मात्र, ही निवडणूक पक्ष एकट्याने लढवणार की युती करणार हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.
विशेष प्रतिनिधी
रांची : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान ( Chirag Paswan ) यांनी रविवारी झारखंडमधील विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. आपला पक्ष झारखंड विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, ही निवडणूक पक्ष एकट्याने लढवणार की युती करणार हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.
चिराग पासवान म्हणाले की, त्यांचा पक्ष झारखंड विधानसभा निवडणूक युतीने लढवणार की एकट्याने लढणार या सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे. पासवान यांचे हे विधान देखील मोठे मानले जात आहे कारण एक दिवस अगोदर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी जाहीर केले होते की झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एनडीए घटक ‘ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन’ (एजेएसयू) आणि जनता दल-युनायटेड (JD-U) यांच्यासोबत सामील होईल..
LJP (रामविलास) केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचा एक भाग आहे. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर चिराग पासवान म्हणाले की, एलजेपीची राज्य युनिट युती किंवा एकट्याने निवडणूक लढवण्यासह सर्व पर्यायांवर चर्चा करत आहे.
पासवान म्हणाले की, झारखंडमध्ये एलजेपीचा (रामविलास) भक्कम आधार आहे. माझा जन्म झाला तेव्हा झारखंड हा एकात्म बिहारचा भाग होता. हे माझ्या वडिलांचे कामाचे ठिकाण आहे. राज्यात पक्षाचा भक्कम आधार निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आगामी विधानसभा निवडणूक पक्ष लढवणार हे निश्चित झाले आहे.
तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी म्हटले होते की, ‘भाजप झारखंडची निवडणूक AJSU आणि JDU सोबत लढवेल. मित्रपक्षांसोबत ९९ टक्के जागांवर करार झाला आहे. उर्वरित एक-दोन जागांसाठी बोलणी सुरू असून लवकरच निर्णय होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App