मोदींचे आज रात्री ८.३० वाजता भाषण; कोणत्या दिशेने राजकीय लढाई नेऊन देणार महिला आरक्षण??, जनमताचा नवा कौल की अन्य काही??
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज रात्री ८.३० वाजता भाषण; कोणत्या दिशेने राजकीय लढाई नेऊन देणार महिला आरक्षण??, असा सवाल आज समोर आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज रात्री ८.३० वाजता भाषण; कोणत्या दिशेने राजकीय लढाई नेऊन देणार महिला आरक्षण??, असा सवाल आज समोर आला.
सुमारे 12 वर्षांच्या लष्करी उपस्थितीनंतर अमेरिकेने सीरियातून आपले सर्व सैनिक काढून घेतले आहेत आणि लष्करी तळ रिकामे केले आहेत. एप्रिल 2026 मध्ये हसाका येथील कसराक एअरबेसवरून शेवटचा अमेरिकन ताफा बाहेर पडला. त्यानंतर सीरियन सरकारने सर्व तळ आपल्या ताब्यात घेतले.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीदरम्यान, अभिनेत्रीने माहिती दिली की ती या प्रकरणात तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोट यांनी नुकतेच लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्ला चढवला. गुरुवारी कंगना म्हणाल्या, ‘2024 मध्ये जेव्हा मला तिकीट मिळालं, तेव्हा माझा एक फोटो लावून आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या प्रवक्त्याने लिहिलं होतं- मंडीत काय भाव चालला आहे.’
लोकसभेत काल महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयके फेटाळून लावल्यानंतर मोदी सरकार आक्रमक झाले. भाजपच्या नेत्यांनी विधेयके फेटाळण्याचे सगळे खापर काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर फोडले.
ठाणे महानगरपालिकेच्या ‘एमआयएम’ पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना करारा जवाब मिळेल,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर केल्यानंतर आम्ही महिला आरक्षणाला विरोध केला नाही फक्त परिसीमनाला विरोध केला, असे सांगत फिरायची वेळ काँग्रेसच्या नेत्यांवर आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे २०२९ च्या निवडणुकांपासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी प्रयत्न केंद्र सरकारने केला. मात्र, दुर्दैवाने राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या विधायक प्रयत्नात अडसर आल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती,” असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीशांनी सांगितले की, एफआयआर (FIR) दाखल करून हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) हस्तांतरित करावे.
इराणने होर्मुज मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर 13% नी स्वस्त झाले आहेत. शुक्रवार, 17 एप्रिल रोजी दर सुमारे 13 डॉलरने घसरून 86 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.
महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यात सरकारला अपयश आले. ‘१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक, २०२६’ मध्ये एकूण जागांची संख्या वाढवून ८५० करण्याच्या तरतुदींचा समावेश होता.
सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाच्या काळात, इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पूर्णपणे पुन्हा खुली केली आहे. परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये जाहीर केले की, सर्व व्यापारी जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी असेल. लेबनॉनमधील युद्धविरामानंतर हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभा परिसीमन विधेयके पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी हर्षवायू झाल्यासारखे लिहिले भारत ने देख लिया, INDIA ने रोक दिया!!, राहुल गांधींच्या या लिहिण्यामुळेच लाडक्या बहिणी कसा आणि कुठे देतील फटका??, असा सवाल ताबडतोब समोर आला.
दिल्ली विमानतळावर गुरुवारी दुपारी २ वाजता पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या अकासा एअरलाइनच्या विमानाला स्पाईसजेटच्या विमानाची धडक बसली. दोन्ही विमानांचे नुकसान झाले आहे. या अपघातात प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
: महिला आरक्षण आणि लोकसभा – विधानसभांचे परिसीमन म्हणजेच सदस्य संख्यावाढ ही विधेयके लोकसभेने आज दोन तृतीयांश बहुमताच्या अभावी नामंजूर केली. महिलांना 33 % आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी आज लोकसभेतून खोडा घातला. लोकसभा सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या आधारे विधेयकाच्या बाजूने 278 मते दिली,
राहुल गांधींकडे ब्रिटिश आणि भारतीय असे दुहेरी नागरिकत्व असेल तर CBI तपास करा. त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करा, असे स्पष्ट आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज दिले. राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या संदर्भात FIR दाखल करून हे प्रकरण CBI कडे हस्तांतरित करावे, असे आदेश सुद्धा खंडपीठाने दिले. त्यामुळे राहुल गांधींच्या राजकीय आणि वैयक्तिक अडचणीत भर पडली. कर्नाटक भाजपचे कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांनी राहुल गांधींवर ब्रिटिश नागरिकत्व घेतल्याचा आरोप केला होता.
रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने अंबानींच्या त्या याचिकेवर दिलासा देण्यास नकार दिला आहे, ज्यात त्यांनी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान दिले होते, जो बँकांना त्यांच्या कर्ज खात्याला ‘फ्रॉड’ (फसवणूक) घोषित करण्याची परवानगी देतो.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी देशात मतदान अनिवार्य करण्याच्या मागणीवरील याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, असा आदेश धोरणात्मक कक्षेत येतो आणि न्यायपालिका तो जारी करू शकत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (16 एप्रिल) निवडणूक आयोगाला पश्चिम बंगालमध्ये पूरक मतदार यादी जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये अशा मतदारांचा समावेश करावा, ज्यांच्या अपीलांवर न्यायाधिकरणाने (ट्रिब्यूनलने) निर्णय दिला आहे. ज्या लोकांची अपील प्रलंबित आहेत, त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मोदी सरकारची चलाखी; प्रियांका गांधींची कबुली!!, हेच राजकीय वास्तव प्रियांका गांधींनी महिला आरक्षण आणि लोकसभा परिसीमन विधेयकांवर केलेल्या भाषणातून समोर आले.
अमेरिकेत अणू आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू आणि बेपत्ता होण्याच्या प्रकरणांवरून आता व्हाईट हाऊस प्रश्नांच्या घेऱ्यात आहे. 2023 पासून आतापर्यंत अशी 10 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये शास्त्रज्ञ किंवा अधिकारी एकतर बेपत्ता झाले किंवा संशयास्पद परिस्थितीत मरण पावले.
नाशिक मधले TCS कार्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच मराठी माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!, असलाच प्रकार गेल्या दोन दिवसांपासून समोर आला.