विशेष प्रतिनिधी
मुंबई : Parinay Phuke त्रिभाषा धोरणाचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर, ठाकरे गट आणि मनसेने उद्या (5 जुलै) रोजी वरळी डोम येथे संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, या मेळाव्यावर भाजपकडून जोरदार टीका होत असून, भाजप आमदार परिणय फुके यांनी खास कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.Parinay Phuke
या मेळाव्यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजप आमदार परिणय फुके यांनी यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत हा मेळावा म्हणजे “आभार मेळावा” हवा होता, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आभार मानायला हवे होते, असे विधान केले. फुके यांनी सभागृहात सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. कवितेमध्ये त्यांनी दोन्ही पक्षांच्या भूमिकांवर आणि त्यांच्या राजकीय पलट्यांवर उपहासात्मक शैलीत शब्दप्रहार केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App