अभिषेक शर्माने बॅट आणि बॉलने केला चमत्कार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : India beat England भारताने पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. वानखेडे येथे खेळला गेलेला ५वा टी-२० सामना टीम इंडियाने १५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यासह भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ विकेटच्या मोबदल्यात २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १०.३ षटकांत ९७ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून फिल सॉल्टने सर्वाधिक ५५ धावांची खेळी खेळली. तर भारताकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या. तर अभिषेक शर्मा, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर रवी बिश्नोईला एक विकेट मिळाली.India beat England
२४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर बेन डकेट खाते न उघडताच बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर कर्णधार जोस बटलरही ७ धावा करून बाद झाला. त्याला वरुण चक्रवर्तीने बळी बनवले. यानंतर रवी बिश्नोईने हॅरी ब्रुकच्या रूपाने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. ब्रुक फक्त २ धावा करून बाद झाला.
यानंतर वरुण चक्रवर्तीने लिव्हिंगस्टोनला बाद केले. लिव्हिंगस्टोन ९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शिवम दुबेने भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याने शानदार खेळी खेळणाऱ्या फिल साल्टला बाद केले. साल्टने २३ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले.
अभिषेक शर्माने एकाच षटकात २ विकेट्स घेतल्या.
यानंतर, अभिषेक शर्माने त्याच षटकात २ बळी घेतले. प्रथम त्याने कार्सला ३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. यानंतर जेमी ओव्हरटनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात आला. तो फक्त १ धाव करून बाद झाला. यानंतर, जेकब बेथेल १० धावा काढून शिवम दुबेचा बळी ठरला. त्यानंतर आदिल रशीद ६ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ फक्त ९७ धावांवर ऑलआउट झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App