महाराष्ट्रात ब्लॉकचेन – एआयच्या मदतीने जात पडताळणी; आदिवासी विकासाला नवी गती!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची 52 वी बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची 52 वी बैठक झाली.
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे किंवा सरकारविरोधात घोषणा दिल्या आहेत. ते म्हणाले- विरोध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? अशा घोषणांसाठी हद्दपारीचा आदेश का?
राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या हिताचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले असून, एका बाजूला शेतीच्या कामासाठी लागणारे गौणखनिज मोफत करण्याचा मोठा निर्णय महसूलमंत्र्यांनी जाहीर केला आहे, तर दुसरीकडे महिलांना ‘स्वतंत्र शेतकरी’ म्हणून ओळख देणारे ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्य आणि नेत्यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना बच्चू कडू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आणि अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटावर आज जी बिकट वेळ आली आहे, त्याला केवळ राऊतच जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.
राज्यात मान्सूनने आता जोर पकडला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आता पुढील 48 तासांतील हवामानाकडे लागल्या आहेत.
मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निष्काळजी कारभारामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालिका प्रशासनावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत असून, चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील आर्थिक खुलाशातून त्यांच्या संपत्तीच्या स्रोतामध्ये मोठा बदल समोर आला आहे. आता क्रिप्टोकरन्सी ट्रम्प यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत बनली आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय बारगळल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेस पक्षात विलीन करायच्या बातम्या सुरू झाल्या. या बातम्यांना आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हवा दिली.
चार दिवसांत समोरच्याला प्रेमात पाडा.’ हा काही फिल्मी डायलॉग नाही, तर म्यानमारमधील सायबर स्कॅम सेंटर्समध्ये काम करणाऱ्यांना दिला जाणारा आदेश आहे. डिजिटल जगात विश्वास आणि भावनांना शस्त्र बनवून चाललेल्या सायबर महाफसवणुकीच्या कारखान्यात नोकरीचे आमिष दाखवून भारत आणि इतर अनेक देशांतून तस्करी करून आणलेले तरुण-तरुणी सामील आहेत.
भारत आणि अमेरिका, भारत आणि युरोप यांच्यातल्या मुक्त व्यापार करारांची अजून चर्चाच सुरू असताना भारत आणि जपान यांच्यात मात्र व्यापार वृद्धी अनेक क्षेत्रांचा विस्तार या विषयावर व्यापक विचार विनिमय झाला.
तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचे सरकार पाडण्यासाठी तमिलगा वेत्री कळगम (टीव्हीके) च्या आमदारांना 35 कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने दावा केला आहे की, त्यांनी राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या कथित कटाचा पर्दाफाश केला आहे.
आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीतील इंद्रायणी घाट विकास प्रकल्प युद्धपातळीवर सुरू असून, वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १३.०८ कोटींच्या विकासकामांना गती देण्यात आली आहे.
जून 2026 मध्ये 1.94 लाख कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. हे एप्रिलमधील विक्रमी 2.42 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 20% कमी आहे. तथापि, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या म्हणजेच जून 2025 च्या तुलनेत ते 14% जास्त आहे. जून 2025 मध्ये ₹1.71 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. सरकारने आज म्हणजेच 1 जुलै रोजी GST संकलनाचे आकडे जाहीर केले.
भारत आणि जपान व्यापारात अमेरिकन डॉलरची भूमिका कमी करण्याच्या तयारीत आहेत. निक्की एशियाच्या अहवालानुसार, दोन्ही देश अशी व्यवस्था तयार करण्यावर काम करत आहेत, ज्यामुळे व्यवसायाचे पेमेंट थेट भारतीय रुपया आणि जपानी येनमध्ये होऊ शकेल.
पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याचा आरोप झालेल्या मध्य प्रदेशातील दंतवैद्य मुस्कान सोनी हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने मुस्कान सोनीला संघटनेतून पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे.
राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी अविनाश शुक्लाच्या अयोध्येतील योग केंद्रातून पोलिसांनी एक पेटी जप्त केली आहे. त्यावर लाल रंगाने ‘रामराज्य कोष’ असे लिहिले होते. पेटीएमचा QR कोड लावलेला होता. 28 जून रोजी झालेल्या या छापामारीचा व्हिडिओ बुधवारी सकाळी समोर आला.
भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांतील 117 मान्यवरांनी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले आहे.
भारताने सिंधू जलकरार आवळून धरल्यामुळे एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चेची तहान; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!, असला प्रकार समोर आलाय.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर अखेर शिवसेना (शिंदे गट) नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला होता, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट)चे जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात होते.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत त्यांनी सचिन अहिर यांच्या निर्णयाचे समर्थन केले.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली. राज्यातील विनापरवाना IVF केंद्रे, गर्भलिंग निदानातील गैरप्रकार, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील रिक्त पदे, पीकविमा, तसेच जळगाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील जलद न्यायाच्या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी IVF गैरप्रकारांवर MCOCA लागू करण्यासाठी पुढील अधिवेशनात कायदेशीर तरतूद करण्याची घोषणा करत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.