Upendra Dwivedi : ‘मणिपूरमध्ये विश्वास आणि शांतता सुनिश्चित करणे हे मुख्य उद्दिष्ट’,

Upendra Dwivedi

लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांचे राज्य भेटीदरम्यान विधान.


विशेष प्रतिनिधी

हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील मणिपूर राज्याच्या दौऱ्यावर असलेले लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ( Upendra Dwivedi ) म्हणाले की, त्यांच्या मणिपूर दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे जातीय हिंसाचार झालेल्या राज्यात विश्वास आणि शांतता नांदावी हे सुनिश्चित करणे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचीही भेट घेतल्याचे जनरल द्विवेदी यांनी सांगितले. यावेळी दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

लष्करप्रमुख जनरल द्विवेदी म्हणाले, “येथे येण्याचा माझा मुख्य उद्देश मणिपूरमधील आजच्या सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेणे हा होता आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगला समन्वय पाहून मला आनंद झाला. मी सविस्तर चर्चा केली. या राज्यात विश्वास, शांतता आणि स्थैर्य आहे याची खात्री करणे हा मुख्य उद्देश आहे.”



ते पुढे म्हणाले, “माझे भाग्य आहे की मला मुख्यमंत्र्यांना भेटायला मिळाले कारण ते स्टेशनवर होते आणि ही खूप चांगली बैठक होती, खूप उत्साहवर्धक बैठक होती जिथे आम्ही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करू शकलो आणि आम्ही पुढे जाण्याचा मार्ग शोधत होतो. आपण राज्यात शांतता कशी प्रस्थापित करू शकतो आणि सर्व समुदायांना एकत्र कसे आणता येईल जेणेकरून त्यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध वाढतील.

मणिपूरला पोहोचल्यावर लष्करप्रमुखांना ग्राउंड कमांडर्सनी ऑपरेशनल तयारीबद्दल माहिती दिली. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राज्यातील विविध सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांशीही चर्चा केली, ज्यात त्यांनी सामायिक केलेल्या माहितीबद्दल त्यांचे कौतुक केले. आपल्या दौऱ्यात जनरल द्विवेदी यांनी सैनिकांशी संवादही साधला.

Army Chief General Dwivedi’s visit to Manipur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात