केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांन विरोधकांच्या गदारोळास ठरवले जबाबदार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Parliament संसदेचे हिवाळी अधिवेशन आज संपले. गदारोळामुळे या वेळी पुन्हा संसदेत कामकाजाची टक्केवारी खूपच कमी होती. अधिवेशनाच्या समारोपावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, विरोधकांकडून संसदेच्या कामकाजात व्यत्यय आला, त्यामुळे संसदेत फार कमी कामकाज झाले.Parliament
रिजिजू म्हणाले की, ‘मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी विचार करावा की संसदेची उत्पादकता का कमी होत आहे. संसदेचे कामकाजाचे प्रमाण 100 टक्क्यांच्या वर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते कमी करू नये. केंद्रीय मंत्री म्हणाले की, संसदेच्या या अधिवेशनात 26 दिवसांत लोकसभेच्या 20 आणि राज्यसभेच्या 19 बैठका झाल्या. या काळात लोकसभेत चार आणि राज्यसभेत तीन विधेयके मंजूर झाली.
गुरुवारी संसदेच्या संकुलात खासदारांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर किरेन रिजिजू म्हणाले, ‘संसदेत घडलेली ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. काही खासदार जखमी झाले. लोकसभेच्या अध्यक्षांनी संसदेत शिस्त पाळण्यासाठी काही नोटिसाही बजावल्या आहेत. संसदेचे कामकाज चालविण्याच्या भूमिकेबद्दल मी सर्व पक्षांच्या अध्यक्षांचे आभार मानतो. संसदेचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांचेही मी त्यांच्या कामाबद्दल आभार मानतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App