतच आणले गुडघ्यांवर!!, असे राजकीय चित्र नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या काही विशिष्ट जिल्हे आणि शहरांच्या अंतर्गत राजकारणातून समोर आले.
पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!, ही अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय अवस्था येऊन ठेपली आहे.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर आली, पण या दोन्हीकडे “पवार संस्कारितांनीच” आपली भांडणे उघड्यावर आणली.
बांगलादेश स्वतंत्र करण्याची शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागली “किंमत”; हीच खरी मोहम्मद युनूस नावाच्या पाकिस्तानी मनोवृत्तीची फ़ितरत!!, याचा अनुभव पुन्हा एकदा बांगलादेशात आला.
कसली आलीय vote chori??; कमी करा सीना जोरी!! हा सल्ला दुसरा तिसरा कुणी नाही, तर काँग्रेस प्रेमी पत्रकारांनीच राहुल गांधींना आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिलाय.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App