प्रतिनिधी
मुंबई : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलन चालवले असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्या संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मोदींनी स्वतः कुस्तीगीरांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सन्माननीय तोडगा काढावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. हे पत्र राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर देखील ट्विट केले आहे.Modiji, attend to the cries of the wrestlers yourself; Raj Thackeray’s letter to the Prime Minister
या कुस्तीगीरांनी आपल्या मेहनतीने देशाला ऑलिंपिक पदके मिळवून दिली आहेत. त्यामुळे 28 मे रोजी त्यांची जशी फरपट झाली तशी पुन्हा होऊ नये. त्यांचा आक्रोश आपण ऐकून स्वतः लक्ष घालून सन्मानजनक तोडगा काढावा, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये.… pic.twitter.com/Qzjivo91xh — Raj Thackeray (@RajThackeray) May 31, 2023
सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये.… pic.twitter.com/Qzjivo91xh
— Raj Thackeray (@RajThackeray) May 31, 2023
मात्र, राज ठाकरे यांनी ज्यांच्या संदर्भात हे पत्र लिहिले आहे, त्याला वेगळा राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. खासदार ब्रजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातले नेते आहेत. राज ठाकरे यांनी जेव्हा 2022 मध्ये आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती, त्यावेळी याच ब्रशभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही कारण त्यांनी मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहार मधले हिंदी बांधवांना अपमानित करणारी व्यक्तव्य केली होती, असा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या या दौऱ्यावरून भाजप विरुद्ध मनसे असे मोठे राजकारण झाले होते. अखेरीस राज ठाकरे यांनी त्यांचा आयोध्या दौरा स्थगित केला होता.
कोलकाता: पहलवानों के समर्थन में पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने हाजरा मोड़ से रवींद्र सदन तक रैली निकाली। मुख्यमंत्री ममता बनर्जी, "हमारी एक टीम पहलवानों से मुलाकात करने जाएगी और उन्हें समर्थन देगी। हम आपके साथ हैं इसलिए आज हमने यह रैली निकाली है। कल भी इसे जारी रखा… pic.twitter.com/FVIuimrAuv — ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2023
कोलकाता: पहलवानों के समर्थन में पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने हाजरा मोड़ से रवींद्र सदन तक रैली निकाली।
मुख्यमंत्री ममता बनर्जी, "हमारी एक टीम पहलवानों से मुलाकात करने जाएगी और उन्हें समर्थन देगी। हम आपके साथ हैं इसलिए आज हमने यह रैली निकाली है। कल भी इसे जारी रखा… pic.twitter.com/FVIuimrAuv
— ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2023
पण त्यानंतर ब्रजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरे संदर्भातली आपली भूमिका सौम्य केली होती. अयोध्येत त्यांचे स्वागत करायला देखील ते तयार झाले होते. या राजकीय पार्श्वभूमीवर ब्रजभूषण सिंह यांच्या प्रकरणात स्वतः मोदींनी लक्ष घालावे, असे पत्र राज ठाकरे यांनी लिहिले आहे. त्याला वेगळे महत्त्व आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App