सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार ब्रँड लै मोठे आहेत, तर ते मुंबई + ठाण्यात आणि पुणे + पिंपरी चिंचवड मध्येच काय अडकलेत??, असा सवाल महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने समोर आलाय.
लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढल्यावर काँग्रेसवाले भडकले
दोन्ही मुलांना व्यवस्थित settle करून नारायण राणे सन्मानाने निवृत्तीच्या दिशेने निघालेत…, पण महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्याला अजून काही निवृत्त होण्याचा विचार मनाला शिवत नाही. मनाला शिवला, तरी तो अंमलात आणता येत नाही.
एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.
अजितदादांना बरोबर घेऊन भाजपला पश्चाताप; तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन काँग्रेसला डोक्याला ताप!!, हेच राजकीय चित्र महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच समोर आले. कारण अजितदादा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आपापल्याच मित्र पक्षांना अडचणीत आणले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवरच दुगाण्या झोडल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी आपल्या सोयीचे राजकारण साधून घेतले.
वेळीच वेसण घातली नाही म्हणून हिंमत झाली, असे म्हणायची वेळ अजित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली. अजित पवारांनी पिंपरी – चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आणि राज्य सहकारी बँक लुटली, असे आरोप त्याच अजित पवारांना टोचली भाजपची “राक्षसी भूक”!!, हे राजकीय सत्य आज पिंपरी चिंचवड मधून बाहेर आले.
मुंबईचा 29 महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्या युत्या आणि आघाड्या मोडल्या तरी त्यात उमेदवारीच्या आकडेवारीच्या बाबतीत भाजप आणि ठाकरे बंधू इतर पक्षांवर सरस ठरले. भाजपने महायुतीतून अजित पवारांना एकाकी पाडले
भाजपचे काँग्रेसीकरण; नवे प्रयोग करतानाही शिस्तीला ग्रहण!!, हेच राजकीय चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले.
वंचित बहुजन आघाडीला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??, असा सवाल विचारायची वेळ वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाने मुंबईत आणली.
मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये युती तुटली. कारण भाजप आणि शिवसेना यांना स्वबळाची खुमखुमी आली.
आमदार खासदारांच्या मुलांना तिकिटे दिली जाणार नाहीत असे धोरण भाजपने नाशिक मध्ये जाहीर केले.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे आणि काँग्रेसच्या निर्णय असा झाला, की आधी पवार काका – पुतण्यांच्या पक्षांच्या यशात पाचर मारायची, नंतर भाजपशी लढत द्यायची!!.
मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था एखाद्या लटकत्या खेळण्यासारखी झाली. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या पेक्षा सहा पट कमी लेखले.
महाराष्ट्रात फार मोठा राजकीय संगर होऊन ठाकरे बंधू ठरले लढवय्ये; पण शरद पवार ठरले पुतण्या पुढे शरणागत!!, हेच राजकीय वास्तव चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आज समोर आले.
मुंबई, पुणे, नाशिक यांच्यासह बहुतेक महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे कुठल्याही पक्षात विलीनीकरण झाले नाही, तर त्यांनी स्व हस्ते पक्षाची वाताहत करून घेतली. यशवंतराव चव्हाण यांनी दिग्गज नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित बहुजन आघाडीला ठरविली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा सहा पट भारी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
शरद पवारांच्या बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम झाला. त्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून विद्या प्रतिष्ठानने शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले; पुतण्याच्या आवाजामुळे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकीपुढे तुतारीचा आवाज पिचकला!!,
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App