लष्करासह संयुक्त सुरक्षा दलांनी इंफाळमध्ये काढला फ्लॅग मार्च
विशेष प्रतिनिधी
जिरिबाम : Manipur हिंसाचारग्रस्त जिरिबाम जिल्ह्यात रविवारी रात्री अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयांना जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, लहान मुलांसह सहा मृतदेह सापडल्यानंतर शनिवारपासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाल्यानंतर लष्करासह संयुक्त सुरक्षा दलांनी रविवारी रात्री इम्फाळमध्ये फ्लॅग मार्च काढला.Manipur
कुकी-जो जमातीची प्रमुख संघटना असलेल्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने रविवारी रात्री सांगितले की, जिरीबाममधील प्रतिस्पर्धी समुदायातील हल्लेखोरांनी शनिवारी रात्री किमान पाच चर्च, एक शाळा, एक पेट्रोल पंप आणि आदिवासींची 14 घरे जाळली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कर, आसाम रायफल्स, बीएसएफ, सीआरपीएफ, मणिपूर पोलीस आणि राज्य कमांडोजने उच्च अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राजधानी इंफाळ आणि त्याच्या बाहेरील भागात रविवारी रात्री फ्लॅग मार्च काढला.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी एका महिलेचा मृतदेह बराक नदीत तरंगताना सापडला. जिरीबामच्या सीमेला लागून असलेल्या कचार जिल्ह्यातील बराक नदीतून आसाम पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर रविवारी जिरीबाममध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला.
रविवारी रात्री संतप्त जमावाने जिरीबाममधील अनेक राजकीय पक्षांची कार्यालये जाळली. हल्ल्याच्या तपशीलाची प्रतीक्षा आहे. इंफाळमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंत्री आणि आमदारांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या जमावाचा भाग असलेल्या २५ जणांना इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही शस्त्रे आणि दारूगोळा, मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.
आसाम रायफल्स, बीएसएफ आणि कमांडोसह राज्य दलांनी शनिवारी आणि रविवारी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या अनेक गोळ्या आणि रबर गोळ्या झाडल्या, 15 हून अधिक लोक जखमी झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App