Mizoram-Assam Dispute : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मिझोराम आणि आसामने सीमा विवादांवर चर्चा केली आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे मान्य केले. यासह मिझोरामला प्रवास न करण्यासंबंधी पूर्वी दिलेला सल्ला आसाम सरकार मागे घेणार असल्याचेही सांगण्यात आले. Joint Statement On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मिझोराम आणि आसामने सीमा विवादांवर चर्चा केली आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे मान्य केले. यासह मिझोरामला प्रवास न करण्यासंबंधी पूर्वी दिलेला सल्ला आसाम सरकार मागे घेणार असल्याचेही सांगण्यात आले.
आसाम आणि मिझोराम यांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, गृहमंत्रालय आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सीमेवरील तणाव संपवण्यासाठी आणि चर्चेद्वारे समस्येवर तोडगा काढण्यासाठी उचललेल्या पावलांवर ते पुढे जातील. संयुक्त निवेदनात, आसाम आणि मिझोराम यांनी आंतरराज्य सीमेवरील भागात शांतता राखण्यासाठी सहमती दर्शविली आहे. दोन्ही राज्ये संघर्षाच्या ठिकाणी गस्तीसाठी पोलीस दल पाठवणार नाहीत. यासह तेथे अतिरिक्त सैन्य तैनात केले जाणार नाही.
Assam & Mizoram, in a joint statement, agree to maintain peace in inter-state border areas; The 2 states will not send their respective Forest & Police forces for patrolling, domination, enforcement/for fresh deployment to any areas where confrontation has taken place recently — ANI (@ANI) August 5, 2021
Assam & Mizoram, in a joint statement, agree to maintain peace in inter-state border areas; The 2 states will not send their respective Forest & Police forces for patrolling, domination, enforcement/for fresh deployment to any areas where confrontation has taken place recently
— ANI (@ANI) August 5, 2021
दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा विवादाने 26 जुलै रोजी रक्तरंजित संघर्षाचे रूप धारण केले होते. ज्यामध्ये आसामचे 6 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक ठार झाला होता, तर सुमारे 50 लोक जखमी झाले होते. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी बुधवारी ट्विटरद्वारे सांगितले की, दोन्ही राज्यांच्या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा आहे.
त्यांनी ट्विट केले, “उद्या 5 ऑगस्ट 2021 रोजी आसाम सरकारचे प्रतिनिधी एका वरिष्ठ मंत्र्याच्या नेतृत्वाखाली मिझोराम सरकारच्या शिष्टमंडळाला भेटतील. मला खात्री आहे की, यामुळे सीमा विवाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा करार होईल.
Joint Statement On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App