वृत्तसंस्था
गुरुग्राम, (हरियाणा) : राम मंदिर देणगीतील कथित अफरातफर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत चंपत राय यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणे अपेक्षित असताना विश्व हिंदू परिषदेचे सह – महामंत्री सुरेंद्र जैन यांनी एक सूचक विधान केले. त्यांनी या बैठकीला चंपत राय हे सुद्धा उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे सांगितले. ज्या बैठकीत चंपत राय यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे, त्याच बैठकीला चंपत राय यांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे, असे वक्तव्य समोर आल्याने चंपत राय यांच्यावरच्या कठोर कारवाई विषयी संशय उत्पन्न व्हायला वाव मिळाला आहे.
#WATCH | Gurgram, Haryana | On the alleged Ram Mandir donation embezzlement case, VHP Joint General Secretary Surendra Jain says, "… We want the investigation to be conducted transparently, impartially, and without any pressure. That is why we have shifted our meeting to Delhi.… pic.twitter.com/v99m0Gyke2 — ANI (@ANI) July 5, 2026
#WATCH | Gurgram, Haryana | On the alleged Ram Mandir donation embezzlement case, VHP Joint General Secretary Surendra Jain says, "… We want the investigation to be conducted transparently, impartially, and without any pressure. That is why we have shifted our meeting to Delhi.… pic.twitter.com/v99m0Gyke2
— ANI (@ANI) July 5, 2026
– सुरेंद्र जैन यांचे वक्तव्य
विश्व हिंदू परिषदेचे (VHP) सह-महामंत्री सुरेंद्र जैन म्हणाले, “राम मंदिरातील चोरी संदर्भात चौकशी पारदर्शक, निष्पक्ष आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावी असे वाटते. म्हणूनच आम्ही आमची बैठक दिल्लीला हलवली आहे. चंपत राय हे आमचे उपाध्यक्ष आहेत. राम जन्मभूमीशी संबंधित कामांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते कधीकधी बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत. ते उपस्थित राहतील की नाही, याचे उत्तर केवळ तेच देऊ शकतात. पण ते सहभागी होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
– २० हजार कोटींचा आकडा आला कुठून??
सुरेंद्र जैन पुढे म्हणाले, “काही राजकारणी दररोज जे हास्यास्पद आणि निराधार आरोप करत आहेत, ते आक्षेपार्ह आहेत. उदाहरणार्थ, राम गोपाल यादव यांनाच घ्या. त्यांचा इतिहास पाहता प्रभू श्रीरामांना त्यांचा तीव्र विरोध असल्याचे दिसून येते. त्यांनीच असा दावा केला होता की रामाने बाबरी मशिदीवर ताबा मिळवला होता, असे असूनही, ते आता स्वतःला रामभक्त म्हणवून घेत आहेत आणि २०,००० कोटी रुपयांच्या चोरीचा आरोप करत आहेत. ही माहिती त्यांना कुठून मिळाली??
– केजरीवाल, प्रियंकाच्या चौकशीची मागणी
त्याचप्रमाणे केजरीवाल यांचा विचार करा; जे काही काळापूर्वी म्हणत होते की ते राम जन्मभूमीला भेट देणार नाहीत आणि ज्यांच्या पक्षाचे सदस्य म्हणायचे की ‘तिथे कुत्राही जाणार नाही’, तेच आता रामभक्त म्हणून तिथे जात आहेत. तरीही, ते दागिने आणि निधीबाबत चोरीचे आरोप करत आहेत. प्रियांका वाड्रा आणि इतरही यात सामील झाले आहेत, परंतु या दाव्यांसाठी कोणाकडेही कोणताही आधार किंवा पुरावा नाही. म्हणूनच आम्ही मागणी केली आहे की एसआयटी (SIT) आणि तपास अधिकाऱ्यांनी या व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावावे. कोणीही खोटे आरोप करायचे, खळबळ निर्माण करायची आणि नंतर मोकळेपणाने निघून जायचे, हे आता चालणार नाही. आम्ही त्यांना असे करू देणार नाही. आमची कायदेशीर टीम या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App