विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता असदुद्दीन ओवैसी यांच्याशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात डबल M अर्थात मराठा + मुस्लिम कार्ड खेळायच्या बेतात असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून आता आमदार सदाभाऊ खोत मनोज जरांगे यांना एक खोचक सल्ला दिला. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पिच्छा सोडून आता शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा, असा टोला सदाभाऊ खोत यांनी हाणला. Jarangs should leave Fadnavis and move towards Baramati
सदाभाऊ खोत म्हणाले :
रयत क्रांती संघटनेला यावेळीही भाजपने विधान परिषदेची 1 जागा देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान करून मला संधी दिली. शेवटी आम्ही एका कुटुंबातील आहोत. आम्ही कधीही विचार सोडलेला नव्हता. आम्ही तत्व सोडलेले नव्हते. कोणत्याच पक्षाने घटक पक्षाला येवढा मोठा सन्मान दिलेला नाही. भाजपने महादेव जानकर, विनायक मेटे यांना विधान परिषद दिली होती. तसेच मलाही दुसऱ्यांदा विधान परिषद दिली. भाजपने विस्थापित वर्गाला न्याय दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App