वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटविण्यावर सुप्रीम कोर्टाने वैधतेचे शिक्कामोर्तब करताना केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा द्या, असे आदेश दिल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याची मागणीने जोर पकडला आहे. Supreme Court decision welcomed by Karan Singh
इतकेच नाही, तर राज्यातील 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे आधी राज्याचा दर्जा द्यावा आणि मगच निवडणुका घ्या, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी अधिपती करण सिंह यांनी मोदी सरकारकडे केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
करण सिंहाची मागणी
जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविणे सुप्रीम कोर्टाने वैध ठरविले आहे. न्यायालयाने सर्व बाबींचा बारकाईने विचार केलेला दिसतो. देशातली, आंतरराष्ट्रीय आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पाहूनच सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयाला पोहोचले आहे. निर्णयाचे मी स्वागत करतो, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे केंद्र सरकारने 30 डिसेंबर 2024 या मुदतीच्या आतच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घ्यावी. ती केंद्रशासित प्रदेश म्हणून न घेता संपूर्ण राज्याचा दर्जा देऊन मगच निवडणूक घ्यावी अशी मागणी करण सिंह यांनी केली.
#WATCH दिल्ली: सुप्रीम कोर्ट में संविधान के अनुच्छेद 370 को निरस्त करने वाले राष्ट्रपति के आदेश की वैधता को बरकरार रखने पर कांग्रेस नेता कर्ण सिंह ने कहा, "सुप्रीम कोर्ट ने बहुत बारीकी से हर एक चीज को देखा है। सभी परिस्थितियों को देखते हुए सुप्रीम कोर्ट उस नतीजे पर पहुंची है। मैं… pic.twitter.com/zxkKYBZvaf — ANI_HindiNews (@AHindinews) December 11, 2023
#WATCH दिल्ली: सुप्रीम कोर्ट में संविधान के अनुच्छेद 370 को निरस्त करने वाले राष्ट्रपति के आदेश की वैधता को बरकरार रखने पर कांग्रेस नेता कर्ण सिंह ने कहा, "सुप्रीम कोर्ट ने बहुत बारीकी से हर एक चीज को देखा है। सभी परिस्थितियों को देखते हुए सुप्रीम कोर्ट उस नतीजे पर पहुंची है। मैं… pic.twitter.com/zxkKYBZvaf
— ANI_HindiNews (@AHindinews) December 11, 2023
गुलाम नबी आझाद नाराज
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जम्मू काश्मीर डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाब नवी आझाद यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जम्मू-काश्मीर मधल्या जनतेला जाता येणार नाही, हे खरे. पण मूळात 370 कलम हटविण्यात चूक होते. जम्मू-काश्मीर मधल्या सर्व राजकीय पक्षांचा त्यासाठी कौल घ्यायला हवा होता, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर मधल्या लोकांना दुःख झाले आहे, असे मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आपण निराश आहोत पण हातात नाही आमचा संघर्ष सुरूच राहील, असे ट्विट केले आहे.
#WATCH सुप्रीम कोर्ट ने जम्मू-कश्मीर में अनुच्छेद 370 को हटाए जाने को संवैधानिक रूप से वैध ठहराया। इसपर डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव आज़ाद पार्टी(DPAP) के अध्यक्ष गुलाम नबी आज़ाद ने कहा, "एक उम्मीद थी क्योंकि कई चीज़ों में हमने कहा था कि जो कोर्ट कहेगा वह आखिरी फैसला होगा… मैं… pic.twitter.com/uppj44z5Kc — ANI_HindiNews (@AHindinews) December 11, 2023
#WATCH सुप्रीम कोर्ट ने जम्मू-कश्मीर में अनुच्छेद 370 को हटाए जाने को संवैधानिक रूप से वैध ठहराया।
इसपर डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव आज़ाद पार्टी(DPAP) के अध्यक्ष गुलाम नबी आज़ाद ने कहा, "एक उम्मीद थी क्योंकि कई चीज़ों में हमने कहा था कि जो कोर्ट कहेगा वह आखिरी फैसला होगा… मैं… pic.twitter.com/uppj44z5Kc
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App